DNA मराठी

राजकीय

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे

Sujay Vikhe On Congress:  काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा हा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलीली धुळफेख असून केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा जाहिरनामा प्रकाशित केला अशी बोचरी टीका अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि भाजप महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली आहे.  शिंगोरी गावात बूथ सक्षमीकरण संवाद मेळावा आयोजित कार्यक्रमात बोलत होते.  शेवगाव तालूक्यातील शिंगोरी गावातील  बुथ कमिटी बैठक आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह शेवगाव तालूक्यातील सर्व भाजप पदाधिकारी,बुथ कमिटी मेंबर, गण प्रमुख आणि सुपर वॉरियर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याचा पडखर समाचार घेत कॉंग्रेसवर हल्ला चढविला. क्रॉंग्रेसने आपल्या जाहिरनाम्याचे नाव ‘न्यायपत्र’ दिले आहे. जर कॉंग्रेसला आता न्याय द्यायचा आहे, तर ५५ वर्षाच्या काळात केवळ अन्याय केला का असा सवाल सुद्धा डॉ. विखे यांनी विचारला आहे. अनेक दशक देशात कॉंग्रेसने सत्ता उपभोगली अनेक लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहिरनामे प्रकाशित केले. पण आजतयागत त्यांनी आपल्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पुर्ण केले नाही असा दावा डॉ. सुजय विखे यांनी केला. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनाचे गाजर दाखवत लोकांची फसवणूक करण्याचे काम आतापर्यंत कॉंग्रेस करत आली आहे. यामुळे हा जाहिरनामा केवळ कागदापूरता मर्यादित असून पुन्हा देशाचे पंतप्रधान हे केवळ नरेंद्र मोदीच होतील, देशात केवळ मोदींची गॅरेंटी टीकू शकणार आहे. असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मागील दहा वर्षाच्या काळात देशाने जगात जे नावलौकीक मिळविले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश महासत्तेकडे वाटचाल करत असून देशात आर्थिक सुधारणांना गती  मिळत आहेत. मेक इन इंडिया,स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक तयार होत आहेत. त्याच बरोबर उज्वला योजना, वयोश्री योजना, पिएम किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत,प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा अनेक योजनाच्या मार्फत सरकार हे शेतकरी, गोर गरीब, महिला आणि तरूणाच्या मागे खंबीर उभे आहे दाखवून दिले. यामुळे अबकी बार ४०० पार होऊन या देशात नवा इतिहास घडणार असल्याचा दावा डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.  जिल्ह्यातही केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ मोठी विकास कामे झाली आहेत. यामुळे नगरची जनता सुद्धा पंतप्रधान मोदींच्याच मागे राहणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त करत केवळ विकास कामांवर सदरची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे घराघरात मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पोहचवा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Sujay Vikhe On Congress : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे जनतेची दिशाभूल : खा. डॉ. सुजय विखे Read More »

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द

Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त दोन आठवडे शिल्लक आहे. यामुळे सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरात प्रचार करताना दिसत आहे.  तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. VBA च्या एका उमेदवाराचे अर्ज रद्द करण्यात आले आहे.   यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. अर्जातील त्रुटींमुळे तो रद्द करण्यात आला आहे.  यवतमाळ-वाशीममध्ये होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पाहता येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल होती. आज प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. याच प्रक्रियेत VBA उमेदवार अभिजीत राठोड यांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्याने त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 4 एप्रिल रोजी यवतमाळ-वाशिममधून उमेदवार बदलून सुभाष खेमसिंग पवार यांच्या जागी तरुण अभिजीत राठोड यांना उमेदवारी दिली होती. यानंतर अखेरच्या दिवशी अभिजीतने उमेदवारी अर्ज दाखल केला. यवतमाळ-वाशिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 38 उमेदवारांचे 49 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले. येथे महायुतीकडून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीचे संजय देशमुख आहेत. VBA उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडल्याने MVA आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. यानंतर दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे रोजी होणार आहे.

