DNA मराठी

Maharashtra Politics

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरीवर खाजगी व्यक्ती दावा करत असल्यामुळे सदर विहिरीचे पाणी हे गावासाठी खुले करण्यात यावे तसेच या विहिरीवर तार कंपाऊंड बांधण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण तसेच तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकटे बुद्रुक येथील वंचितचे शाखा अध्यक्ष गणेश बोरुडे यांच्यासह ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका अध्यक्षा संगीताताई ढवळे तसेच सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ फाटे यांनी मध्यस्थी करून सदर विहीर ही गावाला पाण्यासाठी खुली करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले बोंबाबोब आंदोलन हे मागे घेण्यात आले.  यावेळी सरपंच ज्योती हरिभाऊ फाटे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, शाखा उपाध्यक्ष राजू बोरुडे, लक्ष्मण बोरुडे, प्रकाश बोरुडे, राणी बोरुडे, वर्षा बोरुडे, वंदना बोरुडे, छाया बोरुडे, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य आंदोलक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagar News: लेखी आश्वासनामुळे ग्रामपंचायत समोरील वंचित आघाडीचे बोंबाबोंब आंदोलन मागे….! Read More »

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्…

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणला बसले आहेत. त्यांची तबीयत खराब होत असल्याने त्याच्या समर्थनार्थ अहमदनगर शहरात मराठा समाज्याच्या कार्यत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाला हार घालुन शहरात उघडलेली दुकान बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फुल देऊन दुकान बंद करण्याचे आव्हान करत शहरात रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मराठा समाज्याला आरक्षण ओबीसी कोट्यातुन आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणला सुरूवात केली.   गेल्या सहा दिवसापासुन सुरू असलेल्या उपोषणावर राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर   बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाज्याच्या कार्यकर्त्यानी गांधीगिरी करत सुरू असलेल्या  दुकान मालकांना गुलाबाचे फुल देत दुकान बंद ठेवण्याचे आव्हान करण्यात आले.

Maratha Reservation: मराठा आंदोलकांकडून अहमदनगर शहरात गांधीगिरी! दुकान मालकांना दिले गुलाबाचे फुल अन्… Read More »

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा

Manoj Jarange: मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे यासाठी आज अखंड मराठा समाज अहमदनगरकडून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले. तसेच जर जरांगे पाटील यांचे मागण्या पूर्ण झाले नाही तर तहसील कार्यालय नगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देखील अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी त्यात प्रामुख्याने सगेसीयर अधिसूचनेची अंमलबजावणी करणे. शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज जोमाने चालू ठेवावे. मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद सातारा मुंबई गॅझेट लागू करावे. इ. मागण्यांसाठी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहे. सरकारने त्यांच्या या मागण्या मान्य न केल्यास मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अ. नगर यांच्यावतीने हे निवेदन दिलेपासून 48 तासात मागण्या मान्य न झाल्यास तहसील कार्यालय नगर येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांच्यासह काही मराठा बांधव आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा अखंड मराठा समाज अहमदनगरकडून देण्यात आला आहे.

Manoj Jarange: … तर आमरण उपोषणास बसणार, अखंड मराठा समाजाकडून सरकारला इशारा Read More »

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम

Sanjay Gaikwad : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तत्वानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर काल रात्री बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना  मी माझ्या वक्तव्यावर ठाम असून माफी मागणार नाही अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.  यावेळी ते म्हणाले की, स्टेटमेंट मी केले, मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील. माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आरक्षण संपणाऱ्या बद्दला जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. 70 कोटी लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पलानिग काँग्रेसने केले. काँग्रेसपेक्षा जास्त आंदोलन आम्ही केलीय. आम्हाला पण दहा दहा हजार आणून आंदोलन करता येतील असं ते म्हणाले.  तर माझ्या कार्यक्रममध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा. तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जी जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वयक्तिक मत आहे. असेही या वेळी ते म्हणाले.  तसेच आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही आरक्षणला विरोध करणाऱ्यांना जर धडा शिकवण्याकरता जर गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे. असेही संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Sanjay Gaikwad : ‘मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री…’, संजय गायकवाड ‘त्या’ वक्तव्यावर ठाम Read More »

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत !

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे हे नाव मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला नवीन नसलं तरी तो कायम वैविध्यपूर्ण भूमिका करून चर्चेत असणारा अभिनेता आहे. आता पुन्हा एकदा नव्याने तो  चर्चेत आला आहे ते म्हणजे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “विस्फोट” ह्या चित्रपटाच्या निमित्ताने.  रितेश देशमुख, फरदीन खान, सीमा बिस्वास ह्या बहुचर्चित नावांच्या यादीत आपल्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्याचं ही नाव आता कौतुकाने आणि बरोबरीने घेतलं जातंय. मराठी प्रेक्षकांना याचा नक्कीच अभिमान आहे ही कौतुकाची बाब आहे.दिग्दर्शक कुकी गुलाटी ह्याच्या मार्गदर्शनाखाली त्याने ह्या चित्रपटात केलेल्या अभिनयाची विशेष चर्चा होत आहे.  मुळात आपल्या कामाच्या निवडी बाबत काटेकोर असल्यामुळे नचिकेत कायमच अत्यंत महत्त्वाच्या आणि आशयघन चित्रपट आणि नाटकांचा भाग असतो.  “तू” “रामप्रहर” “सिंधू सुधाकर रम आणि इतर” अश्या प्रायोगिक नाटकांच्या सोबत “दिल दोस्ती दुनियादारी” “पिंजरा” “लक्ष्मणरेषा” ह्या सारख्या मालिकांच्या आणि “अस्तू” “मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर” इत्यादी कलात्मक चित्रपटांच्या बरोबरीनेच मुख्य प्रवाहातील “फोर्स 2” “रॉकी हँडसम” “दगडी चाळ – 2” अश्या अनेक दर्जेदार कलाकृींमध्ये त्यानी ह्या पूर्वी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.  आता पुन्हा एकदा अनेक नवनवीन आणि उत्तमोत्तम कलाकृतींच्या माध्यमातून तो प्रेक्षकांसमोर येत आहे. नचिकेत भविष्यात अनेक उत्तम प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे यात शंका नाही.

Marathi Movie: नचिकेत पूर्णपात्रे पुन्हा एकदा ‘या’ कारणासाठी आला चर्चेत ! Read More »

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा

Ahmednagar Crime : 14 महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) यांच्या मृत्यूची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती मात्र त्यांच्या मृत्यु संशयास्पद झाला असल्याचा दावा नातेवाईकांकडून करण्यात येत होता.   सदर संशयास्प्द मुत्यू त्याचे सोबत असणारा मित्र प्रमोद जालींदर रणमाळे याने घडवुन आणला असा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होता.   या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हेशाखा, युनिट क. 2 कडिल पोहवा/मनोहर शिंदे यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने  आरोपी प्रमोद जालींदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, यांनी शिताफिने ताब्यात घेतले.  आरोपीची वरीष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि समाधान हिरे यांनी तपास कौशल्य, अ.मू.चे पेपर अवलोकन, तांत्रीक विश्लेषण वापरून विचारपुस केली असता आर्थिक व्यवहारातून हत्या केल्याची कबुली दिली.  मयत अभिजीत सांबरे हा आरोपीचा मित्र होता. त्यांचे यापुर्वीपासुन पैश्यांचे व्यवहार होते व त्यातुन त्यांचा वाद विकोपास गेला होता. त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे याने मयत इसम अभिजीत सांबरे यास मारण्याबाबत डाव आखलेला होता.  27 जुन 2023 रोजी आर्थीक व्यवहाराकरीता यातील मयत हा येवला जि, नाशिक येथे जाणार होता. त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते. संशयित प्रमोद रणमाळे याने यातील मयत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेवुन रात्री 9.00 वाचे सुमारास त्यास दारूमधुन ब्लड प्रेशर व झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळया मिसळुन त्यास दारू पाजली. त्यातुन मयत अभिजीत सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असतांना त्यास त्याचे बुलेट गाडीवर मागे बसुन येवला येथुन संभाजीनगर कडे जाणा-या रस्त्याने वैजापुर गावाजवळुन कोपरगाव रस्त्याने घेवुन गेला.  मयत इसम अभिजीत सांबरे याची शुध्द हरपल्याचा अंदाज घेवुन गाडी थांबवुन त्यास कोपरगाव रस्त्याचे कडेला फेकुन देवुन पोबारा केला होता.  या प्रकरणात कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे भादंविक 302 प्रमाणे दाखल झाला असुन त्यास पुढील तपासकामी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले आहे.

