DNA मराठी

Rahul Gandhi

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी

Rahul Gandhi: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. त्याच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित सभेत बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पाच गॅरंटी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जर राज्यात महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आणि संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवास मिळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तर सरकार आल्यावर शेतकऱ्यांना देखील तीन लाखांची कर्जमाफी देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात सरकार येताच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे. त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. 5 गॅरंटीमहिलांसाठी राज्यभरात मोफत बस प्रवासराज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये मासिक मदतशेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. कर्ज परतफेडीवर 50,000 रुपये प्रोत्साहन25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटपबेरोजगारांना सरकारकडून मासिक 4000 रुपयांची मदत.

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी Read More »

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा?

Rahul Gandhi:  लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर आहे. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये असणार आहे.  ते कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आज सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी राहुल संविधान वाचवा परिषदेत सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. खालच्या जातींना 50 टक्के आरक्षण देण्याचे पहिले काम शाहूजी महाराजांनी 1902 साली कोल्हापुरात केले. आरक्षण देणाऱ्या भूमीवरून राहुल गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहेत, त्यामुळे मोठा राजकीय संदेश जाईल, असे म्हणता येईल. घोषणा होण्यापूर्वीच तिकीट मागणाऱ्यांचा महापूर काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसकडे तिकिटांसाठी हजारो अर्ज येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे राज्यभरातून 1830 हून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक तिकीट अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून प्राप्त होत आहेत. या भागात दलित, मुस्लिम आणि मराठा काँग्रेस आणि आघाडीला पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 288 पैकी 100 ते 110 जागांवर निवडणूक लढवू शकते. अर्जाचा आकडा हरियाणापेक्षा जास्त अर्जांचा हा आकडा हरियाणाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हरियाणाच्या विधानसभेच्या 19 जागांसाठी सुमारे अडीच हजार अर्ज आले होते. तर महाराष्ट्रात हा आकडा घोषणेपूर्वीच 2000 च्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात तिकिटासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीलाही नोंदणी शुल्क भरावे लागते. SC/ST उमेदवारांना 10,000 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 20,000 रुपये भरावे लागतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली होती. काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. तर 65 टक्के विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर होती. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी आणि अर्जदारांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचवेळी हरियाणातील प्रचार संपताच राहुल गांधींची महाराष्ट्रात सक्रियता काँग्रेसला येथेही विजयाचा वास येऊ लागल्याचा स्पष्ट संदेश आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा? Read More »

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम

Sanjay Gaikwad : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तत्वानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काल रात्री बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना  मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.  यावेळी ते म्हणाले की, स्टेटमेंट मी केले, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेसने केले. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलीय. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील असं ते म्हणाले.  तर माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे. असेही या वेळी ते म्हणाले.  तसेच आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. असेही संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम Read More »

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.   रविवारी टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.   राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही मानतो की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास याची पर्वा न करता त्यांना स्थान दिले पाहिजे. हा लढा आहे आणि हा लढा निवडणुकीत अधिक स्पष्ट झाला जेव्हा भारताच्या कोट्यवधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत काय म्हणाले? ते पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. निवडणुकीत लोकांना जे स्पष्टपणे समजले आणि मी पाहिले की मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा लोकांना मी काय म्हणतो ते समजले. भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे, आमच्या भाषेवर हल्ला करत आहे, आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे, आमच्या इतिहासावर हल्ला करत आहे, असे ते सांगत होते. ‘भाजपला हे सहन होत नाही’ राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे समजले ते म्हणजे जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा मी अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. ‘भाजपची भीती नाहीशी झाली’ भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्यामुळे हे मोठे यश आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नाही. लोकशाही समजून घेणाऱ्या भारतीय जनतेचे हे मोठे यश आहे, ज्यांना हे समजले आहे की आम्ही आमच्या संविधानावर हल्ला स्वीकारणार नाही. आमच्या धर्मावर, राज्यावर झालेला हल्ला आम्ही मान्य करणार नाही. भारत जोडो यात्रेवर काय म्हणाले? राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेने माझ्या कामाबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलली. मी म्हणेन की राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आमच्या लोकांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे ऐकण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या प्रवासात फक्त मीच नाही तर अनेकांचा सहभाग होता.

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल Read More »

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का

Maharashtra Congress:  राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  सर्व राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. आगामी निवडणुकीत कोणाचा विजय होणार? हे लवकरच समजेल.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वात जास्त जागांवर यश आलं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आता आत्मविश्वास वाढला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते आपले उमेदवार निवडून रिंगणात उतरवू शकतात.  पण सूत्रांच्या माहितीनुसार काही विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस पक्ष विधानसभेच्या तिकीट कापण्याची शक्यता आहे. ज्यांचं मतदारसंघात काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. यासाठी आमदारांच्या कामाचा अहवाल जमा केला जाणार आहे. “विधानसभा निवडणुकीत कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही,” असं मोठं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. “हायकमांडने हा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही बदमाशांना आता विधानसभेचं तिकीट द्यायचं नाही. काही लोकं व्यापारासाठी येतात. त्यामुळे अशा कोणत्याही बदमाशांना या पक्षात स्थान दिलं जाणार नाही. तशी भूमिका काँग्रेसची आहे. आम्ही कोणालाही अभय दिलं नाही. ज्यांची चूक समोर आली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. चुकीला माफी नाही,” अशी भूमिका काँग्रेस हायकमांडची असल्याचे नाना पटोले यांनी केले आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे  तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून उद्धव ठाकरे दिल्लीत इंडिया आघाडीच्या काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश असेल.

Maharashtra Congress: काँग्रेसमध्ये होणार मोठी कारवाई, ‘या’ आमदारांना बसणार धक्का Read More »

CWC Meeting : काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक, राहुल गांधींकडे दिली जाणार ‘ही’ मोठी जबाबदारी

CWC Meeting: भाजपला धक्का देत लोकसभा निवडणुकीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसचा उत्साह आता वाढत चालला आहे . यातच आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा यांच्यासह पक्षाचे इतर सदस्यही उपस्थित राहणार आहेत.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर विचारमंथन करेल आणि भविष्यातील रणनीतीवरही विचार करेल.  2019 च्या निवडणुकीत काँग्रेस 52 वरून 99 जागा वाढवत लोकसभेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे. राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे, यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे पक्षातील एका गटाचे मत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. दरम्यान, काँग्रेस लोकसभेतील नेत्याचे नाव ठरवणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय राहुल गांधी यांनी हे महत्त्वाचे पद स्वीकारावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.  पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि विविध राज्यांतील प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पक्षाच्या कामगिरीचे विश्लेषण करतील आणि संघटना मजबूत करण्यासाठी उपाययोजना सुचवतील. या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवरून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड होऊ शकते. तर राहुल गांधी यांच्यासाठी केसी वेणुगोपाल, मणिकम टागोर आणि गौरव गोगोई यांच्यासह पक्षाचे खासदार हात वर करून विरोधी पक्षनेते निवडण्याची मागणी करू शकतात, असे सांगितले जात आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी लोकसभेतील पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची निवड करतात की अन्य कोणते नेते हे सोनिया गांधींवर अवलंबून आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार, संसदीय पक्षाच्या अध्यक्षांना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पक्षाच्या नेत्यांची नावे देण्याचा अधिकार आहे.    सध्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे संसदेच्या वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते आहेत. लोकसभेतील काँग्रेसचा नेता हा सभागृहातील विरोधी पक्षनेताही असतो. सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने आवश्यक संख्येने जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींवर मोठी जबाबदारी सोपवल्याची बाब समोर येत आहे. सोनिया गांधी आता राज्यसभेच्या सदस्य झाल्याची माहिती आहे. पक्ष काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे हे सर्व CWC सदस्य आणि पक्षाच्या खासदारांसाठी हॉटेल अशोक येथे डिनरचे आयोजन करणार असल्याचीही बातमी आहे.

CWC Meeting : काँग्रेस कार्यकारिणीची आज होणार बैठक, राहुल गांधींकडे दिली जाणार ‘ही’ मोठी जबाबदारी Read More »

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

Congress Candidate List : लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसकडून राज्यातील सात लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. राज्यात 48 जागांपैकी काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर इतर जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेसने यावेळी शाहू महाराजांना कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने अनेक दिवसांपासून केली आहे. शिवसेनेने (UBT) कोल्हापूरच्या जागेवरही दावा केला होता, पण शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे ती मागे पडली. कोल्हापूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्रात खूप आदर आहे. काँग्रेससोबत त्यांचा दीर्घकाळचा राजकीय संबंध असला तरी, 1998 च्या लोकसभा निवडणुकीत अयशस्वी झाल्यापासून त्यांनी पक्षाशी औपचारिक संबंध टाळला आहे. मराठा समाजातही त्यांचा मान खूप उंच आहे. महाराष्ट्रातून ही नावे जाहीर करण्यात आली कोल्हापूर- शाहू महाराज सोलापूर- प्रणिती सुशीलकुमार शिंदे पुणे- रवींद्र धंगेकर लातूर- शिवाजी काळगे नंदुरबार- गोवळ पाडवी अमरावती- बळवंत वानखेडे नांदेड- वसंतराव चव्हाण महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.  एमव्हीएची थेट स्पर्धा भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीशी आहे.

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी Read More »

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल

Loksabha Election 2024 : पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.   पटियाला काँग्रेस लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रनीत कौर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे आणि अरुण सिंग, पंजाब भाजपचे प्रभारी विजय भाई रुपाणी आणि पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रनीत कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, त्या परराष्ट्र राज्यमंत्रीही राहिल्या असून त्यांच्या येण्याने निश्चितपणे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल आणि पंजाबच्या जनतेलाही फायदा होईल.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत काम केले, पंजाबसाठी काम केले आणि लोकशाहीसाठी काम केले. आता वेळ आली आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुढे नेऊ शकतील, जगात भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी करत असलेले काम आणि धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षात समाविष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगसह आधीच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रनीत कौर यांनी पंजाबच्या पटियाला मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत गेल्या वर्षीच त्यांना निलंबित केले होते. पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेली भाजप प्रनीत कौर यांना लोकसभेची उमेदवार बनवू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल Read More »

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश

Congress News : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  तर दुसरीकडे ममता आणि भगवंत मान यांनी बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे.  जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि राजीव चंद्रशेखर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा आणि भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रमुख अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 7 महिन्यात काँग्रेसचा भ्रमनिरास वास्तविक, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट न दिल्याच्या रागातून जगदीश शेट्टर यांनी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, गुरुवारी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शेट्टर म्हणाले की, काही मुद्द्यांमुळे आपण काँग्रेसमध्ये गेलो होतो. पण, भाजपचे कार्यकर्ते त्यांना पक्षात परत येण्यासाठी सतत आग्रह करत होते, बीएस येडियुरप्पा, विजयेंद्र येडियुरप्पा आणि कर्नाटकचे भाजप नेतेही त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगत होते. त्यामुळे काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याबाबत बोलताना शेट्टर म्हणाले की, पक्षाने (भाजप) त्यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या.  याआधी बीएस येडियुरप्पा आणि कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीच्या तयारीवरही चर्चा केली.

Congress News : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये केला प्रवेश Read More »