DNA मराठी

ताज्या बातम्या

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार

Yeh Re Yeh Re Paisa 3 :  मराठी चित्रपटसृष्टीत ‘ये रे ये रे पैसा’  मल्टिस्टारर चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल ‘ये रे ये रे पैसा 3’ बहुचर्चित आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, नव्या वर्षात 3 जानेवारी 2025 रोजी ‘ये रे ये रे पैसा 3’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.  अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अॅरो  या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून,  सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे  निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे, तर संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे.  पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.  संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे. ‘ये रे ये रे पैसा’ आणि ‘ये रे ये रे पैसा 2’ या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी ‘ये रे ये रे पैसा 3’ सज्ज होत आहे.

Yeh Re Yeh Re Paisa 3 : “ये रे ये रे पैसा 3” नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार Read More »

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा

Ahmednagar Latest News: पैगंबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि मुस्लीम समाजाला धमकी देणारे भाजप आमदार नितेश राणे यांच्या विरोधात UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम धर्मगुरू सलमान अजहरी यांची सुटका करण्यात यावी या मागणीसाठी आज समस्त मुस्लीम समाज व उलेमा शहर अहमदनगर यांच्यावतीने अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. तसेच प्रशासनाकडून यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देखील मुस्लिम समाजाकडून देण्यात आला आहे.  मुस्लिम समाजाने या निवेदनामध्ये महंत रामगिरी महाराज, यती नरसिंम्हानंद आणि नितेश राणे यांच्या विरोधात दाखल असणाऱ्या गुन्ह्यामध्ये कलम 61 (1), 61(2), 192, 299 भारतीय न्याय संहिता 2023 तसेच 15 (1) बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अॅक्ट 2019 अन्वये कलमांची वाढ करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले होते तेव्हा मुंबई पोलीस आयुक्ताने आरोपी विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

Ahmednagar Latest News: रामगिरी महाराजांवर कारवाई करा नाहीतर…, समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सरकारला इशारा Read More »

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर

Ratan Tata:  रतन टाटा यांच्या निधनाबद्दल राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. टाटा समूहाला जागतिक स्तरावर नामांकित समूहात रूपांतरित करण्याचे श्रेय टाटा यांना जाते. बुधवारी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय तिरंगा अर्ध्यावर फडकणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही. दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत टाटा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव एनसीपीए येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली. दर्शनासाठी येणाऱ्यांना तेथे पार्किंगची सुविधा नसल्यास पोलिसांच्या सूचनांचे पालन करून त्यांची पार्किंग व्यवस्था तपासावी लागेल, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांचा पूर्ण बंदोबस्त तैनात असेल.

Ratan Tata: रतन टाटा यांचा शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार, राज्यात एक दिवसीय दुखवटा जाहीर Read More »

Ratan Tata: असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.., रतन टाटांच्या यशाची कहाणी

