DNA मराठी

राजकीय

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

Acharya Satyendra Das Death: अयोध्येच्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी सकाळी निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 85 वर्षीय महंत सत्येंद्र दास यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) च्या न्यूरोलॉजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर अयोध्येतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु नंतर त्यांना चांगल्या उपचारांसाठी एसजीपीजीआय येथे रेफर करण्यात आले. आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया साइट X वर पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले- भगवान रामाचे परम भक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली! आम्ही भगवान श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि त्यांच्या शोकाकुल शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी. ओम शांती!

Acharya Satyendra Das Death: मोठी बातमी! अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन Read More »

Ajit Pawar: नगरच्या विकासासाठी जास्त निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

Ajit Pawar: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 अंतर्गत प्रारुप आराखडा अंतिम करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर नियतव्ययापेक्षा अधिकचा निधी देण्यात येईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. बैठकीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिवाजीराव गर्जे, आमदार किरण लहामटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा, नगरचे पालक सचिव प्रवीण दराडे आणि नगर जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शासनाने निश्चित करून दिलेल्या बाबींवर निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. त्यासोबतच पुढील वर्षापासून दिव्यांग कल्याणासाठी 1 टक्का निधी राखीव ठेवण्याच्या सूचना निर्गमित करण्यात येणार आहे. यावर्षी मार्च अखेरपर्यंत 100 टक्के निधी होईल याचे नियोजन करण्यात यावे. नगरने नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उभारलेल्या कांदा क्लस्टरची माहिती घेवून अजित पवार म्हणाले, जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. राजगुरूनगर भागात 9 महिने टिकणारे कांद्याचे वाण उपयोगात आणले जात आहे. असे चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. अकोले, श्रीगोंदा आणि कर्जत येथे उद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, जिल्हा दुग्धोत्पादनात राज्यात अग्रेसर आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही या क्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. राहता तालुक्यात पशुखाद्य युनिट स्थापीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात क्लस्टरच्या माध्यमातून लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अकोले तालुक्यात पर्यटनावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी जिल्ह्यासाठी कमाल आर्थिक मर्यादेपेक्षा महत्वाच्या योजनांसाठी 150 कोटींचा निधी अधिक मिळावा अशी मागणी केली. पशुवैद्यकीय दवाखाने, दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रम, वन क्षेत्रामध्ये मृद व जलसंधारणाची कामे, वन पर्यटन विकास, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान, अपारंपरिक ऊर्जा विकास, ग्रामीण रस्ते विकस व मजबुतीकरण, जिल्हा परिषद शाळांची इमारत व वर्गखोल्यांचे बांधकाम, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजीटल शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे बांधकाम व दुरूस्ती, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींसाठी जमीन संपादन व बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना यंत्रसामुग्री पुरविणे, रुग्णालयांसाठी औषधे व साहित्य खरेदी आणि किमान कौशल्य विकास कार्यक्रमासाठी हा निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस मुंबई येथून जिल्हा नियेाजन अधिकारी दीपक दातीर तर जिल्हाधिकारी कार्यालयातून विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Ajit Pawar: नगरच्या विकासासाठी जास्त निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही Read More »

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला

Suresh Dhas: मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये असा टोला भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना लावला आहे. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुठलाही भेदभाव केला नाही.या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून मी स्वतः मुख्यमंत्र्यांनाही बोललो पाच लाखाची मदत दहा लाखाची करून दिली. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, महादेव मुंडे प्रकरणात माझी भूमिका एकच आहे. असं सुरेश धस म्हणाले. तसेच माझ्यासोबत दलित बांधव असतात, मला कळवळा दाखवायची गरज नाही. माझ्या मतदारसंघातला 95 टक्के दलित बांधव माझ्यासोबत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये. आव्हाड साहेब तुम्ही एकदा तरी सूर्यवंशी कुटुंबीयांशी संपर्क केला का? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे माझ्या भगिनी आहेत त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही.  सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यावर मी काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. असेही धस म्हणाले. परळी सोडून गेलेले व्यापारी बोलायला घाबरत आहेत. पंकजा मुंडेंना माझी  विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष राखेवर द्या.परळीत द्या गायरान जमिनी हडप केले आहेत तिथे द्या. असेही या पत्रकार परिषदेत सुरेश धस म्हणाले.

Suresh Dhas : जितेंद्र आव्हाड यांनी दुसऱ्याला शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत जाऊ नये, सुरेश धसांचा टोला Read More »

Election Commission: देशाला ‘या’ दिवशी मिळणार नवा मुख्य निवडणूक आयुक्त, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Election Commission : लवकरच देशाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळणार आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत असल्याने 19 फेब्रुवारी रोजी देशाला नवीन मुख्य निवडणूक आयुक्त मिळणार आहे. 1988 च्या तुकडीतील ज्ञानेश कुमार हे पुढील नवे मुख्य निवडणूक आयुक्त होण्याची अपेक्षा आहे. तथापि, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू हे दोघेही 1988 च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. दोघांचीही नावे 14 मार्च 2024 रोजी निश्चित करण्यात आली. गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी अनुप चंद्र पांडे यांच्या निवृत्तीनंतर आणि त्यानंतर 9 मार्च रोजी दुसरे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या अचानक राजीनामा दिल्यानंतर आयोगाच्या दोन्ही निवडणूक आयुक्तांची पदे रिक्त झाली होती. भारतीय निवडणूक आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे की, दोन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये जो कोणी वरिष्ठ असेल. पुढील मुख्य निवडणूक आयुक्तपदासाठी ते प्रबळ दावेदार असतील. त्यापैकी विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार सीनियर यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, पुढील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असतील अशी अपेक्षा आहे. परंतु पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला केंद्रीय कायदा मंत्री आणि दोन केंद्रीय सचिवांचा समावेश असलेल्या समितीने प्रस्तावित केलेल्या पाच नावांव्यतिरिक्त सीईसीसाठी नाव निवडण्याचा अधिकार आहे. निवड समितीने नाव निश्चित केल्यानंतर, राष्ट्रपती अंतिम मान्यता देतात. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाते. निवडणूक आयोगाची व्यवस्था काय आहे?भारतीय निवडणूक आयोगाच्या सध्याच्या व्यवस्थेत, आयोगाच्या शीर्ष तीन पदांमध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. नवीन कायद्यानुसार, शोध समितीचे नेतृत्व आता कॅबिनेट सचिवांऐवजी कायदा मंत्री करतील. ज्यामध्ये दोन केंद्रीय सचिव आहेत. कायदा मंत्री आणि दोन केंद्रीय सचिवांचा समावेश असलेली शोध समिती पाच नावे निवडते आणि ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय निवड समितीकडे सादर करते. तीन सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि त्यात एक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते असतात. नवीन कायद्यानंतर आयोगात मुख्य निवडणूक आयुक्तांची ही पहिलीच नियुक्ती असेल. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतही काम केले आहे. त्यावेळी ते केंद्रीय गृह मंत्रालयात काश्मीर विभागाचे प्रभारी होते. जेव्हा केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून संविधानातील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अयोध्या प्रकरणात गृह मंत्रालयाच्या डेस्कचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. 2022 मध्ये ते सहकार मंत्रालयाचे सचिव होते.

Election Commission: देशाला ‘या’ दिवशी मिळणार नवा मुख्य निवडणूक आयुक्त, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Read More »

Delhi Election Results: ‘आप’च्या 15 उमेदवारांनी फोन केला होता अन्…, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

Delhi Election Results: नुकतंच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत 26 वर्षांनंतर सरकार स्थापन करणार आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे धक्कादायक दावा केला आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की त्यांना आम आदमी पक्षाच्या 15 उमेदवारांचा फोन आला होता, त्यांनी भाजपच्या मतांचे विभाजन व्हावे म्हणून दिल्लीत शिवसेनेचा उमेदवार उभा करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला. एकनाथ शिंदे यांनी का नकार दिला?दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आम आदमी पक्षाच्या 15 उमेदवारांनी त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मागितले होते, परंतु त्यांनी “युती धर्मा”मुळे नकार दिला, असा दावा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला. शिंदे काय म्हणाले?शिंदे म्हणाले, “आपच्या एकूण 15 उमेदवारांनी माझ्याशी संपर्क साधला होता. जर त्यांना ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह मिळाले तर मते भाजप आणि शिवसेनेत विभागली जातील, ज्यामुळे इतर पक्षांना फायदा होईल, असे मला वाटले. म्हणून मी नकार दिला. मी माझ्या खासदारांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करण्यास सांगितले होते.” दिल्ली निवडणुकीत काय घडले?दिल्लीतील 70 विधानसभा जागांपैकी भारतीय जनता पक्षाने (भाजप) 48 जागा जिंकल्या तर आम आदमी पक्षाला (आप) फक्त 22 जागा जिंकता आल्या. त्याच वेळी, काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा एकही जागा जिंकता आली नाही. 2020 च्या निवडणुकीत ‘आप’ने 62 जागा जिंकल्या होत्या आणि 2015 मध्ये 67 जागा जिंकल्या होत्या.

Delhi Election Results: ‘आप’च्या 15 उमेदवारांनी फोन केला होता अन्…, एकनाथ शिंदेंचा मोठा दावा Read More »

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू

Pune News : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्ष चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी 3 सदस्यांचा सहभाग असलेल्या 20 समिती स्थापन केल्या असून दिनांक 6 आणि 7 फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या 20 समिती 8 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.   सर्व 20 समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल.

Pune News: महिला आयोगाच्या निर्देशानुसार आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू Read More »

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही

Maharashtra Government : राज्य सरकारने मोठा निर्णय घेत औद्योगिक जमिनीचा वापर करावयाचा असल्यास त्यासाठी बिगरशेती (NA) परवानगी आवश्यक असणार नसल्याची घोषणा केली आहे. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या व्यापार सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जमीनधारकांना औद्योगिक वापरासाठी मानीव अकृषिक वापराची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यासाठी लागणारा वेळ हा जमीन एनए करण्यासाठी लागणाऱ्या वेळेएवढाच आहे, हे शासनाच्या निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जमिनीचा उद्योगासाठी वापर करावयाचा असल्यास परवानगीची तरतूद रद्द होण्यासाठी काही काळाचा अवधी लागणार असल्याने तोपर्यंतच्या कालावधीत एखाद्याला जमीन उद्योगासाठी वापरायची असल्यास त्यालाही एनए परवानगी घेणे आवश्यक नाही. त्यासाठी या उद्योग घटकाने सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी (Development permission) घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर करून घेतल्यानंतर त्याची नोंद करण्यासाठी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे (तलाठी) जावे. त्यानंतर त्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने लवकरात लवकर ती नोंद त्याच्या दप्तरात करावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. औद्योगिक जमिनीसाठी एनएची आवश्यकता असणार नाही. तसेच, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! आता औद्योगिक जमीन वापरासाठी NA परवानगी आवश्यक नाही Read More »

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा

Rohit Pawar: दोन दिवसापूर्वी 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगर शहरात पार पडली. मात्र या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत सामन्यात आणि अंतिम सामन्यात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपांत्य फेरीत सामन्यात शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराजमोहोळ यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात राक्षे पराभूत झाले मात्र त्यांनी पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेत निर्णय अमान्य केला. तर अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. तर दुसरीकडे या स्पर्धेवर आणि आयोजकांवर सोशल मीडियासह अनेक नेते मंडळी टीका करताना दिसत आहे. कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी देखील जोरदार टीका करत आयोजकांवर निशाणा साधला आहे. स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठीवादाचं ‘मोहोळ’ उठलेली अहिल्यानगरमधील कालची कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी होती की नेत्यांसाठी, असा प्रश्न निर्माण होतो. या स्पर्धेतील काही नियम अजब-गजबच होते, अनेक मल्लांना संधीही मिळाली नाही, शिवाय माजी महाराष्ट्र केसरी पैलवानांना कोणताही मानसन्मान न मिळाल्याने त्यांना अवमान सहन करावा लागला. केवळ राजकीय नेत्यांचीच या स्पर्धेवर छाप असल्याने या नेत्यांसाठी अनेक कुस्त्यांच्या वेळाही बदलल्या. एकूणच काय तर ही स्पर्धा कुस्तीची आणि पैलवानांनी चेष्टा करणारी होती. कुस्तीतील पारदर्शकता, आदरभाव, निष्पक्षपणा आणि खिलाडू वृत्तीच काल ‘चितपट’ झाल्याचं चित्र दुर्दैवाने अवघ्या महाराष्ट्राला उघड्या डोळ्यांनी बघावं लागलं. म्हणूनच पैलवानांना न्याय देणारी खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’ अन्यायाला थारा न देणाऱ्या माझ्या मतदारसंघात कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीत घेण्याचं नियोजन आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखालील ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे’ने परवानगी दिली तर पुढील महिन्यातच मार्चअखेर ‘महाराष्ट्र केसरी’चा कर्जत-जामखेडच्या भूमीत भव्य असा आखाडा भरवण्यात येईल आणि ही स्पर्धा ‘कुणालातरी जिंकवण्यासाठी’ नसेल तर या स्पर्धेत गुणवत्तेवर जिंकणाऱ्या पैलवानालाच मानाची गदा मिळेल, याची खात्री देतो. असं रोहीत पवार यांनी ट्विट करत आयोजकांवर टीका केली आहे.

Rohit Pawar: कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी की नेत्यांसाठी…, रोहित पवारांचा आयोजकांवर निशाणा Read More »

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार

Maharashtra Government: महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त करणार असून प्रत्येक ठिकाणी 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीचे अध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. आजच्या सुधारित जीआरमुळे आतापर्यंत पदावर असलेल्या विशेष कार्यकारी अधिकारीचे पद तात्काळ प्रभावाने नाहीसे होणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद नसणार नाही. तर त्यांना 13 ते 14 विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक 1000 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक 500 मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहे. लवकरच प्रत्येक जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार अनेक शासकीय विषयात समावेशअनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय 25 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 पेक्षा कमी असावे. प्रमाणपत्र देण्याचा अधिकारशासकीय योजनांसाठी ज्या काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल. सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. काय म्हणाले बावनकुळे?सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. 33 टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल.

सरकारचा मोठा निर्णय, एक लाख 94 हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार Read More »

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले

Jitendra Awhad : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतल्याबद्दल एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने केलेला दावा गेल्या काही दिवासांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. आग्रा येथून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. या दाव्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांच्या या दाव्यावर संताप व्यक्त करत हल्लबोल केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय.” असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे. इतकेच नाही तर आव्हाडांनी छत्रपती शिवरायांची उंची कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला आहे. आव्हाड यांनी या पोस्टमध्ये पुढे म्हंटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे”. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे, हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल”, असा इशाराही आव्हाडांनी पोस्टमध्ये दिला आहे. दरम्यान राहुल सोलापूरकर यांच्या विधानावर सोशल मीडियावर अनेक जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. चक्क लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आले. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती असेही ते म्हणाले. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले होते. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो. असं या मुलाखतीमध्ये अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले.

Jitendra Awhad : राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? ‘त्या’ प्रकरणात जितेंद्र आव्हाड भडकले Read More »