Ahmednagar Crime : अभिजीत सांबरेची हत्याच! 14 महिन्यानंतर धक्कादायक खुलासा Read More »

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका

Ganesh Chaturthi 2024 : आजपासून गणेश चतुर्थीचा उत्सव सूरु होत आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो. या 10 दिवसात काही खास गणेश मंत्रांचा नियमित जप केल्यास सर्व प्रकारच्या समस्या टाळता येतात.   मंत्र 1 वक्रतुंडा महाकाया सूर्यकोटी समप्रभा । कुरुमध्ये कोणत्याही अडथळ्याविना देव नेहमी कार्यरत असतो. मंत्र 2 विघ्नेश्वराय वरदया सुरप्रियाया लंबोदयाय सकलय जगद्धितायम् । नागनाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते मंत्र 3 अमेय च हेरंब परशुधरके ते । मूषक वाहनायव विश्वेशाय नमो नमः । मंत्र 4 एकादंतय शुद्धाय सुमुखाय नमो नमः । प्रापण जनपालय प्रणतर्ती विनाशिने । मंत्र 5 एकदंताय विद्महे । वक्रतुंडय धीमा । तन्नो दंति प्रचोदयात् । इतर मंत्र – ओम गं गणपते नमः – ओम वक्रतुंडया हम – गं क्षिप्राप्रसादाय नमः मंत्र कसा जपायचा? वर नमूद केलेल्या कोणत्याही मंत्राचा जप सुरू करण्यापूर्वी, स्नान करून शुद्ध व्हा आणि स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास हिरवे धोतर परिधान करून मंत्राचा जप करावा. श्री गणेशाच्या मूर्तीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि रुद्राक्ष जपमाळेने कोणत्याही एका मंत्राचा जप सुरू करा. कमीत कमी 5 फेऱ्या जप करा. एक जपमाळ म्हणजे 108 वेळा. मंत्रजप करताना बसण्यासाठी कुश मुद्रा वापरल्यास चांगले होईल. मंत्राचा जप केल्यानंतर तुमची काही इच्छा असेल तर श्री गणेशासमोर बोला. अशाप्रकारे गणेशोत्सवाचे 10 दिवस अखंडपणे मंत्र जपल्यास श्रीगणेश सहज प्रसन्न होऊ शकतात. हा उपाय खूप सोपा आहे जो प्रत्येकजण करू शकतो.

Ganesh Chaturthi 2024 : गणेश उत्सवादरम्यान दररोज ‘या’ 5 मंत्रांचा जप करा, समस्यांपासून मिळणार सुटका Read More »

