DNA मराठी

latest news

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असलेल्या महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांची बालमटाकळी येथे असणाऱ्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. हे पीक मोठी झाल्याने सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख हे दोघे शनिवार दिनांक २९ जुलै रोजी दुपारी आपल्या शेतात खुरपण करत होते. तेव्हा  अचानक सोफिया शेख यांची भावजाई हुमेरा युनुस शेख राहणार अहमदनगर यांनी सोफिया फिरोज शेख व त्यांचे पती फिरोज शेख यांना   शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले. त्यामुळे फिर्यादीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.  याबाबत महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तसेच आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी दिला आहे.

Ahmednagar News : नंदाच्या जमिनीत पेरलेल्या कपाशी व तूर पिकाची भावजाईने केली नासाडी, गुन्हा दाखल Read More »

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा

Dhananjay Munde : संपूर्ण राज्यात सध्या आरक्षणावरून चांगलंच राजकीय वातावरण तापल आहे. यातच आता मराठा समाजाचे कार्यकर्ता गोरख दळवी यांनी पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके ओबीसी नसून धनगर असून त्यांनी त्यांच्या समाजाचा पाहावा छगन भुजबळ यांचे प्यादे बनू नये आणि छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे बनू नये अशी टीका केली. मनोज जरांगे यांची राज्यात कोणी बरोबरी करु शकत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच त्यांनी राज्याचे मंत्री धनजय मुंडे यांना इशारा देत तुम्ही दोन समाजामध्ये भांडण लावू नये अशी देखील विनंती केली.  धनजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या गाड्यांची तोडफोड केली असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.  तुम्हाला एका मराठ्याने घडवलं आहे. आम्ही देखील राज्यात फिरणाऱ्या तुमच्या गाड्या फोडू शकतात असा इशारा देखील यावेळी त्यांनी धनजय मुंडे यांना दिला.

Dhananjay Munde : … तर आम्ही तुमच्या गाड्या फोडणार, गोरख दळवींचा धनजय मुंडेंना इशारा Read More »

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण

Ahmednagar News:  पारनेर तालुक्यातील निघोज येथे अज्ञात चोरट्यांनी जेवणाच्या उद्देशाने निघोज – वडगाव रस्त्यावर असलेल्या गणेश भुकन व प्रविण भुकन यांच्या मालकीच्या  जत्रा या हॉटेलमधील प्रविण भुकन या़च्यावर हल्ला केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.   यामध्ये प्रविण भुकन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रात्री दोन वाजता नगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.   या प्रकरणानंतर गणेश भुकन यांनी रात्री निघोज पोलीसांना संपर्क केला मात्र पोलिसांनी याची दखल न घेता टाळाटाळ केली असा आरोप गणेश भुकन यांच्याकडून करण्यात आला आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की आम्हाला महिन्याकाठी हप्ता दे या उद्देशाने झाला याची सध्या निघोज परिसरात चर्चा सुरू असून हल्लेखोर निघोज आणि परिसरातील असून भुकन हे सध्या नगर येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहे.  त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले असून आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ते शुद्धीवर आल्यावर पोलीसांना काय जबाब देतात यावर बरेच काही अवलंबून आहे.  गेली काही दिवसांत निघोज आणी परिसरात गुन्हेगारी वाढली असून गुन्हेगारीला राजकीय आश्रय आहे की काय यावर निघोज परिसरात चर्चा सुरू आहे.

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात हप्त्यासाठी खुनी हल्ला? अनेक चर्चांना उधाण Read More »

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल

Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची बुधवारी रात्री अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे.  देशाचे माजी उपपंतप्रधान अडवाणी यांच्यावर एम्सच्या युरोलॉजी विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना एम्सच्या जुन्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या 96 वर्षांचे आहेत. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतरत्न आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला वयोमानाशी संबंधित समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. नुकतेच एनडीएच्या संसदीय दलाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले होते. यासंबंधीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 2014 पासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते हे विशेष. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला होता. ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये गृहमंत्री होते. 10व्या आणि 14व्या लोकसभेत त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका चोख बजावली. भारत सरकारने त्यांना यावर्षी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविले. लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणूनही हे पद भूषवले होते. 2015 मध्ये, त्यांना पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.

Lal Krishna Advani: मोठी बातमी! ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानक बिघडली, AIIMS मध्ये दाखल Read More »

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान

Election 2024- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील  69 हजार 368 मतदानापैकी  64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184  इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे.  धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी  7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण  5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

Election 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी 93.48 टक्के मतदान Read More »

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar Police: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली नाका, संगमनेर येथे कल्याण  मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली आहे. माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत, एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये कल्याण नावाचा हारजितीचा मटका, जुगार लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडून पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवत आहे अशी बातमी मिळाली होती. या माहितीवरून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी  पोहेकॉ सचिन अडबल,पोहेकॉ रवींद्र कर्डिले,पोहेकॉ/ मनोज गोसावी,पोहेको ज्ञानेश्वर शिंदे,पोना/ विशाल गवांदे,पोकॉ/बाळासाहेब गुंजाळ,पोकॉ/ अमृत आढाव यांचे पथक खासगी वाहनाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता एक इसम दिल्ली नाका, संगमनेर येथील देशी दारु दुकानाचे पाठामागे बोळीमध्ये लोकांना चिठ्यांवर आकडे लिहुन देवुन त्यांचेकडुन पैसे देवुन घेवुन खेळत व खेळवताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकुन चिठ्या देणा-या इसमास जागीच पकडले. बशीर इसाक शेख (वय 30 वर्षे, रा. मोमीनपुरा, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  त्यास सदर मटाका मालकाबाबत विचारपुस करता तो स्वतः मालक असल्याचे सांगुन तो स्वतःचे अर्थीक फायद्या करीता मटका घेत असल्याचे सांगितल्याने, सदर इसमाची अंगझडती घेतली असता रोख रक्कम व मटका खेळण्यासाठी लागणारे साधने मिळुन आली.

Ahmednagar Police: जुगार अड्ड्यावर छापा, एक आरोपी ताब्यात, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई Read More »

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक

Ahmednagar News- जिल्ह्यातील ऊस बागायतदार शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे तर दुसरीकडे कारखान्यांकडून त्यांची देयके थकीत ठेवली जात आहे. शेतकरी उसाचे बिल व त्यावरील व्याज वेळेवर मिळत नसल्याने कर्जबाजारी होत चालला असल्याने आर्थिक हदबल होत आहे.  धक्कादायक म्हणजे शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक ही कर्ज बुडवणाऱ्या साखर कारखानदारांना कर्ज देण्याची चुकीचे धोरण अवलंबत आहे. या गोष्टीचा निषेध व शेतकऱ्यांना त्यांची थकीत देयके हे तातडीने मिळावी यासाठी येत्या काळात ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक भरून मंत्रालयावरती मोर्चा काढणार आहे अशी माहिती यावेळी प्रहारच्या वतीने देण्यात आली.  प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे पत्रकार परिषद घेत हम कडून शेतकऱ्यांची देयके ही थकीत ठेवले जात असल्याचं म्हणत जिल्हा बँकेच्या कारभारावर देखील ताशेरे ओढले. यावेळी बोलताना पोटे म्हणाले की हंगाम सुरू करण्यापूर्वी भाव जाहीर न करणे, भाव जाहीर न करता कारखाने तीन-चार महिने चालवू नये. भाव जाहीर केल्याप्रमाणे पैसे न देता एफआरपी कायद्यानुसारच पैसे देणे. तसेच शेतकऱ्यांचीच असणारे जिल्हा बँक बुडवणाऱ्यांनाच साखर कारखानदारांनाच कर्ज देण्याची चुकीचे धोरणे जिल्हा बँकेकडून आखले जात आहेत.  ऊस असूनही उसाला वेळेवर तोड न देता कार्यक्षेत्राच्या बाहेरून ऊस आणणे एच एन टी मध्ये भ्रष्टाचार असा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला.

Ahmednagar News: ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक घेऊन मंत्रालयावरती मोर्चा काढणार… शेतकऱ्यांसाठी प्रहार आक्रमक Read More »

