DNA मराठी

Imtiyaz Jaleel News

imtiyaz jaleel

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा; अहिल्यनगर महापालिकेसाठी माजी नगरसेवकासह चार जणांना उमेदवारी

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मोठी घोषणा करत प्रभाग क्रमांक 4 साठी उमेदवारांची घोषणा केली आहे. इम्तियाज जलील यांनी सोशल मीडियावर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. तर लवकरच दुसरी यादी देखील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एमआयएमकडून देण्यात आली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4 मधून माजी नगरसेवक समद खान यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते खालिद शेख यांची पत्नी शहनाज खालिद शेख, शेहबाज सय्यद आणि सलमा शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शहरात सभा घेत अहिल्यानगर महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे अहिल्यानगर महापालिकेसाठी एमआयएमकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. तर आता माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून अहिल्यानगर महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली असून चार जणांचा उमेदवारी देण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

AIMIM Candidate For Ahilyanagar Municipal Corporation Election : इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा; अहिल्यनगर महापालिकेसाठी माजी नगरसेवकासह चार जणांना उमेदवारी Read More »

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका

imtiyaz Jaleel : मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी मागणी केली आहे. “ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत. पण जर आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते. त्याशिवाय वाळू माफी असेल किंवा दुसरे काही असेल. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? त्यामुळे जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी राज्य सरकारचं संरक्षण आहे असे दिसत आहे,” असा गंभीर आरोप देखील इम्तियाज जलील (imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांची मुख्य मागणी: राजकीय प्रतिक्रिया: ह्या प्रकरणामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप युती सरकारवर दबाव वाढला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळेच अशी गुन्हेगारी घडत आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. पुढील संभाव्यता: या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे, विशेषत: गुन्हे, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवर चर्चा होत आहे.

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका Read More »