DNA मराठी

राजकीय

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा

Ajit Pawar On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधाडून आरोप- प्रत्यारोप सुरू आहे. तर दुसरीकडे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यावर असताना थेट धनंजय मुंडे यांच्यासमोर अजित पवारांनी सर्वांना इशारा दिला आहे. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये. मी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलावलं असून त्यांना आता माझ्या पद्धतीने सांगणार आहे. कोणत्याही अफवावंवर विश्वास ठेऊ नका आणि एक गोष्ट पुन्हा सांगतो, जर कोणी कुठल्या गोष्टीत जबाबदार असेल, जर कुणी वेडेवाकडे प्रकार केले असतील, विकासाची कामं करताना कुणी कुणाला खंडणी मागितली तर मी मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही. मी टोकाची भूमिका घेईन. असं अजित पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जनतेचा पैसा सत्कारणी लागलाच पाहिजे. त्या ठिकाणी कोणतीही गडबड होता कामा नये. जिल्ह्यासाठी केंद्राचा निधी कसा जास्त आणता येईल, यासाठी प्रयत्न आम्ही करणार आहे. मी पहिल्यांदाच पालकमंत्री या नात्याने बीड जिल्ह्यामध्ये आलो आहे. असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

… तर मकोका लावणार, अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या समोर दिला इशारा Read More »

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरातील सर्व भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. मंदिर प्रशासनाच्या मते, मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन नियमानुसार, लहान किंवा फाटलेले कपडे घालून मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. सर्व भाविकांनी सभ्य आणि पारंपारिक कपडे घालून मंदिरात यावे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 30 जानेवारीपासून मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी हा नवीन ड्रेस कोड नियम लागू होईल. या नवीन व्यवस्थेनुसार, स्कर्ट, फाटलेले कपडे आणि उघडे कपडे घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबत माध्यमांना माहिती देताना सांगितले की, मुंबईत असलेले सिद्धिविनायक मंदिर हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील सनातनी आणि गणेश भक्तांसाठी एक प्रमुख श्रद्धेचे केंद्र आहे. लाखो लोक येथे दर्शनासाठी येतात आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु, जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात तेव्हा तेथे काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणाचे पावित्र्य राखले जाईल. आचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या काही भाविकांच्या पोशाखाबद्दल अनेक भाविकांनी चिंता व्यक्त केली होती, ज्यांचे कपडे योग्य नव्हते. हे लक्षात घेऊन, सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की दर्शनासाठी येणाऱ्यांना चांगले कपडे घालावे लागतील. हा राजकारणाचा विषय नाही. हा धार्मिक आणि श्रद्धेशी संबंधित विषय आहे. जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा ते सहसा स्नान करून आणि चांगले आणि सभ्य कपडे घालून जातात. आम्हाला फक्त एवढेच हवे आहे की मंदिरात येणाऱ्या भाविकांनी याचे पालन करावे. अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागूआचार्य पवन त्रिपाठी पुढे म्हणाले की, देशभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड आधीच लागू आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांना या नियमांची आधीच माहिती आहे. आम्हाला खात्री आहे की कालांतराने, सिद्धिविनायक मंदिरातही लोक हळूहळू या नियमांचे पालन करू लागतील. सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, ‘या’ ड्रेसमध्ये प्रवेश नाही, जाणून घ्या नवीन नियम Read More »

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाचा आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 25 जानेवारी 2025 पासून जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र तरीही सरकारच्यावतीने कोणीही जरांगे पाटील यांच्याकडे चर्चेसाठी आले नसल्याने जर जरांगे पाटील यांना काही झालं तर सरकारची जबाबदारी असणार असल्याचा निवेदन आज अखंड मराठा समाज अ.नगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संघर्षयोद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासह इतर मराठा सेवक हे शनिवार दि. 25.01.2025 रोजी पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठा समाजाच्या अन्य काही मागण्यांसाठी अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे सामुहिक आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस उपोषण कर्त्यांची प्रकृती चिंताजनक होत चाललेली आहे. सरकार जाणीवपूर्वक या उपोषणाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण अद्यापपर्यंत सरकारच्यावतीने कोणीही मा. मनोज दादा जरांगे यांच्याशी चर्चेसाठी गेलेले नाही. आम्ही या निवदेनाद्वारे सूचित करतो की समाजाच्या संयमाचा बांध सुटत चाललेला आहे. तेंव्हा आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेवून सरकार व शासनाच्या वतीने शिष्टमंडळ अथवा प्रतिनिधी पाठवून चर्चा करून मा. मनोज दादा जरांगे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही ती सरकारची जबाबदारी असेल. असं या निवेदनात म्हटले आहे.

Manoj Jarange Patil : … तर सरकारची जबाबदारी असणार, अखंड मराठा समाजाचा इशारा Read More »

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू

Stampede In Mahakumbh: प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानासाठी लाखो भाविक संगम घाटावर जमले होते मात्र अचानक चेंगराचेंगरीची घटना घडल्याने 17 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने आतापर्यंत 17 मृत्यूंची पुष्टी केली आहे. अपघातानंतर लगेचच डझनभर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि मृतांचे मृतदेह तेथून नेण्यात आले. जखमी भाविकांना मेळ्याच्या परिसरात बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवकीनंदन ठाकूर काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल आध्यात्मिक गुरू देवकीनंदन ठाकूर म्हणाले, “मी संगम घाटावर गेलो नाही कारण तिथे खूप गर्दी आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी फक्त संगम घाटावर स्नान करण्याचा आग्रह धरू नये. सध्या संपूर्ण गंगा आणि यमुना नद्या ‘अमृत’ आहेत, जर तुम्ही कुठेही स्नान केले तर तुम्हाला तेवढेच पुण्य मिळेल. स्वामी रामभद्राचार्य काय म्हणाले?चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, “मी सर्व भाविकांना आवाहन करतो की आज प्रयागराजमध्ये मोठी गर्दी आहे, म्हणून त्यांनी केवळ संगम घाटावर पवित्र स्नान करण्याचा आग्रह धरू नये. त्यांनी आता त्यांचा छावणी सोडून स्वतःची सुरक्षितता शोधू नये.” साध्वी निरंजन ज्योती काय म्हणाल्या?महाकुंभ परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या परिस्थितीबद्दल साध्वी निरंजन ज्योती म्हणाल्या, “ही एक दुःखद घटना आहे. जे काही झाले ते बरोबर नव्हते. जनहित लक्षात घेऊन, आखाडा परिषदेने त्यांचे अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जमलेल्या भाविकांची संख्या अंदाजापेक्षा जास्त आहे. मी लोकांना आवाहन करते की संपूर्ण जत्रा परिसर कुंभमेळा आहे, म्हणून ते केवळ त्रिवेणी घाटावरच नव्हे तर कोणत्याही घाटावर स्नान करू शकतात. आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीतअखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, “घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्यासोबत हजारो भाविक होते… जनहितासाठी, आम्ही ठरवले की आज आखाडे स्नानात सहभागी होणार नाहीत. मी लोकांना आजच्याऐवजी वसंत पंचमीला स्नान करण्यासाठी येण्याचे आवाहन करतो.”

Stampede In Mahakumbh : मोठी बातमी! महाकुंभ चेंगराचेंगरी 17 लोकांचा मृत्यू Read More »

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय?

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार मनोज जरांगे पाटलांवर अखेर उपचार सुरु करण्यात आले आहेत जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. काल रात्री भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेऊन सलाईन लावा आणि उपचार घ्या अशी विनंती केली होती. उपचार घेतल्यास आपल्याला चर्चा करता येईल असं धस जरांगे यांना म्हणाले होते त्यांनतर आज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. उपस्थित मराठा आंदोलकांनी जरांगे यांना उपचार घेण्यास भाग पाडलंय त्यामुळे जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान आज जरांगे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सातव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंवर उपचार सुरू, आज घेणार मोठा निर्णय? Read More »

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्…

Baba Siddique : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणात मोठा आणि धक्कादायक खुलासा माजी आमदार आणि बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे आहे, असे झिशान सिद्दीकी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. “मोहित कंबोज यांचे डायरीत शेवटचे नाव असून त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास व्हॉटसॲपवर चॅटिंग केले होते. वडिलांनी त्यांचे नाव डायरीत का लिहले, हे मी सांगू शकत नाही. परंतु या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे,” असं माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी म्हंटले आहे. याच बरोबर झिशान सिद्दीकी यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचाही उल्लेख केला आहे. परब यांनी ज्ञानेश्वर नगर प्रकल्पबाधितांची बैठक घेतली. बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल असे वचन दिले होते. असं झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हंटले आहे. झिशान सिद्दीकी यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर बाब सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट येणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Baba Siddique : धक्कादायक खुलासा, बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं भाजपच्या बड्या नेत्याचं नाव, WhatsApp चॅटिंग अन्… Read More »

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा

Uniform Civil Code : उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू होणार आहे. देशात समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड बनणार आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केले जाईल. हे राज्याबाहेर राहणाऱ्या रहिवाशांना देखील लागू होईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, यूसीसी धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभाव न करता सुसंवादी समाजाचा पाया रचेल. यामुळे सर्व लोकांना समान अधिकार मिळतील. कोणाविरुद्धही भेदभाव केला जाणार नाही. आम्ही आमचे वचन पूर्ण करत आहोत. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली. जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे हे याचे एक उदाहरण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मजबूत उभा आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री धामी यांनी पुष्टी केली होती की जानेवारी 2025 पासून उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू केला जाईल. यापूर्वी, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले होते की सरकार यूसीसी लागू करण्यास वचनबद्ध आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले गृहपाठ पूर्ण झाला आहेधामी म्हणाले होते की राज्य सरकारने त्यांचे “गृहपाठ” पूर्ण केले आहे. जानेवारी 2025 पासून राज्यभरात यूसीसी लागू करण्याची तयारी करण्यात आली आहे. ते म्हणाले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायदा आणण्याचे आश्वासन राज्यातील जनतेला दिले होते. सरकार स्थापन केल्यानंतर आम्ही त्यावर प्राधान्याने काम केले. युसीसीचा मसुदा तयार होते. पण एक कायदा आणला गेला. आता आम्ही सोमवारी ती वचनबद्धता पूर्णपणे आणि औपचारिकपणे पूर्ण करणार आहोत.” “हे पंतप्रधानांच्या एकसंध भारत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल जिथे कोणत्याही धर्म, लिंग, जात किंवा समुदायाविरुद्ध कोणताही भेदभाव केला जाणार नाही,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Uniform Civil Code : मोठी बातमी! आजपासून उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा Read More »

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले

Vijay Wadettiwar : महामंडळाने मोठा निर्णय घेत एसटी भाडेवाढ केले आहे.त्यामुळे आता सरकारवर चारही बाजूने विरोधक जोरदार टीका करताना दिसत आहे. यात आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्री अजितपवार यांचा विरोध आहे तर एसटीभाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी आणि जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. याच बरोबर दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर या परिवहन खात्याला वाली कोण असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घेतली पाहिजे. मंत्र्यांनी तसे आदेश काढले पाहिजे. दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी? मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी दरवाढ विरोध आहे तर दरवाढ मागे घ्यावी आणि दरवाढ मंत्र्यांनी केली नाही तर हे खाते चालवते कोण? अधिकारी जर खाते चालवतात, हा पोरखेळ आहे. सरकारमध्ये गंमत जंमत सुरू आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. हा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल तर मग त्यांच्यावर कारवाई करणार का? अंगलट आला की अधिकाऱ्यांनी केलं आणि चांगल काही झालं की श्रेय घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे. असा टोला देखील यावेळी राज्य सरकारला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला.

Vijay Wadettiwar : दरवाढीचा निर्णय मंत्री घेत नाही तर परिवहन खात्या वाली कोण? वडेट्टीवार सरकारवर भडकले Read More »

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील सातव्यांदा उपोषणाला बसले आहे. तर यावेळी त्यांच्यासोबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गोरख दळवी देखील उपोषणाला बसले आहे. गोरख दळवी यांनी नगर शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आतापर्यंत अनेकदा उपोषण केले आहे. तसेच अनेकदा नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले आहे. याच बरोबर गोरख दळवी यांनी मराठा आरक्षणासाठी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक वेळा आंदोलन देखील केले आहे. तर आता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे या मागणी करिता अंतरवाली सराटी येते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करत आहे. राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे.आंदोलनाच्या वेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणी करिता मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे  अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

Manoj Jarange Patil :  आरक्षण द्या…,  अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांसह गोरख दळवी यांचे उपोषण सुरू Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त

Walmik Karad : वाल्मिक कराड याच्यावर आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होत आहे आणि यातूनच मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचेही बोलले जात आहे. पण सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत पुन्हा एकदा भर पडली आहे. याला कारण आहे त्याची संपत्ती. मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड, त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर राज्यात विविध ठिकाणी संपत्ती असल्याची माहिती समोर आली होती. साधा घरगडी असणाऱ्या वाल्मिक कराड कडे इतकी संपत्ती कुठून आणि कशी आली? याचे कोडे अजूनही उलगडले नाही. पण आता वाल्मिक कराडची ही सर्व संपत्ती एसआयटीने जप्त करण्याची तयारी सुरु केली असून त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात एसआयटीकडून अर्ज देखील दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. त्याचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे बोलले जात आहे. हा वाल्मिक कराडसाठी खूप मोठा धक्का ठरु शकतो. याआधी सीआयडीने कराडची संपत्ती परदेशात असल्याचा संशय व्यक्त केला होता. अशातच आता एसआयटीने कराडच्या संपत्तीची पाळेमुळे खणायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळते.

Walmik Karad : वाल्मिक कराडला मोठा धक्का! करोडो रुपयांची संपत्ती एसआयटी करणार जप्त Read More »