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले

Eknath Shinde : मिरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC), जी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) एक महत्त्वाची नागरी स्थानिक संस्था (ULB) आहे, आपल्या नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या, सुरक्षेसाठी व कल्याणासाठी प्रबळ वचनबद्ध आहे.  १२ लाख लोकसंख्येसाठी ३६६ शाळांचे व्यवस्थापन करणारी एमबीएमसी सुमारे १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहिली आहे. महाराष्ट्र शासनाने २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या (GR) अनुषंगाने, एमबीएमसीने विद्यार्थ्यांच्या केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एमबीएमसीने ३६ शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सुमारे १०,००० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात आहे. सततच्या देखरेखीमुळे कोणत्याही घटनेवर त्वरित कारवाई करता येते. तसेच, एमबीएमसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचण्या देखील घेत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या  सुविधेचे उद्घाटन भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृहात  करण्यात आले. एमबीएमसी आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन हे देखील उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा संदेश दिला की, केवळ सुरक्षा सुनिश्चित करणेच नव्हे, तर ती खरी वाटली पाहिजे. त्यांनी असे स्पष्ट केले की संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे की स्थानिक संस्थांचा समावेश करून, सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे.  मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एक सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळावे, अशी भावना निर्माण करणे आहे. महापालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव काटकर यांनी विद्यार्थी कल्याणासाठी ही समग्र दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. घटनांच्या प्रतीक्षेत न राहता, एमबीएमसीच्या शाळा सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. पालिका शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, १०,००० विद्यार्थ्यांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, आणि नियमित तपासणी करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय, एमबीएमसीने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य चाचण्या सादर करून, १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे. एमबीएमसीच्या या सुरक्षितता उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रिअल-टाइम मॉनिटरिंगवर दिलेला भर आहे, ज्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटर (CSCC) मुळे १००० कॅमेऱ्यांचे एकाचवेळी निरीक्षण करता येते. ही सुविधा दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यरत असते, ज्यामुळे अखंड देखरेख केली जाते. एमबीएमसीने हे मॉडेल इतर शहरांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये देखील वाढवण्याचे नियोजन केले आहे. भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड (पूर्व) येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार जनेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली. एमबीएमसीचा हा उपक्रम केवळ सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर जाणवावी यासाठी केलेला प्रयत्न आहे, आणि भविष्यात जबाबदार व सशक्त नागरिक घडवण्यासाठी त्याची वचनबद्धता दर्शवतो.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले Read More »

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दिली.  अहिल्‍यानगर हे नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नसल्‍याचे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग सुकर झाला असल्‍याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवींचे नाव देण्‍याची मागणी झाल्‍यानंतर राज्‍यातील महायुती सरकारने अहिल्‍यानगर असे नाव देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतला. नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत पुर्ण होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते.  केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी करुन, अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वेस्‍थानक देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केल्‍याने जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पुर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

Ahmednagar News: मोठी बातमी, अहमदनगरच्या नामांतरासाठी रेल्‍वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल Read More »

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी

Haryana Jind Accident: हरियाणात एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 7 भाविकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहे. माहितीनुसार, सोमवार-मंगळवारच्या रात्री मोठी दुर्घटना घडली. हरियाणातील जिंद येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. जिंद येथे ट्रकने पुढे जात असलेल्या टाटा मॅजिकला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 8 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील कुरुक्षेत्रातील मार्चखेडी गावातील लोक राजस्थानमधील गोगामेडी येथे जात होते. टाटा कारमध्ये एकूण 15 जण प्रवास करत होते. हे लोक सोमवारी संध्याकाळी घरून निघाले होते. यावेळी टाटा एस नरवाना येथील बिधराना गावाजवळून जात असताना हिस्सार-चंदीगड राष्ट्रीय महामार्गावरील बिधराना ते सिमला या गावादरम्यान लाकडाने भरलेल्या ट्रकने मागून धडक दिली. टक्कर झाल्यानंतर टाटा-एस खड्ड्यात उलटली आणि मध्यरात्री एकच गोंधळ उडाला. या वेळी महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी जखमींना मदत केली. त्यानंतर नरवाना पोलिसांनी घटनास्थळी 7 रुग्णवाहिका पाठवून त्यांना नरवाना येथील शासकीय रुग्णालयात नेले. येथे 7 जणांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमींना अग्रोहा येथे रेफर करण्यात आले आहे.

Haryana Jind Accident: भीषण अपघात, 7 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी Read More »