DNA मराठी

स्पोर्ट्स

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो

KKR vs SRH: आयपीएल 2025 मध्ये गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर 80 धावांनी शानदार विजय मिळवला. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी आणि रिंकू सिंग यांच्या उत्कृष्ट खेळीमुळे कोलकाताने चांगली धावसंख्या उभारली. 29 चेंडूत 60 धावा अय्यरने 29 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांसह 60 धावा केल्या तर रिंकू सिंगने 17 चेंडूत 32 धावा केल्या, तर अंगकृष रघुवंशीने 32 चेंडूत 50 धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांत कोलकाताने 78 धावा जोडल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव होता. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सने त्यांना पराभूत केले होते. हैदराबादला विजयासाठी 201 धावांची आवश्यकता होती, पण कोलकाताच्या गोलंदाजी समोर त्यांचा फलंदाजीचा क्रम कोसळला त्यामुळे संपूर्ण संघ 120 धावांवर ऑल आऊट झाला. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा अपयशी ठरलेहैदराबादचे ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघेही लवकर बाद झाले. पहिल्या षटकात हेडने चौकार मारला पण पुढच्या षटकात हर्षित राणाने त्याला झेलबाद केले. दुसऱ्याच षटकात राणाने अभिषेकलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी देखील लवकर बाद झाले. हेनरिक क्लासेनने 21 चेंडूत 33 धावा केल्या, पण तोही लवकर बाद झाला.

हैदराबादला धक्का देत KKR ने मारली बाजी, वेंकटेश अय्यर ठरला हिरो Read More »

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी

कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) Ashwini Kumar – मुंबई, 31 मार्च 2025: मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये त्यांची पहिली विजयाची नोंद केली आहे, वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सवर आठ विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. हा सामना मुंबईच्या पदार्पणवीर गोलंदाज अश्वनी कुमारच्या शानदार कामगिरीची आठवण करून देणारा आहे. त्याने आयपीएलमध्ये पदार्पण करतानाच 24 धावांत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेत केकेआरला व्यवस्थित बांधले. अश्वनी कुमार (Ashwini Kumar)च्या इम्प्रेसिव्ह कामगिरीनंतर मुंबईच्या फलंदाजांनी 116 धावांचे साधे लक्ष्य 12.5 षटकांत पूर्ण करून सीजनची पहिली विजयाची लय तयार केली. रायन रिकल्टनने त्याच्या अर्धशतकी खेळीने संघाला मजबूत आधार दिला, तर सूर्यकुमार यादवने वेगवान फटकेबाजी करून विजयाचा षटकार लगावला. मुंबईच्या कप्तान हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय अगदी योग्य ठरला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर या गोलंदाजी जोडीने केकेआरच्या सलामीवीरांना लवकरच खेळातून बाद केले. केकेआरने 16.2 षटकांत उर्वरित फलंदाजांची विकेट घेत संघ 116 धावांत गुंडाळला. मुंबईने आयपीएल २०२५ मधील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर या विजयाने संघाच्या मनोधैर्याला चांगला उंचावला आहे. या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत आपली स्थिती मजबूत केली आणि ते आता सहाव्या स्थानावर आहेत. १. केकेआरचा धोकादायक डाव कोसळला, अश्वनीचा जादुई स्पेल २. बोल्ट-चहरची सुरुवातीची मदत ३. केकेआरचा धीरगंभीर प्रयत्न, पण अपुरा ४. एमआयचा सहज पाठलाग, रिकेल्टन-स्कायचा धमाका

Ashwini Kumar- मुंबई इंडियन्सचा शानदार विजय, अश्वनी कुमारच्या पदार्पणात चार बळी Read More »

