DNA मराठी

Loksabha election

Narendra Modi : ‘या’ दिवशी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शिंदे गटाला मंत्रिमंडळात मिळणार स्थान?

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर आता सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे.  यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जून रोजी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षाची बैठक पार पडली असून या बैठकीमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली समोर आलेल्या माहितीनुसार, 8 जूनला पंतप्रधानपदाची मोदी शपथ घेणार आहे. यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे.  लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागा मिळाले असून त्यांनी बहुमतासाठी लागणारा 272 चा आकडा पार केला आहे. यामुळे मोदी पुन्हा एकदा राष्ट्रपतीकडे सरकार स्थापन करण्याच्या दावा करणार आहे आणि 8 जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू यांच्यासह नितीश कुमार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील एनडीएला समर्थन पत्र दिले आहे.

Narendra Modi : ‘या’ दिवशी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, शिंदे गटाला मंत्रिमंडळात मिळणार स्थान? Read More »

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

Congress Candidate List : लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसकडून राज्यातील सात लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. राज्यात 48 जागांपैकी काँग्रेस 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर इतर जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे.  काँग्रेसने यावेळी शाहू महाराजांना कोल्हापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने अनेक दिवसांपासून केली आहे. शिवसेनेने (UBT) कोल्हापूरच्या जागेवरही दावा केला होता, पण शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे ती मागे पडली. कोल्हापूरच्या माजी राजघराण्याचे प्रमुख म्हणून छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्रात खूप आदर आहे. काँग्रेससोबत त्यांचा दीर्घकाळचा राजकीय संबंध असला तरी, 1998 च्या लोकसभा निवडणुकीत अयशस्वी झाल्यापासून त्यांनी पक्षाशी औपचारिक संबंध टाळला आहे. मराठा समाजातही त्यांचा मान खूप उंच आहे. महाराष्ट्रातून ही नावे जाहीर करण्यात आली कोल्हापूर- शाहू महाराज सोलापूर- प्रणिती सुशीलकुमार शिंदे पुणे- रवींद्र धंगेकर लातूर- शिवाजी काळगे नंदुरबार- गोवळ पाडवी अमरावती- बळवंत वानखेडे नांदेड- वसंतराव चव्हाण महाराष्ट्रातील विरोधी आघाडी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे.  एमव्हीएची थेट स्पर्धा भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीशी आहे.

Congress Candidate List : काँग्रेसकडून 7 जागांवर उमेदवार जाहीर, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी Read More »

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंबाचा कणा असुन तिच्या अस्तित्वावर कुटुंबाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे तिने कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहणे गरजेचे आहे.  आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत असून आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील तितक्याच काळजीने पार पडत आहे.  महिलांच्या अतुलनीय योगदानामुळे समाजाची व राष्ट्राची चौफेर प्रगती होईल असे मत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले असून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या लाडजळगाव येथील उत्कर्ष फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष ज्ञानेश्वर तहकिक, अमोल तहकिक, चंद्रकांत खरात, भाऊसाहेब क्षीरसागर, जगदीश जंगम यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.  प्राध्यापिका संजीवनी नवल यांचे व्याख्यानाला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून शोभा तहकिक, मोनिका छाजेड, मनीषा कळसाई, मयुरी परदेशी, अस्मिता मराठे, पूजा मुळे, रेखा परदेशी, सुमनबाई कुलकर्णी, कांताबाई राठोड, रुख्मिणी कुलकर्णी आदींसह  महिलांचा सन्मान करण्यात आला होता. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Rajshritai Ghule Patil : स्त्री ही तिच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे :- सौ. राजश्रीताई घुले पाटील Read More »

Ahmednagar News : जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी नवनागापूर येथे होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Ahmednagar News :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.  या निमित्ताने महिलांच्या करमणुकीसाठी सुप्रसिद्ध गायक – संगीतकार अजय अतुल म्युझिकल नाईटचे ही आयोजन करण्यात आले असून नटरंग फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मानसी नाईक यांचीही नृत्य अदाकारी यावेळी पाहायला मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्राचे हास्यवीर रोहित माने व शिवाली परब यांच्या कॉमेडीचा तडका ही पाहायला मिळणार आहे.   नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विविध तालुक्यात कला,मनोरंजन, गायन, संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून आली. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले.  या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून  कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे रविवारी (दि.१०) सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Ahmednagar News : जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी नवनागापूर येथे होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान Read More »

