DNA मराठी

Modi government

Modi 3.0 : आज होणार मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब! अशी असेल नवीन सरकार

Modi 3.0 :  इंडियाकडून तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी भाजपने गुरुवारी सरकारच्या सूत्रावर मॅरेथॉन विचारमंथन सत्र आयोजित केले. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीच्या अनेक फेऱ्या सकाळी 10.30 ते रात्रीपर्यंत पार पडल्या.  या बैठकीत मंत्रिपदाच्या वाटपापासून ते शपथविधीच्या तयारीपर्यंत सर्व गोष्टींवर भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली. असे सांगण्यात येत आहे की भाजप गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र मंत्रालय ‘टॉप-4’ म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) अंतर्गत ठेवेल. इतर मंत्रालयांबाबत मित्रपक्षांशीच करार होऊ शकतो. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी होणाऱ्या NDA संसदीय पक्षाच्या बैठकीत आघाडीचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला औपचारिक मान्यता देण्यात येणार आहे. यानंतर सर्व पक्षांचे प्रमुख नेते राष्ट्रपती भवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. यापूर्वी 8 जूनला शपथविधी होण्याची शक्यता होती, मात्र 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनातच हा कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान, निवडणूक आयोगाने निवडून आलेल्या खासदारांची यादी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन ही यादी त्यांच्याकडे सोपवली. यासह, 16 मार्च रोजी निवडणुकीची घोषणा होताच देशात लागू झालेली आदर्श आचारसंहिता संपली. तर दुसरीकडे टीडीपीच्या सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांच्या पक्षाला चार खासदारांसाठी एक मंत्रीपद हवे आहे. त्यानुसार 16 खासदार असलेल्या टीडीपीला चार मंत्रीपदांची गरज आहे. टीडीपी एक कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदांवर दावा करत आहे. हा फॉर्म्युला पाहिला तर नितीशकुमार तीन मंत्रिपदांवर दावा करत आहेत, चिराग पासवान यांची एलजेपी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रत्येकी दोन मंत्रीपदांवर दावा करत आहे. मात्र, भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की भाजपला सर्व प्रमुख मित्रपक्षांना प्रत्येकी दोन मंत्रीपदे द्यायची आहेत, त्यापैकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री असेल. कोणत्या मंत्रालयावर कोणाचा डोळा आहे? नितीश कुमार यांचे मुख्य लक्ष रेल्वे मंत्रालयावर आहे तर टीडीपीला कृषी मंत्रालय हवे आहे. स्वत:ला शेतकऱ्यांचा पक्ष म्हणवून घेणाऱ्या जयंत चौधरी यांची नजर कृषी मंत्रालयावर आहे. पण, दोन खासदार असलेल्या आरएलडीला कृषीसारखे मोठे मंत्रालय द्यायला भाजप तयार नाही. भाजप हे मंत्रिपद देण्यास तयार मंत्रिमंडळातील आपल्या मित्रपक्षांना केवळ ग्राहक मंत्रालय, पोलाद मंत्रालय, अन्न प्रक्रिया आणि अवजड उद्योग मंत्रालय देण्यास भाजप तयार आहे. याशिवाय कोणत्याही मंत्रालयात केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्याची पक्षाची तयारी आहे. एनडीएमध्ये मंत्री होणे निश्चित एलजेपीचे चिराग पासवान, आरएलडीचे जयंत चौधरी आणि जेडीयूचे लालन सिंग किंवा संजय झा हे केंद्रात मंत्री होणे निश्चित मानले जात आहे. भाजपच्या मित्रपक्ष 14 पक्षांकडे 53 जागा आहेत टीडीपी – 16 JDU-12 शिवसेना (शिंदे)- 7 LJP-5 जेडीएस-2 RLD-2 जनसेना-2 AJSU-1 Ham-1 राष्ट्रवादी-1 अपना कार्यसंघ -1 AGP-1 SKM-1 UPPL-1

Modi 3.0 : आज होणार मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब! अशी असेल नवीन सरकार Read More »

