DNA मराठी

ताज्या बातम्या

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..!

BJP News: शेवगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे विद्यमान तालुका अध्यक्ष तुषार वैद्य यांनी भाजपा तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्याकडे  दिला आहे. तुषार वैद्य यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मला शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष या पदाची जबाबदारी दिली होती. दिलेल्या पदाचा मी पक्ष वाढीसाठी माझ्यापरीने प्रयत्न केला दरम्यानच्या काळात लोकसभेसाठी गावोगाव जाऊन पक्षाचे विकास कार्य व लोक प्रतिनिधींची विकास कामे सांगून लोकांपर्यंत पोहचवण्याच काम केले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार मोनिकाताई राजळे व त्यांचे समर्थक यांच्या विचारांच्या मतभेदामुळे मी व आमची कार्यकारिणी प्रचारादरम्यान सहभागी झालो नाही. कारण शेवगाव तालुका भाजपा पक्ष संघटना वाढीसाठी मागील ३० ते ३५ वर्षाचा इतिहास पाहीला तर माझे वडील स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. नंतर मी देखील माझ्या परीने अगदी प्रामाणीकपणे पक्षनीष्टा जोपासून सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी अनेक ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या नवीन कार्यकर्ते संघटीत केले.  २०१४ विधानसभेसाठी आ. मोनिकाताईना पक्षाने संधी दिली, २०१९ ला दिली आम्ही प्रामाणीक काम केल. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत आमदार ताईचे कार्यकर्ते व जुनी भाजपा यांमध्ये पाहीजे तेवढे सौख्य राहीले नाही. आम्ही पटले नाही तरी पक्षाचा उमेदवार म्हणून काम केले परंतु स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जी.प., पं. स. तसेच ग्रामपंचायत मध्ये राजळे गटाने जुन्या भाजपाला कायम विरोध केल्याचे निदर्शनास आले. तेव्हा या वेळी २०२४ ला विधानसभेच्या पक्षाच्या मुळ कार्यकर्त्याला म्हणजे अरुण भाऊ मुंढे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी असा आग्रह आम्ही म्हणजे जवळपास ८० % जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु त्याला यश आले नाही. पक्षाने मोनिकाताईंना उमेदवारी दिल्याने मागील १० वर्षाचा अनुभव पाहता आम्हाला मीळालेली वागणूक पाहता यावेळी आमच्या विचारांच्या लोकांनी मोनिकाताईचे काम करण्याची मानसीकता राहीली नव्हती. म्हणून मी व आमच्या विचारांच्या लोकांनी शांत बसण्याचा निर्णय घेतला होता. कारण आमदारांच्या कार्यकर्त्यांनी येथून मागे प्रमाणीकपणाने काम करून देखील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळी तर आम्ही उघडपणे पक्षाकडे तिकीट बदलासाठी भूमीका घेतली होती. आम्ही जरी पक्षाचा उमेदवार या नात्याने काम केले असते तरी त्यांनी ते मान्य केले नसते म्हणून शांत बसलो विधानसभेला पक्षासाठी काम केले नाही.  मी पदावर असून देखील मी या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत बसलो. या गोष्टीची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी भाजपा तालुका अध्यक्ष या पदाचा राजीनामा देत आहे.  असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षवादीसाठी यांना देखील करावे लागले संघर्ष…..!स्व. शिवनाथ अण्णा वैद्य यांनी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेऊन लोकनेते. स्व. गोपीनाथ मुंढे व स्व. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात शेवगाव तालुक्यात भाजपा पक्ष वाढीसाठी अतिशय कष्ट घेतले. त्यांना सहकार्य लाभलेल्यांमध्ये स्व. भाऊसाहेब कोल्हे, पांडुरंग लांडे, भीमराज सागडे, तानाजी मालुसरे, डॉ. सोनाजी लांडे, स्व. विष्णुपंत देहडराय, काशीनाथ चौधरी, पांडुरंग मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कोळगे, कचरू चोथे, अरून मुंढे, विक्रम देशमुख, स्व. अंकुश केसभट, अशोकशेठ आहुजा, बंडूशेठ रासने, विजय देवळालीकर, राजाभाऊ लड्डा, छोटूशेठ लड्डा. शेतकरी संघटनेचे ताराभाऊ लोंढे, बापूसाहेब पाटेकर, नितीन काकडे, विनायक खेडकर, परशुराम गरड, स्व. सखाराम निर्मळ, गोपाळशेठ शर्मा, हरिभाऊ झुंबड, शब्बीरभाई राक्षीवाले, मारुतराव नागरे, स्व. गहीनीनाथ ढाकणे, बबनराव ढाकणे, आविनाश मगरे, पंडीतराव नेमाने, गोविंदराव बर्डे, रवी तानवडे, संजय टाकळकर, उद्धव काजळे, डॉ. मंत्री तसेच बालमटाकळी मधील अनेक सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रस्थापीतांच्या विरोधात पक्ष संघटना वाढवीली हे करत असताना फार मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला.

BJP News : भाजपचे शेवगांव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांचा राजीनामा…..! Read More »

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई

Fake Money: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. नीलेश वीरकर, सैफान पटेल, अफजल शहा, शाहीद जक्की कुरेशी, शाहफहड अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक पद्मावती भागात गस्त घालत होते. पद्मावती बस स्थानकाजवळ पोलिसांना पाहून एकजण स्वारगेटच्या दिशेने पळू लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून अडवले आणि त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशातून पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल मिळाले. रात्री अंधारात तो बनावट नोटा वटविण्याच्या प्रयत्न करीत होता. त्याला शाहीद कुरेशी, सैफान पटेल, अफजल शहा यांनी या नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी वीरकरला नवी मुंबई येथे नेत तिथून शाहीदला अटक केली. चौकशीत अन्सारीने त्याला बनावट नोटा दिल्याची माहिती दिली. सहकारनगर पोलिसांनी एक-एक साखळी जोडत पाच जणांना अटक केली त्यांच्याकडून 10 लाख 35 हजार रुपयांच्या पाचशेच्या दोन हजार नोटा जप्त केल्या. या सर्व बनावट नोटा दिल्ली, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून आणल्याचे सांगितले. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Fake Money : बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई Read More »

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती?

Walmik Karad : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड चर्चेत असून आता त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुणे येथे करोडो रुपयांची संपत्ती आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती तर आता दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यांनी X वर पोस्ट करुन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव असल्याचे काही माध्यमांनी दाखवले आहे. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत क ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे 4 सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगल जाधव कोण आहेत? ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील तपास झाला पाहिजे. अशी मागणी या पोस्टमध्ये त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. आज वाल्मिक कराड जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडावर मकोका लावला आहे.

Walmik Karad : वाल्मिक कराड अडचणीत, पुणेनंतर सोलापुरात दुसऱ्या पत्नीच्या नावावर करोडोंची संपत्ती? Read More »

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा

UP Crime: मामी आणि भाच्यामधील नात्यात एक लज्जास्पद घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिरोजाबादमध्ये, एका भाच्याने त्याच्या मामाची हत्या केली कारण तो त्याच्या मामीच्या प्रेमात आंधळा झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना खैरगड पोलीस ठाण्यातील वैरनी गावातील आहे, जिथे सत्येंद्र नावाच्या तरुणाचे 8 मे 2021 रोजी रोशनी नावाच्या मुलीशी लग्न झाले होते. सत्येंद्र आणि रोशनी यांच्या वयात खूप फरक होता, सत्येंद्र त्याच्या पत्नीपेक्षा सुमारे 22 वर्षांनी मोठा होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली, पण काही काळानंतर रोशनीला तिच्या पतीचा भाचा गोविंदवर प्रेम झाले. गोविंद आणि रोशनीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले, जे सत्येंद्रच्या लक्षात आले. त्यामुळे घरात वारंवार वाद होऊ लागले. हे प्रकरण इतके वाढले की रोशनी आणि गोविंद यांनी मिळून सत्येंद्रच्या हत्येचा कट रचला. हे षड्यंत्र गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते आणि 14 जानेवारीच्या रात्री ते अंमलात आणण्यात आले. 14 जानेवारी रोजी संध्याकाळी गोविंद त्याचे मामा सत्येंद्र यांच्या घरी आला आणि जेवण करून सर्वजण झोपायला गेले. रात्रीच्या अंधारात गोविंदने त्याचे मामा सत्येंद्र यांची हत्या केली आणि तो पळून गेला. सकाळी सत्येंद्रचा मृतदेह सापडला तेव्हा गावात एकच खळबळ उडाली आणि पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की, मृत सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नने हत्येचा अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये पत्नी रोशनी आणि भाचा गोविंद दोघांनाही आरोपी ठरवण्यात आले होते. एसपी (ग्रामीण) अखिलेश भदोरिया यांनी माहिती दिली की, “चौकशीदरम्यान गोविंदने सांगितले की त्याचे त्याच्या मामीसोबात प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मामाची हत्या केली.” पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

