DNA मराठी

Yogi Adityanath

utter pradesh crime

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही…

Utter Pradesh Crime: मथुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाणखरपूर बसेला गावात, एका सुनेने आपला प्रियकर आदिल याच्याशी संगनमत करून सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना 3 मार्चच्या रात्री 1 च्या सुमारास घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, सासूने सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर दोघांनी सासूच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिचा गुदमरून जीव घेतला. त्यानंतर, सुनेने आपल्या पतीला फोन करून सासूला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा कट रचला, ज्यामुळे कुटुंबाने मृतदेह दफन केले. मात्र मृत महिलेच्या पतीला संशय आल्याने, पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला आणि त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनात मृत्यूचे कारण मानेचे हाड मोडणे आणि गुदमरणे हे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रचला कट पोलिसांच्या चौकशीत असे उघड झाले की, सदर सुनेचे त्याच परिसरात राहणाऱ्या आदिल नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. 3 मार्चच्या रात्री जेव्हा आदिल तिला भेटण्यासाठी घरी आला होता, तेव्हा सासूला जाग आली. त्या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहताच, सासूने यावर आक्षेप घेतला. आपला हा प्रकार उघडकीस येईल या भीतीने, प्रियकर आणि सुनेने संगनमत करून सासूचा जीव घेण्याचे ठरवले त्यांनी सासूच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर उशी दाबून धरली, जोपर्यंत तिचा श्वास पूर्णपणे थांबला नाही. “हार्ट अटॅक”चा बनाव हत्येचा हा प्रकार लपवण्यासाठी सुनेने एक कपटी योजना आखली पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तिने आपल्या पतीला फोन केला आणि त्याची आईला “सायलेंट हार्ट अटॅक” आल्याचा खोटा दावा केला. कोणताही संशय न आल्याने, कुटुंबाने मृतदेहाचे दफन केले. मात्र, मृत महिलेच्या पतीला नंतर काहीसा संशय आला आणि त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. मथुराचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) यांच्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून दफन केलेली जागा खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेतूनच या खळबळजनक हत्येमागील सत्य समोर आले. सत्य उघडकीस आणि आरोपींची अटक एसएसपी (SSP) यांनी स्पष्ट केले की, शवविच्छेदन अहवालाने सुनेने रचलेली खोटी कहाणी पूर्णपणे खोडून काढली आहे. या अहवालातून हे स्पष्टपणे सिद्ध झाले की, त्या महिलेचा मृत्यू मानेचे हाड मोडल्यामुळे आणि गुदमरल्यामुळे झाला होता. पोलिसांनी तातडीने पावले उचलत खुनाचा गुन्हा दाखल केला आणि सून व तिचा प्रियकर आदिल या दोघांनाही अटक करून, त्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात केली.

Utter Pradesh Crime : सून प्रियकारासोबत ‘बेड’ वर आक्षेपार्ह अवस्थेत, अचानक सासूची एन्ट्री अन् सुनेने केलं असं काही… Read More »

harshwardhan sapkal

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी

Harshwardhan Sapkal: मोदी–योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्धवस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या सोबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, तसेच काँग्रेस पक्षाचे व धनगर समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे शिष्टमंडळ मणिकर्णिका घाटाला भेट देऊन भाजपच्या बुलडोझर सरकारने केलेल्या तोडफोडीची पाहणी करणार आहे. मणिकर्णिका घाट हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेला घाट आहे. मात्र ‘विकासाच्या’ गोंडस नावाखाली या घाटाची तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वीही मोदी आणि योगी सरकारने काशी परिसरातील शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. आता मणिकर्णिका घाट, तेथील देवी-देवतांच्या मूर्ती आणि लहान मंदिरे नष्ट करून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा अपमान करण्यात आला आहे. हा प्रकार केवळ अहिल्याबाई होळकर यांचा फक्त वारसाच नाही, तर धनगर समाजाचा, तसेच संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान आहे. भाजप सरकारचे हे कृत्य म्हणजे संस्कृती, परंपरा आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: बुलडोझर लावून उद्ध्वस्त केलेल्या मणिकर्णिका घाटाची हर्षवर्धन सपकाळ करणार पाहणी Read More »

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या बोलेरोची बसशी धडक, 10 भाविकांचा मृत्यू