Ratan Tata: रतन टाटा उद्योगविश्वातील मोठं व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरलीय 1991 ते 2012 या काळात रतन टाटा स्वतः टाटा समुहाचे चेअरमन राहिले. या काळात त्यांनी उद्योग विश्वात अनेक किर्तीमान स्थापन केले. त्यांनी टाटाला इंटरनॅशनल बँड म्हणून विकसित केलं.   देशातील सर्वाधिक लोकप्रिय उद्योजक आणि अब्जाधीश रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. 1991 ते 2012 या काळात रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन होते. या काळात त्यांनी उद्योग क्षेत्रात अनेक किर्तीमान स्थापित केले. टाटा समुहाला त्यांनी एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं त्याचबरोबर एक उदारवादी माणूस म्हणूनही त्यांनी नाव मिळवलं. हेच कारण आहे की देशातील अगदी लहान व्यापारी असो की मोठा उद्योजक किंवा उद्योग विश्वात दाखल होणारा प्रत्येक जण रतन टाटांना आपला आदर्श मानतो. रतन टाटा सन 1962 मध्ये टाटा इंडस्ट्रीमध्ये सहायक म्हणून सहभागी झाले होते. नंतर त्याच वर्षात टाटा इंजिनीरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या जमशेदपूर युनिटमध्ये सहा महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं. विविध कंपन्यांत काम केल्यानंतर 1971 मध्ये नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रभारी निदेशक म्हणून रतन टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. 1981 मध्ये त्यांना टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. सन 1991 ते 28 डिसेंबर 2012 रोजी सेवा निवृत्तीपर्यंत रतन टाटा हे टाटा सन्स या कंपनीचे अध्यक्ष होते. या दरम्यान टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा पॉवर, टाटा ग्लोबल ब्रेवरेज, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स आणि टाटा टेली सर्व्हिसेस सहित अन्य प्रमुख टाटा कंपन्यांचेही अध्यक्ष होते. भारत आणि विदेशात विविध संघटनांशी त्यांचा संबंध होता. रतन टाटा मित्सुबिशी कॉर्पोरेशन आणि जेपी मॉर्गन चेसक्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीत होते.  सर रतन टाटा ट्रस्ट, एलाइड ट्रस्ट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि एलाइड ट्रस्टचे ते अध्यक्ष होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेटल रिसर्चच्या प्रबंधन परिषदेचे रतन टाटा अध्यक्ष होते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि दक्षिण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या बोर्डतही रतन टाटा कार्यरत होते. रतन टाटा यांची कामगिरी 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष सन 2007 मध्ये कोरस कंपनीची खरेदी केली 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हर कंपनीची खरेदी टाटा स्टील कंपनीचा जगभरात विस्तार केला टाटा मोटर्स या कंपनीला मोठं यश मिळवून दिलं टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस कंपनीचा जगभरात विस्तार जागतिक ब्रँड व्हॅल्यू म्हणून टाटा ग्रुपला नवी ओळख मिळवून दिली रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार सन 2000 मध्ये पद्म भूषण पुरस्कार 2008 मध्ये पद्म विभूषण पुरस्कार सन 2009 मध्ये ऑनररी नाइट कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सन 2012 मध्ये इंटरनॅशनल हेरिटेज फाऊंडेशनचा लाइफटाइम अचीव्हमेंट पुरस्कार टाटांचे सामाजिक कार्य  रतन टाटा यांना परोपकार आणि सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जाते. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्ट आणि टाटा फाउंडेशनने शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. शिक्षण   शिक्षण हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे असे रतन टाटा म्हणत होते. त्यामुळे त्यांनी देशभरात शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. तसेच त्यांनी अनेक स्कॉलरशिप योजनांची सुरुवात केली. आज याच स्कॉलरशिपचा लाखो विद्यार्थी लाभ घेत आहेत. आरोग्य   टाटा ट्रस्टने अनेक आरोग्य सेवा आणि रुग्णालयांत गुंतवणूक केली आहे. कॅन्सर रिसर्च, एड्सवरील उपचार आणि देशातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी विशेष कार्य केले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) आणि भारतीय विज्ञान संस्थान (IISc) यांसारख्या प्रमुख शिक्षण संस्थांना पाठबळ दिलं. रतन टाटा त्यांच्यातील परोपकाराच्या गुणामुळे सुद्धा ओळखले जातात. रतन टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठात 28 मिलियन डॉलरचे टाटा स्कॉलरशिप फंड स्थापन केला. सन 2010 मध्ये टाटा समूहाने हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये एक कार्यकारी केंद्र स्थापन करण्यासाठी 50 मिलियन डॉलर दान केले होते. या केंद्राला टाटा हॉल असे नाव देण्यात आले. सन 2014 मध्ये टाटा समूहाने आयआयटी – बॉम्बेला 95 कोटी रुपये दान दिले होते. तसेच टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन संस्थेची स्थापना केली होती. 