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

Ambadas Danve : मुंबई पोलीस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत त्या संभाषणाचा पेनड्राइव्हच सभापतींकडे सादर केला. बेटिंग करणाऱ्यांमध्ये मेहुल जैन, कमलेश जैन आणि हिरेन जैन या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्याकडून पाकिस्तानी खेळाडूंचा यासाठी वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉपी मध्ये लोटस 24 नावाच्या ऍपच्या माध्यमातून बेटिंग केल्यानंतर आता या सर्व व्यक्ती मुंबईत आयपीएल साठी आल्याची माहिती दानवे यांनी अंतिम आठवडावरील प्रस्तावावरील भाषणात सभागृहाला दिली. राज्याच्या परिवहन, सिडको, महसूल, आरोग्य विभागातील घोटाळे, मंत्र्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, अधिकाऱ्यांचे घोटाळे सादर करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारचे वाभाढे काढले. तसेच राज्यातील आर्थिक स्थिती रसातळाला जात असल्याचे म्हणत दानवे यांनी सरकारच्या कार्यपध्दतीवर निषेध व्यक्त केला. राज्याने गेल्या दोन वर्षांपासून क्राईम इन महाराष्ट्र अहवाल प्रसिध्द केला नाही. राज्यात 564 विविध गुन्हे दाखल झाले असून दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपुर, पुणे,संभाजीनगरमध्ये बलात्कराच्या घटनांचा आलेख वाढला असून दररोज 22 बलात्कार, 45 विनयभंगाच्या घटना घडत आहेत. कायद्याचा धाक नसल्यामुळे या सर्व घटना घडत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारने सुरु केलेले मिशन शक्ती अभियानात आतापर्यंत 22 टक्के रक्कम खर्च झाली असून ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. कारागृहाची बंदीची क्षमता 27 हजार 114 बंदी असताना 43 हजार बंदी कोंबून ठेवले आहेत. राज्यात 51 हजार कोटी रुपयांची फसवणूकीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात गुन्हयांच व सायबर गुन्ह्याच प्रमाण वाढल असून ते रोखण्यासाठी सायबर सेल प्रभावी होण्याची आवश्यकता आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात घुसून चोरी करून त्याला मारण्याचा प्रयत्न झाला. बीड मस्साजोग सरपंच हत्येतील आरोपी अद्याप पकडला जात नाही. सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू मानव आयोगाच्या अहवालात पोलिसांनी केलेल्या मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले. मंत्र्यांचा परदेशात चाललेल्या मुलाच विमान वळवलं जातं परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करू शकत नाही अशा शब्दांत दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदाबादमधील सुधीर कोठडिया नावाच्या व्यक्तीने 2 हजार कोटी रुपये डिजिटल पध्दतीने जमवून हवाला मार्फत ते विदेशात पाठवले. यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली, याबाबत पराग अशोककुमार शहा यांनी तक्रार केली. मात्र याबाबत पुणे कि नारायण गावात गुन्हा दाखल व्हायला होता मात्र ठाण्यात पोलीस उपायुक्तांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करतात. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली. सिडको योजनेतील खरपुडीची 247 हेक्टर क्षेत्र जमीन शेतकऱ्यांकडून सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम, चिप्पा रखमाजी आदींनी विकत घेतली. 