DNA मराठी

Agriculture News

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती

Vijay Wadettiwar: गेल्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने ज्वारी, गहू, हरभरा ही काढणीला आलेली पिके मातीमोल झाली आहेत. आंबा आणि द्राक्ष बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने सोलापूर, परभणी, नांदेड, धाराशीव भागात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे असं वडेट्टीवार म्हणाले. मागील अतिवृष्टीची मदत अजून मिळालेली नाही, धानाला बोनस जाहीर करून देण्यात आलेला नाही आणि आता पुन्हा संकट आले आहे. सरकारने नियम-निकष बाजूला ठेवून तातडीने रोख मदत द्यावी आणि पंचनाम्यांचे केवळ आदेश न देता प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी उध्वस्त होत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या घराघरांवर नोटिसा चिकटवून दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणी सुरू आहे. सहजपूर-जवळा सारख्या 600 लोकसंख्येच्या गावात 1000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करून मोजणी प्रक्रिया राबवली जात आहे. हे लोकशाहीला भूषणावह नाही. धाराशीव, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला होता. हा प्रकल्प रद्द करावा, अशी जनभावना असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एकीकडे अस्मानी संकटामुळे शेतकरी खचला आहे, तर दुसरीकडे सुलतानी संकटाप्रमाणे सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावत आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी विधिमंडळ नेते विजय वडेटीवार यांनी केली. विधानसभा अध्यक्ष यांनी याची दखल घेऊन सरकारला निवेदन करण्याचे निर्देश दिले.

Vijay Wadettiwar: अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतकरी संकटात; विजय वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची स्थिती Read More »

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा

Maharashtra Politics: राज्यात गेल्याकाही दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. यातच अमेरिकेने वाढवलेले शुल्क आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अस्पष्ट धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य आणि शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर लवकरच ठोस पावले उचलली गेली नाहीत तर लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना गंभीर उपजीविकेच्या संकटाला सामोरे जावे लागेल. आयात शुल्क कमी करण्यास विरोध जावंधिया म्हणाले की, सरकारने अलीकडेच कापसावरील आयात शुल्क ११ % वरून शून्य केले आहे, जेणेकरून कापड उद्योगाला अमेरिकेच्या शुल्कातून दिलासा मिळू शकेल. परंतु याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होत आहे. परदेशी कापूस भारतात ५०,०००-५१,००० प्रति कँडी (३५५.६ किलो) दराने येत आहे. परिणामी, देशांतर्गत कापसाचे दर घसरत आहेत आणि विदर्भातील शेतकऱ्यांना (देशाच्या कापूस उत्पादनाच्या ३०% उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या) ७,०००-७,५०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत नाही. लांब जातीसाठी किमान आधारभूत किंमत ₹८,११० आणि मध्यम जातीसाठी ₹७,७१० प्रति क्विंटल निश्चित केली आहे. शेतकऱ्यांचा नेहमीच बळी जवंधिया यांचा आरोप आहे की सरकार वारंवार उद्योग आणि ग्राहकांच्या हितासाठी निर्णय घेते आणि शेतकऱ्यांचा बळी देते. ते म्हणाले, “हे खूप अन्याय्य आहे. जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करते.” एमएसपी आणि अनुदानावर भर त्यांनी शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी दोन प्रमुख पावले सुचवली… एमएसपी कायदेशीररित्या अनिवार्य केले पाहिजे, जेणेकरून कोणतेही पीक किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी विकले जाऊ नये. शेतकऱ्यांना थेट आणि पुरेसे अनुदान दिले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या किमती आणि बाजारभावातील फरक भरून काढता येईल. सध्याच्या योजनांबद्दल प्रश्न महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान महासन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीकडून दरवर्षी १२,००० रुपये मिळतात. कृषी पंपांसाठी ७.५ अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देखील दिली जाते. परंतु जवंधिया म्हणतात की या योजना “सरकारी अपयश लपवण्याचा” एक मार्ग आहेत. सोयाबीनचा किमान आधारभूत किमतीचा दर प्रति क्विंटल ५,३२८ रुपये आहे, पण शेतकऱ्यांना फक्त ४,०००-४,५०० रुपये मिळत आहेत. तूर (तूर) चा किमान आधारभूत किमतीचा दर ८,००० रुपये आहे, पण शेतकरी तो फक्त ६,५००-७,००० रुपयांना विकू शकतात. जावधिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते, तर भारतात ७०% लहान आणि सीमांत शेतकरी फक्त २-५ हेक्टर जमिनीवर शेती करतात. अशा परिस्थितीत ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकत नाहीत. सरकारला थेट आवाहन जावधिया म्हणाले, “जेव्हा तुम्ही इतर योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करू शकता, तर शेतकऱ्यांवर खर्च का करू नये? जे शेतकरी उन्हात आणि पावसात दिवसरात्र कष्ट करून कोट्यवधी लोकांना पोट भरतात त्यांना पूर्ण आर्थिक मदत मिळाली पाहिजे.”

Maharashtra Politics: उद्योगांसाठी बळी देऊ नका, अन्यथा…, राज्यात शेतकरी आक्रमक; केंद्र सरकारला दिला इशारा Read More »

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला

Agriculture News : राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे दर कोसळल्याने अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा, विविध शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेले दोन महिने सातत्याने आंदोलन करत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीतही किसान सभेने याबाबत जोरदार मागणी केली होती. राज्यभर तहसील कार्यालयांवर दुध ओतून करण्यात आलेल्या आंदोलनांमध्येही हीच मागणी करण्यात आली होती.  आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी वारंवार दिले होते. मात्र बैठकीला आज महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष अनुदानाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.  विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात अर्थातच याचे पडसाद उमटले. सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. हरिभाऊ बागडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे  यांनी लक्षवेधी अंतर्गत  प्रश्न विचारले.  किमान या प्रश्नांना उत्तर देताना तरी दुग्धविकास मंत्री अनुदानाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकार अनुदान देण्याबाबत सकारात्मक आहे हीच ध्वनीफीत यावेळीही वाजविण्यात आली.  दुध अनुदानाबाबतची सरकारची ही चालढकल संतापजनक असून अनुदान देण्यात होणारी ही दिरंगाई दुध कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. सध्या दुध क्षेत्रात पृष्ठकाळ (फ्लश सीजन) सुरु आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.  दुध कंपन्या या काळात स्वस्तात दुध घेऊन त्याची पावडर बनवितात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लश सीजन संपून लीन सीजन सुरु होतो.  दुधाचे भाव तेंव्हा पुरवठा घटल्याने स्वाभाविकपणे वाढलेले असतात. जेंव्हा भाव आपोआप वाढतात तेंव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा  लाभ कंपन्यांना पोहचविला जातो. अनुदानाबाबत  आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरु आहे.   दुग्धविकास मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती अनुदान देणार याबाबत खुलासा केलेला नाही ही बाबही चिंताजनक आहे.  भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची मागणी आहे. सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी  सभागृहात जाहीर केले आहे. मात्र मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत असलेल्या मागणीबाबत अद्यापही धोरण घेण्यात आलेले नाही.  पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबतही  सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तत्काळ किमान भाव फरका इतकी रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून पूर्वलक्षी प्रभावाने गेले दोन महिन्याचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, पुढील काळातही हे अनुदान शेतकऱ्यांना सरळ खात्यावर द्यावे तसेच पशुखादय, औषधे व चाऱ्याचे  दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजि.  सतीश देशमुख, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे,  सदाशिव साबळे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे.

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला Read More »