Lok Sabha Elections 2024: प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का, ‘या’ उमेदवाराचे अर्ज रद्द Read More »

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील

Maharashtra News:  केवळ विकास हेच माझे ध्येय आहे आणि केवळ विकासासाठीच मी तुमच्याकडे मते मागणार आहे. असे प्रतिपादन भाजप आणि महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. भाजपच्या वर्धापन दिनाच्या निमित्य आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मागील पाच वर्षात आपण केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदारांसमोर जाणार असून केवळ विकासाचीच कामे लोकांना सांगा असा संदेश सुद्धा त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.  डॉ. सुजय विखे पाटील यांनी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटीगाठी वाढविल्या आहेत. त्याच बरोबर मतदार संघातील बुथ कमीटीच्या माध्यमातून प्रचाराचे नियोजन बुथ कमीट्या सक्षमिकरण करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध ठिकाणी त्यांच्या सभा घेत प्रचाराची रणनिती कार्यकर्त्यांना समजावून सांगितली जात आहे.  भापजच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्य आयोजित सात्रळ तालूका राहूरी येथील  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुजय विखे यांनी केवळ विकास कामांची चर्चा करत उमेदवारांचा प्रचार करण्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यात झालेल्या विकास कामे मतदारांपर्यंत पोहवा असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांवर चर्चा करून त्यांना महत्व देऊ नका, मागील पाच वर्षात जिल्ह्यात झालेली विकासकामे आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी  हेच आपल्या प्रचाराचा अजेंडा राहील त्या व्यतिरिक्त कोणत्याही भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.  तसेच सर्व स्थानिक हेवेहावे बाजूला ठेऊन ही निवडूक देशाची निवडूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती पुन्हा देशाचे नेतृत्व देण्यासाठी काम करा असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra News : विकास हेच माझे ध्येय : डॉ. सुजय विखे पाटील Read More »

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे

Sujay Vikhe News :- अहमदनगर लोकसभा प्रचार सभेत आघाडी घेतलेले महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे पाटील यांनी प्रचारादरम्यान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांची माहिती गावोवावी पोहचवण्यासाठी बूथ कमिटीच्या माध्यमातून सुरू आहे. बूथ कमिटी सक्षमीकरण मेळावे घेण्याचा सपाटा महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लावला आहे.  सदरची निवडणूक ही देशाचे नेतृत्व ठरवणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी खरवंडी कासार येथील बूथ कमिटी सभेत केले.   डॉ. सुजय विखे पाटील हे  विद्यमान खासदार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून  त्यांनी आपल्या  प्रचाराचा सपाटा लावला आहे. गावोवावी जाऊन ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यासाठी मतदार संघातील  सर्व तालुकास्तरावरील बूथ कमिटीच्या बैठका घेणे, कार्यकर्ता मेळावे घेणे, घटक पक्षांच्या सभा घेण्याचे काम ते साध्य करत आहेत. अशीच बूथ कमिटीची बैठक खरवंडी कासार येथे शुक्रवारी बोलावण्यात आली होती.  यावेळी सुजय विखे यांनी महाविकास आधाडीवर निशाणा साधताना  तीन वर्षांच्या काळात तालुक्याला एक रुपयांचा सुद्धा निधी दिला नसल्याचा आरोप व्यक्त केला. तर दुसरीकडे महायुतीच्या दीड वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वच गावात कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन निधी दिला आहे. यामुळे जर देशाचा आणि जिल्ह्याचा विकास पाहिजे असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त देशाला दुसरा पर्याय नाही. म्हणून ही निवडणूक महत्वाची असून त्यासाठी आपण मतदान केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मी फक्त विकासावर मत मागत असून मी फक्त आपल्याला विकास देऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. या सभेला आमदार मोनिका राजळे यांच्यासह मालेवाडी संघ, मिडसंघ, मुंगूसवाड, ढगेवाडी, काठेवाडी,बिडसंगावी,धाकनवाडी, दैत्य नांदूर, भारजवाडी,तुळजवाडी या गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आणि सर्व बूथ प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Sujay Vikhe News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणारी ही निवडणूक :- खा.डॉ.सुजय विखे Read More »