18 जून 2008 ला हे प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केले त्यानंतर आर्थिक साहाय्यता नसल्यामुळे हा प्रकल्प रद्द केला होता. यात सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी डी एसके लीगल सर्व्हिसेसची अवैध नेमणूक करून देयके दिल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी केली. मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव विशाल राठोड यांनी स्वत:च्या सहीने गो बंजारा ट्रस्टची जागा मंत्र्याच्या नावे करून घेतली. उल्हास नगर महानगरपालिकेत युडीच उल्लंघन करून टीडीआर घोटाळा झाला आहे. यात ललित खोब्रागडे नावाच्या अधिकाऱ्याने युडीसिपीआर उल्लंघन केल्याचा गंभीर आरोपही दानवे यांनी केला. अंधेरी, के पश्चिम विभागातील चक्रपाणी नावाचे उपायुक्तांच्या वरदहस्ताने अवैध बांधकाम सुरु आहे. बोरिवली येथील पालिकेचे भगवतीचे हॉस्पीटलचे खासगीकरण करण्याचं प्रयत्न महापालिका करतेय.शत्रू संपत्तीबाबत पाकिस्तानच्या बॉंड वर आपल्याकडे कारवाई झाली. याबाबत मीरा भाईंदरच्या राजू शहा यांनी तक्रार केली असता, त्याला पाकिस्तान मधून धमकीचे फोन येत असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. परिवहन विभागाने वाहतूक स्पीडवर मीटर मर्यादा निर्बंधाचा उल्लेख केला पाहिजे. वाहतूक स्पीडवर वेग नियंत्रक असले पाहिजे, त्यावर परिवहन विभाग लक्ष देत नाही. बेस्ट, टीएमटी, एनएमटीच्या बस धावत असलेल्या मार्गावर सिटी फ्लोच्या बसेस धावतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीच्या बसेसवर बंधन येतात, त्यामुळे सीटी फ्लोच्या बसेस बंद करण्याची मागणी दानवे यांनी केली. भोसरी एमआयडीसीत खुल्या जागेवर 150 शेड अवैधरित्या उभारले गेले. यासाठी विकी गोयल या व्यक्तीने बनावट कागदपत्रे बनवली. संभाजी नगरमध्ये हॉकी मैदानासाठी आलेले 21 कोटी रुपये संजय सबनीस व सुहास पाटील या अधिकाऱ्यांनी कंत्राटी कामगार हर्षकुमार क्षीरसागर यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून गैरव्यवहार केला. रोहयोमध्ये पालघर येथे निवृत्त अधिकारी नंदकुमार यांच्यासाठी मिशन महासंचालक पद निर्माण केलं, त्यासाठी केंद्राने यावर आक्षेप घेतल गेले. मुंबईत आकाश ग्राहक नावाची संस्था नवीनचंद्र चालवितात आणि ते तांदळावर पॉलिश करून परराज्यात विकतात. त्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन मुंबई, ठाणे जिल्हा विभाग असा उल्लेख करून शासनाची दिशाभूल केली. आता कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र दाखवल आहे, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. आरोग्य विभागात बनावट औषधांचा पुरवठा झाला. तत्कालीन आरोग्य मंत्री यांनी यांत्रिक पध्दतीने स्वच्छता करण्याच्या निविदेसाठी ७७ कोटी रुपये खर्च येणार असताना ६६८ कोटी रुपये दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप दानवे यांनी केला. मुंबई ठाण्यातील हॉटेलमध्ये रुफ टॉपवर विदेशी दारू पुरविणे सुरु आहे. लीव्हीन लिक्वीड नावाची कंपनी त्यांच्या ऍपवर विदेशी दारू घर पोहच करून नियमाच उल्लंघन करतेय , त्यामुळे फोरेन लिकर बॉंडचे धोरण सरकारने स्पष्ट करण्याची मागणीही दानवे यांनी केली आहे. जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारणमध्ये घेतले जातात, यामुळे या विभागातील अभियंतांवर अन्याय होतो. औरंगजेबच्या कबरीच्या देखभालीसाठी साडेसहा लाख रुपये तर सिंधुदूर्गमधील शिवरायांच्या मंदिरांच्या देखभालीसाठी 250 रुपये येतात. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करताना दानवे यांनी इतर धर्मांचाही मान राखला पाहिजे असे म्हणत हिंदूत्वादी म्हणणाऱ्या सरकारला सुनावले.

