DNA मराठी

राजकीय

midc

Maharashtra News- एमआयडीसीचा कोट्यावधी रुपयांचं वर्षीला नुकसान जबाबदार कोण, कोणते अधिकारी खाताय मलिदा?

Maharashtra News: एमआयडीसी (MIDC) मध्ये जवळपास 40% भाग भाडेकरूंनी व्यापलेला आहे, आणि त्यातील एक मोठा भाग विनापरवाना भाडेकरू आहेत. एमआयडीसीच्या नियमांनुसार, भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेसाठी एमआयडीसी कार्यालयाला 3% महसूल मिळावा, तर बेकायदेशीर विनापरवाना प्लॉट भाड्याने दिल्यास 8% दंड वसूल करता येणे शक्य आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन करून विनापरवाना भाडेकरूंना जागा दिल्या जात आहेत, आणि एमआयडीसीला यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. स्थानिक अधिकारी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे एमआयडीसीला मागील अनेक वर्षांपासून प्रतिवर्षी कोट्यावधी रुपयांचा फटका बसत आहे. या गंभीर प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे आणि योग्य चौकशी करून कारवाई करणे आता आवश्यक झाले आहे. *अधिकारींचे दुर्लक्ष की संगनमत?*स्थानिक अधिकारी आणि संबंधित विभाग या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा संशय आहे. जर नियमांची योग्य अंमलबजावणी झाली असती, तर एमआयडीसीला दरवर्षी कोट्यवधींचा महसूल मिळू शकला असता. हे दुर्लक्ष इतर कोणत्याही कारणामुळे होत असेल, तरी यामध्ये भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात खालील पावले उचलली जाऊ शकतात: चौकशी आयोगाची नियुक्तीएमआयडीसीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा, ज्यामुळे या गैरप्रकाराची सखोल तपासणी होऊ शकेल. दंड आकारणेविनापरवाना भाडेकरूंवर आणि त्यांना जागा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंड आकारण्यात यावा ज्यामुळे एमआयडीसीचे नुकसान भरून निघेल. नियमांची अंमलबजावणीएमआयडीसीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे, ज्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळता येतील. जनजागृतीस्थानिक लोकांमध्ये जनजागृती करणे, ज्यामुळे ते अशा गैरप्रकारांबद्दल माहिती देऊ शकतील आणि योग्य तक्रार दाखल करू शकतील. मुख्य मथितार्थ: तपशीलवार विश्लेषण: 1. नियमांचे उघड उल्लंघन 2. अधिकाऱ्यांचे ‘जाणीवपूर्वक दुर्लक्ष’ 3. भ्रष्टाचाराच्या छायेत संस्थेची विश्वासार्हता चौकशी आणि कारवाईची मागणी: शेवटची ओळ: “अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे MIDC च्या नियमांची धज्जी उडाली आहे. आता वेळ आली आहे की, या गंभीर प्रश्नावर सरकार कडक कारवाई करेल आणि राज्याच्या हिताचे रक्षण करेल.” या पावलांमुळे एमआयडीसीच्या (MIDC) नियमांचे पालन करण्यात मदत होईल आणि भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार टाळता येतील. त्याचबरोबर, एमआयडीसीला होणारे आर्थिक नुकसान थांबवण्यात मदत होईल.

Maharashtra News- एमआयडीसीचा कोट्यावधी रुपयांचं वर्षीला नुकसान जबाबदार कोण, कोणते अधिकारी खाताय मलिदा? Read More »

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे

Maharashtra Politics: आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे. स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या देदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांची जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे Read More »

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी

Vijay Wadettiwar : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे देण्यात आला आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली. परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशीही टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिस मारहाणीत, पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवर यांची मागणी Read More »

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil: विधानसभेत विरोधी पक्षाच्या 293 अन्वये प्रस्तावावर चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना लगावला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, आधुनिक पद्धतीने शेती करणारे राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे या आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शिवारात कायमच पाण्याची चणचण होती ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन एक आंदोलन उभारले होते. ओवर फ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून पाणी सोडावे अशी त्यांची मागणी होती. तसे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु मार्च महिना उजाडला तरीही मागणी मान्य न झाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. हे अतिशय दुर्दैवी आहे. असं जयंत पाटील म्हणाले. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1883 मध्ये “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहिले त्याकाळी फुलेंनी मांडलेल्या समस्या आजही कायम आहेत कारण शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यकर्ते कमी पडत आहेत. सातत्याने तोट्याची शेती आणि त्यातून होणारी आर्थिक कुचंबना हे आत्महत्यांचे मूळ कारण आहे. मागच्या वर्षभरात मराठवाडा आणि विदर्भात सुमारे 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. योग्य सिंचन व्यवस्था नाही, वीज पुरवठा नाही, जीएसटीचा अतिरिक्त भार त्यात सावकारी बेहिशोबी कर्जाचा पाश यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सत्ता आल्या गेल्या मात्र शेतकऱ्यांना न्याय अद्याप मिळालेला नाही. असेही जयंत पाटील म्हणाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आज ज्यांनी खऱ्या अर्थाने ही मुंबई घडवली त्यांना मुंबईत राहण्याची भ्रांती करावी लागते. कारण त्यांच्या घरांवर परप्रांतीयांचा डोळा आहे. मुंबईत 200-300 अमराठी विकासक आहेत. त्या तुलनेत मराठी विकासक फार कमी आहे. हे परप्रांतीय विकासक सहाव्या मजल्यावर बसूऊ मुंबईतील इंच न इंच जमिनीची सौदेबाजी करतात. काही एस आर ए प्रकल्प 15 वर्षांपासून प्रलंबित आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोकांची गैरसोय झाली आहे. विकासकांनी त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जाणून-बुजून प्रकल्प प्रलंबित ठेवणाऱ्या विकासकांवर कारवाई का होत नाही? त्यांच्यावर फौजदारी होणे दाखल होणे गरजेचे आहे. काळा चौकीत राहणाऱ्या प्रणय बोडके या युवकाला चुकीच्या मार्गाने येणाऱ्या शिवशाही बसने चिरडले, त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्याच्या पत्नीच्या पदरी दीड वर्षाचे मूल आहे. या कुटुंबाला नुकसान भरपाई झालीच पाहिजे. भारताला मोठ्या ऐतिहासिक परंपरा आहे. तंत्रज्ञानाचा वारसा आहे. आपली अवस्था वाईट का झाली? तर आपण शिक्षणाचा प्रसार केला नाही, विज्ञान चमत्काराला जोडलं, देवाकडून दैवाकडे गेलो, श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेचे पारडे जड झाले. कर्मकांडांना महत्व दिलं. जातिभेद सोबतीला घेतले. यामुळे समाजाची वैचारिक क्षमता कमी झाली. याचा परिणाम म्हणून मुठभर परकीय आक्रमणांनी आपल्यावर सत्ता गाजवली. स्वातंत्र्यानंतर गोष्टी बदलल्या. मात्र आता जग तिथे अवकाशात पोहोचलेलं असताना आपण इथे कबरीच्या मागे लागलो आहेत. हे दुर्दैव आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. असं यावेळी जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil: आपण एका कबरीच्या मागे लागलो, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल Read More »

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले

Sujay Vikhe: अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्ह्यांच्या प्रमाणामुळे समाजातील सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, अल्पवयीन मुलांनी गुन्हा केल्यानंतर ते लगेच कोर्टाच्या बाहेर पडतात, ज्यामुळे कायद्यातील वयाची अट कमी करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास 50 टक्के आरोपी अल्पवयीन असतात. 16 किंवा 17 वर्षाचा मुलगा खूनासारखा गंभीर गुन्हा करूनही कायद्याच्या वयाच्या अटींमुळे सुटतो. या प्रकारच्या घटनांमुळे समाजातील सुरक्षिततेची भावना खालावत आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे कायद्यातील वयाची अट. सध्याच्या कायद्यानुसार, 18 वर्षाखालील मुलांना अल्पवयीन मानले जाते आणि त्यांच्यावर सामान्य कायद्याची कारवाई लागू होत नाही. यामुळे अनेकदा अल्पवयीन गुन्हेगारांना शिक्षा न मिळाल्याने ते पुन्हा गुन्हा करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. माजी खासदार विखे यांच्या मते, अल्पवयीन मुलांना योग्य मार्गदर्शन आणि शिक्षण देऊन त्यांना गुन्ह्याकडे वळण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तसेच, कायद्यातील वयाची अट कमी करून अल्पवयीन गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळाली पाहिजे.

अल्पवयीन गुन्हेगारांचा वाढता प्रमाण, कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज, ; सुजय विखे स्पष्टच बोलले Read More »

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी

Nitesh Rane : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तापले असून, यावरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या याचिकेत दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यात आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही आरोपांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंच्या अटकेची आणि चौकशीची मागणी केली आहे. नितेश राणेंचा सवाल: लपवालपवी का?नितेश राणे यांनी या प्रकरणावरून ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “ही फार सोपी आणि सरळ केस आहे. जर ही आत्महत्येचीच घटना होती, तर मग ८ जून २०२० पासून आतापर्यंत इतकी पळापळ का सुरू आहे? लपवालपवी का चालली आहे? आदित्य ठाकरेंना यातून का वाचवावे लागते आहे? जर त्यांचा काहीच संबंध नसेल, तर मग त्यांची एवढी धडपड का दिसते?” त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टाच्या एका निकालाचा हवाला देत म्हटले, “सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की, बलात्काराचा आरोप असेल, तर सर्वप्रथम त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी. त्याच नियमानुसार, आदित्य ठाकरेंवर केस दाखल करून त्यांना अटक करावी आणि चौकशी करावी. ज्या न्यायाची अपेक्षा इतरांना असते, तोच न्याय ठाकरेंनाही लागू करावा.” याचिकेतील गंभीर आरोपदिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यासह इतरांवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप केला आहे. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर मालवणी पोलिसांनी चुकीचे अहवाल तयार करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामागे ठाकरे गटाचा दबाव होता. या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) स्वतंत्र तपासाची मागणीही करण्यात आली आहे. या आरोपांमुळे ठाकरे गटावर प्रचंड दबाव आला असून, भाजपने हा मुद्दा पकडून राजकीय हल्ला तीव्र केला आहे. नितेश राणेंचा ठाकरे गटावर पलटवारशिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून भाजपवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, “संजय राऊत आणि ठाकरे गटाला सत्य समोर येण्याची भीती वाटते. त्यामुळे ते असली आक्षेप घेत आहेत. पण आता कायदा आपले काम करेल. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणालाही विशेष सवलत मिळता कामा नये.” राणे यांनी या प्रकरणाला निवडणूक काळातील राजकारणाशी जोडले जाण्याच्या शक्यतेलाही फेटाळून लावले आणि हे प्रकरण “निव्वळ सत्य आणि न्यायासाठी” असल्याचा दावा केला. राजकीय घडामोडींना वेगया प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदे गट यांना ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटावर या आरोपांचे खंडन करण्याचे आणि आपली प्रतिमा सांभाळण्याचे आव्हान आहे. नितेश राणे यांनी यापूर्वीही दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर अनेकदा आरोप केले आहेत आणि आता या याचिकेमुळे त्यांचा हल्ला आणखी तीव्र झाला आहे. त्यांनी या प्रकरणात ठाकरे गटाच्या तत्कालीन सरकारवरही पुरावे दडपण्याचा आरोप केला आहे. न्यायालयाचा निर्णय आणि पुढील दिशामुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका आज (२० मार्च) सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे. या याचिकेतून ठाकरे गटाच्या नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आल्याने न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितेश राणे यांनी या प्रकरणात तातडीने कारवाईची मागणी केली असून, “आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न का होतो आहे, हे जनतेला कळले पाहिजे,” असेही ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणला आहे. नितेश राणे यांच्या आक्रमक मागणीमुळे आणि याचिकेतील गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता न्यायालयीन आणि राजकीय लढाईचे नवे केंद्र बनले आहे. ठाकरे गट या आरोपांचे खंडन कसे करणार आणि भाजप याचा राजकीय लाभ कसा उठवणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल. दरम्यान, या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, जनतेच्या नजरा आता न्यायालयाच्या निर्णयावर खिळल्या आहेत.

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा, मंत्री नितेश राणेंची मागणी Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही

Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या विविध चर्चा होत आहेत, परंतु त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर, बेरोजगारीवर आणि शहरी भागातील मुद्द्यांवर चर्चा होत नाही असा आरोप केला जात आहे. या प्रकारच्या चर्चांमुळे समाजाला काहीही घेणं-देणं नाही असे मत व्यक्त केले जात आहे. राजकारणी राजकारण करत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विधानसभेतील चर्चा ही राजकीय भूमिकांवर आधारित असताना, त्यातून समाजाच्या मुख्य प्रश्नांवर योग्य ती चर्चा होत नाही हे एक मोठे चिंताजनक विषय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाईचा फैलाव, बेरोजगारीची वाढ आणि शहरी भागातील सुविधांचा अभाव या मुद्द्यांवर योग्य ती चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये निराशा पसरत आहे.”राजकारणी फक्त राजकारण करतात, त्यांना समाजाच्या खर्या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही,” असे एका नागरिकाने सांगितले. “आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नावर, महागाईवर आणि बेरोजगारीवर चर्चा करण्याची अपेक्षा करतो. परंतु त्याऐवजी राजकीय भांडणे होत आहेत,” त्यांनी नमूद केले.महत्त्व आणि परिणामया प्रकारच्या चर्चांचा परिणाम म्हणजे नागरिकांमध्ये राजकीय प्रक्रियांबद्दल निराशा निर्माण होत आहे. राजकीय नेत्यांनी समाजाच्या मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मत व्यक्त केले जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, महागाईवर आणि बेरोजगारीवर योग्य ती चर्चा झाल्यास समाजातील मुख्य समस्या सोडवल्या जाऊ शकतात. संदर्भ महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या विधानसभेच्या अधिवेशनातील चर्चांवर केंद्रित आहे. या अधिवेशनात राजकीय भांडणांवर जास्त भर दिला जात असल्याचे दिसत आहे. परंतु, समाजाच्या मुख्य प्रश्नांवर चर्चा न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. या प्रश्नांवर तातडीने लक्ष दिले पाहिजे असे विचार मांडले जात आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू पण शेतकरी, बेरोजगारी अन् महागाईवर चर्चाच नाही Read More »

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा

Disha Salian Death Case : दिशा सालियन, जी सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती, तिच्या मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाल्या आहेत. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथे तिचा मृत्यू झाला होता, ज्याला पोलिसांनी आत्महत्या म्हटले होते. मात्र, आता तिच्या वडिलांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात या सर्व आरोपांना अफवा म्हटले होते. मात्र, आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्या मुलीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली आणि डिनो मोरिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचीही मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनीही दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी”. पोलिसांची भूमिकामुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुराव्यांच्या अभावामुळे बंद केला होता. मात्र, आता दिशाच्या वडिलांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पोलिसांनी आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यांची दिशाभूल केली”. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू झाला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वाढत आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची चर्चा सुरू आहे.

मग ते पत्र कुणाचे? दिशा सालियन प्रकरणात, सतीश सालियन यांचा धक्कादायक दावा Read More »

भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे, गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

Pradeep Purohit : उठ सूट कुणीही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवरायांचा अवमान आणि बदनामी करत आहे. भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे आहे. अशी टीका संतोष शिंदे, प्रवक्ता संभाजी ब्रिगेड यांनी केली आहे. तसेच भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील माध्यमांशी बोलताना संतोष शिंदे यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते अशा पद्धतीचं संसदेच्या सभागृहात वक्तव्य करणे हे अत्यंत निषेधार्य आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना फक्त स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते. असं संतोष शिंदे म्हणाले. तर भाजपच्या खासदाराचं दुर्दैवी आणि आक्षेपार्ह वक्तव्य हे प्रशांत कोरटकर सारख्या शिवद्रोहींना पाठबळ देणार आहे. असेही यावेळी ते म्हणाले. तर औरंग्याच्या कबरीवर आग पकड करणारे सत्ताधारी मंत्री राणे आणि त्यांच्या लोकांनी पुरोहित प्रकरणावर तोंड उघडावे असा आव्हान देखील त्यांनी यावेळी नितेश राणे यांना दिला. सरकार जाणीवपूर्वक अजूनही प्रशांत कोरटकरला पकडत नाही. कारण तो भाजपचा माणूस आहे. या सगळ्यांचा ठरवून प्लान केला जात आहे. यापुढे तमाम शिवप्रेमींना मनुवादी यांचा हा कुटील डाव उध्वस्त करावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी शिवद्रोह्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. काय म्हणाले होते प्रदीप पुरोहित?देशाला एक शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. माझ्या बारगढ मतदारसंघात गिरीजा बाबा नावाचे एक संत राहतात. त्यांनी मला एक दिवस बोलताना सांगितलं की देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्वजन्म हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा होता. त्यांचा दुसरा जन्म मोदी आहे. त्यामुळे या देशाला जगात सर्वात शक्तिशाली राष्ट्र करण्याच्या हेतूने ते काम करत आहेत.

भाजपचेच सगळे वाचाळवीर शिवरायांचा अवमान करण्यात पुढे, गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेडची मागणी Read More »

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar : भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केला आहे. यावेळी त्यांनी भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रात राखेची किंमत 600-660 रुपये असताना फक्त 353 रुपये टन राख विकण्यात आली असा दावा त्यांनी केला आहे. विधान सभेत प्रश्नोत्तराच्या काळात राखेच्या विक्रीत घोटाळा झाल्याचे प्रकरण वडेट्टीवार यांनी मांडले. भुसावळ येथील राख विक्रीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असताना अर्धी राख मोजमाप न होता विकली गेली. इथे ठरवून भ्रष्टाचार करण्यात आला. यातूनच वाल्मीक कराड सारखे लोक तयार होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे. राख विक्रीत जो भ्रष्टाचार झाला त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राख विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. राख विक्री प्रकरणी जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या विक्रीत गैरव्यवहार, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप Read More »