Dnamarathi.com

Harshvardhan Sapkal : सत्तेत येत असताना केलेली आश्वासने याची पूर्तता झाली पाहिजे, सत्तेत आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ हे महायुतीच्या घटक पक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. आता मात्र त्याचा विसर त्यांना पडला आहे. अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते वर्धा येथे माध्यमांशी बोलत होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मतांचा जोगवा मागत असतांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी करावी. हीच मागणी आम्ही आज आंदोलनातून केली आहे. सोबतच शेतमालाला जो भाव आहे. अडाणी- अंबानी यांच चांगभलं करण्यासाठी सोयाबीनचे भाव पाडले. कापसाला भाव नाही आहे.

बेरोजगारीचा मुद्दा आहे त्याहीपेक्षा ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्यांची दुरवस्था आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. सेवाग्राम येथील संगम शिबिराला भेट देण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ सेवाग्राम येथे दाखल झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *