DNA मराठी

ताज्या बातम्या

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न 

Chhatrapati Shivaji Maharaj : आज अहमदनगर महापालिकाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न. यावेळी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे आमदार संग्राम जगताप देखील उपस्थित होते.  आपण पुतळे उभारतो मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार आणि विचार आपल्या मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजे असे मत खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी व्यक्त केलं अहमदनगर महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील अहमदनगर महानगरपालिकेचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते  यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, रणरागिणी महिला मंचच्या धनश्री विखे पाटील, उपमहापौर गणेश कवडे, सभापती गणेश कवडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे सभागृह नेते विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्र्यंबके, सभापती पुष्पाताई बोरूडे, मीनाताई चोपडा, रूपाली वारे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, सभापती गणेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले तर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी आभार मानले. प्रशासकाचा कारभार माझ्याकडे यावा नगर शहराला 500 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार महत्त्वाचा पैलू आहे. मनपाचा प्रशासकीय कारभार माझ्याकडे असल्यास सीना नदी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करू. ज्या शहरात नदी वाहते त्या शहराचा विकास होतो. नगरसेवकांनी छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावे. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरकरांच्या बाजूने उभे राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj : मनपाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा संपन्न  Read More »

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका

Sandip Mitke : Dysp संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करत शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा टाकून 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आरोपी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर 2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहिती वरून संदीप मिटके यांनी सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका केली आहे. याच बरोबर एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.  आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या  फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Sandip Mitke: हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर छापा, 4 परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका Read More »

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू

Jalna News : मागच्या काही दिवसांपासून राज्यात रोड   अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवसापूर्वी अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता.  तर आता जालना जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.   जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धुळे-सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. पुलावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मागून धडक दिली. यामध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका 10 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथील धुळे-सोलापूर महामार्गावर अंकुश नगर सहकारी साखर कारखान्यासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  तसेच कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघाताच्या वेळी अल्टो कारचा वेग जास्त असल्याने तिचा पुढील भाग कंटेनरमध्ये घुसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यामुळे कारमधील कोणालाही वाचवता आले नाही.  कार संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होती. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, डब्याखालून खराब झालेली कार काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. तर मृतदेहांची विटंबना करण्यात आली होती. अपघातानंतर रस्त्यावर मोठी जाम झाली होती. मात्र, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवून रस्ता खुला केला.

Jalna News : जालना येथे भीषण अपघात,कार कंटेनरला धडकली, 3 जणांचा मृत्यू Read More »

New Year Offer:  Honda Activa 6G घरी आणा ‘इतक्या’ स्वस्तात; जाणुन घ्या ऑफर

New Year Offer Honda Activa 6G : जर तुम्ही कमी किमतीमध्ये देशात सर्वात जास्त विक्री होणारी स्कूटर Honda Activa खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेत तुमच्यासाठी Honda Activa 6G कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता.  Honda Activa 6G ऑफर  चांगली बातमी अशी आहे की नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये Activa 6G च्या किमतीत काही कपात करण्यात आली आहे. किंमत तुमचे स्थान आणि व्हेरियंट यावर अवलंबून, आहे. तुम्ही या ऑफरचा फायदा घेत 5,000 रूपयांची बचत करु शकता. Honda Activa 6G फिचर्स  Activa 6G केवळ परवडण्याबाबत नाही फिचर्सच्या बाबतीतही  पॉवरफुल आहे.   सुधारित मायलेज: Honda चे ESP तंत्रज्ञान मागील मॉडेलपेक्षा 10% चांगले इंधन कार्यक्षमतेचे आश्वासन देते, प्रत्येक राइडवर तुमचे पैसे वाचवतात.  शक्तिशाली इंजिन: 110cc इंजिन आरामदायी आणि आत्मविश्वासपूर्ण राइडिंग अनुभव देते. आरामदायी सीट:  सीटखाली मोठी जागा आणि वापरण्यास सोपी नियंत्रणे यामुळे प्रत्येक राइड आरामदायी आणि सोयीस्कर बनते. आधुनिक डिझाईन: Activa 6G स्टायलिश रंग आणि स्पोर्टी ग्राफिक्सच्या रेंजमध्ये येते.  Honda Activa 6G मायलेज   आधी सांगितल्याप्रमाणे, ESP तंत्रज्ञान त्याच्या सुधारित मायलेजसह चमकते. आदर्श परिस्थितीत 55-60 kmpl च्या आकड्यांची अपेक्षा करा, जे दीर्घकाळात इंधनाच्या खर्चावर लक्षणीय बचत करते.  Honda Activa 6G सेफ्टी फीचर्स  Honda सुरक्षिततेला प्रथम स्थान देते आणि Activa 6G निराश होत नाही. एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम, ट्यूबलेस टायर आणि सुरक्षित सेंट्रल लॉकिंग सिस्टीम सायकल चालवताना तुमची मनःशांती सुनिश्चित करतात. 110cc इंजिन शक्ती आणि इंधन कार्यक्षमतेचा परिपूर्ण समतोल प्रदान करते.   नवीन वर्षाच्या ऑफरची ठळक वैशिष्ट्ये किमतीत सवलत: ऑन-रोड किमतींवर 5,000 रुपयांपर्यंतची बचत मायलेज: मागील मॉडेलच्या तुलनेत 10% सुधारणा, सुमारे 55-60 किमी/ली इंजिन: शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम 110cc इंजिन सेफ्टी फिचर्स: एकत्रित ब्रेकिंग सिस्टम, ट्यूबलेस टायर, सेंट्रल लॉकिंग फीचर्स: उत्तम मायलेज, आरामदायी राइड, प्रशस्त स्टोरेज, स्टायलिश डिझाइन स्पर्धा: TVS ज्युपिटर, सुझुकी ऍक्सेस 125, हिरो मेस्ट्रो एज 125