मुंबई पोलिसांच्या मदतीने IPL मध्ये बेटींग, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप Read More »

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर

IPL 2025 : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत स्पर्धा जिंकली आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी केएल राहुलने जबरदस्त कामगिरी केली आहे. नुकतंच तो भारतात परतला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. माहितीनुसार, त्याने आयपीएल 2025 मध्ये कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर नाकारली आहे. माहितीनुसार दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने राहुलला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, मात्र त्याने ऑफर स्वीकारण्यास नकार दिला. अक्षर पटेल कर्णधार होणार?तर दुसरीकडे केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्यामुळे अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची कमान सांभाळू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने केएल राहुलला 14 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले. कारण राहुलला याआधी आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा अनुभव आहे. 2020-21 मध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि 2022 -2024 पर्यंत तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे तो दिल्लीची कमान सांभाळणार याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळू इच्छितो, त्यामुळे राहुलचा हा निर्णय दिल्लीसाठीही किती फायदेशीर ठरणार हे पाहावे लागेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधून परतताच केएल राहुलने घेतला मोठा निर्णय, नाकारली चक्क कर्णधारपदाची ऑफर Read More »

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग

Champions Trophy Final: आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. मात्र या स्पर्धेच्या सुरवातीपासून जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंड संघाला फायनलमध्ये पाच चुका भारी पडल्या ज्यामुळे त्यांना अंतिम सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला. मॅट हेन्री अंतिम सामन्यातून बाहेरन्यूझीलंडच्या आशांना सर्वात मोठा धक्का सामन्यापूर्वीच बसला कारण या स्पर्धेत सर्वाधिक 10 बळी घेणारा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री दुखापतीमुळे अंतिम सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या नाथन स्मिथने 2 षटकांत 22 धावा दिल्या. फिरकी गोलंदाजी खेळता आली नाहीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय वेगवान गोलदाजांवर हल्लाबोल केला मात्र त्यानंतर फिरकी गोलंदाजी सुरू होताच विकेट पडू लागल्या. पहिल्या 75 धावांमध्ये, फॉर्ममध्ये असलेले तिन्ही फलंदाज यंग, रॅचिन आणि विल्यमसन फिरकीच्या जाळ्याचे बळी पडले. मधल्या षटकांच्या फलंदाजी स्लोमधल्या षटकांच्या टप्प्यात किवी फलंदाजांना एकेरी आणि दुहेरी धावा करता आल्या नाहीत. डॅरिल मिशेलने 63 धावा केल्या असतील, पण त्यासाठी त्याला 101 चेंडू लागले. अशा परिस्थितीत, धावगती बरीच कमी झाली आणि त्यानंतर, न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. वेगवान गोलंदाजी निराशाजनक कामगिरीजेव्हा किवी गोलंदाज गोलंदाजी करायला आले तेव्हा रोहित शर्माने त्यांच्यावर वर्चस्व गाजवले आणि त्यांना बॅकफूटवर नेले. त्यानंतर वेगवान गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले आणि पहिल्या 10 षटकांत त्यांनी भरपूर धावा दिल्या. त्यामुळे 252 चा स्कोअर आणखी कमी झाला. श्रेयस अय्यरचा महत्त्वाचा झेल सोडलाएकेकाळी लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु श्रेयस अय्यरने शानदार पुनरागमन केले. त्यानंतर, जेव्हा भारताला जिंकण्यासाठी 100 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता होती, तेव्हा 44 धावांवर अय्यरचा सोपा झेल सोडला. त्यानंतर गती भारताकडे सरकली आणि किवींचे खांदे झुकले.

भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला दिला धक्का, ‘या’ 5 चुका अन् स्वप्न भंग Read More »

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला…

Virat Kohli : आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली निवृत्त होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून याबाबत स्वतः विराट कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर विराट कोहलीने पुष्टी केली आहे की तो कुठेही जाणार नाही आणि देशासाठी खेळत राहील. कोहलीला निवृत्तीबद्दल थेट विचारण्यात आले नसले तरी, माजी भारतीय कर्णधाराने त्याच्या भविष्याबद्दलचे त्याचे हेतू स्पष्ट केले. या प्रश्नाचे उत्तर देताना कोहली म्हणाला, “हो, नक्कीच. म्हणजे, शुभमनने म्हटल्याप्रमाणे, मी शक्य तितके या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो, माझा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो, मी इतका वेळ कसा खेळू शकलो, जिथे शक्य असेल तिथे त्यांचा खेळ सुधारण्यास मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि हो, जसे ते बरोबर म्हणतात, जेव्हा तुम्ही निघता तेव्हा तुम्हाला ते ठिकाण चांगल्या स्थितीत सोडायचे असते.” “आमचा हाच प्रयत्न आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला हेच हवे आहे की जेव्हा आम्ही कोणत्याही टप्प्यावर खेळ पूर्ण करतो, तेव्हा आमचा संघ पुढील 8 -10 वर्षे जगाशी सामना करण्यास सज्ज असेल आणि या खेळाडूंमध्ये निश्चितच ते करण्याची प्रतिभा आहे आणि खेळाची जाणीव देखील आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, त्यांनी आधीच काही प्रभावी खेळी केल्या आहेत, श्रेयसने ती भूमिका बजावली आहे, सुंदर, केएलने सामने संपवले आहेत तरहार्दिक एक मॅच विनर खेळाडू आहे.” ‘ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते’चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत ब्लॅककॅप्सवर चार विकेटनी संस्मरणीय विजय मिळवल्यानंतर, कोहलीने खुलासा केला की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याचा संघ पुनरागमन करू इच्छित होता, जिथे भारताने पाच सामन्यांची मालिका 1-3 अशी गमावली होती. ऑस्ट्रेलियामध्ये कोहलीला स्वतः आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना संघर्ष करावा लागला, पण आज रात्रीचा विजय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे दुःख कमी करण्यास मदत करेल. कोहली म्हणाला, “सर्वप्रथम, आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यानंतर पुनरागमन करायचे होते, एक मोठी स्पर्धा जिंकायची होती आणि आम्ही ते केले. म्हणून, ही एक अद्भुत भावना आहे, इतक्या अद्भुत तरुणांसोबत खेळणे खूप छान आहे, चेंजिंग रूममध्ये खूप प्रतिभा आहे आणि तुम्हाला माहिती आहेच की, ते भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जात आहेत.” “आम्हाला मदत करायला, आमचा अनुभव शेअर करायला आणि संधी मिळेल तेव्हा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायला आनंद होतो. हे खेळाडू मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत आणि म्हणूनच आमचा संघ इतका मजबूत आहे.” या स्पर्धेत कोहलीने पाच सामन्यांमध्ये 218 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतक होते.कोहली म्हणाला, “मला वाटते की भूतकाळात हरवलेले विजेतेपद जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला वेगवेगळ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि जर तुम्ही या स्पर्धेकडे पाच सामन्यांच्या आधारे पाहिले तर प्रत्येकाने कुठेतरी योगदान दिले आहे आणि म्हणूनच आम्ही ही स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झालो.” लोकांनी खूप प्रभावी खेळी खेळल्या आहेत, खूप प्रभावी स्पेल आहेत आणि केवळ सामूहिक प्रयत्नांमुळेच तुम्हाला विजेतेपद मिळू शकते आणि मला खूप आनंद आहे की आम्ही एक संघ म्हणून खेळू शकलो आणि आम्हाला ते खरोखर आवडले.

