DNA मराठी

Champion Trophy

india

World Cup 2027 : विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारता बाहेर होणार; ICC घेणार मोठा निर्णय?

World Cup 2027 : भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील वाढत्या राजनैतिक तणावाचे पडसाद आता खेळाच्या मैदानावर दिसून येत असल्याने आयसीसी आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, 2029 चा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 चा विश्वचषक भारताबाहेरील ठिकाणी हलवण्याबाबत चर्चा सुरू आहे. खेळांवरील हा राजकीय ताण क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरू शकतो. बिघडणारे संबंध चिंता वाढवतात भारत आणि त्याच्या शेजारी देशांमधील बिघडणाऱ्या संबंधांमुळे आयसीसीच्या चिंतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बांगलादेशने भारतात टी20 विश्वचषक सामना खेळण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे स्कॉटलंडला त्याच्या जागी समाविष्ट करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्धच्या सामन्यांवर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली. जरी नंतर आयसीसीच्या आश्वासनानंतर पाकिस्तानने आपली भूमिका बदलली असली तरी, या घडामोडी एका मोठ्या धोक्याकडे निर्देश करतात. ICC पर्यायी योजनांवर काम करणार बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, ICC आता पर्यायी योजनेवर काम करत आहे. ‘द एज’ मधील एका वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियासारख्या देशांना संभाव्य यजमान मानले जाऊ शकते, ज्यामुळे भारताकडून यजमानपदाचे अधिकार काढून घेतले जाऊ शकतात. पाकिस्तान आधीच त्यांचे सामने भारतात खेळत नाही, त्याऐवजी शेजारच्या देशांमध्ये त्यांचे आयोजन करत आहे. बीसीसीआय आणि पीसीबीने देखील एक करार केला आहे की दोन्ही देशांमधील प्रमुख स्पर्धांमधील सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. 2029 आणि 2031 चे भविष्य 2029 मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे, परंतु आयसीसीला भीती आहे की बांगलादेश तेथे खेळण्यास नकार देऊ शकेल. याहूनही मोठे आव्हान म्हणजे 2031 चा विश्वचषक, जो भारत आणि बांगलादेश संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. जर दोन्ही संघ एकमेकांच्या देशात प्रवास करण्यास नकार देत असतील तर स्पर्धेचे आयोजन एक मोठी समस्या बनेल. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापासून, उपखंडात राजकारणाने क्रिकेटवर वर्चस्व गाजवले आहे, ज्यामुळे खेळाच्या भावनेला धक्का बसला आहे. मोठ्या स्पर्धांचा उत्साह कमी तटस्थ ठिकाणी सामने आयोजित करणे ही क्रिकेट बोर्ड आणि प्रसारकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. खेळाडूंच्या प्रवासासाठी, निवासस्थानासाठी आणि लाईव्ह कव्हरेजसाठी वारंवार संसाधनांचे व्यवस्थापन करणे हे एक महागडे आणि कष्टाचे काम आहे. शिवाय, वेळेतील फरक टीव्ही प्रेक्षकांवर नकारात्मक परिणाम करतो. सुरक्षा आणि राजनैतिकता वाढत्या प्रमाणात खेळावरच केंद्रित होत आहे, ज्यामुळे मोठ्या स्पर्धांचा उत्साह कमी होत आहे आणि अस्वस्थ वातावरण निर्माण होत आहे. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड भारतीय चाहत्यांना विश्वचषकासारख्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे जवळजवळ अशक्य आहे. भारतात जगातील सर्वात मोठा क्रिकेट चाहता वर्ग आहे, जो आयसीसीच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. जर स्पर्धा भारतातून हलवली गेली तर आयसीसीला मोठे आर्थिक नुकसान होईल. बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि कोणत्याही किंमतीत यजमानपदाचे अधिकार गमावण्यास तयार नाही. हा संपूर्ण वाद क्रिकेटची लोकप्रियता आणि व्यवसाय यांच्यातील संघर्ष बनला आहे.

World Cup 2027 : विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी भारता बाहेर होणार; ICC घेणार मोठा निर्णय? Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना

NZ vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे. लाहोर येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य होते, परंतु आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 312 धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने शतक (100) केले असले तरी ते संघाचा पराभव रोखू शकले नाही. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होईल, जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीत सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्याने रायन रिकेलटन (17) कडून आपली विकेट गमावली. ही विकेट मायकेल ब्रेसवेलने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतली. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली. बावुमाने 56 धावा केल्या पण मिशेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही.

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »