DNA मराठी

latest news

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन

Former PM Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.

Former PM Manmohan Singh Death: मोठी बातमी! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग निधन Read More »

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली. आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्याजर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते. या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम Read More »

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट

Maharashtra News : एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या समस्यांबाबतची स्थिती चिंताजनक आहे. अनेक वर्षांपासून उद्योजकांनी जागेची मागणी केली असतानाही त्यांना प्लॉट मिळत नाहीत. यामध्ये अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट होत आहे. अधिकारी आणि भूखंड माफियांच्या संगनमतामुळे काही निवडक लोकांना प्लॉट मिळत आहेत, तर इतरांना आर्थिक तडजोडीच्या आधारावरच जागा मिळवावी लागते. प्लॉट शिल्लक नसल्याच्या कारणाने वेबसाईट बंद ठेवली जाते, परंतु अचानक प्लॉटचा लिलाव होणे हे अनेक प्रश्न उपस्थित करते. उद्योग मंत्री लक्ष घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर या समस्यांचे निराकरण झाले नाही, तर उद्योजकांच्या विकासाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयडीसीमध्ये अधिकाऱ्यांचे वर्चस्व आणि भूखंड माफियांची कारस्थाने थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत. उद्योजकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे, अन्यथा या गोंधळामुळे उद्योग क्षेत्रात मोठा अडथळा येऊ शकतो. अहिल्यानगर एमआयडीसीतील उद्योजकांचे प्रश्नअहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजक अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांच्या मुख्य समस्यांचा सारांश खालीलप्रमाणे आहे: उद्योग मंत्र्यांनी लक्ष द्यावेउद्योग मंत्र्यांनी अहिल्यानगर एमआयडीसीमध्ये उद्योजकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून उद्योगांचा विकास होईल. समाधान काय?

Maharashtra News: MIDC मध्ये चाललय काय? अधिकाऱ्यांच्या कारभारामुळे उद्योजकांची फरफट Read More »

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली

Onions Price In Maharashtra : लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले कांद्याचे दर विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव फक्त १० दिवसांत ३६ रुपये प्रति किलोवरून १७ रुपये २५ पैशांवर आले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. काय आहे कारण?निर्यात शुल्क: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले २०% निर्यात शुल्क हे या भावात मोठी घसरणीचे प्रमुख कारण आहे. यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे आणि देशांतर्गत बाजारात आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत. निवडणुका: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय कारणांसाठी कांद्याचे भाव वाढवण्यात आले होते. मात्र, निवडणुका संपल्यानंतर हे कृत्रिम वाढीव भाव टिकू शकले नाहीत. शेतकऱ्यांची स्थिती:नुकसान: शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी खूप खर्च येतो. मात्र, सध्या मिळत असलेले भाव या खर्चाच्याही खाली आहेत. यामुळे शेतकरी मोठे आर्थिक नुकसान सोसत आहेत. चिंता: भाव कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांना पुढील पिकासाठी कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडे मागणी: शेतकरी सरकारकडे या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. सरकार काय करू शकते?निर्यात शुल्क हटवा: सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क हटवले तर कांद्याची निर्यात वाढेल आणि देशांतर्गत बाजारात भाव स्थिर राहू शकतात. खरेदी: सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून त्यांना आधार देऊ शकते. प्रोत्साहन: सरकारने कांद्याच्या नवीन उत्पादनांना प्रोत्साहन देऊन बाजारपेठेतील विविधता वाढवू शकते.काय करावे? एकत्र येऊन लढा: शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सरकारकडे आपली मागणी ठामपणे मांडावी. बदलाव: शेतकरी पिकांची विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. संगठन: शेतकरी संघटनांमध्ये जाऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. कांद्याच्या भावात मोठी घसरण ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. सरकारने या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनीही एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा.

Onions Price In Maharashtra : कांद्याच्या भावात मोठी घसरण: शेतकऱ्यांची चिंता वाढली Read More »

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण

मोठी बातमी: जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू – २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत आदेश प्रभावी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिति अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अंतर्गत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश २१ डिसेंबर २०२४ पासून ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, धारदार हत्यारे, दारुगोळा, स्फोटके किंवा अनुशासन बिघडवणाऱ्या वस्तू बाळगणे व पाच किंवा त्याहून अधिक लोकांचा जमाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. सवलती यांना लागू नाही बंदी: कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 📢 नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra News: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी, ‘हे’ आहे कारण Read More »

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन

Rey Misterio Sr Passes Away: WWE स्टार रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रे मिस्टेरियो सीनियर हे WWE स्टार रे मिस्टेरियो जूनियरचे काका होते. रे मिस्टेरियो सीनियरने वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि Lucha Libre AAA वर्ल्ड वाइड यासह अनेक संस्थांसोबत टायटल जिंकले होते. रे मिस्टेरियो सीनियर यांनी द ग्रेट खली आणि जॉन सीनासारख्या अनेक दिग्गजांना टक्कर दिली होती.रे मिस्टेरियो सीनियरला पराभूत करणे या मोठ्या दिग्गजांसाठीही सोपे नव्हते. Lucha Libre AAA ने रे मिस्टेरियो सीनियर यांच्या मृत्यूबद्दल अधिकृत निवेदनात म्हटले आहे. “आम्ही मिगेल एंजल लोपेझ डायस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो, ज्यांना रे मिस्टेरियो सीनियर म्हणून ओळखले जाते. आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करतो. आम्ही तुम्हाला सांगूया की रे मिस्टेरियो सीनियरच्या कुटुंबीयांनी 20 डिसेंबर रोजी त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली होती. 2009 मध्ये WWE चा निरोप घेतलारे मिस्टेरियो सीनियरची WWE कुस्ती कारकीर्द प्रदीर्घ होती. तथापि, 2009 मध्ये, त्याने वयाच्या 51 व्या वर्षी WWE कुस्तीमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतली. त्याच्यानंतर, त्याचा भाचा रे मिस्टेरियो जूनियर WWE मध्ये त्याचा वारसा पुढे नेत आहे.