New Year Offer:  Honda Activa 6G घरी आणा ‘इतक्या’ स्वस्तात; जाणुन घ्या ऑफर Read More »

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर

Chhagan Bhujbal – राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचा मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या खटल्यातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी करण्याचे न्यायालयाने मान्य केले आहे.  महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून  या तिन्ही आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केले आहे.  या प्रकरणात मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचे साक्षीदार होण्यासाठी त्यांच्या अर्जावर निर्णय घ्या, अशी मागणी तिघांनी केली होती  न्यायालयाने ती मान्य केली आहे. सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या तीन आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर माफीनामा पत्र सादर केले होते.  आरोपी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज यांनी साक्षीतून वगळण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावर ईडीला 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणात विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे मुख्य आरोपी आहेत. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत  सन 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न करता विकासकाची नियुक्ती केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. ACB ने मुंबई सत्र न्यायालयात IPC कलम 409 (लोकसेवक असूनही सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे) आणि 471 (A) (खोटी कागदपत्रे तयार करणे) अंतर्गत आरोप दाखल केले. काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण? मुंबईतील अंधेरी येथील ‘आरटीओ’च्या जमिनीवर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला परवानगी देताना राज्य सरकारने दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी तसेच मुंबईतील मलबार हिल येथील विश्रामगृहाच्या बांधकामाचे कंत्राट संबंधित कंपनीला दिले. या कामासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नाही. कालांतराने संबंधित कंपनीने दुसऱ्या विकास कंपनीशी करार करून विकास हक्क विकले.  यापूर्वी विकासकाला 80 टक्के नफा मिळत होता, तर कंत्राटदार आस्थापनेला राज्य सरकारच्या निकषानुसार 20 टक्के नफा मिळणे अपेक्षित होते. यामध्ये आस्थापनाला 190 कोटी रुपयांचा नफा झाला.  भुजबळ कुटुंबीयांना 13 कोटी 50 लाख रुपये आस्थापनेकडून दिल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केला आहे.

Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ? वाचा सविस्तर Read More »