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा…

Maharashtra Politics: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके साधा माणूस आहेत. जसे स्व.अनिलभैय्या राठोड मोबाईल आमदार होते, तसे लंके या देशातील पहिले मोबाईल खासदार होतील. निलेश लंके रीलवर लोकप्रिय आहेत. कोविड काळात त्यांनी रियल मध्ये नुसते पारनेरच नाही तर नगर दक्षिणेसह महाराष्ट्रातून आलेल्या कोविड रुग्णांची सेवा केली. गोरगरिबांच्या अश्रू पुसण्याच काम केल.  रीलवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की नगरकरांना गुंडाराजला पाठबळ देणारा नाही तर नगरकरांचा विकास करणारा खासदार दिल्लीला पाठवायचा आहे, असा टोला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लगावला आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांच्या प्रचाराची रणनीती ठरवण्याच्या नियोजनाची शहर जिल्हा काँग्रेसची बैठक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी लंके यांच्यावर रिल वरून टीका करणाऱ्या शहराच्या आमदारांचे नाव न घेता त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.  शेतकरी, व्यापारी, उद्योजक, तरुण, महिला अशा विविध घटकांचे सक्षमपणे प्रश्न मांडणारा खासदार लंके यांच्या रूपाने जनता निवडून देणार आहे. प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करून घरोघरी जात प्रचार करत शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली उमेदवाराला विजयी करण्यासाठी वज्रमूठ आवळून काम करण्याचे आवाहन यावेळी किरण काळे यांनी कार्यकर्त्यांना केले.  इंग्रजी वरून खिजवणाऱ्यांवर टीका  भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांनी लंके यांना इंग्रजीतून बोलून दाखवावे, आपण निवडणुकीचा अर्जच भरणार नाही, असे वक्तव्य नगर शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केले होते. त्याचा समाचार घेताना काळे म्हणाले, तुम्ही कॉन्व्हेंट शाळेत शिकले. मोठ्या घरात जन्माला आले. तुमचा जन्म कारखानदार, सत्ता, मंत्रीपद असणाऱ्या घरात झाला. सोन्याचा आयता चमचा तुम्हाला जन्मापासून तुम्हाला तोंडात मिळाला आहे. पण आमचे लंके सामान्य कुटुंबातले आहेत.  वडील शिक्षक, आई शेतकरी असणाऱ्या गरिबाचं लेकरू आहे. काँग्रेस नेते तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे देखील शिक्षण अल्प होतं. त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. मात्र त्यांनी विकासाच व्हिजन ठेवून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. विरोधी उमेदवारांना हे माहीत नाही असे दिसते की संसदेत मराठीतून देखील जनतेचे प्रश्न मांडता येतात. खा.ओमराजे निंबाळकर मराठीतच बोलतात. इंग्रजी वरून लंकेना खिजवण्याचं काम करणाऱ्यांना आता जनताच ईव्हीएमच्या माध्यमातून योग्य मतदान करत खिजवण्याच काम करेल, असा टोला काळे यांनी यावेळी लागला.  शेतकरी अडचणीत म्हणून बाजारपेठ डबघाईला  शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत देण्याचं आश्वासन देऊन देखील भाजप सरकारने पूर्ण केलं नाही. आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. नगर दक्षिण देखील शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या खिशात पैसेच नाहीत. नगर शहराची बाजारपेठ ही शहरासह आसपासच्या तालुक्यांतील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी ग्राहकांवर अवलंबून आहे. शेतकरीच अडचणीत असल्यामुळे बाजारपेठ देखील डबघाईला आली आहे. इन्कम टॅक्स कलम ४३ मध्ये दुरुस्ती करत ४५ दिवसांमध्ये व्यवहार पूर्ण करण्याची अट व्यापाऱ्यांना भाजप सरकारने घातली आहे. अन्यथा ते उत्पन्न म्हणून त्यावर कर लावण्याची तरतूद केली आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वेळच्या निवडणुकीत व्यापारी देखील भरघोस मते देऊन त्यांचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी निलेश लंकेना विजयी करतील असा दावा यावेळी किरण काळेंनी केला.  प्रभाग निहाय बैठकांचे नियोजन  काळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. प्रभागातील प्रत्येक भागात, घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घ्या. त्यांना बूथ पर्यंत मतदानासाठी येण्या करिता प्रवृत्त करा. प्रत्येकाला मतदान करण्यासाठी जागृत करा. महाविकास आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधा. माजी मंत्री आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातून उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागण्याच्या सूचना यावेळी काळेंनी कार्यकर्त्यांना दिल्या.  ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, सांस्कृतिक विभागा शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे आदींनी मनोगत व्यक्त केले. महिला काँग्रेस, विद्यार्थी, युवक काँग्रेस, अल्पसंख्यांक, ओबीसी आघाडी, डॉक्टर, वकील सेल, सांस्कृतिक विभाग, कामगार आघाडी, साफसफाई कामगार विभाग, असंघटित व स्वयंरोजगार आघाडी यासह विविध फ्रंटल, सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहराच्या सावेडी, केडगाव उपनगर भिंगार, मध्य शहरसह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Maharashtra Politics: रील वरून टीका करणाऱ्यांचा काळेंनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले,गुंडाराजला पाठबळ देणारा… Read More »

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : धाराशीव येथील अर्चना पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  दरम्यान धाराशीव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली.  महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. धाराशीव मतदारसंघातील एक वेगळेच चित्र आज इथे पहायला मिळाले आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार यांनी आज जाहीर होणाऱ्या उमेदवारासाठी एकत्रितपणे पत्रकार परिषदेला हजेरी लावली आहे.  या निवडणुकीत महाराष्ट्रात जसे अभूतपूर्व यश महायुतीला मिळणार आहे. तसे यश धाराशीव मतदारसंघात सौ. अर्चना पाटील या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.  राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरासंदर्भात आदेश दिला आहे मात्र ज्यांची मनोवृत्ती ढासळली आहे अशा लोकांची वक्तव्ये प्रसारमाध्यमांमध्ये ऐकली. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राहिल आणि घड्याळ चिन्ह वापरापूर्वी एखादी जाहिरात द्यावी त्याप्रमाणे वर्तमानपत्र आणि टिव्ही चॅनलवर ठळकपणे जाहिरात दिलेली आहे.  शिवाय सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केले आहे की, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन राहून’ हे वाक्य लिहायला सांगितले आहे त्याप्रमाणे पालन होत आहे. याउलट तथाकथित शाहू – फुले – आंबेडकरांचे समर्थक म्हणवणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आणि सतत लोकांची दिशाभूल करत असतात त्यांच्या ट्वीटबाबत सर्वोच्च न्यायालयाने टिका केली आहे असा टोलाही सुनिल तटकरे यांनी लगावला.  शरद पवारसाहेबांचा फोटो लावण्याबाबत त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवारसाहेबांचा फोटो न लावता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा फोटो आम्ही वापरत आहोत. शिवाय महाराष्ट्रातील आमच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना घड्याळ चिन्ह वापराबाबत स्पष्टता सांगण्यात आली आहे. मात्र जाणीवपूर्वक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.  या पक्ष प्रवेश आणि पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, धाराशीवचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजप आमदार अभिमन्यू पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, भाजप आमदार राजाभाऊ राऊत, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे पदाधिकारी व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Lok Sabha Election 2024 : धाराशीव लोकसभा मतदारसंघात अर्चना पाटील यांना उमेदवारी Read More »

Maharashtra News: उद्योजक अनिल जोशी यांची विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड

Maharashtra News: अहमदनगर शहरातील प्रसिद्ध उद्योजक अनिल जोशी यांची काल नेवासा तालुक्यातील वडाळा भैरोबा येथील विभाग बैठकीत केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांच्या उपस्थिती विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड करण्यात आली. या वेळी अनिरुद्ध (अण्णा) पंडित,सतीश अरगडे,सुनील खिस्ती, गजेंद्र सोनवणे,कुणाल भंडारी, श्रीकांत नंदापुरकर आदी उपस्थित होते . अनिल जोशी यांचे वडील सैन्यात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे शिक्षण नगरमध्ये झाले. पहिली ते दुसरी पर्यंतचे शिक्षण नगर शहरातील मध्यवर्ती शाळेत झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर नौदलात निवड झाली आणि पंधरा वर्षे नौदलात सेवा केली. 2000 मध्ये नौदलातून निवृत्त झाल्यानंतर 2007 पर्यंत परदेशात काम केले. त्यानंतर भारतात परत येऊन राष्ट्रिय स्वयंसेवक संघाच्या आदर्शांनी प्रभावित होऊन संघाच्या संपर्कात आले आणि संघात काम करू लागले.  संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद चे ते सदस्य असल्याने त्यांची संघाच्या अखिल भारतीय पूर्वसैनिक परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.

Maharashtra News: उद्योजक अनिल जोशी यांची विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा मंत्री पदी निवड Read More »

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे कारण जेव्हा गोर-गरीबावरती अन्याय होतो आणि ज्या वेळेस दहशतीचे, दादागिरीचे वातावरण निर्माण केले जाते त्यावेळेस आम्ही गुंड होण्याचा देखील पवित्रा घेतो असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केले.  अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच मोठ्या प्रमाणात चालू असून निलेश लंके यांनी मोहटा देवी गडावरून जनसंवाद यात्रेचा नारळ फोडून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा शुभारंभ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करून गावागावात जाऊन जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेत आहेत.  महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी नगर शहरामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात लंके यांना एक आव्हान केले आहे.  निलेश लंके यांनी एक महिन्याभरात इंग्रजीत भाषण पाठ करून दाखवावे मी उमेदवारी अर्ज सुद्धा भरणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने आमदार निलेश लंके यांनी देखील त्यांना पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे.   संसदेत कुठल्या भाषेमध्ये प्रश्न मांडायचा यापेक्षा संसदेत तुम्ही किती प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात हे महत्त्वाचे असून चौका चौकात इंग्रजीत भाषण मी जर करत बसलो तर त्याचा फायदा काय आहे. सर्वसामान्यांना काम पाहिजे भाषण नाही असे निलेश लंके म्हणाले.

Nilesh Lanke: होय, मी गुंडच आहे पण … लंके यांनी दिला विखेंना उत्तर Read More »

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित

NCP News :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरवार दि.४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांनी दिली.   लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून प्रचारास सुरवातही केली आहे. त्यासाठीच दि.४ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा, मंत्री हसन मुश्रीफ राहणार उपस्थित Read More »

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे

Ahmednagar News: आज मंगळवारी खा.सुजय विखे आणि आ.राम शिंदे यांच्या उपस्थितीत  जामखेड तालुका भाजप पदाधिकर्यांची प्रचार नियोजन बैठक पार पडली.  या बैठकीनंतर राम शिंदे यांनी आज झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा सांगितला. नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  शिंदे म्हणाले की, यावेळी कार्यकर्त्यांनी आपापली मते मांडली तसेच निवडणुकीच्या दृष्टीने कशी व्युव्ह रचना हवी याबद्दल सांगितले. गेल्या पाच वर्षातील एकूण आलेल्या अनुभवांचा उहापोह करण्यात आला. या बद्दल उमेदवार सुजय विखे यांनी सर्वांचे समाधान होईल अशी भूमिका मांडली.  यावर उपस्थितीत पदाधिकारी यांचे पूर्ण समाधान झाले असून यापूर्वी जामखेड तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यपेक्षा अधिकचे मताधिक्य जामखेड तालुक्यातून दिले जाईल अशी ग्वाही सर्वांनी दिली.  पक्षाने 13 मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत, केंद्रीय नेतृत्वाने अब की बार चारसौ पार चा नारा दिला आहे. त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणे हे सर्वांचे लक्ष आहे.  नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीतजास्त मताधिक्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. उद्या बुधवारी कर्जत तालुका भाजप पदाधिकारी यांची प्रचार नियोजनाची बैठक होणार आहे. आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता,याची जाहीर वाच्यता होत नसते. आमच्या कुटुंबातील जी काही भाऊबंदकी होती ती मिटली आहे, असे उत्तर खा.सुजय विखे यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारलेल्या प्रश्नावर दिली. मधल्या काळात कार्यकर्त्यांत जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली. त्यावर सर्वांचे समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आहे.  आता एकजुटीने जेष्ठनेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली. यावेळी जामखेड तालुका भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Ahmednagar News : आमचा वाद कौटुंबिक.. आमच्यातील भाऊबंदकी मिटली आहे- सुजय विखे Read More »