DNA मराठी

Rohit Pawar

rohit pawar

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले?

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचं झालेल्या अपघाती निधनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, दिल्लीत जाऊन काँग्रेस आणि इतर नेत्यांना भेटणार. अजित पवार यांचा घातपातच झाला असे आमचे म्हणणे आहे. एकनाथ शिंदे 2023 ला डावोसला जाताना विमान पाण्यात आले असते, त्यावेळी अपघात झाला असता, याच व्हिएसआर कंपनीचे विमान होते, इराण इराक ने हे वाटले असते तर विमान पाडले असते. दादांच्या अपघातबाबत कायम लढत राहणार DGCA चे सस्टेटमेंट सीआयडीकडे आले नाही असे म्हणत आहेसीआयडी बाबत काही पद्धत चुकीची पद्धत आहे. मराठी अधिकाऱ्याला अजित पवार यांच्या विमान अपघात तपास द्यावा, बिहार मध्ये सुशांत सिंग प्रकरणात तपासात अधिकारी बदलल्यानंतर लगेच तपास झाला होता, व्हि के सिंग बोलू नये यासाठी माहिती होते, व्हि के सिंग प्लॅनिंग सांगू शकतो,त्याला वाचवले जाते. अजित पवार अपघात प्रकरणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पंतप्रधान यांना जाऊन परवा भेटणार असल्याची माहिती आहे. असं रोहित पवार म्हणाले. माध्यमांशी बोलताना पुढे रोहित पवार म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी झाली पाहिजे त्याचा तपास केला जाईल. सगळ्याची वेगवेगळी स्टाईल असेल, काकी आणि पार्थ पदामुळे बोलत नाही, जय राजकरणात नसल्यामुळे बोलत आहे. आम्ही सत्तेत असतो आम्ही सत्तेला लाथ मारली असती असं देखील यावेळी रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar on Ajit Pawar Death Case : अजितदादा अपघात प्रकरणात राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करा; रोहित पवार असं का म्हणाले? Read More »

raj thackeray

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले

Raj Thackeray on Rohit Pawar: दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान  अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही पुरावे सादर करत हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई आणि बारामती येथे त्यांनी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांची एफआयआर दाखल करून घेतली नाही. यानंतर आता रोहित पवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे. तर आता रोहित पवार यांच्या  समर्थनात मनसे प्रमुख राज ठाकरे उतरले असून त्यांनी अजित पवार यांच्या अपघातावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.   माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रोहित पवार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या. अनेक संशयाची भूत फिरत आहे. अपघात हा धोक्याचे झाला का? हे समजत नाही. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की 3 ठिकाणी एफआयआर द्यायला गेले पण ती घेतली नाही इथे संशयाची सुई निर्माण झाली. मरीन ड्राइव्ह येथे एफआयआर टाईप करताना DCP येऊन  नाही म्हणतात. जर घरच्या संशय आहे तर मग का एफआयआर नाही? असं राज ठाकरे म्हणाले. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की,  सुनेत्रा वहिनी यांचे पती होते. मग त्यांनी पण याबाबत पुढाकार घ्यायला हवे. काय काळ बेर आहे ? याबाबत संशय निर्माण होत आहे. जर काही संशय आहे तर चौकशी व्हायला हवी ब्लॅक बॉक्स बाबत पण कळले नाही. सरकार संशयाची भूत नाचवत आहे असे दिसून येत. एफआयआर का नोंदवून घेतले नाही. हा मुळात प्रश्न आहे. रोहित पवार यांचा एफआयआर नोंदवून गेला जात नसेल तर सामान्य माणसाचे काय? त्रुटी काही असतील ते मांडले जात नसेल तर काय उपयोग. सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर यात संशयाची भूत या ठिकाणी नाचवली जात आहेत असे वाटत आहे असं देखील राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray on Rohit Pawar: सरकारी दबावामुळे एफआयआर नोंदवून जात नसेल तर…; अजित पवार प्रकरणात राज ठाकरे स्पष्टच म्हणाले Read More »

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल

Vikhe Patil on Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर आता त्यांचा अपघात की घातपात यावरून रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संशय व्यक्त केला आहे. यावरती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजितदादा ज्यावेळेस हयात होते तेव्हा रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्याच्या जनतेला माहित आहे. तुम्ही दादांना कधीच सन्मान मिळवून दिला नाही तसेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देखील तुम्हीच नाकारली याचं प्रथमता उत्तर द्या अशा शब्दात विखे पाटलांनी शरद पवारांवर देखील टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी बारामती येथील विमानतळावरती विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर अनेक दिवस उलटले असतानाही तपास संथ गतीने सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला तसेच दादांचा अपघात नव्हे तर घातपात होता असा संशय देखील पवारांनी व्यक्त केला. यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवीच आहे याचं आम्हालाही दुःख आहे. घटनेची सत्यता जाणून घेण्याचं अधिकार कुटुंबीयांसह राज्यातील जनतेला आहे. त्या पद्धतीने तपास कार्य सुरू आहे. मात्र रोहित पवार सातत्याने माध्यमं समोर येऊन वेगवेगळी माहिती देत आहेत सर्व प्रकरण चौकशी मध्ये असल्याने याची योग्य ती चौकशी होईल. तसेच यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले, अजित पवार हे हयात असताना रोहित पवार तसेच शरद पवार हे त्यांच्याशी कसे वागले हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यांना कधीच सन्मान जनक वागणूक ही त्यांच्याकडून देण्यात आली नाही. काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीला जास्त जागा मिळून देखील मुख्यमंत्री होण्याची संधी कोणी नाकारली याचे उत्तर प्रथमता त्यांनी द्यावी अशा शब्दात मंत्री विखे यांनी शरद पवार यांच्या नाम उल्लेख टाळत त्यांच्यावरती देखील जोरदार निशाणा साधला. अजित पवारांच्या निधनानंतर वीस दिवस उलटले असताना देखील तपास कार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने आमदार रोहित पवार यांनी दोन वेळेस पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मांडले व अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय देखील त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला तसेच तपास यंत्रणेवर देखील संशय व्यक्त केला. याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर ती देखील या घटनेवरून जोरदार निशाणा साधला यामुळे रोहित पवारांनी केलेले आरोप तथ्य आहे की नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Vikhe Patil on Rohit Pawar: अजितदादा हयात असताना त्यांना त्रास दिला अन्…, विखे पाटलांचा रोहित पवारांवर हल्लाबोल Read More »

rajya sabha election

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी?

Rajya Sabha Election : निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आसाम, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमधील रिक्त राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. तामिळनाडूमधील सहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे 26 फेब्रुवारी रोजी अधिसूचना राज्यसभेच्या 37 जागांसाठी अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी केली जाईल. उमेदवार 5 मार्चपर्यंत नामांकन दाखल करू शकतील. 6 मार्च रोजी छाननी सुरू होईल आणि 9 मार्चपर्यंत उमेदवार आपले नामांकन मागे घेऊ शकतील. त्यानंतर 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 आहे. शरद पवारांना पुन्हा संधी? शरद पवार यांचा देखील राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ संपत असल्याने त्यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरद पवार यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे 46 आमदार असून एका जागेसाठी 41 आमदारांची आवश्यकता आहे. राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे: अधिसूचना: 26 फेब्रुवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख: 5 मार्च नामांकनांची छाननी: 6 मार्च मागे घेण्याची शेवटची तारीख: 9 मार्च मतदान: 16 मार्च 2026, सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. मतमोजणी: 16 मार्च 2026 आसाममधील तीन, बिहारमधील पाच, महाराष्ट्रातील सात, ओडिशातील चार, तामिळनाडूतील सहा आणि पश्चिम बंगालमधील पाच जागांसाठी मतदान होईल.

