DNA मराठी

आरोग्य

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Health Tips: आज अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी या बिझी लाईफस्टाईल मध्ये रोज सकाळी किंवा रात्री अंडी खातात मात्र आपल्याला हे माहित आहे का ? फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात.    संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे. फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे   फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात.  अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.  बॅक्टेरियांचा धोका अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तापमान  जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो. तुटण्याची भीती  बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या Read More »

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Travel Tips : बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या ग्रुपसह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो. बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या. अतिरिक्त औषधे जवळ बाळगा  आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा.  जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही. आपली स्थिती स्पष्ट करा आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील. अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा. ऑनलाईन माहिती घ्या आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा Read More »

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके

Tattoo Disadvantage : आज अनेकजण स्टायलिश दिसण्यासाठी किंवा जवळच्या मित्रमैत्रिणींनीमुळे शरीरावर  टॅटू काढतात. जर तुम्ही देखील टॅटू काढण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.   परमनंट टॅटू काढणं तुमच्या ह्रदयासाठी महागात पडू शकतं. कारण याबाबत करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, टॅटू काढलेल्या लोकांना ह्रदय समस्या होण्याचा धोका जास्त असतो. याचं कारण असं क टॅटू काढलेल्या त्वचेखालील ग्रंथींचे नुकसान झाल्यामुळे अशा त्वचेवर घाम येत नाही. ज्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहत नाही आणि ह्रदयाचे नुकसान होऊ शकते.  कारण शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहणे फार गरजेचं आहे. जर्नल ऑफ अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार टॅटू काढलेल्या त्वचेवर घाम येण्याची क्षमता कमी होते. टॅटू काढलेल्या त्वचेवर का येत नाही घाम? घाम येणं ही शरीराची एक नैसर्गिक व्यवस्था आहे. कारण घामामुळे तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीच आपल्या शरीरावर रोमछिद्रे असतात. ज्यातून सतत घाम पाझरत असतो आणि घामामुळे तुमचे शरीर थंड होते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.  टॅटू काढल्यामुळे त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींचे नुकसान होते. कारण टॅटू काढताना तुमच्या त्वचेवर एका मिनीटामध्ये जवळजवळ तीन हजारांपेक्षा जास्तवेळा सुई टोचली जाते. त्वचेवर असे वेदन झाल्यामुळे त्वचेखालील ग्रंथीचे नुकसान होते आणि त्यांचे कार्य मंदावते. याचाच परिणाम असा होतो की अशा त्वचेवर घाम कमी प्रमाणात येतो.  घामाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमच्या शरीराचे तापमान वाढत जाते. काही संशोधनात असंही आढळलं आहे की टॅटू काढलेल्या त्वचेवर येणाऱ्या घामात सोडिअमचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ अशा त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू नाही असा होतो.  टॅटूमुळे ह्रदय विकार होण्याची शक्यता वाढते टॅटू काढल्यामुळे तुमच्या त्वचेवर खूप कमी घाम येतो. ज्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या तापमानावर आणि पर्यायाने ह्रदयावर होतो. टॅटू काढलेल्या लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. कारण हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा तुमच्या शरीराचे तापमान जास्त प्रमाणात वाढते.  हार्ट अॅटकमुळे जीवाला धोका असल्यामुळे लवकर उपचार मिळणं गरजेचं असतं. शिवाय जरी अशा परिस्थितीतून रूग्ण वाचला तरी आयुष्यभर त्याचे ह्रदय कमजोरच राहते. म्हणूनच परमनंट अथवा संपूर्ण शरीरावर टॅटू काढून घेणं तुमच्या ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक नाही. त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी टॅटू काढा पण त्यामुळे तुमच्या शरीर आणि आरोग्यावर काही परिणाम होणार नाही याची अवश्य काळजी घ्या.  कारण फक्त फॅशन म्हणून एखादी गोष्ट करण्यापूर्वी त्यामुळे जर तुमच्या आरोग्याचं नुकसान होणार असेल तर याबाबत वेळीच सावध राहणं गरजेचं आहे.

