DNA मराठी

Ajit Pawar

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar: लोकसभेप्रमाणे यंदा देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती तर आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केला आहे. लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. असं अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी सावळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे. त्यामुळे मला मतदान करून मला देखील खुश करा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 19 जागा जिंकता आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन Read More »

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी

Ajit Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मला मुख्यमंत्री करा आणि राज्यात बिहार पॅटर्न राबवा अशी मागणी केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आणि चर्चांना उधाण आले आहे.   द हिंदू वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्यातून दिलेल्या बातमीमुळे राज्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पुढच्या आठवड्यात दिल्लीत महायुतीतील प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.  माहितीनुसार, राज्यातील किमान 25 जागेवर मैत्रीपूर्ण लढत करावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांनी अमित शहांकडे  केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील पंधरा-वीस दिवसापासून अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे. या चर्चेत जवळपास 40 जागांसाठी चर्चा झाल्याची माहिती आहे.  त्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येणाऱ्या जागा सोडण्यास तयार नसून तीन ते चार जागा संदर्भात अदलाबदल करण्यास तयार आहे. त्याचबरोबर काँग्रेस जिथं लढत आहे अशा दहा ते बारा जागा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्याची माहिती आहे.  त्याचबरोबर महायुतीमध्ये आता महामंडळ वाटपासंदर्भात सुद्धा एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसात नक्की कुणाला कोणत महामंडळ देणार यासंदर्भात एकमत झाल्याची माहिती आहे. त्यामुळे महायुती मधील नाराज नेत्यांचा सुर नरमण्याची शक्यता आहे.  राज्यपाल नियुक्त 12 जागा संदर्भात देखील निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये भाजप 6, शिवसेना 3, आणि राष्ट्रवादी 3 असं सूत्र ठरलं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापर्यंत हे नाव जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवावा, अजित पवारांची अमित शहा यांच्याकडे मागणी Read More »

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी…

Sharad Pawar: ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा अजित पवार यांना पक्षात घेणार का? यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.  जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले होते. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटातील अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र आज याबाबत स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे.  माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांच्या पक्षातील कोणत्याही नेत्याच्या संभाव्य प्रवेशाचा निर्णय सामूहिक असेल. मात्र, अजित पवार यांना पुन्हा यायचे असेल तर त्यांना पक्षात सामावून घेणार का, याची पुष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. वैयक्तिक पातळीवर निर्णय घेता येत नाही पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी-सपामध्ये अजित पवारांना स्थान आहे का, असा सवाल पत्रकारांनी केला असता शरद पवार म्हणाले, वैयक्तिक पातळीवर असे निर्णय घेता येत नाहीत. संकटकाळात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या माझ्या सहकाऱ्यांना आधी विचारले जाईल. अजित पवार यांनी अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि जुलै 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही घेतले होते.  लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने चारपैकी तीन जागा गमावल्यानंतर अजित पवारांच्या गटात खळबळ माजली आहे. शरद पवारांचा सरकारवर टीकास्त्र त्याचवेळी शरद पवार म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या दणक्यानंतर महायुती सरकारला नवनवीन योजना सुरू करून ‘भाई-भगिनी’च्या हिताचा विचार करणे भाग पडले.  पत्रकारांशी बोलताना पवारांनी राज्याच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त करत राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यात ‘माझी लाडकी बहिन योजना’ सुरू केली आहे, ज्यात पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे आणि ‘लाडका भाऊ’ या योजनेअंतर्गत रोजगार प्रशिक्षण आणि मानधन देण्याची तयारी आहे. आता बंधुभगिनींच्या हिताकडे लक्ष द्या पवार म्हणाले की, जयंत पाटील आणि अजित पवार यांना राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी अनेकवेळा मिळाली, पण त्यांच्या अर्थसंकल्पात बहीण-भावांसाठीच्या अशा योजना कधीच दिसल्या नाहीत. बंधू-भगिनींच्या हिताकडे लक्ष दिले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे, मात्र ही जादू केवळ लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे आहे,  मतदारांनी हुशारीने मतदान केल्यास बहीण, भाऊ आणि इतर सर्वांच्या लक्षात राहील.असा टोला देखील त्यांनी यावेळी लावला.

Sharad Pawar: अजित – शरद पवार पुन्हा एकत्र येणार? पवारांनी दिला उत्तर, म्हणाले, मी… Read More »

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची…

Ajit Pawar:  एकीकडे राज्यात महायुतीच्या नेत्यांकडून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार प्रचार होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील महाराष्ट्रावर विशेष लक्ष देत रोडशो आणि अनेक जाहीर सभा घेत आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातून अचानक गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा देखील अजित पवार उपस्थित नव्हते.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते मात्र अजित पवार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. यामुळे अजित पवार नेमकं कुठे आहे याबाबत राष्ट्रवादी नेत्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. माञ राजकीय वर्तुळात अजित पवार महायुतीवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  यामुळे अचानक लोकसभा प्रचारातून अजित पवार गायब झाले असल्याची चर्चा होत आहे.  अजित पवार नेमकं कुठे गायब झाले? याबाबत सर्व शरद पवार यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले अजित पवारांची तब्येत खराब आहे आणि यामुळे ते आराम करत आहे असं शरद पवार म्हणाले. मात्र अजित पवार महायुतीच्या काही नेत्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून मुंबईत आज होणाऱ्या महायुतीच्या सभेत अजित पवार हजर राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: अजित पवार नॉट रिचेबल, अनेक चर्चांना उधाण; शरद पवार म्हणाले, अजित पवारांची… Read More »

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला

Ajit Pawar News : स्थानिक प्रश्नांची जाण नसतानाही त्याला देशाचा नेता बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. विकासाची कोणतेही कामे केली नसून मी जर निधी दिला नसता तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता असा टोला उपुख्यमंत्रीपद अजित पवार यांनी निलेश लंके यांना लावला.   जिल्‍ह्यातील मोठ्या प्रकल्‍पांच्‍या  निधीसाठी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना विजयी करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.  कर्जत तालूक्यात महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्‍यात आलेल्‍या जाहिर सभेत उपमुख्‍यमंत्री पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार राम शिंदे, बाळासाहेब नाहटा, उमेश पाटील, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले पाटील, मंगलदास बांगल, बाळासाहेब शिंदे याच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, केंद्रातून जास्तीत जास्त निधी आणून राज्याचा विकास करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. यामुळे आपण जिल्ह्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करताना नगर माझे आजोळ असून येथील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न केले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्यासोबत चांगले सुर जुळले असून सध्याचे महायुती सरकार हे गोरगरिबांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. देशात पंतप्रप्रधान मोदींनी मागील १० वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर देशात पुन्हा एनडीए आणि राज्यात महायुती सरकार येणार आहे. यामुळे इतरांनी कितीही प्रतत्न केले तरी त्यांना यश मिळणार नाही असे त्यांनी सांगितले.  महायुती सरकार आणि जलसंपदा विभागाच्या मार्फत नगर जिल्ह्या दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता  निशाणा साधला. ते म्हणाले ८० वर्षाच्या पुढे इतरांना संधी दिली पाहिजे, पण  आमचे जेष्ठ रिटायर होतच नाही.  यामुळे आम्ही काय करायचे असे सांगत आपली खंत व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विरोधी उमेदवार यांना धारेवर धरले, आधी बायकोसाठी उमेदवारी मागण्यासाठी आला नंतर लोकांनी हवा दिली आणि स्वतः खासदारकीच्या मैदानात आला अशा शब्‍दात त्‍यांनी महाविकास आघाडीच्‍या उमेदवाराचा समाचार घेतला.  राज्यात सुजय विखे यांच्या पंजोबांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली आणि अख्या महाराष्ट्राला याचा फायदा झाला आहे. त्यांचा नातू तरूण, तडफदार नेता डॉ. सुजय विखे पाटील हे लोकांचे प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडतील यामुळे त्यांना येत्या १३ मे रोजी अनु. क्र. ३ चे कमळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देवून मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहायता करा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

Ajit Pawar News: …तर मंदिरात घंटा वाजवत बसला असता; अजित पवारांचा लंकेना टोला Read More »

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ?

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सत्ताधारी महायुतीमध्ये अद्याप देखील जागा वाटपाचा प्रश्न सुटलेला नाही.  यामुळे राज्यात 48 लोकसभा जागांपैकी कोण किती जागावर निवडणूक लढवणार याची अपचारीक घोषणा झालेली नाही.  तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त आहे. महायुतीच्या 48 पैकी 46 जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, 2 जागांसाठी अजूनही लढत सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाजपने राज्यात आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले आहेत. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक आणि ठाण्याच्या जागांबाबत सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही चुरस सुरू आहे. ठाणे लोकसभा जागा मिळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. ठाण्यात आपली ताकद शिवसेनेपेक्षा जास्त असल्याचा भाजपचा तर्क आहे. त्याचवेळी ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्यानं शिंदे सेना ठाण्याची जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे ही जागा त्यांच्या प्रतिष्ठेची आहे. ठाण्याव्यतिरिक्त नाशिकच्या जागेवरही तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. या जागांवर शिंदे यांची शिवसेना निवडणूक लढवू शकते कल्याण, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर, मावळ, रामटेक, कोल्हापूर, हातकणंगले, बुलढाणा, शिर्डी, हिंगोली, यवतमाळ-वाशीम. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या जागा मिळतील बारामती, शिरूर, रायगड, परभणी (महादेव जाणणे). याशिवाय राज्यातील उर्वरित जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकतात. ठाण्याला महत्त्व का?  सध्या ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या गटात आहेत. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे 4 आणि शिवसेनेचे 2 आमदार आहेत. याशिवाय हा मतदारसंघ मुख्यमंत्री शिंदे यांचाही मतदारसंघ आहे. नाशिकमध्येही अडचणी? नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांना निवडणूक लढवायची आहे. सध्या नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे खासदार आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नाशिकची जागा हवी आहे. याशिवाय ठाण्यात ताकद दाखवून हेमंत गोडसे यांनी आपले इरादे व्यक्त केले आहेत. रविवारी रात्री शिवसेनेचे नाशिकचे सर्व आमदार, अधिकारी आणि खुद्द खासदार गोडसे हे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर जमले होते. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काबीज करण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 आमदार आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता येथे शिवसेनेची ताकद कमी लेखली जात असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपला ही जागा मिळवायची आहे.  तर मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जाऊ देणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

Lok Sabha Election 2024  : महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना, ‘या’ 2 जागा भाजपसाठी ठरल्या डोकेदुखी ? Read More »

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात  

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांना धक्का देत गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे. यानंतर लंके म्हणाले, आता आपण साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करणार आहोत.   नीलेश लंके म्हणाले, “मी नेहमीच शरद पवारांच्या विचारसरणीचे पालन केले आहे. 2019 मध्ये माझा निवडणूक प्रचार त्यांनीच सुरू केला होता. त्यांची विचारधारा आणि पक्ष मी कधीही सोडला नाही.” राष्ट्रवादी काँग्रेस (पुणे) शहर कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत लंके म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, मी साहेबांच्या (शरद पवार) आदेशाचे पालन करेन, असे ते म्हणाले.   शरद पवार म्हणाले, “लंके हे कष्टाळू आहेत आणि त्यामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाची पसंती होती. त्यांनी अलीकडेच काही निर्णय घेतले असतील, पण ते त्यांच्या मतदारांप्रती प्रामाणिक आहेत आणि पुढेही राहतील. जनतेसाठी काम करण्यासाठी. त्यांना काही मदत लागली तर आम्ही त्यांना जनहितासाठी मार्गदर्शन करू.” आदल्या दिवशी अजित पवार म्हणाले होते की, लंके यांनी पक्ष सोडण्यापूर्वी आपल्या निर्णयाचा विचार करावा. लंके यांनी पक्ष सोडल्यास त्यांना अपात्रतेला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात लंके निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लंके हे राष्ट्रवादीचे (एसपी) लोकसभेचे उमेदवार असतील, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले. ते म्हणाले, “लंके हे अहमदनगरमधील लोकप्रिय नेते आहेत. कोविड महामारीच्या काळात केलेल्या कामामुळे ते शेजारच्या जिल्ह्यातही प्रसिद्ध आहेत.  शरद पवार यांच्या विचारधारेवर त्यांचा नेहमीच विश्वास होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मागील विधानसभा निवडणूकही लढवली होती. ते शरद पवार साहेबांचा फोटो  वापरत राहतील आणि आता औपचारिकपणे NCP (SP) चा भाग आहेत.

Nilesh Lanke : “साहेबांचा आदेश मी सदैव मानेन” अजित पवारांना धक्का देत निलेश लंके शरद पवार गटात   Read More »

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

Maharashtra News : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे? याची कोणालाच कल्पना नाही.  तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना शरद पवार यांचे फोटो निवडणूक प्रचारामध्ये वापरल्यामुळे मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढले आहेत.   शरद पवार यांच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप करणाऱ्या अर्जावर आज  सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने विचारले की, वेगळे झाल्यानंतरही अजित पवार गट शरद पवारांचे फोटो का वापरत आहे? निवडणूक प्रचारासाठी शरद पवार यांच्या फोटोचा वापर का? करत आहे, असा सवाल सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला केला.  न्यायालयाने अजित पवार गटाला सांगितले की, आता तुम्ही वेगळा राजकीय पक्ष आहात. तुम्ही त्यांच्यासोबत (शरद पवार) न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तुम्ही त्यांचे (शरद पवार) फोटो का वापरता… आता तुमची ओळख घेऊन निवडणुकीत जा…”   उपमुख्यमंत्री अजित पवार लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे. अजित पवार गट मतदारांना आकर्षित करण्यासाठी शरद पवारांच्या नावाचा, फोटोचा गैरवापर करत असल्याचा आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने करून याबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  त्यावर आज सुनावणी करताना न्यायालयाने अजित पवार गटाला शनिवारपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.  जुलै 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा एक गट सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला तेव्हा राष्ट्रवादीचे दोन गट झाले. यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा केला.  अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने 23 फेब्रुवारीला अजित पवार गटाला  राष्ट्रवादीचा दर्जा देत घड्याळाचे चिन्ह दिले.  तर पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ आणि निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ असे नाव देण्यात आले.

Maharashtra News: ​​अजित पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का! ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय Read More »