DNA मराठी

राजकीय

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट

Anmol Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. तर आता त्याला भारतात आण्याची तयारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने त्याला गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियातून ताब्यात घेतले होते. इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एफबीआयच्या नवी दिल्लीतील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. यावेळी अनमोल बिश्नोईचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. अनमोल बिश्नोई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी वॉन्टेड आहे. एनआयए आणि मुंबई पोलीस बऱ्याच दिवसांपासून अनमोल बिश्नोईचा शोध घेत होते. एनआयएने अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीसही ठेवले आहे. एफबीआय आणि भारतीय अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठकइंडियन एक्स्प्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत एफबीआय आणि भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये 45 मिनिटे बैठक झाली. यामध्ये त्याच्यावरील खटले आणि पुराव्यावर चर्चा करण्यात आली. यादरम्यान अनमोलचा बाबा सिद्दीकी हत्याकांडातील कथित सहभाग आणि सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारावरही चर्चा झाली. अनमोलचे एक प्रवासी कागदपत्र बनावट असल्याचे यूएस इमिग्रेशन विभागाला आढळून आल्याचेही सूत्रांनी सांगितले. अनमोल 15 मे 2022 रोजी भानू नावाच्या व्यक्तीच्या नावाने बनावट पासपोर्ट मिळवून अमेरिकेत पळून गेला होता, परंतु अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाला त्याच्या प्रवासाशी संलग्न असलेल्या एका कंपनीचे संदर्भ पत्र आढळून आल्याने त्याचा पर्दाफाश झाला. कागदपत्रे बनावट होती. अमनोल बिश्नोई कॅनडात राहतातअनमोल कॅनडामध्ये राहणारा असून तो नियमितपणे अमेरिकेत जात असल्याचे समजते. तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे. तुरुंगात असूनही लॉरेन्सवर जागतिक गुन्हेगारी टोळी चालवल्याचा आरोप आहे. सूत्रांनी अनमोलच्या ताब्यात घेण्याबाबत अधिक माहिती दिली नाही. सूत्रांनी सांगितले की, अनमोल अनेक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाव असलेल्या अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाबाबत केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना अनमोल बिश्नोईच्या त्यांच्या देशात उपस्थितीची माहिती दिल्यानंतर हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले होते.

Anmol Bishnoi ला भारतात आणण्याची तयारी, FBI -भारतीय अधिकाऱ्यांची भेट Read More »

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला. आज संध्याकाळी 6 ला प्रचाराच्या तोफा थंड देखील होणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबई आयोजित एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी नीती आयोगाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महत्त्व कमी करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा दावा केला. यावेळी उद्धव म्हणाले की, सत्तेत आल्यास महाविकास आघाडी (MVA) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि MMRDA यांच्यात झालेला सामंजस्य करार रद्द करेल, कारण BMC चे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करत असेल तर ते एमएमआरडीए विसर्जित करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ते म्हणाले, “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र केवळ चर्चा नाही तर एक गंभीर संकट आहे. हे षडयंत्र खरे आहे, परंतु आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. ते म्हणाले की एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफ यांनी सप्टेंबरमध्ये एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करार केला होता. एमएमआर विकासावरील NITI आयोगाच्या अहवालानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमीन अदानी समुहाच्या ताब्यात देणाऱ्या महायुती सरकारची धोरणे संपुष्टात आणण्याचा एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला निर्णय असेल, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ते ‘विकासविरोधी नसून विनाशविरोधी’ आहेत. त्यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले गेले (जून 2022 मध्ये) आणि शिवसेनेत फूट पडली कारण त्यांनी महाराष्ट्राची लूट होऊ दिली नाही. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल Read More »

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे 

Monika Rajale : ताजनापुर योजनेवर चर्चा सुरु केली की समजून जायचे निवडणूक आली आहे. निवडणूक प्रचारात गावासाठी काय दिले, काय करणार हे न सांगता, जातीपातीचे राजकारण सुरु करायचे. त्यांच्याकडे विकासकामांचे मुद्दे नसल्याने, विकासाच्या मुद्द्याला बगल द्यायची, दहा वर्षात तालुका मागे पडला म्हणायचा, जर तुम्ही दहा वर्षात मतदारसंघात फिरले असते तर विकास कामे दिसली असती. तुमच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.    आमदार राजळे यांनी तालुक्यातील ठाकूर निमगाव, कुरुडगाव रावतळे, वरुर, भगुर, आव्हाणे, दिंडेवाडी, बऱ्हाणपुर, मळेगाव, भातकुडगाव, आखतवाडे, आपेगाव, गरडवाडी, ढोर जळगाव, सामानगाव, लोळेगाव आदी गावातील नागरिकांशी संवाद साधला. वरुर येथे झालेल्या कार्यक्रमात दिनकर अंचवले महाराज, भिमराव फुंदे, सचिन म्हस्के, भानुदास सोनटक्के, मारुती लव्हाट, विठ्ठल झिरपे, केशव म्हस्के, गणपत शिंदे, संजय देवडकर, संजय मोरे, बाबासाहेब धायतडक, प्रकाश म्हस्के, भागवत झिरपे, भाऊसाहेब वावरे, किसन म्हस्के, संजय मोरे, दीपक भुसारी, बापुनाना पिसोटे, रवींद्र वायकर, आशाताई गरड, मारुती खांबट, गणेश म्हस्के, अंबिका लव्हाट, अजिंक्य लव्हाट, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे बोलतांना राजळे म्हणाल्या, कारखान्याला मदत हवी होती, त्यावेळी अजितदादांच्या गटात आले. दिडशे कोटी रुपये निधी मिळाला, लगेच पलटी मारली. त्यांनी देखील यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले, त्यांच्या कार्यकाळात बसस्थानक, शहर पाणी योजना, ताजनापुर योजना, रस्ते, आदी प्रश्न होते. इतक्या वर्षापासून महिलांचे पाण्यासाठीचे सुरु असलेले हाल त्यांना दिसले नाहीत. मी महिला असल्याने त्यांचे दुःख वेदना मला जाणवल्या त्यामुळे प्राधान्याने पाणी प्रश्नावर पाठपुरावा करुन पाणी प्रश्न मार्गी लावला. बसस्थानक, विविध रस्त्यांचे कामे मार्गी लावली. त्यावेळी त्यांना हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणीही अडवले नव्हते. प्रत्येक गावात किमान एक कोटी निधी देऊन विविध प्रश्न मार्गी लावले. क्वचित एखाद्या गावाला कोटी पेक्षा कमी निधी मिळाला असेल. पण भेदभाव न करता जनतेचे हित लक्षात घेऊन कामे केल्याचे आमदार मोनिका राजळे म्हणाल्या.

Monika Rajale : विरोधकांच्या खोट्या प्रचाराला नागरिक थारा देणार नाही – मोनिका राजळे  Read More »

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

Sanjay Raut On PM Modi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या शेवटच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर आता या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (ठाकरे गट) यांनी प्रत्युत्तर दिला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,महाराष्ट्रातील जनतेचा पंतप्रधानांच्या वक्तव्यावर विश्वास नाही. ही महाविकास आघाडी आहे. महाराष्ट्रात आम्ही तिघे एकत्र आहोत आणि तुमच्यापेक्षा सुरक्षित आहोत. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या टिप्पणीवर त्यांनी पलटवार केला आणि रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात आहे हे जनता ठरवेल असे म्हटले. मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल काँग्रेसकडे सोपवला आहे. त्याचा संदर्भ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे होता. त्यावर संजय राऊत म्हणाले की, शिवसेना फोडून तुम्ही जो वेगळा गट स्थापन केला आहे, त्याचे नियंत्रण तुमच्या हातात असेल, मात्र आम्ही आमचा रिमोट कंट्रोल भाजपकडे सोपवला नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदी संतापले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीतसंजय राऊत म्हणाले, जोपर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, मी यापूर्वीही म्हटले आहे की 23 नोव्हेंबरनंतर कोणतीही महाआघाडी होणार नाही कारण मुख्यमंत्री नसतील. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार नाही. त्यांना विरोधी पक्षनेतेपदही दिले जाणार नाही, कारण भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत केले आहे. राऊत म्हणाले, निवडणुकीनंतर आम्ही सरकार स्थापन करत आहोत. महायुतीला बहुमत मिळणार नाही. काय म्हणाले पीएम मोदी?गुरुवारी जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, मुंबई हे स्वाभिमानी शहर आहे, मात्र महाविकास आघाडीत समाविष्ट असलेल्या एका पक्षाने आपला रिमोट कंट्रोल बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करणाऱ्यांच्या हाती दिला आहे. मोदी म्हणाले, म्हणून मी त्यांना आव्हान दिले की, त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे गुणगान काँग्रेसला करावे. आजपर्यंत या लोकांना बाळासाहेबांची स्तुती करायला काँग्रेस आणि त्यांचे राजपुत्र जमले नाही. काँग्रेस सत्तेसाठी हतबल असून हा पक्ष पाण्याविना माशासारखा आहे, असे ते म्हणाले.

Sanjay Raut On PM Modi : ‘आम्ही आमचा रिमोट कंट्रोल दिला नाही, म्हणून…’ PM मोदींना संजय राऊतांचे प्रत्युत्तर Read More »

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

Asaduddin Owaisi : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने देखील 16 जागांवर उमेदवार दिले आहे. 13 नोव्हेंबर रोजी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी सोलापूरमध्ये फारुख शा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत असताना सोलापूर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. नोटीसमध्ये काय होते?नोटीसमध्ये पोलिसांनी ओवेसी यांना कोणत्याही समाजाच्या भावना दुखावू नयेत आणि त्यांच्या भाषणात भडकाऊ शब्द वापरू नयेत असे निर्देश दिले आहेत. ओवेसींनी नोटीस स्वीकारून आपल्या भाषणात याचा उल्लेख करत पोलिसांकडून देण्यात आलेल्या नोटीस मध्ये स्पेलिंग मिस्टेक असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती नोटीस बजावले असं सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीवर जोरदार निशाणा साधला. याच बरोबर त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी फारुख शाब्दी यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

Asaduddin Owaisi : सोलापुरात ओवेसींचा भाषण अन् भर मंचावर पोलिसांनी बजावली नोटीस, जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय? Read More »

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ahmednagar Election: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी मतदारांना मतदान करता यावे यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विधानसभा निवडणुकीत कामगारांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. आस्थापनांना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी-कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी किंवा व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. याबाबत तक्रार असल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, मुलजी निवास, डॉ. चोंभे हॉस्पिटल, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर (दूरध्वनी क्र. ०२४१-२४५१८५२) येथे करावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त रे.मु.भिसले यांनी केले आहे.

Ahmednagar Election: नगरकरांनो, मतदानाचा टक्का वाढवा, सार्वजनिक सुट्टी जाहीर Read More »

Sunil Tingre : पॉर्श प्रकरणात अडकलेल्या सुनील टिंगरेंना मोठा धक्क, रेखा टिंगरे यांची भाजपला सोडचिठ्ठी

Sunil Tingre : विधानसभा निवडणुकीच्या काळात पॉर्श प्रकरणात अडकलेल्या आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला आहे. आज वडगाव शेरीतील भाजपच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला आहे. माहितीनुसार, माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पठारे हे देखील यावेळी उपस्थित होते. या प्रवेशाने आमदार सुनील टिंगरे यांना मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. आधीच अडचणीत सापडलेले आमदार सुनील टिंगरे या प्रवेशानंतर आणखी बॅकफूटवर आले आहे. राज्यात यावेळी हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये काही मुख्य लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे.

Sunil Tingre : पॉर्श प्रकरणात अडकलेल्या सुनील टिंगरेंना मोठा धक्क, रेखा टिंगरे यांची भाजपला सोडचिठ्ठी Read More »

Donald Trump Cabinet : डोनाल्ड ट्रम्प मंत्रिमंडळात थेट इलॉन मस्कची एन्ट्री, विवेक रामास्वामीवरही मोठी जबाबदारी

Donald Trump Cabinet : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प जानेवारी 2025 पासून त्यांच्या कार्यकाळासाठी मंत्रिमंडळाची घोषणा करत आहे. या मंत्रिमंडळात ट्रम्प यांनी अब्जाधीश एलोन मस्क आणि उद्योगपतीतून राजकारणी झालेले विवेक रामास्वामी यांचा देखील समावेश केला आहे. ट्रम्प यांनी इलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्याकडे सरकारी कार्यक्षमता विभागाची जबाबदारी सोपवली आहे. सरकारी कार्यकुशलता विभागाचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कामकाजात सुधारणा करणे, नोकरशाही कमी करणे आणि फेडरल एजन्सीची रचना बदलणे हे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केलीमंगळवारी जारी केलेल्या निवेदनात, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले की विवेक रामास्वामी आणि एलोन मस्क हे सरकारच्या कार्यक्षमतेचे (डीओजीई) विभागाचे नेतृत्व करतील, ज्यांचे काम जास्तीचे नियम कमी करणे आणि फालतू खर्च कमी करणे हे असेल. ट्रम्प म्हणाले की, ‘हे दोन अमेरिकन एकत्रितपणे माझ्या प्रशासनाला सरकारी नोकरशाही मोडून काढण्याचा मार्ग दाखवतील, अनावश्यक नियमावली कमी करतील आणि फेडरल एजन्सींची पुनर्रचना करतील – अमेरिका वाचवा चळवळीसाठी आवश्यक आहे.’ सरकारी पैशाचा अपव्यय कमी होईलनिवडून आलेले अध्यक्ष म्हणाले, ‘मी ऍलन आणि विवेक फेडरल नोकरशाहीमध्ये बदल करतील याची मी अपेक्षा करतो ज्यामुळे सर्व अमेरिकन लोकांचे जीवन सुधारून कार्यक्षमता वाढेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आम्ही आमच्या $6.5 ट्रिलियन वार्षिक सरकारी खर्चाला त्रास देणारा प्रचंड कचरा आणि फसवणूक दूर करू. इलॉन मस्क नियुक्तीवर काय म्हणाले?आपल्या नियुक्तीबद्दल उत्साह व्यक्त करताना, एलोन मस्क यांनी DoGE हे अमेरिकेतील सरकारी कामकाजात सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून वर्णन केले. मस्क यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले की, ‘सरकारी कार्यक्षमता विभाग. यामुळे सरकारी पैशांची उधळपट्टी करणाऱ्यांना थेट मेसेज जाईल. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान, इलॉन मस्क यांनी अंदाज वर्तवला होता की ते यूएस फेडरल बजेटमधून किमान $2 ट्रिलियन कपात करू शकतात, जे काँग्रेस संरक्षणासह सरकारी एजन्सी ऑपरेशन्सवर दरवर्षी खर्च करते.

Donald Trump Cabinet : डोनाल्ड ट्रम्प मंत्रिमंडळात थेट इलॉन मस्कची एन्ट्री, विवेक रामास्वामीवरही मोठी जबाबदारी Read More »

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली

Sharad Pawar: राज्यात विधानसभेसाठी बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) देखील जोरदार प्रचार करत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवला विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचा पराभव करण्याचे आवाहन नागरिकांना केले. या सभेत बोलताना शरद पवार यांनी 2019 च्या निवडणुकीत “चुकीचा उमेदवार” दिल्याबद्दल जनतेची माफी मागितली. तसेच भुजबळांचा पराभव करा असा भावनिक आवाहन देखील यावेळी त्यांनी केला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी मोठा खुलासा करत म्हणाले की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा भुजबळ यांनी अजित पवारांशी चर्चा करतो असं सागितलं होत मात्र त्यानंतर भुजबळच त्या गटात गेले असं शरद पवार म्हणाले. तसेच आम्ही त्यांना विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची पदे दिली. मात्र तरीही देखील त्यांनी सर्व मर्यादा ओलांडून विश्वासघात केला. असं देखील शरद पवार म्हणाले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, भुजबळ विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवले आणि विरोधी पक्षनेतेही केले. ते म्हणाले की, मी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा भुजबळांना पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष केले. येवल्यातून त्यांना रिंगणात उतरवून सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्रीपद देण्याची चूक मी केली. शरद पवार म्हणाले की, भुजबळांनी काही चुका केल्या आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, मात्र स्वत: सुधारण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांना पुन्हा सरकारमध्ये घेण्यात आले. “जेव्हा भुजबळांवर काही आरोप झाल्यानंतर त्यांना तुरुंगात जावे लागले तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांना महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये पदही दिले,” असेही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar: जनतेची माफी अन् छगन भुजबळांवर हल्लाबोल, येवल्यात शरद पवारांनी सभा गाजवली Read More »