DNA मराठी

Mumbai Indians

lalit modi

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा

Lalit Modi on BCCI : आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आयपीएलबाबत एक मोठा दावा केला आहे. ‘आयपीएलचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांचे असे म्हणणे आहे की, आयपीएलच्या कार्यपद्धतीतील एका विशिष्ट त्रुटीमुळे बीसीसीआयला (BCCI) दरवर्षी 1200 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. केवळ ही लीगच नव्हे, तर आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीलाही दरवर्षी तितक्याच रकमेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. ललित मोदी यांचा असा युक्तिवाद आहे की, बीसीसीआय या स्पर्धेसाठी सुरुवातीला निश्चित करण्यात आलेल्या स्वरूपाचे (format) पालन करण्यात अपयशी ठरत आहे. हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी, बीसीसीआयने पुन्हा एकदा पूर्णपणे ‘होम-अँड-अवे’ (home-and-away) स्वरूपाकडे वळावे, अशी शिफारस त्यांनी केली आहे. तसेच, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि राजस्थान रॉयल्स या दोन फ्रँचायझींचे मूल्यांकन (valuation) सुमारे 31,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे, या गोष्टीबद्दल ललित मोदी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ललित मोदी यांच्या मते, मूळ नियमानुसार प्रत्येक संघाने इतर प्रत्येक संघाविरुद्ध दोनदा सामने खेळणे बंधनकारक होते. 2022 मध्ये या लीगचा विस्तार होऊन त्यात 10 संघांचा समावेश झाल्यानंतर, निश्चित केलेल्या रचनेनुसार लीग टप्प्यात 90 सामने खेळवले जाणे अपेक्षित होते; त्यानंतर चार बाद फेरीचे (knockout) सामने नियोजित होते. मात्र, ‘होम-अँड-अवे’ पद्धतीत बदल करून, आयपीएलने सामन्यांची संख्या कमी करत केवळ 74 सामन्यांचे वेळापत्रक कायम ठेवले आहे; ज्यामध्ये प्रत्येक संघ सात ‘होम’ (घरच्या मैदानावर) आणि सात ‘अवे’ (प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने खेळतो. ‘स्पोर्टस्टार’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या महसुलापैकी 50 टक्के वाटा बीसीसीआयला मिळतो, तर उर्वरित 50 टक्के वाटा संघांमध्ये विभागला जातो. परिणामी, संघांना आता 20 सामन्यांना मुकावे लागत आहे. त्यांनी भरलेल्या फ्रँचायझी शुल्काचा विचार करता, त्यांना ‘होम-अँड-अवे’ सामन्यांचा पूर्ण कोटा मिळणे सुनिश्चित करणे ही एक करारात्मक जबाबदारी (contractual obligation) आहे. या स्पर्धेचे खरे मूल्य हे ‘होम-अँड-अवे’ स्वरूपातच दडलेले आहे. जर क्रिकेटच्या वेळापत्रकात (calendar) पुरेशी जागा उपलब्ध नसेल, तर सरळसरळ संघांची संख्या वाढवू नका. ही गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे. आम्ही कधीच अशा पद्धतीचे समर्थन केले नव्हते. सर्वांनी खरोखरच या बदलाला संमती दिली होती का? मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो की, त्यांनी तसे केले नव्हते.” त्यांनी पुढे नमूद केले: “ते ‘होम-अँड-अवे’ (घरच्या आणि प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर) सामने का खेळत नाहीत? यासाठी कदाचित काही सबबी असू शकतात; परंतु संबंधित संघांच्या दृष्टीने, हा एक करारान्वये प्राप्त झालेला अधिकार आणि त्याच वेळी एक व्यावसायिक व्यवहार देखील आहे.” सामन्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम फ्रँचायझी आणि लीग या दोघांच्याही मूल्यांकनावर (valuations) होतो, असे मोदी यांचे मानणे आहे. त्यांनी स्पष्ट केले, “जर आज ‘होम-अँड-अवे’ तत्त्वावर 94 सामने खेळले गेले असते आणि प्रत्येक सामन्यातून 118 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते, तर केवळ प्रसारमाध्यम हक्कांचे (media rights) मूल्यच 2400 कोटी रुपयांनी अधिक झाले असते. याचा अर्थ असा की, बीसीसीआयला 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल प्राप्त झाला असता. या रकमेपैकी 1200 कोटी रुपये 10 संघांमध्ये वितरित केले गेले असते ज्यामुळे प्रत्येक संघाला 120 कोटी रुपये मिळाले असते आणि परिणामी, या संघांचे मूल्यांकन आपोआपच वाढले असते.”

Lalit Modi on BCCI : ललित मोदींचा मोठा दावा; बीसीसीआय आणि आयपीएल संघांना दरवर्षी 2400 कोटी रुपयांचा तोटा Read More »

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर बीसीसीआयने एका आठवड्यासाठी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावा कमी होत असल्याने बीसीसीआयने आयपीएल 2025 पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बीसीसीआयने 12 मे रोजी नवीन वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. 17 मे पासून सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने एक तात्पुरता नियम लागू केला आहे, ज्यामुळे सर्व संघांना दिलासा मिळाला आहे. परंतु या नियमानुसार, संघांना एका अटीवर सहमती द्यावी लागेल. बीसीसीआयने नवीन नियम लागू केला उर्वरित 17 सामन्यांसाठी बीसीसीआयने एक नवीन नियम लागू केला आहे. बीसीसीआयने सर्व संघांना बदली खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी दिली आहे. अहवालानुसार, यापूर्वी, लीग टप्प्यातील 12 सामन्यांनंतर, खेळाडू दुखापती, आजार किंवा इतर कोणत्याही कारणामुळे बाहेर असल्यास संघांना बदली खेळाडूंवर स्वाक्षरी करता येत नव्हती. या हंगामात आतापर्यंत अनेक संघांनी 12 सामने खेळले आहेत. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता, बोर्डाने उर्वरित सामन्यांसाठी यावर सूट दिली आहे. याचा अर्थ असा की संघ आता नवीन खेळाडूला करारबद्ध करू शकतात. ही स्थिती संघांसमोर असेल या नियमासोबतच बीसीसीआयने संघांसमोर एक अटही ठेवली आहे. बोर्डाने आधीच सांगितले आहे की हे नियम फक्त तात्पुरते मानले पाहिजेत. याचा अर्थ असा की जर एखाद्या संघाने एखाद्या खेळाडूला करारबद्ध केले तर ते फक्त या हंगामासाठी असेल. तसेच संघ त्याला पुढील हंगामासाठी राखू शकत नाहीत. जर एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी केली तर संघ त्याला थांबवू शकत नाही आणि पुढच्या हंगामातच त्याला खरेदी करावे लागेल, जिथे तो खेळाडू पुन्हा त्याच संघासोबत खेळू शकेल अशी आशा फारच कमी असेल. हा नियम सर्व 10 संघांसाठी आहे. पण याचा फायदा फक्त 7 संघांनाच होईल. कारण तीन संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहेत. या हंगामात बाहेर पडणारा पहिला संघ सीएसके आहे.

IPL 2025 पुन्हा सुरू होणार, संघाना मान्य करावी लागणार बीसीसीआयची ‘ही’ अट Read More »