Rajya Sabha Election : 10 राज्यांमधील 37 जागांसाठी राज्यसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; शरद पवारांना पुन्हा संधी? Read More »

rohit pawar

Rohit Pawar: जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवार सरकारवर बरसले

Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात की घातपात या विषयावर पत्रकार परिषद घेऊन धक्कादाक दावे केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत अजित पवार आदल्या दिवशी बाय रोड बारामतीला जाणार होते मात्र एका नेत्याने केलेल्या कॉलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यांना निर्णय बदलावा लागला असा दावा केला आहे. तर आता सोशल मीडियावर पोस्ट करत जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? असा प्रश्न विचारला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट केलं जातं.. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जातं, मग जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? हाच न्याय VSR कंपनीलाही लावून आतापर्यंत गुन्हा दाखल करून कंपनीला टाळंही लावायला पाहिजे होतं. पण तसं होताना का दिसत नाही, हे न समजणार कोडं आहे.. की कंपनीचा मालक आणि पार्टनर यांचं एवढं वजन आहे का, ज्यामुळं सरकारही त्यांच्यावर कारवाईला घाबरतं? देशातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, सर्वपक्षीय राजकीय नेते या VSR कंपनीची सेवा घेत असतील तर त्यांचा आणि पायलटसह अन्य कर्मचाऱ्यांचाही जीव तेवढाच महत्त्वाचा नाही का? त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, तातडीने या कंपनीवर कारवाई करून तिच्या देशातील सेवेला बंदी घालावी असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 28 जानेवारी रोजी बारातमी येथे झालेल्या एका विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते.

Rohit Pawar: जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवार सरकारवर बरसले Read More »

baramati by election

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  छायाचित्र मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते पारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. डुडी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित करण्यात आलेल्या छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत प्रारुप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदार यादीवर बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे दावे व हरकती सादर येणार आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव प्रारूप मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची तपासणी करावी. नाव नसल्यास फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार यादीत नाव नोंदवावे. तसेच नावामध्ये किंवा मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास फॉर्म क्रमांक ८ भरावा, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. प्राप्त दावे व हरकतीवर शुक्रवार ६ मार्च २०२६ पर्यंत निर्णय घेण्यात येणार असून मंगळवार १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  अशी माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली आहे.यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांच्या हस्ते विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रारूप मतदार यादीचे वितरण करण्यात आले. 7 हजाराहून अधिक मतदारांची वाढ बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ऑक्टोबर २०२४ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ३ लाख ८० हजार  ६०८ इतके मतदार असून आज ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकूण मतदार संख्या ३ लाख ८८ हजार ३७१ इतकी आहे. या कालावधीत ७ हजार ७६३ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९२ हजार ८१९ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९६ हजार १०२ इतके मतदार असून यामध्ये ३ हजार २८३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.ऑक्टोबर २०२४ च्या मतदार यादीत महिला मतदारांची संख्या १ लाख ८७ हजार ७६५ तर आज प्रसिद्ध झालेल्या यादीत १ लाख ९२ हजार २४५ इतके मतदार असून यामध्ये ४ हजार ४८० इतक्या मतदारांची वाढ झाली आहे. मतदारसंघात तृतीयपंथी मतदार संख्या २४ असून यामध्ये कोणताही बदल नाही, अशी माहिती डुडी यांनी दिली.

Baramati By-election: बारामती विधानसभा मतदार संघासाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध Read More »

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका

Ram Shinde on Rohit Pawar : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर परिषदेमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत 15 जागा आणि नगराध्यक्ष पदी विजय मिळवला आहे. या विजयानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावरती टीकास्त्र डागले आहे, नगरपरिषद निवडणुकीत आमच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले मात्र जामखेडच्या मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला आहे. अशाच पद्धतीने येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील भाजपला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच महाविकास आघाडीला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याच देखील त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत शानदार कामगिरी करत तब्बल 123 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राहिला आहे. तर काँग्रेसने देखील विदर्भात चांगली कामगिरी करत भाजपला रोखण्याचे प्रयत्न केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत काही खास करता आलेला नाही. जामखेड नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने देखील 2 जागा मिळवल्या आहे.

Ram Shinde on Rohit Pawar: जनतेचा कौल राम शिंदेनां ; विजयानंतर राम शिंदेनी रोहित पवारांवर केली टीका Read More »

rohit pawar

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले

Rohit Pawar on Congress: जामखेड नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त झाले असून, त्यांनी थेट महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवरच तोफ डागली आहे. भाजपविरोधात लढाई असल्याचे सांगत असतानाच काँग्रेसने प्रत्यक्षात भाजपची बी-टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, जनतेने दोनदा भरभरून मतांचं दान दिलं, मी कायम त्यांच्या ऋणात राहीन. कार्यकर्त्यांनी जीव तोडून मेहनत घेतली, उमेदवारांनी ताकदीने लढा दिला, तरीही निकाल अत्यंत निराशाजनक आहे. काम करणाऱ्यांचं मनोबल खच्ची करणारा हा पराभव आहे. जनतेवर आक्षेप नाही. पण जिथे सर्वत्र पैसाच चालतो, तिथे बचत गट चालक, शेतकरी, दुकानदार, सामान्य कुटुंबातील उमेदवारांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांना सत्तेच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर… आमदार पवारांनी आजच्या राजकारणावरही तिखट भाष्य केलं. तत्त्व, विचार आणि विकासावर चालणारं स्वच्छ राजकारण कमी होत चाललंय. पैशांनी गढूळ झालेलंच राजकारण आज जास्त दिसतं. आमच्या विरोधात निवडून आलेल्यांचे कारनामे पाहिले, तर चारचौघात त्यांची नावं घेण्याचीही लाज वाटते, असा घणाघात त्यांनी केला. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला सर्वात स्फोटक आरोप करताना पवार म्हणाले, काही अपक्षांसह धर्मनिरपेक्षतेचा गजर करणाऱ्या काँग्रेसने भाजपाच्या उमेदवारालाच स्वतःच्या तिकिटावर उभं केलं. भाजपाची बी-टीम बनून जातीयवादी शक्तींना विजय मिळवून दिला. लोकंही या तिरक्या खेळीला बळी पडली. यापुढे काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर विश्वास कसा ठेवायचा, हा मोठा प्रश्न आहे. जामखेडच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच आता आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून, रोहित पवारांच्या या भडक वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Rohit Pawar on Congress: काँग्रेस भाजपची बी टीम; पराभवानंतर आमदार रोहित पवार भडकले Read More »