Ratan Tata: असिस्टंट’ म्हणून सुरुवात नंतर कंपनीलाच बनवलं इंटरनॅशनल ब्रँड.., रतन टाटांच्या यशाची कहाणी Read More »

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार

Ratan Tata : उद्योगपती रतन टाटा यांचा निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.  सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना  मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी बरोबर आहे. अशी माहिती एक्सवर रतन टाटा यांनी दिली होती.  रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. टाटाच्या दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारातून ग्रुपने दूरसंचार, रिटेल आणि ऑटो यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. 2008 मध्ये जग्वार लँड रोव्हरची खरेदी ही टाटाच्या सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक होती, जो टाटा ग्रुपच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण होता.

Ratan Tata:  उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, ICU मध्ये सुरु होता उपचार Read More »

LIC चा धमाका, मिळणार 28 लाख रुपये, करा फक्त ‘हे’ काम

LIC Scheme :  मुलीचे शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी तुम्ही देखील गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीने कन्यादान पॉलिसी नावाने एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. तुम्हाला या योजनेत ठराविक कालावधीनंतर चांगला परतावा मिळतो.   LIC कन्यादान पॉलिसी योजना काय आहे? एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक योजना आहे जी विशेषतः आयुर्विमा एलआयसीने मुलींचे भविष्य लक्षात घेऊन तयार केली आहे. या अंतर्गत, जर कोणत्याही पालकाने आपल्या मुलीच्या नावावर निश्चित रक्कम जमा केली तर त्यांना पॉलिसीच्या परिपक्वतेवर मोठी रक्कम मिळते. ज्याचा उपयोग त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर गरजा भागवण्यासाठी केला जाऊ शकतो. LIC कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत किती पैसे गुंतवावे लागतील? या योजनेंतर्गत तुम्ही दररोज 121 रुपये जमा केल्यास, 25 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला 27 ते 28 लाख रुपये मिळतील. एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची पात्रता वडिलांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे. मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. पॉलिसी मॅच्युरिटीचे कमाल वय 65 वर्षे असावे. ही पॉलिसी फक्त पालकच त्यांच्या मुलीच्या नावाने खरेदी करू शकतात. एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना कशी खरेदी करावी ही पॉलिसी एलआयसीच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या शाखेत जाऊन खरेदी केली जाऊ शकते. तेथे तुम्हाला पॉलिसीशी संबंधित अर्ज मिळेल. जे तुम्हाला काळजीपूर्वक भरावे लागेल. त्याशिवाय, तुम्हाला अनेक आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. यानंतर, तुम्हाला दररोज किती प्रीमियम भरावा लागेल? तुम्हाला त्याचा तपशील देखील प्रविष्ट करावा लागेल. तरच 25 वर्षांनंतर तुम्हाला 27 ते 28 लाख रुपये मिळू शकतील.

LIC चा धमाका, मिळणार 28 लाख रुपये, करा फक्त ‘हे’ काम Read More »

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही?

Maharashtra Election: राज्यात आता विधानसभेचे वारे वाहत आहे. येत्या काही दिवसात निवडणुकांची घोषणा देखील होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आता आपापल्या तयारीला लागला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना पुणे शहरातील एकही विधानसभा जागेवर उमेदवार देणार नाही.  माहितीनुसार जागा वाटपामध्ये पुण्यातील विधानसभा लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नसल्याने शिवसेनेने दावा सोडला असल्याची माहिती समोर येत आहे.  तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील 2 जागांवर शिवसेना निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे.  तर दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर मधून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा आहे.