UP Crime: मामी आणि भाचाचं प्रेम… नंतर मामाचा काढला कटा Read More »

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण

Maharashtra News : एमआयडीसी मधील अधिकारी उद्योजकांना भेटत नाहीत अशा अनेक तक्रारी वारंवार येत असतात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी वेळ देऊनही भेट देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रारी यापूर्वीही झाले आहेत याबाबत एका उद्योजकाने डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून एमआयडीसीमध्ये लेखावर्ष अधिकाऱ्याची तक्रार केली आहे. यावर फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अहिल्यानगर शहरापासून एमआयडीसीमध्ये उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यात एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी उद्योजकांना ऑफिसला बोलवून घेऊन ते स्वतः बाहेर निघून जातात असे प्रकरण समोर आले आहे, एमआयडीसी मधील उप अभियंता एस एस बडगे यांच्या विरोधात खास करून या तक्रारी आहेत किलोस्कर सारख्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना कराल यात बोलून ठेवले सदरचे अधिकारी हे अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी पुण्याहून नगरला आले होते. मात्र उप अभियंता पडदे यांनी त्यांना जवळपास तीन तास बसवले तरीही ते आले नाही अशा प्रकारे अनेक तक्रारी पडदे यांच्या विरोधात करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोननगर एमआयडीसी मधील वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणं टाळत असतात यामुळे कंपन्यांचा विस्तार होण्यास अडचणीत असल्याचं उद्योजकांनी म्हटल आहे कुठल्याही काम वेळेवर होत नसल्याने उद्योजक हैराण झाले आहेत अभियंता यांच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका उद्योजकाने डायरेक्ट तक्रार केली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यावर काय कार्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, अर्थपूर्ण समजण्यासाठी अधिकाऱ्यांना भेट टाळण्याची शक्यता उद्योजक उद्योगातील कामासाठी अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी फोन करून पूर्व परवानगी घेतली जाते. परंतु, एमआयडीसीतील काही वरिष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक भेट घेत नाहीत, अर्थपूर्ण तडजोडीचे बोलावे म्हणून उद्योजकान भेट घेण्यास टाळाटाळ केली जाते अशी चर्चा उद्योजकांमध्ये आहे.

Maharashtra News: डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, MIDC मधील अधिकारी भेटेना, उद्योजक हैराण Read More »

Hindenburg Research होणार बंद, संस्थापकांनी केली मोठी घोषणा

Hindenburg Research Shuts Down: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने जानेवारी 2023 मध्ये अदानी ग्रुपवर आरोप केले होते, त्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. नॅथन अँडरसन म्हणाले की ते त्यांची फर्म बंद करत आहेत. त्याच्या अहवालांमुळे गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात शॉर्ट-सेलिंग झाले आणि अधिकाऱ्यांनी चौकशी केली, ज्यामुळे भारतातील अदानी ग्रुप आणि यूएस-स्थित निकोलासह कंपन्यांच्या बाजार मूल्यांचे गंभीर नुकसान झाले. हिंडेनबर्ग 2017 मध्ये सुरू झाले2017 मध्ये हिंडेनबर्ग सुरू करणारे नॅथन अँडरसन यांनी बुधवारी प्रकाशित झालेल्या एका वेबसाइट पोस्टमध्ये त्यांच्या निर्णयाचे कारण म्हणून कामाचे “खूपच तीव्र आणि कधीकधी सर्वसमावेशक” स्वरूप असल्याचे नमूद केले. नॅथन अँडरसन यांनी एका पत्रात लिहिले आहे की, ‘कोणतीही विशिष्ट गोष्ट नाही – कोणताही विशिष्ट धोका नाही, आरोग्याचा प्रश्न नाही आणि कोणतीही मोठी वैयक्तिक समस्या नाही.’ बंद करण्याची घोषणा “या तीव्रतेमुळे आणि एकाग्रतेमुळे, मी जगाला आणि मला ज्या लोकांची काळजी आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे,” तो म्हणाला. “मी आता हिंडेनबर्गला माझ्या आयुष्यातील एक अध्याय मानतो, मला परिभाषित करणारी मध्यवर्ती गोष्ट नाही,” अँडरसनने त्यांच्या कंपनीच्या अंतिम कल्पनांवर काम केल्यानंतर आणि संशयित पोंझी योजनांबाबत नियामकांना शिफारसी सादर केल्यानंतर सांगितले. आम्ही बुधवारपासून ते बंद करत आहोत. पुढील सहा महिन्यांत, तो हिंडेनबर्ग मॉडेलवरील व्हिडिओ आणि साहित्याच्या मालिकेवर काम करण्याची योजना आखत आहे जेणेकरून इतरांना फर्मने आपला तपास कसा केला हे कळू शकेल. तो म्हणाला, ‘सध्या, मी आमच्या संघातील प्रत्येकाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचावे यावर लक्ष केंद्रित करेन.’ कंपन्यांवर आरोप झाले40 वर्षीय अँडरसन यांनी जानेवारी 2023 मध्ये गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपवर “कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा” केल्याचा आरोप करणारा एक अहवाल प्रकाशित करून आंतरराष्ट्रीय खळबळ उडवून दिली.

Hindenburg Research होणार बंद, संस्थापकांनी केली मोठी घोषणा Read More »

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न

Saif Ali Khan : जिथे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत,जिथे हाई प्रोफाइल व्यक्ती सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलात.. महाराष्ट्राला लागलेली गुन्हेगारीची कीड याला जबाबदार कोण? महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत, हा प्रश्न मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारायला नको का? अशी टीका काँगेस खासदार वर्षा गायकवाड यांनी अभिनेता सैफ अली खान प्रकरणावरून सरकारवर केली आहे. त्यांनी ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. अभिनेता पद्मश्री सैफ अली खान यांच्यावरील चाकू हल्ला अतिशय भयानक आणि धक्कादायक घटना आहे. मुंबईत कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. वांद्रेसारख्या परिसरात एका लोकप्रतिनिधीची गोळ्या झाडून हत्या केली जाते, एका अभिनेत्याच्या घराबाहेर बेछूट गोळीबार होतो आणि आता अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी शिरून त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला जातो.. अशाप्रकारची उघड-उघड दहशत पाहण्यासाठी मुंबई सरावलेली नाही. कायद्याचे पालन करणारे राज्य म्हणून आपण नेहमीच अभिमानानं महाराष्ट्राकडे पाहत आलो. पण आता परिस्थिती खरोखरंच हाताबाहेर जात चालली आहे. गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण?कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की, कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे, ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे. वाढत्या गोळीबाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटना, गुंडांनी मंत्रालयाच्या आवारात रिल्स बनवणं आणि सीएम व डीसीएमसोबत फोटो काढणं, सामाजिक ध्रुवीकरण आणि हिंसेचं राजकारण वाढणं या सर्व गोष्टींमुळे गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती नाहीशी झाली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. राज्याचे गृहमंत्री करताहेत तरी काय? असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

Saif Ali Khan वर चाकूने हल्ला, खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; थेट मुख्यमंत्र्यांना विचारला प्रश्न Read More »

घरात चोरी अन् Saif Ali Khan वर चाकूने वार, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Saif Ali Khan : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात अभिनेता सैफ जखमी झाला आणि त्याला मध्यरात्री मुंबईतील लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सैफवर सहा वेळा चाकूने हल्ला झाला आणि त्याच्या शरीरावर सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत. लीलावती रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैफला दोन ठिकाणी गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या मणक्याजवळही दुखापत झाली आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सैफ अली खानवर हल्ला का झाला?मीडिया रिपोर्ट्सनुसार सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. सुरुवातीला असे म्हटले जात होते की चोरीच्या उद्देशाने एक अज्ञात व्यक्ती घरात घुसली होती, परंतु नंतर वेगळीच माहिती समोर आली. ताज्या वृत्तांनुसार, पहाटे 2 वाजताच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात घुसला आणि त्यांच्या घरातील मोलकरणीशी वाद घालत होता. जेव्हा सैफ दोघांमधील भांडण सोडवण्यासाठी आला तेव्हा त्या माणसाने सैफचे काहीही ऐकले नाही आणि अचानक त्याच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो माणूस पळून गेला आणि सैफ जखमी झाला. लीलावती रुग्णालयात दाखल हल्ल्यानंतर, सैफ अली खानला दुपारी 3.30 च्या सुमारास मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर लगेच उपचार केले. लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी म्हणाले की, सैफला सहा ठिकाणी दुखापत झाली आहे. पाठीच्या कण्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. डॉ. उत्तममणी म्हणतात की सैफवर शस्त्रक्रिया झाली आणि आता त्याची प्रकृती ठीक आहे. वांद्रे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. त्याच वेळी, मोलकरणीची चौकशी केली जाणार असल्याचे समोर येत आहे.

घरात चोरी अन् Saif Ali Khan वर चाकूने वार, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट Read More »

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत वाल्मिक कराडवर मकोका लावला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लागताच परळीमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर आता या प्रकरणात माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा डाव करण्यात येत आहे असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजली कराडने केला आहे. माध्यमांशी बोलताना माझ्या नवऱ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. तसेच आम्हाला मुख्यमंत्री यांच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्या राजकारणासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका निवडणुकीत माझ्या नवऱ्याने तुमचे काम केले आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देता आहे. असं देखील त्या म्हणाल्या. माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाल्या की मनमानी पद्धतीने गुन्हे दाखल करत आहेत. मुख्यमंत्री यांना विनंती आहे की हे थांबवा. घटना घडली त्यादिवशी माझे पती परळीत किंवा जिल्ह्यात नव्हते. वंजारी समाजाचे दोन नेते मंत्री झाले म्हणून डोळ्यात खुपू लागले. बजरंग सोनवणे यांनी माझ्या मिस्टरांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

Valmik Karad : बजरंग सोनवणे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, मंजिरी कराड यांचा खळबळजनक आरोप Read More »

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अद्यावत युद्ध नौकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. भारतीय नौसेनेच्या माहितीनुसार या तीन अद्यावत युद्धनौकांमध्ये, आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर युद्ध लोकांचा समावेश आहे. या तीन युद्धनौका म्हणजे आपल्या देशाची सागरी सुरक्षेतील एक महत्त्वाची झेप असल्याचे भारतीय नौदलाचे म्हणणे आहे. भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, INS निलगिरी हे 17A स्टेल्थ फ्रिगेट प्रकल्पातील पहिले जहाज आहे. भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने त्याची रचना केली आहे. वाढीव क्षमता, समुद्रात जास्त काळ राहणे आणि स्टेल्थ यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांसह ते नौदलात सामील करण्यात आले आहे. हे देशी फ्रिगेट्सच्या पुढील पिढीचे प्रतिनिधित्व करते. INS सूरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचे चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे, ती अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे. INS वाघशिर ही P75 स्कॉर्पीन प्रकल्पातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. INS वाघशिर पाणबुडी बांधणीत भारताच्या वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. हे फ्रेंच नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने बांधण्यात आले असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे. देशाला देणार भक्कम सुरक्षा कवच आयएनएस सूरत आणि आयएनएस निलगिरी या भारतीय नौदलाच्या अतिशय अद्ययावत युद्धनौका आहेत. देशाला हवाई सुरक्षा देण्यास त्या सक्षम असून शत्रूने धाडलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस वाघशीर ही अद्ययावत पाणबुडी देशाच्या मारक क्षमतेत भर टाकणार आहे. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा मारा या पाणबुडीवरून करता येणार आहे. याच श्रेणीतील आयएनएस अरिघात ही पाणबुडी गेल्यावर्षी नौदलात समाविष्ट करण्यात आली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्या दरम्यान, नवी मुंबईतील इस्कॉन श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. नऊ एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात अनेक देवतांच्या देवतांचे मंदिर, वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालय, सभागृह आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले आहे त्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी महायुतीतील सर्व आमदारांशी संवाद साधणार आहे.यात आमदारांचे रिपोर्टकार्ड,मतदार संघातील आढावा त्यासोबत काही प्रश्न देखील पंतप्रधान आमदरांना विचारणार असून त्यानंतर मार्गदर्शन करणार आहे.असल्याची माहिती मिळतं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची आणि नेत्यांची मंगळवारी रात्री बैठक घेतली होती.

PM Modi: पंतप्रधान मोदी आज मुंबईत नौसेनेच्या तीन युद्ध नौकांचे करणार लोकार्पण Read More »