DNA मराठी

ताज्या बातम्या

rahul gandhi

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप

Rahul Gandhi: लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. राहुल गांधी घेतलेल्या या पत्रकार परिषदेत हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतांची चोरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकामध्ये मत चोरीचा आरोप केला होता. तर आता त्यांनी हरियाणामध्ये तब्बल 25 लाख मतांची चोरी झाली असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एका तरुणीचा फोटो दाखवत या तरुणीने 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप केला. राहुल गांधी म्हणाले की, या तरुणीने कधी सीमा नावाने तर कधी सरस्वती नावाने 22 मते टाकली. राहुल गांधींनी विचारले की, हरियाणाच्या मतदार यादीत ही ब्राझिलियन महिला काय करत आहे. हरियाणातील पाच श्रेणींमध्ये 25 लाख मते चोरीला गेली. त्यांनी श्रेणीनिहाय आकडेवारीही दिली आणि सांगितले की, 5 लाख 21 हजारांहून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले आहेत. हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत. 25 लाख मते चोरीला गेली म्हणजे दर आठ मतदारांपैकी एक बनावट होता. त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi यांनी फोडला ‘हायड्रोजन बॉम्ब’, हरियाणात 25 लाख व्होट चोरीचा आरोप Read More »

crime

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला…

Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका आयटी क्षेत्रातील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे. ‘दैवी शक्ती अंगात येते’ या नावाखाली या भोंदू जोडीने अभियंता आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व मानसिकपणे मोठी फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा बळी ठरलेले अभियंता दीपक डोळस हे काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली आजारपणाने त्रस्त असल्याने त्यांनी उपचारासाठी अनेक ठिकाणी धावपळ केली. त्याच काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपुरकर यांच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज आमच्यात अवतरतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात’ असा दावा करत डोळस कुटुंबाचा विश्वास संपादन केला. वेदिका हिने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा आभास निर्माण केला. त्यानंतर त्यांनी डोळस यांना सांगितले की, पूजा करून आणि धन ‘दैवी शक्ती’साठी वापरल्यास त्यांच्या मुलींचे आजार दूर होतील. या बहाण्याने दोघांनी डोळस दांपत्याकडील सर्व बँक ठेवी आणि बचत निधी आपल्या खात्यात वळवून घेतला. एवढ्यावर न थांबता, डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात जमा करण्यात आले. तरीही मुलींच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने डोळस यांनी कारण विचारले असता, खडके-पंढरपुरकर जोडीने त्यांच्या घरात ‘दोष’ असल्याचे सांगून आणखी पैसे मागितले. त्यांनी पुण्यातील मालमत्ता विकण्यास सांगितले, आणि जेव्हा काहीच उरले नाही, तेव्हा घरावर आणि वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडले. 2018 पासून सुरू असलेल्या या फसवणुकीतून या भोंदू जोडीने एकूण 14 कोटी रुपये डोळस यांच्याकडून घेतले. पोलिस तपासात समोर आले आहे की, या पैशातून दोघांनी कोथरुडमधील महात्मा सोसायटी परिसरात एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या घटनेनंतर डोळस कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, सध्या पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेल्या अशा आर्थिक फसवणुकीने पुन्हा एकदा समाजात जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे.

Pune Crime: धक्कादायक, अंधश्रद्धेच्या जाळ्यात आयटी अभियंता अडकला; भोंदूनी 14 कोटींचा गंडा घातला… Read More »

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त

Maharashtra Election : जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी उपरोक्त आदेश जारी केले असून, या नेमणुका शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार केल्या आहेत. निवडणुकांचे कामकाज पार पाडण्यासाठी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नियुक्त अधिकारी निवडणुकीदरम्यान शासकीय मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणार आहेत. जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती भारती सागरे (उपजिल्हाधिकारी) असतील. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश सावंत (तहसीलदार, कोपरगाव) व सुहास जगताप (मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपरिषद) यांची नेमणूक करण्यात आली आहे. संगमनेर नगरपरिषदेकरिता अरुण ऊंडे (उपविभागीय अधिकारी, संगमनेर) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून धीरज मांजरे (तहसीलदार, संगमनेर) व श्रीमती धनश्री पवार (मुख्याधिकारी, अकोले नगरपंचायत) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील (उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर) असतील, तर सहायक अधिकारी म्हणून मिलींदकुमार वाघ (तहसीलदार, श्रीरामपूर) व मच्छिंद्र घोलप (मुख्याधिकारी, श्रीरामपूर नगरपरिषद) कार्यभार सांभाळतील. जामखेड नगरपरिषदेकरिता नितिन पाटील (उपविभागीय अधिकारी, कर्जत-जामखेड) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून अजय साळवे (मुख्याधिकारी, जामखेड नगरपरिषद) व मच्छिंद्र पाडळे (नायब तहसीलदार, जामखेड) यांची नेमणूक करण्यात आली आहे. शेवगाव नगरपरिषदेकरिता प्रसाद मते (उपविभागीय अधिकारी, पाथर्डी-शेवगाव) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी म्हणून आकाश दहाडदे (तहसीलदार, शेवगाव) व श्रीमती विजया घाडगे (मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद) यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय, पाथर्डी नगरपरिषदेकरिता सुभाष दळवी (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून उध्दव नाईक (तहसीलदार पाथर्डी) व दिग्विजय पाटील (नायब तहसीलदार, पाथर्डी) कार्यभार पाहतील. राहाता नगरपरिषदेकरिता मनिषा राशीनकर (उपजिल्हाधिकारी) यांच्यासह सहायक अधिकारी अमोल मोरे (तहसीलदार, राहाता) व वैभव लोंढे (मुख्याधिकारी, राहाता नगरपरिषद) असतील. राहुरी नगरपरिषदेकरिता अनुपसिंह यादव (उपजिल्हाधिकारी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी नामदेव पाटील (तहसीलदार, राहुरी) व सोपान बाचकर (नायब तहसीलदार,राहुरी) नेमले गेले आहेत. देवळाली प्रवरा नगरपरिषदेकरिता श्रीमती गौरी सावंत (उपजिल्हाधिकारी) यांची निवड झाली असून सहायक अधिकारी म्हणून ऋषिकेश पाटील (मुख्याधिकारी, देवळाली प्रवरा नगरपरिषद) व डी.पी. शेकटकर (नायब तहसीलदार श्रीरामपूर) असतील. नेवासा नगरपंचायतीकरिता सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर- नेवासा) यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक झाली असून सहायक अधिकारी संजय बिरादार (तहसीलदार, नेवासा) व निखिल फराटे (मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत) असतील. शिर्डी नगरपरिषदेकरिता माणिक आहेर (उपविभागीय अधिकारी, शिर्डी) निवडणूक निर्णय अधिकारी असतील; सहायक अधिकारी म्हणून सतिश दिघे (मुख्याधिकारी, शिर्डी नगरपरिषद) व बी.बी. मुळे (नायब तहसीलदार राहाता) यांची नियुक्ती झाली आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेकरिता श्रीकुमार चिंचकर (उपविभागीय अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर) निवडणूक निर्णय अधिकारी असतील, तर सहायक अधिकारी म्हणून सचिन डोंगरे (तहसीलदार श्रीगोंदा) व पुष्पगंधा भगत (मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद) कार्यभार पार पाडतील. सर्व नियुक्त अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी आदेशांचे तंतोतंत पालन करून नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २०२५ शांततेत, पारदर्शकतेने व सुव्यवस्थित पार पाडाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

Maharashtra Election: नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त Read More »

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Sharad Pawar: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संपूर्ण राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी देखील कंबर कसली असून सर्व राजकीय पक्षाकडून बेरीज वजाबाकीचे राजकारण सुरू झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी वैयक्तिक कारणामुळे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा निर्णय घेत अहिल्यानगर जिल्ह्याची कमान माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्याकडे सोपवली आहे. संपूर्ण जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू अशी माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी पक्षाचे सोपवली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे माजी आमदार दादाभाऊ कळमकर आता कोणत्या पद्धतीने पक्षाला एकत्र करून निवडणुकीचा सामना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

Sharad Pawar: निवडणुका जाहीर होताच अहिल्यानगरसाठी शरद पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय Read More »

election

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल

Maharashtra Local Body Election: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तसेच या निवडणुकीसाठी 7 नोव्हेंबरला मतदान याद्या जाहीर होणार असल्याची माहिती देखील राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर 31 ऑक्टोबरच्या मतदान यादीनुसार मतदान होणार असं देखील आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच बरोबर 2 डिसेंबरला मतदान होणार आणि 3 डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय खर्च मर्यादा अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- 15 लाख सदस्य-5 लाख ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 11 लाख 25 हजार ब वर्ग नगर परिषद सदस्य -3 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- 7 लाख 50 हजार क वर्ग नगर परिषद सदस्य – 2 लाख 50 हजार नगर पंचायत अध्यक्ष- 6 लाख नगर पंचायत सदस्य – 2 लाख 25 हजार असा असणार नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुक कार्यक्रम अधिसूचना प्रसिद्धी उमेदवारी अर्ज दाखल करणे – 10 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस – 17 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज छाननी – 18 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार – 21 नोव्हेंबर मतदान – 2 डिसेंबर मतमोजणी – 3 डिसेंबर

Maharashtra Local Body Election: निवडणुकीचा बिगुल वाजला; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान अन् 3 डिसेंबरला निकाल Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis: भारतीय संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंना रोख पारितोषिक देणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis: भारतीय महिला संघाने शानदार कामगिरी करत महिला क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच आपलं नावं विश्वचषकावर कोरले. तर आता भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या शानदार कामगिरीनंतर राज्य सरकारकडून या संघात सहभागी असणारे महाराष्ट्रीयन खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय महिला क्रिकेट संघाचं राज्यसरकारकडून अभिनंदन सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक देणार येणार आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॅाड्रिग्ज, राधा यादव यांचा सन्मान केला जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यात आढळून आलेल्या बिबट्यासंदर्भात देखील प्रतिक्रिया दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिबट्यासंदर्भातला रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी मिळावी असे प्रयत्न केले जात आहे. पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेकजणांचा मृत्यू झाला आहे. पुणे, अहिल्यानगर भागात बिबट्यांची संख्या 1300 वर आहे. राज्यातील 21 प्रकल्पाचा काल मी आढावा घेतला आहे, ज्या प्रकल्पाची पुर्ण होण्याची जी नियोजित तारीख दिलेली आहे , ज्या प्रकल्पाची काम मागे पडली आहेत त्याच्या कंत्राटदारांना देखील बोलावलं होतं त्यांच्या त्यांनी अडचणी सांगतल्या, त्यांना तंबी दिलेली आहे. तसेच प्रोजेक्ट वेळेत पुर्ण झाले पाहिजे या दृष्टीने सुचना दिलेल्या आहे अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Devendra Fadnavis: भारतीय संघातील महाराष्ट्रीयन खेळाडूंना रोख पारितोषिक देणार मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

img 20251104 wa0005

उभारणी तील ‘मध्यस्थां’ चा सुळसुळाट बंद करा Pratap Sarnaik यांचे आदेश

Pratap Sarnaik : धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या उभारण्या चा उद्योग वेगाने विस्तारत आहे. पवनचक्की उभारणी साठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे! त्यासाठी कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील ‘ मध्यस्थ ‘ या नावाखाली वाढलेला दलालांचा सुळसुळाट बंद करा. असे आदेश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. ते या अनुषंगाने मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते .या बैठकीला धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजारा, जिल्हा पोलीस अधीक्षक शफखत आमना, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या सह पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, पवन चक्क्या उभारणीमध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली जाते, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला पाहिजे. यासाठी शासनाने मध्यस्थ म्हणून काम केले पाहिजे, शेतकरी आणि संबंधित कंपनी याच्यामध्ये तयार झालेले दलाल हे गुंडगिरी करून शेतकऱ्यांना धमकवतात, तसेच त्याला योग्य मोबदला मिळू देण्यापासून वंचित ठेवतात. अशा अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात तक्रार येण्याची वाट न पाहता सुमोटो (Suo Moto ) गुन्हे दाखल करावेत. अशा गुंडांच्या पासून जिल्ह्यात निर्भय वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. याबरोबरच संबंधित कंपनीला पवनचक्की उद्योग उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ते सहकार्य करणे देखील आवश्यक आहे. पवनचक्की उभारणी उद्योगातून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित जपले जावे, त्याची फसवणूक होणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्ष रहावे असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

उभारणी तील ‘मध्यस्थां’ चा सुळसुळाट बंद करा Pratap Sarnaik यांचे आदेश Read More »

anil ambani

ED Action on Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत; ED ची मोठी कारवाई, 40 मालमत्ता जप्त

ED Action on Anil Ambani : देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिल अंबानी चर्चेत आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने त्यांच्या ₹ ३,०८४ कोटी (अंदाजे $३.८ अब्ज) किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. माहितीनुसार, ईडीने ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ५(१) अंतर्गत ही कारवाई सुरू केली. जप्त केलेल्या मालमत्तेत अनिल अंबानी यांचे पाली हिल, वांद्रे पश्चिम, मुंबई येथील राजवाड्यातील निवासस्थान समाविष्ट आहे. ईडीच्या जप्तीमध्ये अनिल अंबानी यांच्या समूहाच्या नवी दिल्लीतील रिलायन्स सेंटर आणि मुंबई, नोएडा, गाझियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई (कांचीपुरमसह) आणि पूर्व गोदावरी येथील मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये कार्यालय परिसर, निवासी युनिट्स, औद्योगिक इमारती आणि अनेक भूखंडांचा समावेश आहे. ईडीने चार वेगवेगळ्या आदेशांनुसार ही मालमत्ता जप्त केली. 40 हून अधिक मालमत्ता जप्त रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरएचएफएल) आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल) यांनी उभारलेल्या सार्वजनिक निधीच्या गैरवापराच्या कथित गैरवापराच्या मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली. या कंपन्यांद्वारे उभारलेला निधी अनिल अंबानी समूहाच्या विविध संस्थांना वळवण्यात आला होता, असे तपासात आढळून आले. ईडीचे म्हणणे आहे की हे पैसे अप्रत्यक्षपणे येस बँकेद्वारे वळवण्यात आले. २०१७ ते २०१९ दरम्यान, येस बँकेने आरएचएफएलमध्ये २,९६५ कोटी आणि आरसीएफएलमध्ये २,०४५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. डिसेंबर २०१९ पर्यंत, या गुंतवणुकीला नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (एनपीए) घोषित करण्यात आले होते. आरएचएफएलकडे १,३५३.५० कोटी रुपयांची थकबाकी होती आणि आरसीएफएलकडे १,९८४ कोटी रुपयांची थकबाकी होती. तपासात रिलायन्स कम्युनिकेशन्सवर पकड घट्ट ईडीने आता आपला तपास रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड (आरकॉम) आणि त्याच्या संलग्न कंपन्यांपर्यंत वाढवला आहे. तपासात असे दिसून आले आहे की कंपनीवर १३,६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज फसवणुकीचा आरोप आहे. यापैकी १२,६०० कोटी रुपये संबंधित पक्षांना हस्तांतरित करण्यात आले, तर १,८०० कोटी रुपये म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींद्वारे इतर कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले. ईडीच्या म्हणण्यानुसार, बिल डिस्काउंटिंगच्या नावाखाली फसवे व्यवहार आणि मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले आहेत. भ्रष्टाचाराशी संबंधित मालमत्ता परत मिळवण्यासाठी ही कारवाई सार्वजनिक हितासाठी असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अनिल अंबानींच्या समूहावर ईडीने पकड घट्ट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ५ ऑगस्ट २०२५ रोजी ईडीने कर्ज फसवणूक प्रकरणासंदर्भात अनिल अंबानींना चौकशीसाठी बोलावले होते. याआधी २४ जुलै रोजी मुंबईत ३५ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या छाप्यांमध्ये ५० व्यावसायिक संस्था आणि २५ व्यक्तींच्या मालकीच्या जागेची झडती घेण्यात आली. ऑक्टोबर २०२५ मध्ये, ईडीने रिलायन्स ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अशोक कुमार पाल यांना अटक केली, ज्यांच्यावर फसव्या बँक हमी आणि मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. ईडीची वाढती कारवाई सक्तवसुली संचालनालय अनिल अंबानी ग्रुपच्या आर्थिक कारवायांची सतत चौकशी करत आहे. एजन्सीने म्हटले आहे की ही कारवाई केवळ दंडात्मक नाही तर सार्वजनिक हितासाठी आर्थिक पारदर्शकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न आहे.

ED Action on Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत; ED ची मोठी कारवाई, 40 मालमत्ता जप्त Read More »

women world cup 2025

Women World Cup 2025 : विश्वविजेता होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघाला 51 कोटी बक्षीस जाहीर

Women World Cup 2025 : भारतीय संघाने रविवारी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारत इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. बीसीसीआयने कोटींच्या बक्षिस रकमेची घोषणा केली या ऐतिहासिक कामगिरीनंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला संघासाठी मोठ्या बक्षिस रकमेची घोषणा केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, संघाला 51 कोटी बक्षिस रक्कम मिळेल. आयसीसीकडून मिळालेल्या 4.48 दशलक्ष (अंदाजे 39.55 कोटी) बक्षिस रकमेव्यतिरिक्त ही रक्कम बोनस म्हणून दिली जाईल. बीसीसीआयचे हे पाऊल महिला खेळाडूंच्या समर्पणाचा आणि संघर्षाचा सन्मान करण्यासाठी आहे. तिसऱ्या प्रयत्नात ऐतिहासिक विजय भारतीय महिला क्रिकेट संघ यापूर्वी दोनदा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता परंतु विजेतेपद जिंकण्यात त्यांना अपयश आले. अंतिम फेरीत संघाची ही तिसरी वेळ होती आणि अखेर त्यांनी त्यांचे स्वप्न साकार केले. घरच्या मैदानावरील हा विजय आणखी खास बनला. डीवाय पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज नदीन डी क्लार्कचा निर्णायक झेल घेतला तेव्हा संपूर्ण स्टेडियम आनंदाने उसळून उठले. भारतीय महिला संघ विश्वविजेता बनला होता आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावरील अभिमान आणि भावना खरोखरच उल्लेखनीय होती. हरमनप्रीत कौर: नवीन विश्वविजेती कर्णधार या विजयासह, हरमनप्रीत कौर आता भारतीय क्रिकेट इतिहासातील महान कर्णधारांच्या यादीत सामील झाली आहे. कपिल देव, एमएस धोनी आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांप्रमाणे तिनेही भारताला जागतिक जेतेपद मिळवून दिले आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली, संघाने अंतिम फेरीत उल्लेखनीय संयम आणि रणनीती दाखवली. तिच्या नेतृत्वाखाली, संघाने दमदार फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दाखवले. महिला क्रिकेटसाठी एका नवीन युगाची सुरुवात या विजयामुळे भारतातील महिला क्रिकेटसाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की हे यश भावी महिला खेळाडूंना प्रेरणा देईल. शाळा आणि अकादमींमधील अधिक मुली आता क्रिकेटला करिअर म्हणून आकर्षित करतील.

Women World Cup 2025 : विश्वविजेता होताच बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय संघाला 51 कोटी बक्षीस जाहीर Read More »

josh hazlewood

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर

Josh Hazlewood : पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताविरोधात शानदार गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तो या मालिकेतील पुढील तिन्ही सामने खेळणार नसल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डकडून देण्यात आली आहे. जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी अ‍ॅशेस कसोटी मालिकेला लक्षात घेऊन जोश हेझलवूडला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित कसोटी मालिकेसाठी हेझलवूडला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी प्राधान्य आहे. लांब आणि आव्हानात्मक पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत त्याचा अनुभव आणि तंदुरुस्ती आवश्यक असेल, म्हणून त्याला भारताविरुद्धच्या उर्वरित टी-20 सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात, हेझलवूडने चार षटकांत फक्त 13 धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या घातक स्पेलमुळे टीम इंडिया सुरुवातीलाच अडचणीत आली. हेझलवूडच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाची नक्कीच परीक्षा होईल. संघ आता त्याच्या जागी झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस किंवा शॉन अ‍ॅबॉट सारख्या गोलंदाजांना निवडू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघासाठी ही एक दिलासादायक बाब आहे की त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये हेझलवूडच्या धोकादायक स्विंग आणि अचूक गोलंदाजीचा सामना करावा लागणार नाही.

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर Read More »