DNA मराठी

latest update

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल

Nilesh Lanke News : गेली पन्नास,साठ वर्षे आमच्याकडे जिल्ह्याची सत्ता असल्याचे ते आपल्या भाषणातून सांगतात.या काळात त्यांनी केलेले असे एक काम दाखवावे की जे पंचवीस वर्षे जनतेच्या लक्षात राहिले आहे.त्यांच्याकडे मंत्रीपदे होती, आहेत.पण एकही मोठा प्रकल्प त्यांनी जिल्ह्यात आणला नाही.त्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण नगर जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले.असा हल्लाबोल आमदार नीलेश लंके यांनी नाव न घेता विखे पिता पुत्रावर केला.  स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या सहाव्या दिवशी राहुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरीकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आ. प्राजक्त तनपुरे, जि.प.चे मा. अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  लंके म्हणाले, तुमच्या तालुक्याला खासदार धार्जिण नाही असे भाषणातून सांगण्यात येते. ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही ते कृतघ्न असतील. परंतू नीलेश लंके हा माणूस असा आहे की एखाद्याने एकदा मदत केली तर मी त्याला आयुष्यभर विसरत नाही. त्याला शंभरवेळा मदत केल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. आपल्या संकटात ज्यांनी मदत केली त्यांना मदत करण्याची भावना मनात असली पाहिजे.  विखेंना ज्यांनी मदत केली, त्यांनी त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. नगर शहरात अनिलभैय्या राठोड यांनी त्यांना नगर शहर दाखविले. निवडणूकीनंतर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्ही आम्ही कोण ?असा सवाल लंके यांनी  केला.    राजकारणात जिरवाजिरवी करण्यापेक्षा मी कामाला महत्व देणारा माणूस आहे.तुम्ही म्हणाल खरोखर माणूस भेटला आपल्याला. त्यांच्याकडे कामापेक्षा जिरवाजिरवीला जास्त महत्व असते. मागच्या निवडणूकीत त्यांनी मोठ मोठ्या गप्पा केल्या. सहा महिन्यानंतर प्राजक्त तनपुरे हे निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. ते प्रचाराला गेल्यावर त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडून मते मागतील.  खासदारांनीही कामाचा लेखाजोखा मांंडणे अपेक्षीत असताना अपयश झाकून ठेवण्यासाठी डाळ आणि साखर वाटप करण्याची आयडीया त्यांनी शोधून काढल्याचे लंके म्हणाले.  नादी लावणारांना  घरी पाठविण्याची वेळ  पाण्याची बाटली २० रूपयांना मिळते. शेतकऱ्याचा जोड धंदा असलेल्या दुधाला २२,२३ रूपयांचा भाव मिळतो आहे. पालकमंत्री दुग्धविकास मंत्री आहेत ते दुधाला भाव का वाढून देत नाहीत ? ते म्हणाले, ५ रूपये अनुदान देऊ. कागद गोळा केले, शेतकऱ्यांना नादी लावले अनुदान मात्र मिळालेच नाही. हे लोक नादी लावणारे असून त्यांना आता घरी पाठविण्याची वेळ आली आहे.  रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर नाव बदलेल नगर-पाथर्डी रस्त्यासाठी मी उपोषण केले ते उपोषणही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या उपोषणानंतर या रस्त्याचे काम मार्गी लागले. १३ तारीख होऊ द्या, नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू करून दिले नाही तर मी माझे नाव बदलून ठेवील. आभाळ फाटलंय, कोणतीच यंत्रणा शिवू शकणार नाही ! पूर्वी निवडणूकीच्या प्रचारासाठी एखादा नेता येणार असेल तर हातापाया पडून लोक जमा करावे लागत असत. इथे उलटे झाले आहे. दोन, दोन, तीन, तीन तास लोक वाट पाहत आहेत. जिल्हयात असे भासविले जाते की यंत्रणा, यंत्रणेचा याला फोन, त्याला फोन. कसली यंत्रणा ? यंत्रणा फिंत्रणा काही नाही ! आभाळ फाटल्यावर कोणीही रोखू शकत नाही. फाटलेले आभाळ शिवायला जगात कोणतीही यंत्रणा नाही असे लंके यांनी सांगितले.