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे

PNB Bank: जर तुमचे ही पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच पीएनबीमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  माहितीनुसार, PNB त्यांच्या काही ग्राहकांना नोटीस पाठवत आहे ज्यांनी बर्याच काळापासून खाते वापरले नाही. अशा परिस्थितीत पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बचत खात्याची सुरक्षितता लक्षात घेऊन पंजाब नॅशनल बँकेने हा निर्णय घेतला आहे. पीएनबीने आपल्या बचत खात्याच्या ग्राहकांना अनेक वेळा माहिती दिली आहे. PNB ही खाती बंद करू शकते तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असल्यास प्रथम त्याची स्थिती तपासा. पंजाब नॅशनल बँक या महिन्याच्या अखेरीस 30 जून 2024 पर्यंत अशी खाती बंद करणार आहे. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच, ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये शिल्लक आहेत. तो बंद करणार आहे.  अशा ग्राहकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीस पाठवल्यानंतर एक महिन्याने ती खाती बंद केली जातील. तुम्हाला ती खाती ॲक्टिव्ह ठेवायची असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या. अन्यथा, ही बँक खाती 1 जुलै 2024 रोजी बंद केली जातील.  PNB ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अशा खात्यांचे KYC मिळावे असे कळवले होते. तथापि, बँकेने 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यानंतर 1 जुलैपासून ही खाती बंद करण्यात येणार आहेत. अनेक स्कॅमर अशा खात्यांचा गैरवापर करतात जे ग्राहक बर्याच काळापासून वापरत नाहीत. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 30 एप्रिल 2024 रोजी खात्याची गणना केली जाईल. अशा ग्राहकांना बँकेने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. या खात्यांवर कोणताही परिणाम होणार नाही तथापि, बँकेने म्हटले आहे की 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांच्या खात्यांव्यतिरिक्त PMJJBY, PMSBY, SSY, APY, DBT सारख्या विशिष्ट योजनांसाठी उघडलेली अनेक प्रकारची खाती या अंतर्गत बंद केली जाणार नाहीत. केवायसीद्वारे बँक खाती पुन्हा सक्रिय केली जाऊ शकतात बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतर त्यांचे खाते सक्रिय होईल. अधिक माहितीसाठी ग्राहक बँकेला भेट देऊ शकतात.

PNB Bank: ‘या’ बँकेत खाते असेल तर सावधान, 1 जुलैला बंद होणार खाते, बँक नोटीस पाठवत आहे Read More »

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा

Ahmednagar News: अहमदनगर शहरातील नगर मनमाड रोडवरील झोपडी कॅन्टीन येथील आठरे हॉस्पिटलमध्ये घुसून साहित्याची तोडफोड करत  कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या गणेश सर्जेराव फसले यांच्यासह आलेल्या 30 ते 40 जणांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.  गणेश फसले व त्यांच्यासोबत असलेल्या 30 ते 40 जणांनी हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती प्रवेश करून प्रवेश हॉस्पिटलमधील आय. सी. यू,ऑपरेशन थिएटर, अंतररुग्ण विभाग, लॅबरोटरी, संगणक कक्ष व इतर भागातील कुलपे तोडून कॉट्स, मॉनिटर्स, एसी युनिट, वेंटीलेटर, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नासधूस केली व त्याबरोबरच तोडफोड करून डॉ. अनिल आठरे पाटील यांच्या कुटुंबावर हल्ला केला आणि अब्रुनुकसानिकारक कृत्य केले. गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांकडून वारंवार होणा-या हिंसक कृत्यां‌द्वारे माझ्या परिवाराला आणि हॉस्पिटलच्या स्टाफला अत्यंत धोका होत आहे. त्याचे हे कृत्य असेच चालू राहिले तर माझ्या परिवाराच्या जीवीतास धोका आहे. संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी गणेश सर्जेराव फसले आणि त्याच्या गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करावी, व माझ्या परिवाराला व आठरे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी योग्य तो न्याय दयावा अशी मागणी डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Ahmednagar News: हॉस्पिटलमध्ये कुटुंबाला मारहाण करून महिलांची छेड काढणार्‍या आरोपी विरोधात कारवाई करा Read More »

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील गुलमोहर रस्त्यालगत असणाऱ्या नरहरी नगरमधील ओढ्यावर पाईप टाकून बुजविण्यात आला होता. पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तात बुधवारी सायंकाळी ओढ्यातील पाईप हटवून पाण्याला मोकळी वाट केली. अधिक्रमण विरोधी पथकाने अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार आज काढण्यात आले अधिक्रमण युवक विभाग कर्मचारी ज्यावेळी अतिक्रमण काढण्यास गेले असता त्या नागरिकाने त्यांना विरोध केला यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचा बंदोबस्त मागवण्यात आला.   शहरातील 45 ओढे-नाले पाईप टाकून बुजविण्यात आले आहेत. त्याचे महापालिकेतर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून महापालिकेच्या अधिकारी व तक्रारांनी संयुक्त पाहणी केली आहे.   नगरमध्ये ओढ्यावरच प्लॉटिंग करण्यात आली आहे. प्लॉटधारकाने पाईप टाकून ओढा बुजविला होता. त्यामुळे गुलमोहर रोड, वसंत टेकडी परिसरातून येणारे पावसाचे पाणी तुंबले जात होते.

Ahmednagar News: सावेडी उपनगरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई Read More »