DNA मराठी

Parvez Ashrafi

asaduddin owais

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू

Asaduddin Owais: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन ( AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी 9 ऑक्टोबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. खासदार ओवैसी यांची ही सभा मुकुंदनगर मधील सीआयव्ही ग्राउंड येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. यापूर्वी खासदार असदुद्दीन ओवैसी 30 सप्टेंबर रोजी नगर शहरात जाहीर सभा घेणार होते मात्र 29 सप्टेंबर रोजी शहरात दोन गटात वाद निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर खासदार ओवैसी यांनी सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तर आता ही सभा 09 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती अहमदनगर एमआयएमकडून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नगर शहरात पहिल्यांदाच होणाऱ्या या सभेत एमआयएम कडून आगामी पालिका निवडणुकीसाठी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील देखील नगर शहरात 09 ऑक्टोबर रोजी येणार आहे.

Asaduddin Owais: ठरलं! 09 ऑक्टोबरला नगर शहरात खासदार ओवैसी घेणार जाहीर सभा; MIM कडून तयारी सुरू Read More »

img 20250823 wa0002

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सर्वत्र जातीय तणाव निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न होत आहे. धार्मिक कार्यक्रमा मध्ये धर्म प्रसारण बाजूला ठेऊन राजकारण आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम काही दंगलखोर संघटना आणि सत्ताधारी पक्षाचे लोक प्रतिनिधी करत आहे. यांना कोणीही जाब विचारायला तयार नाही. प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक प्रश्न करत आहे.  मुस्लिम समाजाचे दर्गा मशीद मदरसावर हल्ले होत आहे. काही जातीवादी संघटन लोकांना आव्हान करत आहे. प्रशासनाला याची माहिती दिली तरी प्रशासन काही करत नाही. न्यायालयाचे मनाई आदेश प्रशासनाला दिल्यानंतर ही प्रशासन कोणतीच प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही. दर्ग्यात दरोडे घातल्याची फिर्याद घेत नाही. तक्रार करायला गेल्यावर फिर्यादीलाच दम देऊन हाकलून देतात. असे अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असताना मुस्लिम समाजाने ज्यांना लोकसभेत आणि विधानसभेत मतदान केले किंवा ज्या पक्षासाठी खुलेआम प्रचार केला, त्याचे आज आवाज बसले आहे. दररोज जिल्ह्यात मुस्लिम समाजावर अत्याचार होत आहे. अल्पसंख्याक समाज सुरक्षित नाही. मागास्वर्गीय समाजावर शुल्लक कारणाने घरात घुसून सर्व कुटुंबाला जीव जाऊ पर्यंत मारतात. तसेच गऊ रक्षकांच्या नावाखाली हल्ले करतात, जनावरे चोरून दुसरीकडे विकतात. असे अनेक समस्यांच्या चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्याचे उद्देशाने व एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या नेतृत्वात अहमदनगर महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक समद खान आणि सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख हे आपल्या असंख्य मान्यवर कार्यकर्तयां सोबत एम आय एम मध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश महा सचिव समीर साजिद बिल्डर,प्रदेश सहसचिव शफीउल्लाह काझी यांची मुलाखत औरंगाबाद येथील पक्ष कार्यालय दारुसलाम येथे घेतली. इम्तियाज जलील यांनी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत केले.आणि आपल्या सारखे ज्येष्ठ नगरसेवक पक्षात आल्याने पक्षाला ताकद मिळेल आणि आगामी निवडणुकीत महानगर पालिकेत पक्षाची महत्त्वाची भूमिका राहील असे सांगितले. समद खान यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की आपल्या शहरात अल्पसंख्याक समाजावर खालची पातळीवर टीका होत असताना एम आय एम व्यतिरिक्त कोण्ही बोलायला तयार नाही.जर पक्ष यांना बोलायची किंवा विरोध करायची परवानगी देत नसेल तर मी त्या पक्षात राहुन काय करू. म्हणून इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा समाधान झाल्याने आम्ही निर्णय घेतला आहे. एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी आणि प्रदेश अध्यक्ष  इम्तियाज जलील यांची सभा अहमदनगर मध्ये होणार असून विरोधकांना ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत उत्तर देऊ. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, नगरसेवक समद खान, अंजर खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख, यूथ अध्यक्ष अमीर खान, आवेज काझी,जावेद शेख,नवीद शेख सनाउल्लाह खान, समीर खान, वाहिद हुंडेकरी, सज्जाद शेख, अजीम राजे, मोसिन शेख, मतीन खान आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात जिल्ह्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिले.

Maharashtra Politics: येणाऱ्या निवडणुकीसाठी MIM ची मोठी खेळी ; डॉ. परवेज अशरफी Read More »

imtiaz jaleel

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ

Imtiaz jaleel : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा चर्चेत आला आहे. याचा मुख्य कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर महानगर पालिकेतील माजी नगरसेवकासह अनेक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची साथ सोडत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षात दाखल होणार आहे.  माजी नगरसेवक समद खान, सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक समद खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेत एमआयएममध्ये प्रवेश करण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी भूमिका घेत एका विशेष समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज असून एआयएमआयएममध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आता नगरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी एआयएमआयएमला नगर शहरात मोठी ताकद मिळत असून पुढील काही दिवसात आणखी काही नेते एआयएमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचा विश्वास एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी व्यक्त केला आहे.

Imtiaz jaleel : नगरचं राजकारण बदलणार, MIM करणार मोठा धमाका; अनेक कार्यकर्ते सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसची साथ Read More »

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी

Maharashtra Election :  राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी तसेच पक्षांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे.   तर दुसरीकडे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. परवेज अशरफी यांनी लोकसभेसाठी देखील अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने दिलेल्या आदेशानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजप नितेश राणे यांच्यावर कारवाईची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच 12 विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली.  तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे सवरक्षण करतात.  तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे.  जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको. यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल.

Maharashtra Election : परवेज अशरफी निवडणुकीच्या रिंगणात, पक्षाकडे उमेदवारीची मागणी Read More »

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा

Ahmednagar News: शहरातील रामवाडी परिसरात 18 जून रोजी झालेल्या   वादाला जाणून बुजून धार्मिक रंग देऊन शहरात मोठी दंगल घडून आण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी केला आहे. तसेच पोलिसांकडून आरोपींवर कारवाई झाली नाही तर जन आंदोलन उभारू असं देखील अशरफी म्हणाले. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रामवाडी भागात स्थानिक नागरिकांत 18 जुन 2024 रोजी किरकोळ वाद झाले होते मात्र ते मिटून घेण्यात आली होती.  मात्र तरही बजरंग दल आणि काही जातीवादी संघटनेचे  पदअधिकारी यांनी 40-50 गुंड हत्यारे, दांडके घेऊन रामवाडीत आले होते त्यावरून या लोकांना शहरात दंगल घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे दिसून येत आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कते मुळे या गुंड्यांचा डाव फसला असं अशरफी यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या गुंड्यांचा डाव फसल्याने त्यांनी शहरातील अनेक ठिकाणी शहराचा वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला.  या सगळ्या घेटने मागील  मास्टर माईंड बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याने 4 दिवसात या आरोपीला अटक करावी   नाहीत तर कोणतीही पूर्व सूचना न देता पुणे औरंगाबाद महामार्गावर आम्ही समस्त भारतीय संविधान प्रेमी समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करणार असा इशारा अशरफी यांनी दिला आहे.

Ahmednagar News: आरोपींवर कारवाई करा नाहीतर जन आंदोलन करू परवेज अशरफी यांचा इशारा Read More »