DNA मराठी

Rahul Gandhi news

rahul gandhi

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप Read More »

Shashi Tharoor : काँग्रेसला मोठा धक्का, शशी थरूर पक्षाला ठोकणार रामराम? ‘हे’ आहे कारण

Shashi Tharoor : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर पक्षावर नाराज असून पक्ष सोडण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. जर असं झालं तर हे काँग्रेससाठी मोठा धक्का असणार आहे. जर पक्षाला त्यांची गरज नसेल तर त्यांच्याकडे खुले पर्याय आहेत, असे विधान त्यांनी अलिकडेच केले. त्यामुळे थरूर पक्ष सोडू शकतात का अशी अटकळ बांधली जात आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा?शशी थरूर हे चार वेळा खासदार राहिले आहेत आणि राष्ट्रीय राजकारणातील एक मोठे नाव आहेत. अलिकडेच त्यांनी केरळ काँग्रेसमधील नेतृत्वाच्या कमतरतेबद्दल सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर, त्यांनी पक्षाच्या हायकमांडची भेट घेतली, ज्यामुळे ते पक्ष सोडू शकतात अशी चर्चा सुरू झाली. थरूर यांनी उघडपणे सांगितले की, जर केरळमधील पुढील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकली तर ते निश्चितच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतील. त्यांनी असा दावाही केला की विविध सर्वेक्षणांमध्ये त्यांना केरळमधील सर्वात लोकप्रिय काँग्रेस नेते म्हणून दाखवण्यात आले आहे. परंतु त्यांचे हे विधान अनेक काँग्रेस नेत्यांना आवडले नाही आणि पक्षात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. थरूर यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रियाकेरळ काँग्रेसचे अध्यक्ष के सुधाकरन म्हणाले की, थरूर यांनी मीडियामध्ये अशा गोष्टी बोलू नयेत. ते म्हणाले की… ‘थरूरकडे त्याच्या चुका सुधारण्यासाठी वेळ आहे.’ माध्यमांमध्ये अशी विधाने करणे योग्य नाही. पक्षाच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावे. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य रमेश चेन्निथला यांनीही सांगितले की, पक्षाने नेहमीच थरूर यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या आहेत. थरूर चार वेळा खासदार झाले, केंद्रीय मंत्रीपद भूषवले आणि पक्षाच्या सर्वोच्च संस्थांमध्ये त्यांचा समावेश होता, याची आठवण त्यांनी करून दिली. थरूर यांचा काँग्रेसवर भ्रमनिरास ?थरूर यांच्या अलीकडील विधानांवरून असे दिसते की त्यांना काँग्रेसमध्ये दुर्लक्षित वाटत आहे. ते म्हणाले की, त्याला राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली पाहिजे. काही वरिष्ठ नेत्यांचा असा विश्वास आहे की थरूर यांना तरुण मतदारांना आकर्षित करण्याची जबाबदारी सोपवावी, तर केरळ काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, थरूर यांनी खरोखरच काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे का? की ते फक्त पक्ष नेतृत्वावर त्यांची भूमिका अधिक मजबूत करण्यासाठी दबाव आणत आहेत? सध्या काँग्रेस हायकमांड या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहे. येत्या काळात, थरूर यांना राजी करण्यासाठी पक्ष कोणती पावले उचलतो आणि थरूर स्वतः कोणता निर्णय घेतात हे पहावे लागेल.

Shashi Tharoor : काँग्रेसला मोठा धक्का, शशी थरूर पक्षाला ठोकणार रामराम? ‘हे’ आहे कारण Read More »

Rahul Gandhi: लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर

Rahul Gandhi: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील व त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी ५.१५ वाजता विमानाने दिल्लीला जातील. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, खा. रविंद्र चव्हाण, खा. डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली व निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Rahul Gandhi: लोकसेभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर Read More »

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी

Rahul Gandhi: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. त्याच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईतील बीकेसी मैदानात आयोजित सभेत बोलताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून पाच गॅरंटी जाहीर केली आहे. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जर राज्यात महाविकास आघाडी सरकार आली तर महालक्ष्मी योजना लागू करणार असल्याची ग्वाही दिली. या योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करणार आणि संपूर्ण राज्यात महिलांना मोफत बस प्रवास मिळणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तर सरकार आल्यावर शेतकऱ्यांना देखील तीन लाखांची कर्जमाफी देणार असल्याची गॅरंटी त्यांनी दिली. या वेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात सरकार येताच जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत आहे. त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच मुलींप्रमाणे मुलांना देखील मोफत शिक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बेरोजगार तरुणांना दरमहा चार हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. तर 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते. 5 गॅरंटीमहिलांसाठी राज्यभरात मोफत बस प्रवासराज्यातील सर्व महिलांना 3000 रुपये मासिक मदतशेतकऱ्यांची तीन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. कर्ज परतफेडीवर 50,000 रुपये प्रोत्साहन25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा आणि सर्वांना मोफत औषध वाटपबेरोजगारांना सरकारकडून मासिक 4000 रुपयांची मदत.

Rahul Gandhi: महिलांना 3000, फ्री प्रवास अन् शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, राहुल गांधींकडून महाराष्ट्राला 5 गॅरंटी Read More »

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा?

Rahul Gandhi:  लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर आहे. येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा खूप महत्त्वाचा मानला जात आहे. राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये असणार आहे.  ते कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते आज सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. यानंतर 5 ऑक्टोबर रोजी राहुल संविधान वाचवा परिषदेत सहभागी होणार आहेत. कोल्हापुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यामागे एक ऐतिहासिक कारण आहे. खालच्या जातींना 50 टक्के आरक्षण देण्याचे पहिले काम शाहूजी महाराजांनी 1902 साली कोल्हापुरात केले. आरक्षण देणाऱ्या भूमीवरून राहुल गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहेत, त्यामुळे मोठा राजकीय संदेश जाईल, असे म्हणता येईल. घोषणा होण्यापूर्वीच तिकीट मागणाऱ्यांचा महापूर काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसकडे तिकिटांसाठी हजारो अर्ज येत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे राज्यभरातून 1830 हून अधिक अर्ज आले आहेत. सर्वाधिक तिकीट अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून प्राप्त होत आहेत. या भागात दलित, मुस्लिम आणि मराठा काँग्रेस आणि आघाडीला पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस 288 पैकी 100 ते 110 जागांवर निवडणूक लढवू शकते. अर्जाचा आकडा हरियाणापेक्षा जास्त अर्जांचा हा आकडा हरियाणाच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हरियाणाच्या विधानसभेच्या 19 जागांसाठी सुमारे अडीच हजार अर्ज आले होते. तर महाराष्ट्रात हा आकडा घोषणेपूर्वीच 2000 च्या आसपास पोहोचला आहे. महाराष्ट्रात तिकिटासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीलाही नोंदणी शुल्क भरावे लागते. SC/ST उमेदवारांना 10,000 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 20,000 रुपये भरावे लागतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली होती. काँग्रेसने 13 जागा जिंकल्या. तर 65 टक्के विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडीवर होती. लोकसभा निवडणुकीची आकडेवारी आणि अर्जदारांची वाढलेली संख्या पाहता महाराष्ट्रात काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचवेळी हरियाणातील प्रचार संपताच राहुल गांधींची महाराष्ट्रात सक्रियता काँग्रेसला येथेही विजयाचा वास येऊ लागल्याचा स्पष्ट संदेश आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधी आजपासून मिशन महाराष्ट्रावर, करणार मोठी घोषणा? Read More »