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारी बोलेरो कार एका बसला धडकली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रयागराज येथे झालेल्या या अपघातात 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर हा अपघात झाला. बोलेरो कार छत्तीसगडहून प्रयागराज येथे महाकुंभाला जात होती, तर बस महाकुंभावरून वाराणसीला परतत होती. टक्कर झाल्यानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व 10 जण अपघाताचे बळी ठरले. त्याच वेळी, बसमधील 19 जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. अपघात इतका भीषण होता की बोलेरोचे तुकडे झाले. गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना खूप मेहनत घ्यावी लागली. अपघाताची संपूर्ण माहितीछत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक संगमात स्नान करण्यासाठी बोलेरो गाडीने प्रयागराजला जात होते. रात्री 2 वाजताच्या सुमारास, जेव्हा त्यांची कार प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावरील मेजा पोलिस स्टेशन परिसरातील मनु के पुरा गावाजवळ पोहोचली, तेव्हा समोरून येणाऱ्या बसशी तिची टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. बोलेरो गाडीचे मोठे नुकसान झाले आणि घटनास्थळी गोंधळ उडाला. बस महाकुंभावरून वाराणसीला जात होतीअपघातानंतर पोलिसांना माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी पोहोचले. बोलेरो गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि लोक तिच्या आत अडकले. जखमींना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबी बोलावला, पण बोलेरोमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाला होता. बसमधील 19 जण जखमी झाले, ज्यांना उपचारासाठी रामनगर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. ही बस मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील भाविकांना घेऊन महाकुंभहून वाराणसीला जात होती. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.

MahaKumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या बोलेरोची बसशी धडक, 10 भाविकांचा मृत्यू Read More »

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

Acharya Satyendra Das Death: अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 85 वर्षीय महंत सत्येंद्र दास यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) च्या न्यूरोलॉजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले- भगवान रामाचे परम भक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! आम्ही भगवान श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकाकुल शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन Read More »

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी

Maharani Laxmi Bai Medical College : उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये शुक्रवारी भीषण आग लागली. त्यामुळे 10 मुलांचा मृत्यू झाला. अन्य 16 मुले जखमी झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी रुग्ण इकडे तिकडे धावू लागले. कुटुंबातील सदस्य मुलांना हातात घेऊन धावताना दिसत होते. यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. आगीच्या वेळी एनआयसीयूमध्ये 54 मुलांना दाखल करण्यात आले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयातून 37 मुलांची सुटका करण्यात आली. आग लागली तेव्हा रुग्णालयातील मुलांच्या वॉर्डमध्ये 54 रुग्ण दाखल होते. डीएम अविनाश कुमार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 12 तासांत अहवाल मागवलाउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. जखमींवर चांगले उपचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त आणि डीआयजींकडून 12 तासांत अहवाल मागवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि आरोग्य सचिव पार्थ सारथी सेन शर्मा मदतकार्यात समन्वय साधण्यासाठी झाशीला पोहोचले आहेत. बचाव आणि मदत कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी डीएम, एसएसपी आणि डीआयजी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले. जखमी 16 मुलांची प्रकृती चिंताजनकएसएसपी सुधा सिंह यांनी सांगितले की, 16 जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत. त्याचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर काही पालक आपल्या मुलांना घरी घेऊन गेल्याचीही माहिती मिळाली आहे. पंतप्रधानांनी घोषणा केली – मृत मुलांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळणारझाशी मेडिकल कॉलेजला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Maharani Laxmi Bai Medical College : शॉर्टसर्किटमुळे रुग्णालयात भीषण आग, 10 मुले जिवंत जाळली, 16 जखमी Read More »

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग दरम्यान झालेल्या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली असून आमचे सरकार या घटनेच्या तळापर्यंत जाऊन कटकारस्थान आणि जबाबदार व्यक्तींना योग्य ती शिक्षा देईल, असे म्हटले आहे. यासोबतच राज्य सरकार या घटनेची चौकशी करत असल्याचेही त्यांनी सांगितले.   राजकारण करणाऱ्यांना कडक शब्दात फटकारले आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषदेला संबोधित करताना, सीएम योगी यांनी या घटनेवर राजकारण करणाऱ्या पक्षांनाही फटकारले आणि पीडितांबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी अशा घटनेवर राजकारण करणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे सांगितले.  पीडितांच्या जखमा भरून काढण्याची, पीडितांप्रती सहानुभूती दाखवण्याची हीच वेळ आहे. सरकार या प्रकरणी आधीच संवेदनशील असून कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. सीएम योगी म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. 112 लोकांचा मृत्यू झाला  2 जुलै रोजी हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव येथे भोले बाबांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर उपदेशक मंचावरून खाली उतरत असताना भक्तांचा जमाव त्यांच्या दिशेने सरकत होता. दरम्यान, लोक भोले बाबाला हात लावण्यासाठी आतुर झाले आणि त्यानंतर सेवा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखले असता तेथे चेंगराचेंगरी झाली. सीएम योगी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त डीजी आग्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम तयार करण्यात आली असून त्यात विभागीय आयुक्त अलीगढ यांचा समावेश आहे आणि त्यांना विलंब न करता अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. घटना पाहता राज्याचे मुख्य सचिव आणि डीजीपी तेथे तळ ठोकून आहेत आणि राज्य सरकारचे तीन मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण, संदीप सिंह आणि असीम अरुण घटनास्थळी तळ ठोकून आहेत आणि जखमींवर उपचाराची व्यवस्था करत आहे. यासोबतच मुख्यमंत्री म्हणाले की, भारत सरकार आणि राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी तसेच राहुल गांधींही या घटनेवर दु:ख व्यक्त केला आहे.

Hathras Stampede Update: हाथरस सत्संग प्रकरणात मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा Read More »