img 20251206 wa0006

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा

Dancer Deepali Patil : नृत्यांगना दिपाली पाटील मृत्यू प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे २०१६ साली राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते रोहित पवारांसोबत होते. त्यानंतर २०२४ विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीतच आहेत. त्यांचा भाजपशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. गायकवाड यांच्या पत्नीने नगरपरिषद निवडणुकीत ऐनवेळी भाजपकडून निवडणूक लढवली असली तरी संदिप गायकवाड यांचा भाजपात कुठलाही राजकीय प्रवेश झालेला नाही. ते आजही राष्ट्रवादीतच आहेत. नगरपरिषद निवडणूकीत पराभव होणार हे स्पष्ट होताच रोहित पवारांनी भाजपला व आमच्या नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र हाती घेतले आहे, नृत्यांगणा दिपाली पाटील यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून या घटनेच्या आडून रोहित पवार हे घाणेरडे राजकारण करून जामखेडची बदनामी करू पाहत आहेत, ही बाब जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे. जामखेड येथील एका कलाकेंद्रात नृत्यांगणा म्हणून काम करणाऱ्या दिपाली पाटील या नृत्यांगनेने ४ डिसेंबर रोजी जामखेड येथील साई लाॅज येथे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याची घटना घडली होती. ही घटना उजेडात येताच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेशी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करताच भाजपने रोहित पवारांचीच पोलखोल केली आहे. जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले म्हणाले की, माजी नगरसेवक संदिप सुरेश गायकवाड यांनी २०१६ सालच्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत प्रभाग १० मधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. जिंकली होती. त्यांच्या पत्नीही त्यावेळी प्रभाग ०७ मधून निवडून आल्या होत्या होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संदिप गायकवाड हे रोहित पवारांसोबत होते. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संदिप गायकवाड यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीच्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी गायकवाड यांनी रोहित पवारांचा जोरदार प्रचार केला होता. नुकत्याच पार पडलेल्या जामखेड नगरपरिषद निवडणूकीत रोहित पवारांनी संदिप गायकवाड यांना उमेदवारी डावलल्याने गायकवाड यांच्या पत्नीने बंडखोरी करत ऐनवेळी भाजपकडून उमेदवारी केली. मात्र संदिप गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केला नाही. एकाच कुटुंबातील अनेक जण वेगवेगळ्या पक्षात सक्रीय असतात. एखाद्याने काही चुकीचं केलं तर त्याचा संबंध कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाशी जोडणे म्हणजे बालबुध्दी उपद्व्याप होय, हाच उद्योग सध्या रोहित पवारांकडून सुरू आहे असे म्हणत सभापती शरद कार्ले यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला. माजी नगरसेवक संदीप गायकवाड हे आमदार रोहित पवार यांचे कार्यकर्ते असल्याचे पुरावे सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनीच शरद पवारांच्या उपस्थितीत गायकवाड यांचे पक्षात जोरदार स्वागत केले होते.भाजपवर टीका करण्यापूर्वी रोहित पवारांनी स्वता:चे आत्मपरीक्षण करावे. संदीप गायकवाड प्रकरणी रोहित पवारांनी भाजपवर केलेले आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे आहेत, या प्रकरणात रोहित पवार हे अडचणीत येणार असे दिसताच त्यांनी भाजपवर आरोप करून कांगावा करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक सत्य हेच आहे की, संदिप गायकवाड हेच त्यांच्या पक्षाचे आणि त्यांचे कार्यकर्ते आहेत. जामखेड नगरपरिषद निवडणूकीत दारूण पराभव होणार हे समजल्यामुळे रोहित पवारांनी भाजप व आमच्या नेत्याची बदनामी सुरू केली आहे, भाजपला बदनाम करण्याचे रोहित पवारांनी हाती घेतलेले षडयंत्र जामखेडची जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा शरद कार्ले यांनी दिला आहे. “नृत्यांगणा दिपाली पाटील मृत्युप्रकरणाची घटना अत्यंत दुर्दैवी असुन या प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकवाड हा पूर्वीपासून राष्ट्रवादीचाच अर्थात रोहित पवारांचा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत तो त्याच पक्षात सक्रीय आहे. त्याचा भाजपची कुठलाही संबंध नाही. नृत्यांगणा मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे, या प्रकरणाच्या आडून भाजपला बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, जनता हे कदापी सहन करणार नाही, असा इशारा बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी दिला आहे.”

Dancer Deepali Patil Case : माजी नगरसेवक संदीप गायकवाड रोहित पवारांचाच कार्यकर्ता, बिनबुडाचे आरोप करू नका, शरद कार्ले यांचा इशारा Read More »

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी

Rohit Pawar: जळगाव शहरात आयोजित एका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज भेट देत महाराष्ट्र आणि उत्तराखंड संघातील सामना पाहिला. सामना संपल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानात उतरून काही फटकार ठोकत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळ संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राजकीय क्षेत्रात येताना येणाऱ्या ‘गुगली, स्पिन आणि स्पेस’ डिल करणं शिकावं लागतं असं सांगितलं. पण, ‘गावठी शॉट’ म्हणजेच खालच्या पातळीचं वक्तव्य टाळावं लागतं, असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं. यावेळी रोहित पवार यांनी मराठी मीडियालाही आपला ‘कोच’ संबोधत, “मीडिया वेळोवेळी वेडी वाकडी पण अभ्यासपूर्ण प्रश्न विचारतं. त्यांना टाळण्यापेक्षा योग्य उत्तरं देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कोणत्याही वादात अडकलेलो नाही,” अशी प्रतिक्रिया देखील रोहित पवार यांनी दिली.

Rohit Pawar: क्रिकेटच्या मैदानात आमदार रोहित पवारांची फटकेबाजी Read More »