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही? Read More »

Repo Rate बाबत मोठी घोषणा, जाणून घ्या होम लोनच्या EMI वर काय होणार परिणाम

RBI Repo Rate :  रिझर्व्ह बँकेने पॉलिसी दरांमध्ये (रेपो रेट) कोणताही बदल केलेला नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले धोरण दर 6.50 टक्के कायम ठेवले आहेत. दोन दिवसीय चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीचे निकाल जाहीर करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, यावेळी देखील धोरण दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो दर अपरिवर्तित राहणे म्हणजे घर, वाहन यासह विविध कर्जावरील मासिक हप्त्यामध्ये (EMI) बदल होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच तुमच्या कर्जाचा EMI वाढणार नाही आणि कमीही होणार नाही. रेपो हा व्याजदर आहे ज्यावर व्यापारी बँका त्यांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेतात. RBI याचा वापर महागाई नियंत्रणासाठी करते. काय म्हणाले शक्तीकांत दास? गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, ‘मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो दर 6.5% वर कायम ठेवण्याचा बहुमताने निर्णय घेतला. जागतिक चढउतार असूनही, चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यात आणि आर्थिक विकासाला गती देण्यात चलनविषयक धोरण यशस्वी ठरले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने भूमिका बदलून तटस्थ करण्याचा निर्णय घेतला. ‘खाद्य महागाई कमी होईल’ ते म्हणाले, ‘चांगला मान्सून आणि पुरेसा बफर स्टॉक यामुळे यंदा अन्नधान्य महागाई कमी होईल. महत्त्वपूर्ण आर्थिक डेटा अर्थव्यवस्थेतील मजबूत क्रियाकलाप दर्शवित आहे, मूलभूत गोष्टी मजबूत आहेत. GDP मधील गुंतवणुकीचा वाटा 2012-13 पासून सर्वोच्च पातळीवर आहे. चलनविषयक धोरण समितीने व्याजदर अपरिवर्तित ठेवण्याच्या बाजूने 5:1 निर्णय घेतला. आर्थिक विकास दर 7.2 टक्के अपेक्षित आहे आरबीआय गव्हर्नर पुढे म्हणाले, ‘चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत मागणीत सुधारणा, कच्च्या मालाची कमी किंमत आणि सरकारी धोरणांमुळे उत्पादन क्षेत्राला गती मिळत आहे. देशांतर्गत मागणीत सुधारणा, कच्च्या मालाची कमी किंमत आणि सरकारी धोरणांमुळे उत्पादन क्षेत्राला गती मिळत आहे. किरकोळ चलनवाढीचा अंदाज 4.5 टक्के आरबीआयने सामान्य मान्सून पाहता 2024-25 या आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलनवाढीचा अंदाज 4.5 टक्के ठेवला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या पुनर्रचित चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) तीन दिवसीय बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत माहिती देताना RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, MPC ने धोरण दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी धोरणात्मक दर कायम ठेवण्याच्या बाजूने मतदान केले.

Repo Rate बाबत मोठी घोषणा, जाणून घ्या होम लोनच्या EMI वर काय होणार परिणाम Read More »

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं

Sanjay Raut:  कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तर महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहित आहे जागावाटप कसा व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असेही ते म्हणाले.

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं Read More »

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट

Haryana Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. सध्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष 47 जागांवर पुढे असून काँग्रेस 36 जागांवर पुढे आहे. त्यामूळे भाजपने ताज्या आकडेवारीनुसार बहुमताचा आकडा पार केला आहे मात्र हे कल असल्याने हरियाणामध्ये पुन्हा एकदा सामना फिरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला होता मात्र आता कल बदलत असल्याने पुढील 1-2 तासात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये देखील जबरदस्त फाईट पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या काँग्रेस आघाडीने बहुमतचा आकडा पार केला आहे तर भाजप 28 जागांवर पुढे आहे.  एक्झिट पोलमध्ये हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष 55 ते 60 जागांवर विजय मिळवणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर भाजपला 20 ते 30 दरम्यान जागा मिळणार असं देखील अनेक एक्झिट पोलचं म्हणणं होतं. मात्र प्रत्यक्षात भाजप सध्या हरियाणामध्ये तिसऱ्यांदास सरकार स्थापन करण्याच्या जवळ दिसत आहे.

Haryana Election : सामना फिरला, हरियाणात भाजप करणार हॅट्रिक? जाणून घ्या ताजे अपडेट Read More »