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला

Agriculture News : राज्यातील शेतकरी गेल्या दोन महिन्यापासून दुधाचे दर कोसळल्याने अडचणीत सापडला आहे. यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी किसान सभा, विविध शेतकरी संघटना व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गेले दोन महिने सातत्याने आंदोलन करत आहे.  आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 22 नोव्हेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीतही किसान सभेने याबाबत जोरदार मागणी केली होती. राज्यभर तहसील कार्यालयांवर दुध ओतून करण्यात आलेल्या आंदोलनांमध्येही हीच मागणी करण्यात आली होती.  आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकार याबाबत सकारात्मक निर्णय करेल असे आश्वासन विखे पाटील यांनी वारंवार दिले होते. मात्र बैठकीला आज महिना उलटून गेला तरी प्रत्यक्ष अनुदानाची घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही.  विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात अर्थातच याचे पडसाद उमटले. सभागृहात दूध प्रश्नाबाबत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आ. हरिभाऊ बागडे, आ. बाळासाहेब थोरात, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे  यांनी लक्षवेधी अंतर्गत  प्रश्न विचारले.  किमान या प्रश्नांना उत्तर देताना तरी दुग्धविकास मंत्री अनुदानाची घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. सरकार अनुदान देण्याबाबत सकारात्मक आहे हीच ध्वनीफीत यावेळीही वाजविण्यात आली.  दुध अनुदानाबाबतची सरकारची ही चालढकल संतापजनक असून अनुदान देण्यात होणारी ही दिरंगाई दुध कंपन्यांना लाभ पोहचविण्यासाठीच केली जात आहे. सध्या दुध क्षेत्रात पृष्ठकाळ (फ्लश सीजन) सुरु आहे. या काळात दुधाचे उत्पादन वाढलेले असते.  दुध कंपन्या या काळात स्वस्तात दुध घेऊन त्याची पावडर बनवितात. जानेवारीनंतर हळूहळू दुधाचे उत्पादन कमी होते. परिणामी दुधाचे भाव आपोआप वाढू लागतात. मार्च अखेरपर्यंत फ्लश सीजन संपून लीन सीजन सुरु होतो.  दुधाचे भाव तेंव्हा पुरवठा घटल्याने स्वाभाविकपणे वाढलेले असतात. जेंव्हा भाव आपोआप वाढतात तेंव्हा अनुदान देण्याचा मुहूर्त साधून त्याचा  लाभ कंपन्यांना पोहचविला जातो. अनुदानाबाबत  आजवरचा हाच अनुभव शेतकरी घेत आले आहेत. यावेळीही अनुदान जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई यासाठीच सुरु आहे.   दुग्धविकास मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदानाची घोषणा होईल असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात किती अनुदान देणार याबाबत खुलासा केलेला नाही ही बाबही चिंताजनक आहे.  भेसळ रोखण्यासाठीचे अधिकार दुग्धविकास विभागाला द्यावेत ही किसान सभेची मागणी आहे. सभागृहात लक्षवेधीला उत्तर देताना ही मागणी मान्य झाल्याचे दुग्धविकास मंत्र्यांनी  सभागृहात जाहीर केले आहे. मात्र मिल्कोमिटर व वजन काट्यात होणारी लूटमार रोखण्याबाबत असलेल्या मागणीबाबत अद्यापही धोरण घेण्यात आलेले नाही.  पशुखाद्याचे भाव कमी करण्याबाबतही  सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. तत्काळ किमान भाव फरका इतकी रक्कम अनुदान म्हणून जाहीर करून पूर्वलक्षी प्रभावाने गेले दोन महिन्याचा भाव फरक सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, पुढील काळातही हे अनुदान शेतकऱ्यांना सरळ खात्यावर द्यावे तसेच पशुखादय, औषधे व चाऱ्याचे  दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती करत आहे.  डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, इंजि.  सतीश देशमुख, जोतीराम जाधव, दादा गाढवे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे,  डॉ. अशोक ढगे, नंदू रोकडे,  सदाशिव साबळे, अमोल गोर्डे, धनंजय धोरडे, रामनाथ वदक, सुदेश जाधव, सुदेश इंगळे, रवी हासे, दीपक अण्णा काटे, सागर जाधव, अप्पा अनारसे, अरविंद कापसे.

Agriculture News : राज्यातील 72 टक्के दूध खाजगी संस्थांना ! अनुदान फक्त सहकारीला Read More »

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी

Ahmednagar Shivaji Maharaj Statue : ऐतिहासिक अहमदनगर शहरातील महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.   या पुतळ्याचे अनावरण मराठा समाजाच्या हक्कासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी पालिका सभागृहात नगरसेविका शिला दीप चव्हाण यांनी केली आहे. तसेच मनपा आयुक्त व महापौर यांना देखील त्यांनी या मागणीचे पत्र दिले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन आदर्श राज्याची निर्मिती केली आहे. यामुळे त्यांचा महापालिकेत बसविण्यात आलेला पुतळा सर्वांना प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे. अहमदनगर महापालिका प्रशासनाने गुरुवारी (दि.21 डिसेंबर) रोजी महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे नियोजन केले आहे.  या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाल्यास सर्व नगरकरांना आनंद होईल.मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला आरक्षण मिळावा यासाठी स्वत:च्या मालकीची जमीन विकून संघर्ष करत आहे. यामुळे ते एक लढवय्ये कार्यकर्ते आहे. आज समाजासाठी सर्वस्वी त्याग करण्याची त्यांची भूमिका आहे.

Ahmednagar Shivaji Maharaj Statue: शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करा : नगरसेविका शिला दीप चव्हाण यांची मागणी Read More »

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात घट! ‘या’ दिवसापासून थंडी वाढणार

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 25 डिसेंबरनंतर पुन्हा तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे थंडी वाढणार आहे.  मंगळवारी मुंबईतील IMD च्या सांताक्रूझ हवामान केंद्रात किमान तापमान 23.7 अंशांवर पोहोचले, जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी जास्त आहे. तर कुलाबा येथील हवामान केंद्रात किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी 12 डिसेंबर रोजी हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती, जी 19.4 अंश होती. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. सोमवारी सांताक्रूझमध्ये किमान तापमान 23.6 अंशांवर घसरले, तर कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअसची नोंद झाली. आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या हवामान प्रणालीमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. शहरापासून दूर असले तरी त्याचा परिणाम तापमानात वाढ होत आहे. मात्र, 25 डिसेंबरनंतर पश्चिमी विक्षोभ तसेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परंतु, तोपर्यंत किमान तापमान 21 ते 22 अंशांच्या दरम्यान राहील. त्याचवेळी स्कायमेट वेदरचे महेश पलावत यांनी तापमानात वाढ होण्यामागे उत्तर कोकणातील कुंड असल्याचे सांगितले आहे. जेव्हा जेव्हा कुंड तयार होते तेव्हा वाऱ्याची हालचाल घड्याळाच्या विरुद्ध असते. जोपर्यंत उत्तरेचे वारे येत नाहीत तोपर्यंत तापमान जास्तच राहील. साधारणत: 15 डिसेंबरच्या आसपास कमाल तापमानात घट झाल्यानंतर हिवाळा वाढू लागतो. मात्र, गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुंबईचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते.

Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात घट! ‘या’ दिवसापासून थंडी वाढणार Read More »

JN.1 COVID Variant : मोठी बातमी! राज्यातील ‘या’ भागात कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री

JN.1 COVID Variant: केरळ नंतर आता राज्यात देखील कोरोनाचा नवीन सबवेरियंट JN1 ची एन्ट्री झाली आहे. यामुळे आता राज्यात आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही महिन्यांनंतर मुंबईत कोरोनाचे दोन आकडी रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ठाण्यात ओमिक्रॉन वेरियंट BA.2 म्हणजेच JN.1 ची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीची पावले उचलली जात आहेत.  आरोग्य विभागाने नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक तेथे मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यासारख्या इतर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. JN1 मुळे होणारा संसर्ग अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावध राहण्यास सांगितले आहे.  या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना इन्फ्लूएन्झा आणि श्‍वसनाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या सर्व रूग्णांचे सर्वेक्षण करून गरज भासल्यास कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्व जिल्ह्यांना कोरोना चाचणी वाढवण्यास सांगितले आहे. JN.1 कुठे संक्रमित झाला? ओमिक्रॉन जेएन.1 ची लागण झालेला पहिला रुग्ण मंगळवारी ठाणे जिल्ह्यात आढळून आला. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, 19 वर्षांच्या मुलीला या नवीन वेरियंटची लागण झाली आहे. त्यांना काल दुपारी साडेचार वाजता ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तरुणी मुंब्रा परिसरात राहते. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या आठवड्यात तीनशेहून अधिक जणांची तपासणी केली होती. त्यानंतर मंगळवारी 19 वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. JN.1 संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. 6 महिन्यांनंतर सर्वाधिक प्रकरणे अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेएन.1 मुळे केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत केरळमध्ये कोविडचे 292 नवीन रुग्ण आढळून आले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2041 वर पोहोचली आहे.  मंगळवारी, 21 मे पासून देशभरात कोरोना संसर्गाची सर्वाधिक 614 प्रकरणे नोंदली गेली. यासह, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,311 वर पोहोचली आहे. घाबरण्याची गरज नाही – केंद्र कोविडच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज तयारीचा आढावा घेतला आणि राज्यांना सतर्क राहण्याचे आणि पाळत ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण घाबरून न जाता सावध राहण्याची गरज आहे. तयारीमध्ये कोणतीही हलगर्जीपणा नसावा. केंद्र सर्व प्रकारची मदत करेल.”

JN.1 COVID Variant : मोठी बातमी! राज्यातील ‘या’ भागात कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरियंटची एन्ट्री Read More »

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता

Sujay Vikhe Patil : अहमदनगर मध्ये रोजगाराची उपलब्धता वाढवण्याकरिता मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरीता शिर्डी आणि वडगाव गुप्ता येथे जमीन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला होता. शिर्डी येथील औद्योगिक वसाहती करिता शेती महामंडळाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यास राज्य मंत्री मंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला होता.  काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत नगर तालुक्यातील महाराष्ट्र शासनाची वडगाव गुप्ता येथील 600 एकर म्हणजेच सुमारे 225 हेक्टर आर जमीन फेज 2 साठी विनामूल्य वर्ग करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.  विशेष म्हणजे राज्यात ही पहिलीच एमआयडीसी अशी आहे ज्या एमआयडीसीसाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली गेली नाही. अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर औद्योगिक वसाहतीचा विस्तार होणे आवश्यक होते. या विस्ताराकरिता जागा उपलब्ध होणे जरूरीचे होते. मात्र राज्यात महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या सर्व निर्णयाला गती मिळाली आणि राज्य सरकारने औद्योगिक विकासाकरिता वडगाव गुप्ता येथे एमआयडीसीसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यामुळे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील असा विश्वास खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. औद्योगिक वसाहतीच्या विस्ताराकरिता खासदार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान जागा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. सुजय विखेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

Sujay Vikhe Patil : खा. डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘त्या’ प्रकरणात मिळाली मंत्री मंडळाची मान्यता Read More »