DNA मराठी

Nitin Gadkari

nilesh lanke

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी

Nilesh Lanke: नगर–मनमाड महामार्ग हा केवळ वाहतुकीचा रस्ता नाही तो अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीय हालचालींचा मुख्य मेरुदंड आहे. मात्र गेल्या आठ–नऊ वर्षांपासून हा महामार्ग ‘काम सुरू आहे’ या एका वाक्यात अडकलेला आहे. खड्डे, धूळ, अपघात आणि मृत्यू हेच या रस्त्याचं वास्तव बनलं आहे. या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे दररोज जीव धोक्यात घालण्यासारखं झालं आहे. अनेकांनी प्राण गमावले, कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. तरीही जबाबदार यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे दुर्दैव. आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट खंडणीखोरीचे आरोप करत या रखडपट्टीचं मूळ कारण समोर आणलं आहे. ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधी पैसे मागतात, त्यामुळे पाच–सहा ठेकेदारांनी काम अर्धवट सोडल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर एका लोकप्रतिनिधीला दम दिल्याचंही उघड झालं. मात्र एवढं सगळं सांगूनही ‘तो लोकप्रतिनिधी कोण?’ हा प्रश्न अनुत्तरितच ठेवण्यात आला. याच मुद्द्यावर खासदार निलेश लंके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, “साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगा पैसे कुणी मागितले?” असं आव्हान दिलं. मागील सात–आठ वर्षांत काम अर्धवट सोडणारे ठेकेदार का गेले, कुणी वैतागून दिलं, कुणी काय मागितलं, हे समाजासमोर यावं, अशी त्यांची मागणी आहे. या आरोप–प्रत्यारोपांत मात्र सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे सामान्य नागरिक. रोज या रस्त्यावरून जाणारा शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार… यांच्यासाठी हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. राजकीय लढाया सुरू असताना रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा एखाद्या अपघाताची नांदी ठरत आहे. नगर–मनमाड महामार्गाचा प्रश्न आता फक्त बांधकामाचा राहिलेला नाही तो राजकीय इच्छाशक्तीचा आणि प्रशासकीय अपयशाचा आरसा बनला आहे. आरोप करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत, चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. अन्यथा हा महामार्ग पूर्ण होण्याआधी आणखी किती जीव जाणार, हा प्रश्न कायम राहील.

Nilesh Lanke : खड्ड्यांत अडकलेला महामार्ग ; आरोपांत अडकलेली जबाबदारी Read More »

nitin gadkari

Nitin Gadkari : ‘रोजगार वाढवणे हीच खरी प्राथमिकता’; नितीन गडकरी यांचे स्पष्ट मत

Nitin Gadkari : नागपूरमधील एका खाजगी कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांधी आणि नेहरूंचे उदाहरण देत सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरू नेहमीच म्हणायचे की अधिक उत्पादन झाले पाहिजे. तेच महात्मा गांधी म्हणायचे की अधिक उत्पादनासोबतच लोकांना अधिकाधिक रोजगार मिळाला पाहिजे. रोजगार निर्माण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. येत्या काळात जर यशस्वी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोजगार वाढवे गरजेचे आहे. याबरोबर विदर्भातील निर्यात वाढवण्याची गरज आहे. जर विदर्भ समृद्ध झाला तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि मग भारत समृद्ध होईल. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. असं मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Nitin Gadkari : ‘रोजगार वाढवणे हीच खरी प्राथमिकता’; नितीन गडकरी यांचे स्पष्ट मत Read More »

Nitin Gadkari: पंतप्रधानपदाची वापर कोणी दिली, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर

Nitin Gadkari :  लोकसभेपुर्वी आणि निकालानंतर मला विरोधकांनी पंतप्रधान पदाची वापर दिली होती असा धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमांमध्ये बोलताना केला.  या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, त्यांना एकदा नव्हे तर अनेक वेळा पंतप्रधान होण्याची ऑफर आली होती. मात्र, त्यांना कोणत्या विरोधी पक्षनेत्याकडून ही ऑफर देण्यात आली हे गडकरींनी सांगितले नाही. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गडकरींनी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून पंतप्रधानपदाची ऑफर आल्याचे सांगितले होते. आता गडकरींनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही अनेकवेळा आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आली होती. जेव्हा गडकरींना विचारण्यात आले की, त्यांना ही ऑफर सोनिया गांधी किंवा शरद पवार यांच्याकडून मिळाली होती का? त्यामुळे त्यांनी हा प्रश्न टाळला आणि त्याचा अर्थ काढण्यासाठी ते मीडियावाल्यांना सोडत असल्याचे सांगितले. ‘पंतप्रधान बनणे हे माझे ध्येय नाही’ नितीन गडकरी म्हणाले, मी माझ्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. विरोधकांनी मला पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याचे बोलले होते, मात्र पंतप्रधान होणे हे माझे ध्येय नसल्याने हा प्रस्ताव मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. मी माझ्या विचारधारेबरोबरच माझ्या श्रद्धांनुसार जगत आहे. नितीन गडकरी यांनी याआधीच विरोधकांच्या या ऑफरचा उल्लेख केला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमादरम्यान गडकरी म्हणाले होते की, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही, मात्र एका व्यक्तीने मला सांगितले की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. मी म्हणालो तुम्ही मला का साथ देणार आणि मी तुम्हाला का साथ देऊ?. पंतप्रधान होणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय नाही. मी माझ्या विश्वासावर आणि संघटनेशी एकनिष्ठ आहे आणि मी कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही, कारण माझा विश्वास माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. हा विश्वास भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असे मला वाटते.

Nitin Gadkari: पंतप्रधानपदाची वापर कोणी दिली, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरींनी दिले ‘हे’ उत्तर Read More »