DNA मराठी

Santosh Deshmukh Case

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पळून जाण्यासाठी पोलीस अधिकारीने मदत केली सुरेश धसांचा गौप्यस्फोट

Suresh Dhas on Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडावर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातले पोलीस अधिकारी आणि फकराबादचे सरपंच नितीन बिक्कड सहभागी आहे, असा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आले आहे. हत्या करून आरोपी वाशिम मार्गे गेले आणि त्यांना पळून जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि नितीन बिक्कड यांनी मदत केली. त्या सर्वांना मकोका लावून त्यांना हत्या प्रकरणात सहआरोपी करा तसेच याबाबत पुरावेही आपण देणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला अडीच महिने झाले असले तरीही आतापर्यंत न्याय मिळाला नसल्याने 25 फेब्रुवारी रोजी मस्साजोगचे नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पळून जाण्यासाठी पोलीस अधिकारीने मदत केली सुरेश धसांचा गौप्यस्फोट Read More »

सुदर्शन घुले करणार मोठा खुलासा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणार नवीन ट्विस्ट?

Santosh Deshmukh Murder Case: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज खंडणी प्रकरणात सीआयडी पोलीस कोठडीत असणाऱ्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आज मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आवादा कंपनीला कोणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली होती? त्याने खंडणीची काही रक्कम घेतली आहे का? याबाबत सध्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेसह वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे. याबाबत देखील त्याच्याशी चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सुदर्शन घुले करणार मोठा खुलासा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणार नवीन ट्विस्ट? Read More »

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला

Suresh Dhas: मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लावला आहे. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे. असं सुरेश धस म्हणाले. तसेच माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही.  सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. असेही धस म्हणाले. परळी सोडून गेलेले व्यापारी बोलायला घाबरत आहेत. पंकजा मुंडेंना माझी  विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष राखेवर द्या.परळीत द्या गायरान जमिनी हडप केले आहेत तिथे द्या. असेही या पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला Read More »

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका

imtiyaz Jaleel : मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी मागणी केली आहे. “ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत. पण जर आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते. त्याशिवाय वाळू माफी असेल किंवा दुसरे काही असेल. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? त्यामुळे जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी राज्य सरकारचं संरक्षण आहे असे दिसत आहे,” असा गंभीर आरोप देखील इम्तियाज जलील (imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांची मुख्य मागणी: राजकीय प्रतिक्रिया: ह्या प्रकरणामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप युती सरकारवर दबाव वाढला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळेच अशी गुन्हेगारी घडत आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. पुढील संभाव्यता: या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे, विशेषत: गुन्हे, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवर चर्चा होत आहे.

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका Read More »