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले

Ahmednagar Lok Sabha Election: भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या संविधानाचा खरा सन्‍मान भारतीय जनता पक्षाच्‍या सरकारमध्‍येच झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील उपेक्षित समाजाला न्‍याय देणा-या योजना सुरु करुन वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे मोठे काम केले आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते महायुतीच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रचार यंत्रणेत काम करत असल्‍याची माहीती लहुजी सेनेचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे तसेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.  नगर येथे महायुतीचे उमदेवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ खंदारे यांनी विविध भागांमध्‍ये दौरा करुन, मतदारांशी संवाद साधला. त्‍यानंतर निवडणूक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी लहुजी सेनेची भूमिका स्‍पष्‍ट केली. महायुतीच्‍या उमेदवाराला लहुजी सेनेचे पुर्ण समर्थन असून, महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍यासाठी लहुजी सेनेने सुध्‍दा जबाबदारी स्विकारली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  ज्‍या कॉंग्रेस पक्षाने या पुर्वी ७० ते ८० वेळा घटनेमध्‍ये बदल केला, त्‍यामुळे भाजपावर आरोप करण्‍याचा त्‍यांना कोणताही आधिकार नाही. संविधानाचा खरा सन्‍मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या कार्यकाळातच होवू शकला असे स्‍पष्‍ट करुन, लंडन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्‍या  निवासस्‍थाला राष्‍ट्रीय स्‍मारकाचा दर्जा देण्‍याचा निर्णय, इंदु मिल येथील डॉ.आंबेडकरांचे स्‍मारक तसेच वस्‍ताद लहुजींच्‍या स्‍मारका करीता ५ गुंठे जमीन आणि निधीची उपलब्‍धता करुन, देण्‍याच महत्‍वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्‍यामुळेच लहुजी सेनेने महायुती सरकारच्‍या निर्णयांचे स्‍वागत केले आहे.  लोकसभा निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूतीवर लहुजी सेनेचे सर्व कार्यकर्ते सक्रीयेपणे प्रचारात सहभागी झाले असून, युतीचे सर्व उमेदवार विजयी करण्‍यासाठी प्रयत्‍न करीत असल्‍याचे प्रदेशाध्‍यक्ष कैलास खंदारे यांनी सांगितले.

Ahmednagar Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचित घटकांना मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम केले Read More »

Modi Government: केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुरक केला

Modi Government:  मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या महत्वपुर्ण निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. पारंपारिक शेतीला प्राधान्य देऊन केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुरक केला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ते चिंचोडी पाटील येथील महायुतीच्या सभेत बोलत होते.    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या महत्त्वाकांक्षेसह शेती क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्यांना आणि त्यांचे प्रयत्न सुरक्षित करणे, त्यांना तंत्रज्ञानाचे जाणकार बनवणे, कृषी संशोधन आणि शिक्षणाला चालना देणे आणि शेतीशी संबंधित पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काही प्रमुख उद्दिष्टे आहेत. कृषी क्षेत्राच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम केले जात  असे त्यांनी खा. डॉ. विखे यांनी सांगितले.   यावेळी जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, भाजप. ता. अध्यक्ष अशोक कार्ले, राष्टवादीचे ता. अध्यक्ष अशोक कोकाटे, मार्केट समितीचे माजी संचालक हरिभाऊ कर्डीले, शिवसेना ता. अध्यक्ष अजित दळवी, युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  खा. विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलेला न्यू इंडिया हा त्यांच्या सबका साथ, सबका विकास या ब्रीदवाक्यावर चालतो, आणि शेतकरी कल्याण हा त्याचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभिक जोर हा जागरूकतेतून येतो. आणि ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.   या संदर्भात, लॅब-टू-लँड, हर खेत को पानी आणि पर ड्रॉप मोअर क्रॉप यांसारख्या संदेशांच्या सरकारच्या प्रेरणादायी योजनांनी शेतीची उत्पादकता वाढली आहे.   कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय सरकारी योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. हे काम जलद गतीने होत आहे .आपल्यासारख्या राष्ट्राची, जिथे जवळपास निम्मी कामगार शक्ती शेतीमध्ये गुंतलेली आहे, शेती शाश्वत केल्याशिवाय भरभराट होऊ शकत नाही. यामुळे तंत्रज्ञानापासून पीक विम्यापर्यंत, सुलभ कर्ज उपलब्धतेपासून ते आधुनिक सिंचन पद्धतींपर्यंत, संपूर्ण शेती चक्रामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सर्वसमावेशक कृती योजना राबवून पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम सुरू केले आहे.   श्री अन्नाच्या माध्यमातून देशातील तृणधान्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यांचा त्यांचा निर्णय महत्वपुर्ण ठरला. असे डॉ. खा. विखे  यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांचा विकास होत आहे. येणाऱ्या काळात महायुतीचे सरकार मार्फत विकसित भारताचे स्वप्न साकार होणार आहे. यामुळे पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा खासदार बनविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाला निवडुण आणण्याची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता काटेकोरपणे पार पाडील असा विश्वास जिल्हा बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी व्यक्त केला.