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.   रविवारी टेक्सास विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला.   राहुल गांधी म्हणाले, ‘आरएसएसचा विश्वास आहे की भारत ही एक कल्पना आहे आणि आम्ही मानतो की भारत हा अनेक विचारांचा देश आहे. आम्हाला विश्वास आहे की प्रत्येकाला सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास याची पर्वा न करता त्यांना स्थान दिले पाहिजे. हा लढा आहे आणि हा लढा निवडणुकीत अधिक स्पष्ट झाला जेव्हा भारताच्या कोट्यवधी जनतेला स्पष्टपणे समजले की भारताचे पंतप्रधान भारतीय संविधानावर हल्ला करत आहेत. राहुल गांधी अमेरिकेत काय म्हणाले? ते पुढे म्हणाले, ‘मी तुम्हाला जे काही सांगितले ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. निवडणुकीत लोकांना जे स्पष्टपणे समजले आणि मी पाहिले की मी संविधानाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा लोकांना मी काय म्हणतो ते समजले. भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे, आमच्या भाषेवर हल्ला करत आहे, आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे, आमच्या इतिहासावर हल्ला करत आहे, असे ते सांगत होते. ‘भाजपला हे सहन होत नाही’ राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे समजले ते म्हणजे जो कोणी भारतीय संविधानावर हल्ला करत आहे तो आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहे. म्हणूनच संसदेतील माझ्या पहिल्या भाषणात जेव्हा मी अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतीक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. त्यांना समजत नाही आणि आम्ही त्यांना समजावणार आहोत. ‘भाजपची भीती नाहीशी झाली’ भाजपवर निशाणा साधत विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे भाजपची भीती नाहीशी झाली. निवडणूक निकालानंतर लगेचच, काही मिनिटांतच, भारतात कोणीही भाजप किंवा भारताच्या पंतप्रधानांना घाबरत नाही, हे आपण पाहिले. त्यामुळे हे मोठे यश आहे, राहुल गांधी किंवा काँग्रेस पक्षाचे नाही. लोकशाही समजून घेणाऱ्या भारतीय जनतेचे हे मोठे यश आहे, ज्यांना हे समजले आहे की आम्ही आमच्या संविधानावर हल्ला स्वीकारणार नाही. आमच्या धर्मावर, राज्यावर झालेला हल्ला आम्ही मान्य करणार नाही. भारत जोडो यात्रेवर काय म्हणाले? राहुल गांधी म्हणाले, ‘भारत जोडो यात्रेने माझ्या कामाबद्दल विचार करण्याची पद्धतच बदलली. मी म्हणेन की राजकारणाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन, आमच्या लोकांकडे पाहण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे ऐकण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. या प्रवासात फक्त मीच नाही तर अनेकांचा सहभाग होता.

Rahul Gandhi : ‘भाजप आणि पंतप्रधानांना कोण घाबरत नाही’, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल Read More »

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल

Loksabha Election 2024 : पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.   पटियाला काँग्रेस लोकसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रनीत कौर यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ, विनोद तावडे आणि अरुण सिंग, पंजाब भाजपचे प्रभारी विजय भाई रुपाणी आणि पंजाब प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रनीत कौर यांचे भाजपमध्ये स्वागत करताना सांगितले की, त्यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे, त्या परराष्ट्र राज्यमंत्रीही राहिल्या असून त्यांच्या येण्याने निश्चितपणे पंजाबमध्ये भाजप मजबूत होईल आणि पंजाबच्या जनतेलाही फायदा होईल.  भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रनीत कौर म्हणाल्या की आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे याचा मला आनंद आहे. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत काम केले, पंजाबसाठी काम केले आणि लोकशाहीसाठी काम केले. आता वेळ आली आहे जेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाला पुढे नेऊ शकतील, जगात भारताची प्रतिष्ठा वाढवू शकतील. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा विकास करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी करत असलेले काम आणि धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षात समाविष्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. प्रनीत कौर या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत प्रनीत कौर या पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंगसह आधीच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.  प्रनीत कौर यांनी पंजाबच्या पटियाला मतदारसंघातून चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत गेल्या वर्षीच त्यांना निलंबित केले होते. पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेली भाजप प्रनीत कौर यांना लोकसभेची उमेदवार बनवू शकते, असे सांगण्यात येत आहे.

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला पुन्हा धक्का! माजी केंद्रीय मंत्री भाजपमध्ये दाखल Read More »