Rey Misterio Sr Passes Away : WWE स्टार रे मिस्टेरियो यांचे निधन Read More »

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई

Maharashtra Police : शेवगाव पोलीसांनी मोठी कारवाई करत अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तीचा शोध घेवुन आरोपीस 24 तासाचे आत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा आप्पासाहेब काजळे यांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्यांचे पती आप्पासाहेब भानुदास काजळे यांना 18 डिसेंबर रोजी दोन ते तीन इसमांनी बोधेगाव येथुन बळजबरीने वाहनात टाकुन पळवुन नेले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांनी वेगवेगळी तीन पोलीस पथके तयार करुन जि.सांगली, जि.बीड तसेच तिसरे पथक ता.पैठण हद्दीत रवाना केली. तपासाच्या सहाय्याने जि.बीड येथे गेलेल्या तपास पथकाला माहिती मिळाली की शिरुर कासार येथे अपहरण केलेल्या व्यक्तीला डांबुन ठेवले आहे. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना तसेच अपहरित व्यक्तीस ताब्यात घेतले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सोमनाथ बाबुश्या जाधव (रा. औरंगपुर ता.शिरुर कासार जि.बीड) असं आहे. तसेच इतर फरार आरोपींचा शोध घेऊन नमूद गुन्ह्यात लवकरात लवकर अटक करणार आहोत.

Maharashtra Police: अपहरण करणारे आरोपीस अटक, शेवगाव पोलिसांची मोठी कारवाई Read More »

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद

Shrigonda Police: श्रीगोंदा पोलिसांनी मोठी कारवाई करत मांडवगण येथील सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी व दान पेटीतील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत अटक केली आहे. माहितीनुसार, मांडवगण गावातील सिद्धेश्वर मंदिराच्या आतील गाभा-यात असणारी दानपेटी चोरी झाल्याची तक्रार मंदीराचे पुजारी पोपट गणपत खराडे यांनी 16 डिसेंबर रोजी दाखल केली होती. या गुन्हेचा तपास करत असताना बाळु वसंत घोडके याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांस 05 दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनावले आहे. दान पेटीमधील 17,600 रुपये किमतीची रोख रक्कम देखील आरोपीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.

Shrigonda Police: सिध्देश्वर मंदिरातील दान पेटी चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद Read More »

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra IMD Alert : उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्यामुळे त्या भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी 5.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. गुरुवारपर्यंत  थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी शेकोटीच्या आधार घेतला आहे, थंडीमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यामध्ये सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनिया, हृदयाच्या आजारांचे विकार, हायपरटेंशन, हायपोथर्मिया आणि इतर श्वसन संक्रमण यांचा समावेश होतो.थंडीमुळे उद्भवू शकणार्‍या काही प्रमुख समस्या: श्वसन संक्रमण: थंडीमुळे श्वासनलिका आणि फुफ्फुसांमध्ये संक्रमण होण्याची शक्यता वाढते. यामुळे खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया होऊ शकतो. हृदयाच्या आजारांचे विकार: थंडीमुळे हृदयाचे ठोके वेगवान होतात आणि रक्तदाब वाढू शकतो. यामुळे हृदयाच्या आजारांच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. हायपरटेंशन: थंडीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये संकुचन होते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हायपोथर्मिया: शरीर तापमानात खूप कमी झाल्यास हायपोथर्मिया होऊ शकतो. हे एक गंभीर वैद्यकीय परिस्थिती आहे ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. इतर समस्या: थंडीमुळे त्वचेची समस्या, स्नायूंचे दुखणे, सांध्यांची दुखणे आणि मनोवैज्ञानिक समस्या देखील उद्भवू शकतात. थंडीपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी: उबदार कपडे घाला: थंडीपासून स्वतःला वाचवण्यासाठी उबदार कपडे घाला. शरीर उबदार ठेवा: गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि उबदार खाद्यपदार्थ खा. घरात उबदार वातावरण ठेवा: घरात उबदार वातावरण ठेवा. बाहेर जाण्याचे टाळा: शक्यतो थंडीत बाहेर जाण्याचे टाळा. नियमित व्यायाम करा: व्यायाम करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता. पर्याप्त झोप घ्या: झोप पुरेशी घेणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या: जर तुम्हाला थंडीमुळे कोणतीही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Maharashtra IMD Alert : नगरकरांनो, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम, डॉक्टरांचा सल्ला घ्या Read More »

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Maharashtra Politics: मुंबई | शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. कापूस, सोयाबीन आणि तुरीला हमीभाव मिळावा, तसेच धानाला बोनस जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आमदारांनी शेतकऱ्यांच्या वेशात आंदोलन केले. “कापसाच्या झाल्या वाती, सोयाबीनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो”, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदारांनी हातात सोयाबीन व तुरीची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्र सरकारच्या शेतमाल आयात-निर्यात धोरणावर टीका करताना म्हटले की, “हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे आहे. त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाही. हे अन्यायकारक आहे आणि आम्ही तो सहन करणार नाही.” शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तत्काळ धोरणात बदल करावा, अशी मागणी करत त्यांनी सरकारला जाग येईपर्यंत आंदोलने सुरूच राहतील, असा इशाराही दिला. या आंदोलनामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्या, विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन Read More »