विराट कोहली निवृत्त होणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जिंकल्यानंतर सोडलं मौन, म्हणाला… Read More »

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 251 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार रोहित शर्माने 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. रोहितने डावाच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली, पण त्यानंतर ग्लेन फिलिप्सने गिलचा एक शानदार झेल घेतला. 50 चेंडूत 31 धावा काढून गिल बाद झाला. यानंतर, विराट कोहलीने फलंदाजीला आला पण तो फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसह डावाला पुढे नेले मात्र मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो यष्ट्यांच्या मागे बाद झाला. रोहित शर्माने 83 चेंडूत 7 चौकार आणि 8 षटकारांसह 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 62 चेंडूत 48 धावा केल्या, पण रचिन रवींद्रने एक शानदार झेल घेतला. यानंतर अक्षर पटेलने 20 चेंडूत 29 धावा केल्या, पण तोही बाद झाला. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 18 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. शेवटी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 33 चेंडूत 34 धावा केल्या, तर जडेजा 6 चेंडूत 9 धावा केल्या.

भारताचा ‘शानदार’ विजय, न्यूझीलंडला धक्का देत पटकावले चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद Read More »

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना

NZ vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे. लाहोर येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य होते, परंतु आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 312 धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने शतक (100) केले असले तरी ते संघाचा पराभव रोखू शकले नाही. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होईल, जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीत सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्याने रायन रिकेलटन (17) कडून आपली विकेट गमावली. ही विकेट मायकेल ब्रेसवेलने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतली. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली. बावुमाने 56 धावा केल्या पण मिशेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही.

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

Chammpions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आपल्या शेवटच्या ग्रुप सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. तर न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने 5 विकेट्स घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर नेले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने या सामन्यात 249 धावा केल्या, प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ या लक्ष्याच्या जवळही पोहोचू शकला नाही. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुभमन गिल आणि रोहित शर्माची सलामी जोडी काही खास कामगिरी करू शकली नाही आणि भारताने लवकरच सुरुवातीच्या विकेट गमावल्या. विराट कोहलीही या सामन्यात फ्लॉप ठरला परंतु अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यरने भारतीय डाव सावरला. त्यानंतर हार्दिक पंड्याने स्फोटक फलंदाजी करत 45 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने शानदार कामगिरी करत 5 विकेट्स घेतल्या. 249 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. हार्दिक पंड्याने लवकरच रचिन रवींद्रला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर वरुण चक्रवर्तीने विल यंगला 22 धावांवर बाद केले. कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला 17 धावांवर बाद केले, तर रवींद्र जडेजाने टॉम लॅथमलाही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. केन विल्यमसनने एका टोकापासून चांगली फलंदाजी केली आणि 81 धावा केल्या, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. वरुण चक्रवर्तीने घातक गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडचा डाव उद्ध्वस्त केला. त्याने 5 विकेट्स घेतल्या आणि किवी संघाला 200 पेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळले. अक्षर पटेलनेही एक महत्त्वाची विकेट घेतली आणि विल्यमसनला 81 धावांवर बाद करून भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे.

Chammpions Trophy 2025 : दुबईत वरुण चमकला, भारताने न्यूझीलंडचा उडवला धुव्वा Read More »