Nilesh Lanke News : त्यांनी जाणीवपूर्वक जिल्हा भकास ठेवण्याचे काम केले, लंके यांचा विखे कुटुंबावर हल्ला बोल Read More »

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe On Congress:  काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील  बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा पडखर समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती  मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.  जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे Read More »

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ

Akola News : अकोल्या जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील बटवाडी बुद्रुक येथील रहिवासी सतीश सुधाकर आखरे यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नितीन सुधाकर आखरे वय 35 वर्ष रा. बटवाडी बु  हे नेहमी प्रमाणे रात्री घराच्या अंगणात झोपलेले असतांना त्यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्ञानी हला करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवार दि.1 एप्रिल रोजी राञीच्या सुमारास उघडकीस आली. या बाबतचे फिर्याद  बाळापूर पोलिसांना दिली असता बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह  शवविच्छेदन तपासण्यासाठी रुग्णालय पाठविला.  या घटनेतील काही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जागेच्या वादावरून खुन झाल्याची चर्चा सुरु असून नेमका खुन कशासाठी करण्यात आला हे आरोपी पकडल्या नंतर समोर येईल हे निश्चित.  या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज जी, पोलीस निरीक्षक अनिल जुमळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

Akola News : जागेच्या वादावरून 35 वर्षीय इसमाचा खुन; परिसरात खळबळ Read More »

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई

Ramadan Eid 2024 – केडगाव नगर पुणे रोडवरील   शाही जामा मशिदीस रमजाननिमित्त सालाबाद प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारतासह जगभरात मुस्लिम बांधव रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करतात चंद्र दर्शन झाल्यानंतर रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्यानिमित्त ठिकठिकाणी मशिदीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.  याही वर्षी चंद्र दर्शन झाल्यानंतर 11 एप्रिल किंवा 12 एप्रिल 2024 रोजी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी  होणार आहे त्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील  शाही जामा मशीदवर आकर्षक विद्युत रोशनी करण्यात आली आहे.   मशिदीचे अध्यक्ष जनाब हाजी अकबर पठाण, हाजी उस्मान मणियार ,रफिक भाई शेख ,मुन्नवर सय्यद, नदीमरजा शेख ,साहिल पठाण, नजीर पिरजादे, या बांधवांनी सर्व धर्मीयांना रमजान ईदच्या शुभेच्छा देत प्रत्येक समाजात जात धर्म पंथ असला तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता ही असते ती जागृत करण्याचे काम आपण केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.

Ramadan Eid 2024: रमजान ईद निमित्त केडगाव मशिदीस आकर्षक विद्युत रोषणाई Read More »

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत

MS Dhoni : आयपीएल 2024 चा 13 वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला पराभव केला मात्र भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा  यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीने एक मोठी कामगिरी केली.  या सामन्यात पृथ्वी शॉचा झेल घेत त्याने टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील 300 बाद पूर्ण केले. या सामन्यात पृथ्वी शॉने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. शॉचा चेंडू रवींद्र जडेजावर कट करण्याच्या प्रयत्नात असताना धोनीने विकेटच्या मागे झेल घेतला आणि धोनीने नवा विक्रम रचला.  चेन्नई सुपर किंग्जला त्याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा चॅम्पियन बनवणारा धोनी यंदाच्या मोसमात फक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. धोनीने आतापर्यंत 213 झेल आणि 87 स्टंपिंग केली आहे. धोनीने आज T20 मध्ये 300 बाद पूर्ण केले असतील पण तो दीर्घकाळ T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक बाद करणारा खेळाडू होता. धोनीच्या मागे पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कामरान अकमल आहे, ज्याने 264 बाद घेतले आहेत.  भारताच्या दिनेश कार्तिकने 274 ची शिकार केली आहे. क्विंटन डी कॉकच्या नावावर 270 विकेट आहेत आणि जोस बटलरच्या नावावर 209 विकेट आहेत.

MS Dhoni च्या नावावर आणखी एक विक्रम! क्रिकेट जगात धोनी पुन्हा चर्चेत Read More »

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू….

Mumbai News : मुंबईतील माहीम चौपाटी समुद्रकिनारी  होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळी होळी साजरी केल्यानंतर पाच मित्र समुद्रात आंघोळीसाठी गेले होते मात्र भरती-ओहोटीमुळे ते बुडाले. मात्र, चौपाटीवर तैनात असलेल्या जीवरक्षकाने चार तरुणांना वाचवून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. काल संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्या पाचव्या तरुणाचा शोध सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, रात्री अंधार आणि भरती-ओहोटीमुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शोध मोहिमेदरम्यान आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. सोमवारी 20 ते 21 वर्षे वयोगटातील पाच मुले माहीम समुद्रकिनारी होळी साजरी करण्यासाठी गेली होती. होळी खेळल्यानंतर ते माहीम ते शिवाजी पार्क किनाऱ्यादरम्यानच्या समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी समुद्रात भरती-ओहोटी होती. त्यामुळे त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही.  काही खोल पाण्यात गेले आणि बुडू लागले, हे पाहून बाकीचे मित्र त्यांना वाचवण्यासाठी धावले. मात्र पाचही जण समुद्रात बुडू लागले. त्यातील चौघांना वाचवण्यात यश आले. तर एका तरुणाबाबत काहीही सापडले नाही. बचावलेल्या चार तरुणांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चारपैकी दोघांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. एकावर उपचार सुरू आहेत. तर हर्ष किंजळे (19) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी असून माहीम येथे राहतात.

Mumbai News : धक्कादायक! होळी खेळण्यासाठी गेलेले 5 तरुण समुद्रात बुडाले, 2 जणांचा मृत्यू…. Read More »

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..!

Ahmednagar News: शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित “मिशन आरंभ २०२४” उपक्रमांतर्गत दि. १० मार्च रोजी आयोजित केलेल्या इयत्ता-चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल दि. २० मार्च रोजी जाहीर करण्यात आला आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून स्पर्धात्मक स्वरूपाच्या अभ्यासाची तयारी ग्रामीण भागातील मुलांनी प्राथमिक स्तरापासूनच सुरू करावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडजळगाव येथील श्रीपद्म प्रविण शिंदे ( इयत्ता चौथी ) याने या परीक्षेत ३०० पैकी २५२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून त्याने तालुकास्तरावर आठवा तर बालमटाकळी केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.  त्याचबरोबर अमृता पांडुरंग पाटील, श्रावणी जगदीश तहकीक, साईराज प्रभाकर तहकीक, स्वरा वैजिनाथ नागरे, शिवराज बाळासाहेब तहकीक, शिवानी राजेंद्र जाधव अशी एकूण सात विद्यार्थी संबंधित परीक्षेत पात्र ठरले आहेत. मुलांच्या गुणवत्ता विकासात शाळेचे आदर्श वर्ग शिक्षक प्रविण शंकर शिंदे त्याचप्रमाणे सहकारी आदर्श शिक्षिका श्रीमती राजगुरू भारती भाऊसाहेब, श्रीमती तनपुरे संतोषी शामराव व श्रीमती गर्जे मंगल देवराव यांचे मोलाचे असे मार्गदर्शन व योगदान लाभले.  शालेय भौतिक विकास त्याचबरोबर विद्यार्थी गुणवत्ता विकास कामी शेवगावचे गटशिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी डॉ. शंकर आसाराम गाडेकर, केंद्रप्रमुख काळु भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Ahmednagar News : श्रीपद्म शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत बालमटाकळी केंद्रात प्रथम…..! Read More »

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण

Uddhav Thackeray : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.  यातच आता उद्धव ठाकरे गटाला एक मोठा धक्का लागला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनिल देसाई यांच्या निकटवर्तीयांना ईडीने समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोभाटे यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. सीबीआयने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.  सीबीआयने बेहिशोबी मालमत्तेबाबत गुन्हा दाखल केला होता. बोभटे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले आहे. एजन्सीच्या एका सूत्राने सोमवारी संध्याकाळी याची पुष्टी केली. बोभाटे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की या जोडप्याने 2.58 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, जी त्यांच्या उत्पन्नाच्या उघड स्त्रोतांपेक्षा 36 टक्क्यांनी जास्त आहे. बोभटे यांनी यापूर्वी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ सहाय्यक पदावर काम केले आहे. सीबीआय प्रकरणानुसार, बोभटे यांनी 2014 ते 2023 या कालावधीत विमा कंपनीत काम केले. या काळात त्यांनी निर्माण केलेली संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त आहे.  बोभटे यांची संपत्ती मुदत ठेवी, म्युच्युअल फंड आणि जंगम आणि जंगम मालमत्तांच्या स्वरूपात आहे. या प्रकरणी दिनेश बोभाटे यांना समोरासमोर विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, असे एजन्सीचे म्हणणे आहे. आज उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. त्याआधी ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांच्या सहकाऱ्याला समन्स बजावल्याने चिंता वाढली आहे. बोभटे यांच्या बँक खात्यातही अनियमितता झाल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले आहे.  सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ‘आतापर्यंत मिळालेल्या पुराव्यांवरून प्रथमदर्शनी असे दिसते की दिनेश बोभटे यांनी कर्मचारी म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आणि त्यातून संपत्ती कमावली. त्याची संपत्ती दाखवलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा कितीतरी जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोभटे यांना अनेक मुदत ठेवी, म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि निधी मिळाला होता. मित्र आणि मुलाकडून आर्थिक मदतीच्या नावावर त्यांनी ही रक्कम घेतली होती. यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. याशिवाय त्यांच्या खात्यात अनेक प्रकारची रक्कम जमा करण्यात आली होती, ज्याबद्दल दाम्पत्य स्पष्टीकरण देऊ शकत नाही.  सीबीआयच्या तपासादरम्यान, ईडीने फेब्रुवारी 2024 मध्ये या प्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या कोनातून तपास करत आहे.

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना ईडीचा समन्स ; अनेक चर्चांना उधाण Read More »

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक

Maharashtra News : राज्याच्या राजकारणाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर सायंकाळी 5 वाजता जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तर उद्या (26 मार्च) उद्धव गटाच्या 15 किंवा 16 उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्याआधी या बैठकीत ज्या जागांवर दोन गटात वाद आहे, त्यावर चर्चा होणार आहे.  तर दुसरीकडे 2014 आणि 2019 ची परिस्थिती आता राहिलेली नाही, असे स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाला काँग्रेसकडून सांगण्यात आले. काँग्रेस पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने जास्त जागांची अपेक्षा करू नये. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरे सेना अतिआत्मविश्वासात आहे. ठाकरे आणि पवार यांनी युतीकडे अधिक जागांची मागणी केली असली तरी बुलढाणा आणि वर्धासारख्या जागांसाठी त्यांच्याकडे उमेदवारही नाहीत. शिवसेनेची कट्टर हिंदू व्होट बँक (यूबीटी) त्यांच्याकडे जाईल की नाही, अशी काँग्रेसला चिंता आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका कधी होणार? लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे सांगितले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला 5 जागांवर, दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला 8 जागांवर, तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी 11 जागांवर, चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी 11 जागांवर आणि पाचव्या टप्प्यात 13 जागांवर मतदान होणार आहे. 20 मे रोजी टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Maharashtra News :  आज होणार निर्णय ? जागावाटपाबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्त्वाची बैठक Read More »