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल

IPL 2025 : रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल 12 धावांनी पराभव करत विजय नोंदवला आहे. मुंबईच्या विजयानंतर सध्या सोशल मीडियावर रोहित शर्माचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर चाहते वेगवेगळे कॉमेंट करताना दिसत आहे. करुण नायर – बुमराह वाद दिल्ली कॅपिटल्सकडून करुण नायरने शानदार कामगिरी केली. त्याने 89 धावांची खेळी खेळून संघाला विजयाच्या जवळ आणले. करुणने जसप्रीत बुमराहच्या षटकात 9 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या. दरम्यान, बुमराह आणि करुणमध्ये वाद झाला. करुणने बुमराहच्या चेंडूवर दोन धावा घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले, पण धाव घेताना दोघांमध्ये टक्कर झाली, जी बुमराहला आवडली नाही. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान, बुमराहने करुणला काहीतरी सांगितले, ज्यावर करुण नायरने प्रत्युत्तर दिले आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. यादरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माची मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा बुमराह आणि करुण वाद घालत होते, तेव्हा रोहित शर्माने मान वळवून मजेदार पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया चाहत्यांना खूप आवडली आणि ती सोशल मीडियावर व्हायरल झाली. दिल्ली कॅपिटल्सचा पराभव या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीचा संघ 19 षटकांत 193 धावांवर सर्वबाद झाला आणि मुंबईला 12 धावांनी सामना जिंकता आला. या विजयासह, सलग दोन पराभवांनंतर मुंबईने हंगामातील पहिला विजय मिळवला. त्याच वेळी, सलग विजयांनंतर दिल्लीला या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीकडून करुण नायरने 89 धावा केल्या तर मुंबईकडून कर्ण शर्माने तीन विकेट्स घेत सामन्याचा मार्ग बदलला. मुंबईने 205 धावा केल्यानंतर, दिल्लीला 206 धावांचा पाठलाग करणे कठीण झाले.

IPL 2025: बुमराह – करुण नायर वाद अन् रोहित शर्माचा रिएक्शन व्हायरल Read More »

IPL Mega Auction ‘या’ 72 खेळाडूंची लागली लॉटरी; पहा संपूर्ण लिस्ट

IPL Mega Auction: आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सुरू झाला आहे. रविवारी सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे लिलाव सुरु झाला आहे. दोन दिवस चालणाऱ्या लिलावात एकूण 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. सर्व 10 संघांमध्ये 70 विदेशी खेळाडूंसह एकूण 204 खेळाडूंसाठी जागा आहे. तर लिलावाच्या पहिल्या दिवशी रविवारी 84 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, त्यापैकी 10 संघांनी 72 खेळाडूंना खरेदीदार मिळाले आहे. कोणत्या खेळाडूला खरेदी करण्यासाठी कोणी बोली लावली जाणून घ्या. 11.मोहम्मद सिराज (गुजरात टायटन्स) 12.25 कोटी 19.रचिन रवींद्र (चेन्नई सुपर किंग्ज) 4 कोटी 21.व्यंकटेश अय्यर (कोलकाता नाईट रायडर्स) 23.75 कोटी 34.जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स) 12.50 कोटी 35.खलील अहमद (चेन्नई सुपर किंग्ज) 4.80 कोटी 43.अथर्व तायडे (सनरायझर्स हैदराबाद) 30 लाख 44.नेहल वढेरा (पंजाब किंग्ज) 4.2 कोटी 48.निशांत सिंधू (गुजरात टायटन्स) 30 लाख 50.नमन धीर (मुंबई इंडियन्स) 5.25 कोटी 53.विजय शंकर (चेन्नई सुपर किंग्ज) 1.20 कोटी 54 .रॉबिन मिन्झ (मुंबई इंडियन्स) 65 लाख 58.अनुज रावत (गुजरात टायटन्स) 30 लाख 68.सुयश शर्मा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) 2.5 कोटी 69. कर्ण शर्मा (मुंबई इंडियन्स) 50 लाख 70.मयंक मार्कंडे (कोलकाता नाईट रायडर्स) 30 लाख 71.कुमार कार्तिकेय सिंग (राजस्थान रॉयल्स) 30 लाख 72.मानव सुथार (गुजरात टायटन्स) 30 लाख

IPL Mega Auction ‘या’ 72 खेळाडूंची लागली लॉटरी; पहा संपूर्ण लिस्ट Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »