DNA मराठी

ताज्या बातम्या

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू

Pankaj Asia : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला. डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

Pankaj Asia : नूतन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया रुजू Read More »

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक

Stock Market Scam: शेवगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना बारा तासाच्या आता अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख सिताराम वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपणी क्लासिक ब्रीज वर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कंपनीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक करण्यात आली असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करत असताना पोलीस निरीक्षक समाधान नागरे, शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुन्ह्यातील आरोपी संदीप मधुकर थोरात (वय-35 रा.पाईपलाईन रोड अहिल्यानगर, दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय-35 रा.घोगरगाव ता.श्रीगोंदा जि.अहील्यानगर) यांची गुप्त माहीती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांचे पथके तयार करून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोपी संदीप मधुकर थोरात याला त्याचे रहाते घरी जात असताना अटक केली तर आरोपी दिलीप तात्याभाऊ कोरडे याला सुपा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वरील आरोपी विरुध्द इतर कोणीही व्यथीत अगर बळीत अशा जनतेची फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोस्टेला बिनधास्तपणे संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी पोलिसांनी केले आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक Read More »

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय

Maharashtra News : शेतकऱ्यांनी आकारी पड जमिनीच्या चालू वर्षाच्या प्रचलित बाजारमूल्याच्या प्रस्तावित २५ टक्के रक्कम ऐवजी ५ टक्के रक्कम शासनास जमा केल्यास, हस्तांतरणास निर्बंध या अटीवर ही जमीन त्यांना परत करण्यात येईल. याचा लाभ राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतूदीत सुधारणा करण्याबाबतचे विधेयक विधीमंडळाच्या कनिष्ठ सभागृहात मान्यतेसाठी आज सादर करण्यात आले. तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येतात. राज्यात अशा ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षांच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे. तथापि, १२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. ही तरतूद बदलण्यात येणार आहे. या सुधारणेमुळे आकारीपडची कार्यवाही तातडीने होऊन शासनाकडे जमा झालेल्या एकूण १०९३ आकारीपड प्रकरणांत साधारण ४ हजार ८४९.७१ एकर क्षेत्र आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना माफक दरात परत मिळणार आहेत. आकारीपड जमिनी म्हणजे काय?शेतजमीन मालकांनी शेतसारा भरला नाही, पिके घेतली नाहीत, अशा जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारने मालकी हक्क लावला. मात्र, या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवण्यात आल्या. त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली, तरी या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारीपड जमीन म्हटले जाते. पड जमिनींचा तपशील कलम २२० अन्वये कारवाई झालेली एकूण प्रकरणेकोकण विभाग : ३१पुणे विभाग: ५९७नाशिक विभाग: ४६५ सरकारचा ताबा असलेली प्रकरणेकोकण विभाग :१७पुणे विभाग: ६९नाशिक विभाग: ४४ माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाल्याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात निर्णय घेतल्यावर आज कायद्यात सुधारणा करणे शक्य झाले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. असं यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना आकारी पड जमिनी परत मिळणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय Read More »

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक

Satyajeet Tambe : संगमनेर तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र, जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे यांनी विरोध केला असून हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी सभागृहात केली आहे. आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करणे सोयीचे नसून, अनेक गावांतील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. या कार्यालयाला जोडण्यात येणाऱ्या गावातील नागरिकांना शहर ओलांडून पुढे 20-25 किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्वी बुद्रुकला जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जाणार असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावाला सभागृहात तीव्र विरोध केला आहे. “जनतेची कोणतीही मागणी नसताना महसूल विभागाने हा प्रस्ताव प्रस्तावित करणे, हे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे. प्रस्तावावर नागरिकांची नाराजीसंगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “प्रशासनाने जनतेच्या सोयीसुविधांचा विचार न करता हा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Satyajeet Tambe : नवीन अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव रद्द करा, सत्यजीत तांबे आक्रमक Read More »

Rahul Gandhi : ‘धारावीतून काँग्रेसला संजीवनी देणार राहुल गांधी, राजकीय समीकरण बदलणार?

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या मुंबई आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहे. राहुल गांधी धारावीत भेट देणार आहे. त्यांच्या या भेटीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राहुल गांधी धारावीत काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. या भेटीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस तयारी सुरू करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक असलेली धारावी सध्या तिच्या पुनर्विकास प्रकल्पामुळे चर्चेत आहे. येथील स्थानिक लोक सरकारच्या योजनेवर नाराज आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी थेट तिथे पोहोचले आणि लोकांच्या समस्या ऐकल्या आणि आपली उपस्थिती नोंदवली. काँग्रेस याकडे लोकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहे. निवडणुकीवर काँग्रेसचा डोळामुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या तयारीत काँग्रेस पूर्णपणे गुंतली आहे. बीएमसी ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, ज्याचे वार्षिक बजेट सुमारे 60,000 कोटी रुपये आहे. काँग्रेसला या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करायची आहे. यावेळी पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवू शकतो. बीएमसीमध्ये 227 जागा आहेत ज्यासाठी निवडणुका होणार आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 84, भाजपने 82, काँग्रेसने 31 आणि राष्ट्रवादीने 9 जागा जिंकल्या होत्या. यावेळी निवडणूक समीकरणे बदलू शकतात, कारण शिवसेना आणि भाजप आता वेगवेगळ्या मार्गांवर आहेत. तर दुसरीकडे गुजरातमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न राहुल गांधी 7 मार्च रोजी अहमदाबादला रवाना होतील, जिथे ते गुजरात काँग्रेस नेत्यांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतील. गेल्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती कमकुवत होती, त्यामुळे या भेटीला पुन्हा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मानले जात आहे. काँग्रेसला काय फायदा होईल?राहुल गांधींच्या या भेटीमुळे काँग्रेसला किती बळ मिळेल हे येणारा काळच सांगेल, परंतु पक्षाने प्रत्येक पातळीवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे हे स्पष्ट आहे. मुंबईतील धारावीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून आणि गुजरातमधील कार्यकर्त्यांना भेटून राहुल गांधी यांनी संघटनेला नवा उत्साह देण्याचा प्रयत्न केला आहे. आता या दौऱ्याचा काँग्रेसच्या निवडणूक निकालांवर किती परिणाम होतो हे पाहावे लागेल.

Rahul Gandhi : ‘धारावीतून काँग्रेसला संजीवनी देणार राहुल गांधी, राजकीय समीकरण बदलणार? Read More »

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी होणार डॉ. पंकज आशिया, राज्य सरकारची घोषणा

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पंकज आशिया सिद्धाराम सालीमठ यांची जागा घेणार आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धाराम सालीमठ यांची साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. तेव्हापासून नगरची जागा रिक्त होती. आता राज्य सरकारने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. याच बरोबर राज्य सरकारने आणखी 7 आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. गेल्या महिन्यात देखील राज्य सरकारे 21 पेक्षा जास्त आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. ज्यामध्ये सिद्धाराम सालीमठ यांच्या देखील नावाचा समावेश होता. तर आता पुन्हा एकदा राज्य सरकारने 8 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.

Maharashtra News: अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी होणार डॉ. पंकज आशिया, राज्य सरकारची घोषणा Read More »

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना

NZ vs SA: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 9 मार्च रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार आहे. लाहोर येथे झालेल्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे लक्ष्य होते, परंतु आफ्रिकेची फलंदाजी अपयशी ठरली आणि त्यांना 50 षटकांत 9 विकेट्स गमावून फक्त 312 धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा ‘चोकर्स’ असल्याचे सिद्ध झाले. डेव्हिड मिलरने शतक (100) केले असले तरी ते संघाचा पराभव रोखू शकले नाही. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना भारताशी होईल, जो रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजीत सुरुवात खराब झाली. पाचव्या षटकात त्याने रायन रिकेलटन (17) कडून आपली विकेट गमावली. ही विकेट मायकेल ब्रेसवेलने मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर घेतली. यानंतर, कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाची सूत्रे हाती घेतली. या दोघांमध्ये 105 धावांची भागीदारी झाली. बावुमाने 56 धावा केल्या पण मिशेल सँटनरने त्याला बाद केले. मात्र त्यानंतर इतर फलंदाजांना काही खास करता आले नाही.

NZ vs SA: दक्षिण आफ्रिकेला धक्का देत न्यूझीलंडची फायनलमध्ये धडक, भारताशी होणार सामना Read More »

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते!

Bhaskar Jadhav : 03 मार्चपासून महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात विरोधकांनी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेना नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. विरोधकांकडून विरोधीपक्ष नेतेसाठी पुरेशी संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या पदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा होती मात्र आता या पदावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची निवड करण्यात येणार आहे. तर विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेसाठी काँग्रेस दावा करणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गट विधानसभा सदस्यांची बैठक पार पाडली. याबैठकीत विरोधी पक्ष नेता ठरवण्याचा पूर्ण अधिकार आमदारांनी ठाकरे यांना दिले होते. त्याप्रमाणे आज ठाकरे शिवसेनेतून विधानसभा अध्यक्षांना भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कोण आहे भास्कर जाधव?भास्कर जाधव यांनी राजकीय कारकीर्दीची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत एंट्री केली. जाधव सहा वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधिमंडळ कामकाजाचा प्रदिर्घ अनुभव त्याना आहे. 2009 ते 2014 कालावधीत ते राज्यमंत्री पद भूषविले होते. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या आक्रमकतेचा फायदा पक्षाला होऊ शकतो. शिवसेना फुटीनंतर  झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे शिवसेनेला कोकणात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. कोकणात सर्व जागा ठाकरे शिवसेनाच्या हातून गेल्यानंतर गुहागर मधील जागा भास्कर जाधव यांच्या माध्यमातून आपल्यकडे राखण्यात ठाकरे शिवसेनेला यश आले आहे. उद्धव ठाकरे यांची खेळीकोकण विभागातून एकमेव निवडून आलेल्या भास्कर जाधव यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद देऊन ठाकरे शिवसेना नवीन डाव टाकला आहे. कोकणात शिंदे शिवसेनेला शह देणे,आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणत कोकणी मतदार आहे, त्यातल्या त्यात पूर्व मुंबईत कोकणी मतदार  आपल्यकडे वाळविण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी उचललेले पाऊल बोलले जात आहे.

उद्धव ठाकरेंचा मास्टरस्टोक अन् शिंदेंना इशारा, भास्कर जाधव होणार विरोधी पक्षनेते! Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिंदे शिवसेनेचे मुंबईत आंदोलन

Dhananjay Munde: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड याला फाशी द्या, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केले. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद आज मुंबईत उमटले. शिवसेनेने वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी केली.   शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे शिवसेना महिला आघाडीकडून वाल्मिक कराडविरोधात आंदोलन करण्यात आले. वाल्मिक कराडच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे. व्हायरल झालेल्या फोटोंमधून या हत्याकांडाची भीषणता दिसून आली. अशा गोष्टी महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाण आहे. वाल्मिक कराडला केवळ शिक्षा होऊन चालणार नाही. आरोपींना फाशी झालीच पाहिजे, ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे. यासाठी राज्यभरात शिवसेना रान उठवेल, असे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या.

वाल्मिक कराडला फाशी द्या, शिंदे शिवसेनेचे मुंबईत आंदोलन Read More »