DNA मराठी

Antarvali Sarati

laxman hake

Laxman Hake : मनोज जरांगेंच्या लाल गोधडीवर लक्ष्मण हाकेंचा सवाल; ‘त्या’ गोधडीमागे नेमकं दडलंय काय?

Laxman Hake : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगे यांच्या उपोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल गोधडीचा संदर्भ देत हाके यांनी सवाल उपस्थित केला आहे. प्रत्येक उपोषणावेळी तीच लाल गोधडी का वापरली जाते, त्यामागे नेमकं काय आहे, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस सुरू असताना लक्ष्मण हाके यांनी हे वक्तव्य केले. जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ सुरू केला आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आपण मुंबईकडे जाणारच, अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. ‘प्रत्येक उपोषणाला तीच लाल गोधडी का?’ मनोज जरांगे यांच्या उपोषणाबाबत बोलताना लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जरांगे प्रत्येक वेळी उपोषणासाठी त्याच लाल गोधडीचा वापर करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘प्रत्येक उपोषणाला ती लाल गोधडीच का लागते? त्या गोधडीमागे नेमकं काय दडलं आहे?’ असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या उपोषणाची आणि त्यामागील प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. रक्त आणि लघवीच्या तपासण्यांचा दाखला लक्ष्मण हाके यांनी पुढे आरोग्य तपासण्यांचाही मुद्दा उपस्थित केला. उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या रक्त आणि लघवीच्या तपासण्यांमधून शरीरातील ग्लुकोजसह विविध बाबी स्पष्ट होतात, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवालही तपासले पाहिजेत, असा दावा हाके यांनी केला मात्र, या संदर्भात जरांगे यांच्या आरोग्य तपासण्यांमध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही स्वतंत्र पुष्टी या वृत्तात करण्यात आलेली नाही. हाके यांनी उपलब्ध असल्याचे सांगितलेल्या सरकारी आणि आरोग्य विभागाच्या अहवालांच्या आधारे चौकशीची मागणी केली आहे. ‘उपोषणासारख्या प्रभावी आंदोलनाला बदनाम केले’ उपोषण हे महात्मा गांधींच्या काळापासून लोकशाहीतील प्रभावी आंदोलनाचे साधन राहिले आहे. मात्र, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीमुळे उपोषणाच्या या संकल्पनेची बदनामी होत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. जरांगे यांच्या आंदोलनात उपोषणाची भूमिका आणि प्रत्यक्ष परिस्थिती याबाबत प्रश्न उपस्थित करत हाके यांनी त्यांच्या आंदोलनावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाला पुन्हा राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे. हाकेंचा मुंबईकडे पायी मोर्चा दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा सुरू केला आहे. पहिल्या दिवशी त्यांनी सुमारे १५ किलोमीटर अंतर पायी पार केल्याचे सांगितले. पुढेही शक्य तितके अंतर चालत जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोर्चाला पोलिसांची परवानगी नसली तरी आपण आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका हाके यांनी घेतली आहे. आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आझाद मैदानात परवानगी घेऊन आंदोलन करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘ही सामाजिक न्यायाची आणि प्रतिनिधित्वाची लढाई’ आपण कोणत्याही आमदार, खासदार किंवा मंत्र्यांच्या पाठबळावर आंदोलन करत नसल्याचे सांगत हाके यांनी आपल्या भूमिकेचा सामाजिक न्यायाच्या मुद्द्याशी संबंध जोडला. ओबीसी, भटक्या-विमुक्त आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या घटकांच्या हक्कांसाठी आपण आवाज उठवत असल्याचे त्यांनी म्हटले. मोठ्या संख्येने लोक एकत्र आणण्याची क्षमता नसल्यामुळे एखाद्या समाजाचे आरक्षण धोक्यात आणता येणार नाही, असा युक्तिवादही हाके यांनी केला. आरक्षणाचा मूळ उद्देशच सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना संधी आणि प्रतिनिधित्व देणे हा असल्याचे ते म्हणाले.

Laxman Hake : मनोज जरांगेंच्या लाल गोधडीवर लक्ष्मण हाकेंचा सवाल; ‘त्या’ गोधडीमागे नेमकं दडलंय काय? Read More »

Manoj Jarange Patil Photo

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी 23 डिसेंबर 2023 रोजी सरकारने मराठ्यांना 20 जानेवारीपर्यंत कुणबी आरक्षण दिले नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती.  मात्र अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळाला नसल्याने पाटील उद्यापासून उपोषणासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे. काही दिवसापूर्वी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये आरक्षणाबाबत काहीच तोडगा निघाला नसल्याने पाटील यांनी चर्चा नाही तर कृती करा अशी घोषणा केली होती. चला मग या लेखात जाणुन घ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई दौऱ्याचे वेळापत्रक कसं असणार आहे.  संपूर्ण वेळापत्रक मुंबई दौऱ्यासाठी 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटीतून सकाळी नऊ वाजता पायी यात्रेला सुरुवात होणार आहे.  दुपारचे जेवण कोळगाव (ता. गवराई) येथे होईल तर मातोरी (ता. शिरूर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. (बीड जिल्हा) 21 जानेवारी मातोरीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.   तनपुरवाई (ता. पाथर्डी) येथे दुपारचे जेवण तसेच बाराबाभळी-कारंजी बाट (ता, नगर) येथे रात्रीचा मुक्काम व जेवण असेल. 22 जानेवारी बाराबाभळीतून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारी जेवण येथे सुपा (ता. पारनेरे) व रांजणगाव (ता. शिरूर) येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 23 जानेवारी रांजणगावातून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.    दुपारचे जेवण कोरेगाव भिमा येथे व चंदनगर खराडी बायपास येथे मुक्काम व रात्रीचे जेवण होईल. (जिल्हा पुणे) 24 जानेवारी चंदननगर, खराडी बायपास येथून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल.  तसेच तळेगाव दाभाडे येथे दुपारी जेवण व लोणावळ्यात मुक्काम होईल. (पुणे जिल्हा) 25 जानेवारी  लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता पुढील प्रवासाला सुरूवात होईल. त्यानंतर पनवेल (ता.नवी मुंबई) येथे दुपारी जेवण व वाशी येथे मुक्काम आणि रात्रीचे जेवण होईल. (ठाणे – नवी मुंबई)  26 जानेवारी वाशीतून सकाळी 8 वाजता नाष्टा करून पुढच्या प्रवासाला निघणार असून त्यानंतर थेट आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत. यानुसार सगळीकडे मराठा बांधवांच्या वतीने तयारी सुरू आहे.

Maratha Reservation: मराठ्यांना न्याय मिळेल? मनोज जरांगे पाटील तयार! असं आहे संपूर्ण वेळापत्रक Read More »