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय

Uddhav Thackeray: राज्यात पुन्हा एकदा खरी शिवसेना कोणाची या प्रश्नावर चर्चा सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठा निर्णय देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती.  मात्र राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला होता. या याचिकेवर आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या नोटिशीला 01 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सभापती राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या शिवसेनेच्या (यूबीटी) गटाने दाखल केलेल्या याचिकेवर   सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, उद्धव गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात पाठवण्याची मुख्यमंत्री शिंदे यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच होळीनंतर या प्रकरणाची सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट हाच ‘खरा’ शिवसेना पक्ष असल्याच्या सभापतींच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाने नुकतीच याचिका दाखल केली होती. यापूर्वी, CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने CM शिंदे आणि इतर 38 शिवसेना आमदारांना नोटीस बजावली होती आणि शिवसेनेच्या UBT च्या याचिकेवर त्यांचे उत्तर मागितले होते. मात्र अद्याप उत्तर दाखल झालेले नाही. या खंडपीठात CJI चंद्रचूड व्यतिरिक्त न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे उद्धव गटाचा  म्हणणे आहे. कारण सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण प्रकरण निरर्थक ठरणार आहे. सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, “आम्ही होळीच्या सुट्टीनंतर सुनावणीसाठी या प्रकरणाची  सुनावणी करून प्रकरण निकाली काढू.”  अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणाच्या (स्पीकर) कार्यालयातून मूळ रेकॉर्ड मागवण्यात येईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात होईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. . काय आहे उद्धव गटाच्या याचिकेत? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, विधानसभा अध्यक्षांच्या 10 जानेवारीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे, कारण विधानसभेत आणि पक्षाची सत्ता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुमत आहे. याशिवाय शिंदे आणि त्यांच्या गटातील शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळण्यालाही याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

Uddhav Thackeray : शिंदे गटाला धक्का! ‘त्या’ प्रकरणात होळीनंतर होणार निर्णय Read More »

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट

Loksabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच सत्ताधारी ‘महायुती’ मध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.   तर दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप राज्यातील काही विद्यमान खासदारांना धक्का देणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार भाजप आगामी लोकसभा विद्यमान निवडणुकीमध्ये तब्बल डझनभर खासदारांना तिकीट नाकारणार आहे. यामुळे आता कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला पुढील आठवड्यामध्ये ठरू शकतो.  यानंतर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करण्याची शक्यता आहे.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीच्या जागावाटपात विजय हा एकमेव निकष आहे. महायुतीमध्ये समाविष्ट सर्व पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. सुरुवातीची चर्चा सकारात्मक झाली असून 11-12 मार्चपर्यंत जागावाटपाचा निर्णय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील लोकसभेच्या 45 जागा कशा जिंकायच्या, याशिवाय जागावाटपाचा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. पंतप्रधानांच्या विजयासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. अनेक बैठका होऊनही महायुती आघाडी किंवा विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीने महाराष्ट्रात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. राज्यातील विद्यमान खासदारांची कार्यपद्धती आणि परिणामकारकता जाणून घेण्यासाठी भाजपने पक्षांतर्गत तीन सर्वेक्षण केल्याचे वृत्त आहे. डझनभर खासदारांचा स्ट्राइक रेट समाधानकारक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या खासदारांचा स्ट्राइक रेट चांगला नाही अशा खासदारांना हटवले जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांची निवड करताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदारांची कामगिरी हा सर्वोच्च निकष ठेवला आहे. याशिवाय सामाजिक समीकरणाबरोबरच स्थानिक पातळीवरील राजकारणातील त्या नेत्याचा प्रभावही तपासण्यात आला आहे. भाजपने राज्यातील 32 ते 37 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजप येत्या दोन-तीन दिवसांत लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करू शकते. ज्यामध्ये डझनभर नवीन नावांचा समावेश अपेक्षित आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी या खासदारांची तिकिटे कापली जाऊ शकतात. 1. उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन 2. उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 3. सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी 4. सांगली- संजय काका पाटील 5. लातूर- सुधाकर श्रृंगारे 6. जळगाव- उन्मेष पाटील 7. धुळे- सुभाष भामरे 8. बीड- प्रीतम मुंडे 09. नांदेड- प्रतापराव चिखलीकर 10. रावेर- रक्षा खडसे 11. वर्धा- रामदास तडस.

Loksabha Election: भाजप देणार ‘या’ विद्यमान खासदारांना धक्का; कापले जाणार तिकीट Read More »

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं

Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा जागेवर अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का याबाबत तर्क वितर्क लावले जात असतानाच यावर आमदार प्राजक तनपुरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.  अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील असा आम्हाला आशा आहे असा विश्वास यावेळी आमदार तनपुरे यांनी व्यक्त केला. निलेश लंके देखील लवकरच शरद पवार गटात येतं लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आमदार तनपुरे म्हणाले की, लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नसून मी स्वतः लोकसभा लढवणार नाही मी विधानसभा लढवणार आहे असं तनपुरे यांनी स्पष्ट केलं तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, लंके यांनी घेतलेल्या महानाट्य मोठा जनप्रतिसाद मिळाला.  तसेच येणाऱ्या काळामध्ये अनेक लोक हातातली घड्याळ काढून तुतारी फंकण्यास सज्ज राहतील अशी आशा आम्हाला आहे.  लंकेचा पक्षप्रवेश होणार काय यावरती बोलताना ते म्हणाले की लंके का येणार नाही असे म्हणतच एक प्रकारे लंकेंचा लवकरच पक्ष प्रवेश होणार असं असं सुचक विधान यावेळी तनपुरे यांनी केलं.  महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी अगदी तोला मोलाचा उमेदवार दिला जाईल  याबाबत कुठलेही शंका नाही असं देखील यावेळी बोलताना प्राजक्ता तनपुरे यांनी स्पष्ट केले.

Loksabha Election 2024 : निलेश लंके लोकसभेची तुतारी फुंकणार… तनपुरे यांनी सांगूनच टाकलं Read More »

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक मत झालं आहे. MVA ने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून याचा औपचारिक घोषणा दोन दिवसांत होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस किमान 10 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. तर काँग्रेस लोकसभेच्या 18 जागांवर निवडणूक लढवणार आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळतील. उद्धव गट व्हीबीएला दोन जागा देणार आहे. व्हीबीएने पाच जागांची मागणी केली होती.  तर पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष म्हणून राजू शेट्टी यांना पाठिंबा देणार आहे. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा लढवणार आहे. त्यापैकी मुंबई नॉर्थ ईस्टची एक जागा व्हीबीएला देता येईल. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष दोन गटात विभागले गेले असून त्यांचा प्रत्येक गट हा बहुतांश आमदारांसह सत्ताधारी महायुतीच्या युतीचा भाग आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपसोबत युती करून 23 जागा लढवल्या होत्या. यामध्ये भाजपला 23 तर शिवसेनेला 18 जागांवर यश मिळाले.  शिवसेनेने मुंबईच्या दक्षिण मध्य आणि उत्तर-पश्चिमच्या जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ चंद्रपूर जिंकले, तर राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चारवर विजय मिळवला.  अविभाजित शिवसेनेने 2019 ची निवडणूक भाजपसोबत युती करून लढवली होती आणि लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. मात्र तत्कालीन शिवसेना आता दोन गटात विभागली गेली आहे. त्यापैकी केवळ 5 खासदार उद्धव यांच्यासोबत आहेत, तर उर्वरित 13 खासदार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे आहेत. भाजपसाठी महाराष्ट्र जिंकणे महत्त्वाचे भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. खरे तर, उत्तर प्रदेश (80 जागा) नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. त्यामुळे ही दोन्ही राज्ये भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यासाठी विशेष रणनीतीही आखण्यात आली आहे. 2019 मध्ये निकाल कसे लागले? गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या. तेव्हा शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने 25 ठिकाणी निवडणूक लढवली आणि त्यांना केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीने 19 जागा लढवून चार जागा जिंकल्या. तेव्हा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष व्हीबीएने लोकसभेच्या 48 पैकी 47 जागा लढवल्या होत्या. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. पण व्हीबीएला सुमारे सात टक्के मते मिळाली. त्यावेळी राज्यात भाजपला सुमारे 28 टक्के, शिवसेनेला 23 टक्के, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 16 टक्के मते मिळाली होती. असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला एक टक्क्यांहून कमी मते मिळाली, परंतु औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एआयएमआयएमला यश मिळाले.

Maharashtra Politics : MVA मध्ये एकमत! ‘इतक्या’ जागांवर काँग्रेस लढवणार निवडणूक Read More »

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »