DNA मराठी

Ahmednagar News Update

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता..

Sujay Vikhe : अहमदनगर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या सुमारे १५ को.प. बंधारे आणि गे.सी. बंधारे योजनांना महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या योजनांना प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. आज त्या प्रयत्नांना आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने आनंद वाटत असल्याचे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.    या योजनांच्या कामासाठी भरीव निधी मंजूर झाला असून मृद व जलसंधारण विभागाच्या सन २०२२-२३ च्या दरसूचीवर आधारित कामाप्रित्यर्थ सुमारे ८.५ कोटी रुपये व अनुषंगिक खर्चासाठी ६५ लक्ष रुपये अशा एकूण अंदाजित ९.५ कोटी रुपयांच्या किमतीस मान्यता प्रदान करण्यात आली आहे.  तसेच सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार या बंधाऱ्यांची एकूण साठवण क्षमता ५३०.२८ स.घ.मी. असून नियोजित एकूण सिंचन क्षमता १९६ हेक्टर इतकी असल्याचे खासदार सुजय विखे यांनी सांगितले.  या योजनेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यापैकी नगर तालुक्यात दोन, पाथर्डी-५, पारनेर-२, श्रीगोंदा-३ आणि शेवगाव, जामखेड आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका जागेची अशा एकूण १५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. दरम्यान खासदार विखेंनी सदरील भरीव रकमेस मान्यता मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe : खा. सुजय विखे यांच्या पाठपुराव्याला यश! ‘या’ योजनांना प्रशासकीय मान्यता.. Read More »

Ahmednagar News: तरुणाचा मध्यरात्री खून, पत्नीसमोरच 4 अज्ञात आरोपींनी केले कोयत्याने वार…

Ahmednagar News:  श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील कोथूळ गावात मध्यरात्री अडीचच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून पत्नीसमोरच पतीला कोयत्याने वार करून ठार केल्याची घटना घडली असून योगेश सुभाष शेळके (वय 33 वर्षे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत मयताच्या पत्नीने अज्ञात चार व्यक्तींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सदर घटनेने श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे.  मयताच्या पत्नीने आपल्या फिर्यादीत म्हणले आहे की,मी माझे पती, सासरे मुले सर्व कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून झोपलो असता मध्यरात्री अडीच च्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज आल्याने मी उठले त्यावेळी घरातील लाईट गेली होती,मी उठून घराचा दरवाजा उघडला असता काळे कपडे घातलेले व तोंडाला बांधलेले हातात कोयता असलेली 4 इसम दिसून आले.  त्यातील एकाने माझ्या गळ्याला कोयता लावत तू जर आरडाओरडा केला तर तुला ठार मारेल असा दम दिला आणि त्यातील तिघे जण पती योगेश सुभाष शेळके झोपलेल्या ठिकाणी जाऊन कोयत्याने गळ्यावर, पायावर ,हातावर कोयत्याने वार करून पतीला ठार मारून पळून गेले.त्यानंतर आरडाओरडा केल्याने शेजारील जमा झाले.  घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, पीएसआय राजेंद्र चाटे, पीएसआय गाजरे,पो हे कॉ. नंदकुमार पठारे,पो.हे.कॉ. खेडकर, पो. कॉ. संदीप दिवटे, पो. कॉ. कैलास शिपणकर यांच्यासह बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.  घटनास्थळी पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, डीवायएसपी विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी भेट देऊन तापसाबाबत सूचना केल्या. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले असून त्यादृष्टीने तपास चालू आहे. बेलवंडी पोलिसांची चार पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके आरोपींच्या मागावर असून लवकरच आरोपी गजाआड केले जातील. अशी प्रतिक्रिया  पोलीस निरीक्षक श्री. संतोष भंडारे यांनी फोनवर बोलताना दिली.

Ahmednagar News: तरुणाचा मध्यरात्री खून, पत्नीसमोरच 4 अज्ञात आरोपींनी केले कोयत्याने वार… Read More »

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश क्र. १ एम.ए. बरालिया यांचे न्यायालयाने आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच तीनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. याबाबत हकीकत अशी की, सन २०१८ मध्ये डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. उज्वला कवडे डॉ. विनोद श्रीखंडे यांचे तक्रारीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे एमस् हॉस्पीटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील तीनही व्यक्तींच्या नावे बनावट कर्ज प्रकरणे करुन त्यांचे बनावट कागदपत्रे, बनावट सह्या करुन सदरचे कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बैंक अधिकारी व संचालक यांचेशी संगनमत करुन आरोपी डॉ. निलेश शेळके यांनी प्रत्येकी रु. ५ कोटी ७५ लाख असे एकुण रु. १६ कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार केलेबाबतच्या तीन वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल झालेल्या होत्या.  त्या प्रकरणात तपासादरम्यान सर्व हिशोब व कागदपत्रे ही वैधानिक लेखापरिक्षणास पाठविण्यात आली होती, त्याचा अहवाल सन २०२१ मध्ये प्राप्त झाला होता. त्या अहवालानुसार व दाखल तक्रारीनुसार प्रकरणामध्ये आरोपी निलेश शेळके यांचे कायदेशीर सल्लागार व सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांचा सहभाग आढळून आलेला होता व प्रकरणात ते फिर्यादी पक्ष व आरोपी पक्ष यांचे वतीने त्यांनी सी.ए. म्हणून काम केलेले होते.  त्याद्वारे मुख्य आरोपी निलेश शेळके यांचेशी संधान बांधुन फिर्यादी यांना फसविण्याचे उद्देशाने विजय मर्दा यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात आढळून आल्याचा आरोप त्यांचेवर फिर्यादी पक्ष व पोलीसांनी केलेला होता. त्यानुसार त्यांना दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अंदाजे दीड महिना विजय मर्दा हे वरील तीनही स्वतंत्र प्रकरणामध्ये कारागृहामध्ये होते. त्यांचे वतीने ॲड. सतिश गुगळे यांनी सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज सादर करुन प्रकरणात आरोपी विजय मर्दा यांचा सहभाग हा केवळ अनुमानावरुन काढलेला आहे व त्यास प्रथमदर्शनी समर्पक असा पुरावा दिसून येत नाही, अपहाराची कोणतीही रक्कम हस्तेपर हस्ते आरोपी विजय मर्दा यांना आल्याचे आढळून येत नाही. त्याचप्रमाणे दाखल गुन्ह्यामधील लावण्यात आलेली कलमे ही विजय मर्दा यांना लागू होत नाहीत. व त्यांनी त्यांचे कार्य हे कायदेशीर सल्लागार व सी.ए. या कार्यकक्षेत केलेले असल्याने त्यास प्रथमदर्शनी फसवणूक अपहार किंवा बनावट दस्त तयार करण्याचे व्याख्येमध्ये घेता येणार नाही अशा स्वरुपाचा युक्तीवाद ॲड. सतिश गुगळे यांनी न्यायालयासमोर केला. सरकारपक्षाद्वारे त्यांची शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तीवाद करण्यात आलेला होता.  वरील कायदेशीर बाजु, उपलब्ध पुरावा व सादर करण्यात आलेला युक्तीवाद या सर्वांचे अवलोकन करुन जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर यांनी सी.ए. विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना वरील तिनही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. आरोपीतर्फे ॲड. सतिश गुगळे व ॲड. अरविंद काकाणी यांनी काम पाहिले, त्यांना ॲड. चंद्रकांत भोसले, ॲड. अक्षय गवारे, ॲड. अजित चोरमले, ॲड. हर्षद तांगडे, ॲड. अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले.

Ahmednagar News: शहर बँकेतील अपहार प्रकरणी सी.ए. विजय मर्दा यांना जामीन मंजूर… Read More »

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर…

Ahmednagar News: अहमदनगर शहरात चर्चेचा विषय ठरलेला ओंकार गामा भागानगरे खून प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आरोपी सागर प्रवीण गुडा याचा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर झाला आहे. 19 जून 2023 रोजी ओंकार भागानगरे याचा खून झाला होता. यानंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.   या प्रकरणात अटक आरोपी सागर प्रवीण गुडा याचा सेशन्स कोर्ट अहमदनगर येथे जामीन फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या   जामिनाची आज रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तीवर आरोपीस जामीन मंजूर केलेला आहे.  सदर आरोपीच्या वतीने अँड. निलेश घाणेकर अँड. सरिता साबळे व अँड सतीश गीते यांनी काम पाहिले.

Ahmednagar News: बहुचर्चित ओंकार गामा भागानगरे खुनातील आरोपीला जामीन मंजूर… Read More »

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मागील महिन्यात कुणाल भंडारी यांची समितीच्या नाशिक विभाग निरीक्षक पदी निवड झालेली होती. त्यांच्या कामगिरीची दखल घेत आता कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.  मुंबई येथे बागेश्वर धामचे महंत श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज आणि प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री कुणाल भंडारी यांची बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी बढती केली आहे.  सनातन धर्माच्या रक्षणाचे आणि हिंदू जनजागृतीचे हे उदात्त कार्य आपण सर्वांना सोबत घेऊन अधिक उंचीवर घेऊन जाल अशी आशा यावेळी प्रदेश संयोजक श्री अभिजीत करंजुले यांनी व्यक्त केली.

Ahmednagar News: कुणाल भंडारी यांची श्री बागेश्वर धाम सेवा समिती महाराष्ट्र राज्य सहसंयोजक पदी निवड Read More »