Modi Government: केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील आधुनिक शेतीचा मार्ग सुरक केला Read More »

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री

Modi Government: देशात मोदींची गॅरेंटी सुरू असून पुन्हा एकादा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत यात आता कोणतीही शंका राहिली नसून तरी कुणाला वाटत असेल मोदीच का? तर मोदीपर्वात झालेल्या कामांची माहिती घ्या, आणि देश कुणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय करा. असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी केले.   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माणिकदौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. आमदार मोनिका राजळे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले तालुका अध्यक्ष मृत्यूंजय गर्जे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, संजय बडे, अशोक चोरमले,भिमराव फुंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यापुर्वी खासदार विखे पाटील यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी उत्फुर्त स्वागत केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.   सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारचा काळ खुप  प्रभावी आणि आव्हानात्मक होता. तरी  कारभाराचा वेग, सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे, मजबूत पायाभूत सुविधा आणि अनेक दशकांपासून प्रलंबित समस्यांचे निराकरण यांना उच्च प्राधान्य दिले. आज देशात निर्णय घेणारे आणि जबाबदार सरकार आहे. या देशातील सामान्य माणुस, शेतकरी, कामगार, महिला आणि युवा वर्गाला पाठबळ देण्याऱ्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी झाल्यामुळे देशातील जनतेचा विश्वास हा मोदींजींवर असल्याचे त्यांनी सांगितले.  ही निवडणूक लोकसभेची आहे. त्यामुळे देश कुणाच्या ताब्यात द्यायचा हे ठरविण्यासाठीची ही निवडणूक आहे. भविष्य घडविण्यासाठी मोदींशिवाय पर्याय नाही, ही भाावना देशातील जनतेची झाली आहे. त्यामुळेच ४०० जागा जिंकुण भाजप आणि मित्र पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या सरकार मधुनच सुटू शकतात. यापुर्वीही केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याच्या रस्ते विकासाला मोठा निधी उपलब्ध झाला. भविष्यातही विकासाचे प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत. युवकांच्या रोजगारासाठी काम करायचे आहे. यासाठीच सत्ताधारी पक्षाचा खासदार होणे महत्वाचे आहे. ज्यांची सत्ता येणार नाही. त्यांच्या खोट्या आश्वासनांना भुलू नका असे आवाहन डॉ. विखे पाटील यांनी यावेळी केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांची काळजी आहे. ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, जी देशाला या आव्हानात्मक काळातून बाहेर काढण्यास सक्षम आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे सुरक्षा कवच आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनंतर भारत बलवान बनत आहे. आगामी काळात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा देश स्वावलंबन आणि आर्थिक विकासाच्या नवीन उंची गाठण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. मोदी सरकारच्या काळात देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात अनुच्छेद ३७० हटविण्यात आले. नागरिकता संशोधन विधेयक आणण्यात आले. राम मंदिर पुर्ण करण्यात आले. तीन तलाकच्या मुद्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. देशातील सैन्याला बळ देण्यात आले वायुसेनेत आठ अपाचे लढावू हेलिकॉप्टर सामील झाले. ३६ राफेल विमाने भारतीय सैन्यात दाखल झाली. आयुष्यमान भारत ३ कोटी हून अधीक लोकांना आरोग्य कवच मिळाले. अटल पेंशन २ कोटी हुन अधीक लाभार्थी. प्रधानमंत्री किसान योजना, जनधन योजना,प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, श्रमिक कल्याण योजना, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजनांमुळे भारत विकसीत देशाकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत जगात भारत महासत्ता म्हणुन उदयास येईल. यामुळे मोदीशिवाय देशात कोणताही पर्याय नाही.  हे आता माध्यमांच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाल्याचे खा. विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोदीपर्वातील कामांची मांडली जंत्री Read More »

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध

Modi Government:  पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची निर्मिती करून महिलांना प्रगतीपथावर आणण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे. यामुळे महिला सर्वच क्षेत्रात आपली छाप पाडत आहे. महिलांना सामाजिकदृष्ट्या समान हक्क मिळवून सामाजिक न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.  “मेरा बुथ सबसे मजबूत” कार्यक्रमाचेआयोजन बेलवंडी येथे करण्यात आले होते. यावेळी विक्रमसिंह पाचपुते, अण्णासाहेब शेलार व इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज भारत विकसनशील अर्थव्यवस्थेकडे चमकदार अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. देशाच्या या प्रगतीमागे महिलांचे मोठे योगदान आहे. एक काळ असा होता की महिलांसाठी घराबाहेर पडणेही फार कठीण होते. पण आता काळ बदलला आहे. महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चुरशीची स्पर्धा करत आहेत. व्यवसाय, शिक्षण, मनोरंजनापासून ते आयटी आदी अनेक क्षेत्रात महिला प्रगती करत आहेत. महिलांना बळ देण्याचे सर्वाधिक  काम मोदी सरकारच्या काळात झाले असल्याचे खा. विखे पाटील म्हणाले.  मोफत शिलाई मशीन योजनेच्या माध्यामातून लाखो महिला स्वयंरोगारात आल्या, सुकन्या समृद्धी योजनेतून मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याचे काम मोदी सरकारने केले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेमुळे महिला सक्षमीकरणाला चालना देण्यात आली.हिला शक्ती केंद्र योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना,लखपती दीदी योजना,प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,जननी सुरक्षा योजना अशा विविध योजनांची प्रभावीपणे शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे मागील १० वर्षाच्या काळात मोदी सरकारने सर्वाधिक महिला विकासाच्या योजना राबवत देशातील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम केले. यामुळे यावेळी सुद्धा महिलांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंसती आहे. पुन्हा देशात मोदी सरकार येईल आणि आतापर्यंत ज्या पध्ततीने महिलांचा विकास झाला त्याहुन अधिक गतीने महिलांचा विकास होईल असा विश्वास खा. विखे यांनी बोलून दाखवला.   जिल्ह्यात महिलांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार, महिला बचत गटाच्या माध्यातून जिल्ह्यातील महिलांना स्वंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यात महिलांसाठी विविध माध्यमातून रोजगार उभा करण्यावर भर दिला जाईल. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी असेलेल्या योजना प्रत्येक लाभार्थांपर्यंत पोहचविल्या जातील. असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Modi Government : महिला सक्षमीकरणासाठी मोदी सरकार सदैव कटीबद्ध Read More »

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

PM Modi: अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे,  असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी केले आहे. नागवडे ताई यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आमचे नेते अजित पवार यांच्या राज्य सरकारने चांगले काम केले आहे, लोककल्याणकारी कार्य करत आहे. खासदार विखे यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून लोकांना अपेक्षित विविध कामे केली आहेत, रस्त्यांचे अनेक प्रश्न खासदार सुजय विखे पाटील मार्गी लावले, पुन्हा एकदा त्यांना मतदार संसदेत पाठवणार आहे पण मतांची आघाडी जास्त झाली पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघात घरोघरी कमळ निशाणी पोहोचवा, असे सांगून सुजय विखे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. मोदीजींनी केलेली कामे आणि जगाचा त्यांनी जिकंलेला विश्वास हि आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार हा संपूर्ण जगाला विश्वास आहे. त्यामुळे जगातील अनेक दिग्गज उद्योग भारतात येण्यासाठी आतुर आहेत. यामुळे आपल्या देशाची ख्याती जगात उंचाविण्याचे काम यापुढेही होणार असून अबकी बार ४०० सौ पार होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

PM Modi : खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे Read More »

1st April : कामाची बातमी! आजपासून देशात बदलणार ‘हे’ 5 नियम; वाचा सविस्तर

1st April New Rules: आजपासून देशात नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आहे. या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 01 एप्रिलपासून देशात काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्याचे खिशावर होणार आहे.  माहितीसाठी जाणुन घ्या, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला, जो आजपासून लागू होईल. यामुळे काही नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, कर प्रणाली, नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), विमा आणि म्युच्युअल फंड (MF) च्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. कर स्लॅब अंतरिम अर्थसंकल्पानुसार, नवीन आर्थिक वर्षासाठी (FY2024-25), आर्थिक वर्ष 2023-24 शी संबंधित, आयकर स्लॅब अपरिवर्तित राहिले. 0 ते 3,00,000 रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करातून सूट दिली जाईल. 3,00,001 ते 6,00,000 रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के, 6,00,001 ते 9,00,000 रुपये 10 टक्के, 9,00,001 ते 12,00,000 रुपये 15 टक्के, 12,00,001 ते  15,00,000 साठी 20 टक्के आणि 15,00,000 आणि त्याहून अधिकसाठी 30 टक्के. नवीन कर प्रणालीचे फायदे प्रवासाच्या नोंदी आणि भाड्याच्या पावत्या ठेवण्याची गरज नाही  मूळ सूट मर्यादा 2.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपये करण्यात आली आहे करपात्र मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख रुपये. अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आला आहे. हे कमी केलेले दर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना लागू आहेत. जीवन विमा पॉलिसी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 नुसार, नवीन कर प्रणाली अंतर्गत, जीवन विमा पॉलिसींमधून प्राप्त होणारी रक्कम वर्षभरात भरलेला वार्षिक प्रीमियम 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास करपात्र असेल. ई-विमा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने यापूर्वी जाहीर केले होते की 1 एप्रिल 2024 पासून विमा पॉलिसींचे डिजिटलायझेशन अनिवार्य होईल. हा आदेश जीवन, आरोग्य आणि सामान्य विम्यासह सर्व विमा श्रेणींना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लागू होईल ज्यासाठी पॉलिसी जारी करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने सुरक्षा सुधारण्यासाठी द्वि-घटक प्रमाणीकरण उपाय सुरू केले. CRA प्रणालीमध्ये सर्व पासवर्ड-आधारित लॉगिनसाठी दोन-घटक आधार-आधारित प्रमाणीकरण अनिवार्य असेल. EPFO  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था आता नोकरी बदलल्यानंतर ग्राहकाची शिल्लक त्यांच्या नवीन संस्थेकडे स्वयंचलितपणे हस्तांतरित करेल. ईपीएफओ खातेधारकांना पीएफची रक्कम हस्तांतरित करण्याची विनंती करण्याची गरज नाही.

1st April : कामाची बातमी! आजपासून देशात बदलणार ‘हे’ 5 नियम; वाचा सविस्तर Read More »

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला कंटेनरने धडक दिल्याने अपघात झाला.   केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला.  सातारा जिल्ह्यातील वाई येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांच्या गाडीला अचानक ब्रेक लागल्याने कंटेनरला धडकली. या धडकेने कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आठवले यांची गाडी पुढे जाणाऱ्या कंटेनरने अचानक ब्रेक लावल्याने कंटेनरला धडकली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. सातारा एसपी समीर शेख यांनी केंद्रीय मंत्री आठवले सुरक्षित असून या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची पुष्टी केली. त्यानंतर आठवले दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Ramdas Athawale : मोठी बातमी! केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात,  कंटेनरने दिली धडक Read More »

Indian’s Spending :  काय सांगता, अन्नावर नाहीतर ‘या’ ठिकाणी जास्त खर्च करतात भारतीय, जाणून व्हाल थक्क

Indian’s Spending : नुकतंच सोशल मीडियावर एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सर्वेक्षणात भारतीय लोकांच्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती शेअर करण्यात आली आहे.  सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे मात्र लोकांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. या सर्वेक्षणानुसार आता भारतीय लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करताना दिसत आहे.  कपडे आणि मनोरंजनावर खर्च   या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे. लोक आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहे. यामुळे बाजारात खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.   या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा कमी झाला होता. ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा 2011-12 मध्ये 53 टक्के होता, तो आता 46.4 टक्के आहे. तर शहरी भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा या कालावधीत 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत शहरी भागात अखाद्य पदार्थांचा वाटा  57.4 टक्क्यांवरून वाढून चक्क 60.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर 47 टक्क्यांवरून चक्क 53.06 टक्क्यांवर ग्रामीण भागात आहे.   दरडोई ग्राहक खर्चात वाढ हे जाणून घ्या कि, ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान हे सरकारी सर्वेक्षण करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च होता तो आता अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर  ग्रामीण भागात हा आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत गेला आहे.  सर्वेक्षणाच्या या आकडेवारीनुसार भारतीय लोक आज अन्नावर कमी तर प्रवास आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, हा डेटा सरकार किरकोळ महागाई आणि GDP मोजण्यासाठी वापरते.

Indian’s Spending :  काय सांगता, अन्नावर नाहीतर ‘या’ ठिकाणी जास्त खर्च करतात भारतीय, जाणून व्हाल थक्क Read More »

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट

Amit Shah: राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. अब की बार चारसौ पारची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत.  मागील आठवड्यातच खा.सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. तर गुरुवारी पुन्हा खा.विखे यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अमित शहांची भेट घेतली असून ही भेट कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात तसेच यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे.  तसेच यावेळी शहा यांनी विखे पितापुत्रां सोबत महाराष्ट्रातील एकूण राजकीय घडामोडी आणि परिस्थितीवर महत्वपूर्ण चर्चा केल्याचे समजते. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना कांदा प्रश्नी शेतकऱ्यांची नाराजी अडचणीची ठरणारी आहे. कांद्या संदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि सरकारकडून असलेली अपेक्षा शहा  यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असून त्यात नगर,नाशिक,पुणे या कांदा पट्यातील शेतकरी पूर्ण कांदा पिकावर अवलंबून असतो, अशात निर्यात बंदीचा फटका शेतकर्यांना बसत आहे. त्यामुळे तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी किंवा नाफेड मार्फत योग्य भावात सरकारने कांदा खरेदी केंद्र सुरू करावेत यावर चर्चा झाली. यावेळी अमितभाई शाह यांनी लवकरात लवकर केंद्र सरकार कांद्याच्या निर्याती संदर्भात निर्णय घेईल, यावर लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणारा चांगला निर्णय घेईल असे शाह यांनी मंत्री विखे आणि खा.विखे यांना आश्वासीत केले आहे. दरम्यान या भेटी वेळी शहा यांनी राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.  विरोधकांप्रमाणे सत्तेत असलेल्या भाजपनेही आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही. मात्र पक्षांतर्गत खात्रीशीर उमेदवारांना लोकसभेच्या तयारीला लागण्याचे संकेत अंतर्गत पातळीवर देण्यात आल्याची माहिती समजते. तसेच उमेदवारांच्या नावांची घोषणा नसल्याने इच्छुकांच्या चुळबुळी सुरूच असल्याचे काही ठिकाणी चित्र आहे.  अशात खा.सुजय विखेंच्या  पक्षाचे महत्वपूर्ण नेतृत्व असलेल्या अमित शहांसोबत सातत्याने भेटी होत असून आज गुरुवारी खा.विखेंच्या सोबतच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शहा यांची भेट घेत कांदा प्रश्नासह राज्यातील विविध विषयांवर तसेच राजकीय घडामोडींवर चर्चा केली.

Amit Shah : मिळणार दिलासा? कांदा निर्यात बंदी उठवण्यासंदर्भात विखे पिता-पुत्रांची अमित शहांची भेट Read More »