Tattoo Disadvantage : सावधान, टॅटू काढणं पडू शकतं महागात, जाणून घ्या ‘हे’ धोके Read More »

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Ice Cream Benefits : राज्यात आता उन्हाळा सुरू झाला आहे. यामुळे आता राज्यात आंबे, फणसची मागणी वाढली आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?   आरोग्यदायी आईस्क्रिम    आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो.   कॅल्शियम  आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते.  डोळ्यांसाठी फायदेशीर  आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते.  उर्जा स्त्रोत  आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.   रक्ताचा प्रवाह सुधारतो   आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो.  मेटॅबॉलिझम   आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.  स्मरणशक्ती तल्लख  आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते.  वजन घटवणं   वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते.  अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Ice Cream Benefits : काय सांगता, आईस्क्रिम खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे Read More »

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा

Health Tips: राग ही एक फार वाईट गोष्ट आहे ज्यामुळे तुमचा सर्वनाशही होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा तुमचा उत्कर्षच होईल.  परंतु कोणाकोणाचा राग इतका वाढतो की त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व इतरांच्या जीवनावर पडू लागतो, काही लोक त्यांना कधी राग येतो हे मान्यच करत नाहीत आणि त्यांना जेव्हां राग येतो तो नियंत्रणाबाहेर होऊन जातो अशातच ते आपल्या जवळच्या लोकांना नुकसान पोहोचवतात.  आपल्यामधील काहीच मान्य करतात की त्यांचा स्वभाव रागीट आहे. आज आपण जाणणार आहोत की राग येण्यास कसे ओळखावे. राग कसा नियंत्रित करावा यासाठी टिप्स  राग येण्याचे संकेत  जीवनात प्रत्येक क्षण समान नसतो. कधी आनंद तर कधी दुःख सुध्दा येतात जेव्हां नात्यांच्या धाग्यांना रागाने ओढतोड केली जाते त्यात अनेक नात्यांची धागी मात्र तुटून जातात. ती जोडण्यास बराच वेळ लागतो. नातं जितकं मजबुत तितकाच वेळ लागतो तो जोडण्यासाठी. रागाची लक्षणे  धैर्याचा बांध तुटणे. चिडचिडेपणा. अस्वस्थता वाढणे. शंका व संशयी भाव वाढणे. प्रत्येक कारणास दुसऱ्यांना दोषी ठरविणे. अपमान करणे. संबधीत व्यक्तीस कमी लेखणे. वर्तमानात सभोवतालचे भान नसणे. पत्नी मूलबाळ आणि नातेवाईक तुमच्याशी बोलण्यास घाबरतात. हे राग येण्याची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय परिस्थितीनुरूप अनेक कारणांनी राग वाढू शकतो, आपला परिवार, मित्रसंघ, कार्यक्षेत्र आणि आपल्या जवळच्या लोकांमुळे काही विशेष कारणास्तव रागाची निर्मीती होऊ शकते.  रागाच्या उत्पत्तीचे मुळ हे स्वभावात म्हणजेच आपल्या मानसिक तारतम्यांवर अवलंबून असते. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटते की तूम्हाला राग येतो आहे यासाठी तुम्हास स्वतःच स्वतःवर नियंत्रणासाठी विशेष पाउलं उचलावी लागतील. तर मग हा प्रश्न उठतो की रागाचे नियंत्रण कसे करावे. राग नियंत्रित करण्याचे काही महत्वाचे उपाय  1) 10 पर्यंत अंकांची गणना जर तुम्हास समोरच्या व्यक्तीवर राग येत असल्यास त्याच्याशी बोलणे टाळा. त्याच्याशी नजर मिळवू नका व मनात 10 पर्यंत किंवा पुढेही अंकांची गणना खात्रीने सुरू ठेवा.आपले मन पूर्णपणे अंकांच्या उच्चारात केंद्रीत करा. बघा तुमचा राग शांत हातो की नाही यामुळे तुम्हाला रागाबाबत योग्य निर्णय घेण्यास वेळ मिळेल. 2) एक ब्रेक घ्यावा  जर तूम्हाला अशांत करणारा जोरदार राग येत असेल तर ज्याच्याशी तुम्ही वाद घालता आहात त्यापासून दूर जावे व शांत बसून आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा दिसेल. समोरचा व्यक्ती शांत झाला असेल तर त्याच्याशी चर्चा करा किंवा वाटत असेल तर चर्चाही न करता त्याच्याशी बोलणे व संपर्क करणे टाळा. 3) प्राणायाम करून राग घालवा  प्राणायाम व पहाटेचा व्यायाम तसेच पहाटेचे चालणे सुध्दा तुमचा मुड दिवसभरासाठी चांगला करू शकतो, प्राणायामात मन केंद्रीत करण्याचा सराव होतो.  तसेच श्वास केंद्रीत करण्याचा सराव आपणांस राग घालवण्यास मदत करेल. पोहणे, हास्य व्यायाम व चर्चां मुळे तुमचा राग येण्यास बऱ्याच प्रमाणात आळा बसतो. 4) निवांत झोप  कधी कधी कामाची दगदग आणि दगदगीच्या दिनचर्येमुळे मन चिडचिडे होते त्यामुळे राग लवकर येणे साहजिकच आहे, पण त्याचा फायदा कोणताच नाही सर्व नुकसानच आहे. त्यामुळे राग घालविण्यासाठी आपल्या मेंदूला शांत करणे फार जरूरी आहे. त्याकरीता निवांत झोप घेणे फार जरूरी आहे. निवांत झोपेमुळे तुमची मनस्थिती चांगली होते व त्यामूळे व्यक्ती मानसिक दृष्टया तयार ही होतो किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक मानली जाते. रागीट स्वभाव सर्वांनाच अप्रिय आणि व्देषाचा भागी बनतो. रागास दाबून ठेवणे हे फार चुकीचे ठरते व त्यामुळे कोणत्याच समस्येचा उपाय निघत नाही त्याकरीता स्वतःच्या मनातील विचार सर्वांशी जुळवून घ्या तरच रागाचे प्रमाण कमी होईल.  प्रत्येकाचे बोलणे ऐका व त्यास आपली बाजू प्रेमाने समजावून सांगा, न पटल्यास चर्चा करा त्याने नक्कीच कोणता ना कोणता योग्य पर्याय समोर येईल. तर ह्या काही सोप्या आणि छोट्याश्या टिप्स जे आपल्याला मदत करतील रागावर नियंत्रण ठेवायला.

Health Tips: लवकर राग येतो का? ‘ह्या’ टिप्स फॉलो करा आणि रागावर नियंत्रण मिळवा Read More »

Medicine Price Down: महागाईत मिळणार दिलासा!  ‘ही’ औषधे होणार स्वस्त; वाचा सविस्तर

Medicine Price Down : देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत सर्वसामान्यांना आता एक दिलासादायक बातमी मिळणार आहे. या बातमीनुसार आता देशात काही महागड्या औषधे स्वस्त होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी एकूण 69 फॉर्म्युलेशनच्या किमती निश्चित केल्या आहेत. आता ही औषधे निश्चित किंमतीपेक्षा जास्त विकता येणार नाहीत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीच्या नवीन अधिसूचनेनुसार आता 69 औषधे स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत. 69 फॉर्म्युलेशनसाठी निर्णय घेण्यात आला आहे NPPA ने 31 औषधांच्या आणि 69 फॉर्म्युलेशनच्या कमाल किमती निश्चित केल्या आहेत.  या अधिसूचनेनुसार, मधुमेह, वेदनाशामक औषधे, ताप, हृदयविकार, सांधेदुखीची औषधे आणि 4 विशेष वैशिष्ट्यांच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यात येणार आहेत. कोणती औषधे स्वस्त असतील झी न्यूजच्या वृत्तानुसार, अँटिटॉक्सिन, कोलेस्ट्रॉल, साखर, वेदना, ताप, संसर्ग, रक्तस्त्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी3 आणि मुलांसाठी अँटीबायोटिक औषधे स्वस्त होतील. या आदेशाची अंमलबजावणी कशी होणार? नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहिला जाईल. डीलर नेटवर्क नवीन किमतींबद्दल माहिती देईल. कंपन्यांनी त्यासाठी पैसे भरले असतील तरच ते निश्चित किंमतीवर जीएसटी वसूल करू शकतील. NPPA चे काम काय आहे? NPPA ची स्थापना 1997 मध्ये झाली. ही संस्था फार्मा उत्पादनांच्या किमती ठरवते. औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवते आणि औषधांच्या किमतींवर लक्ष ठेवते.

Medicine Price Down: महागाईत मिळणार दिलासा!  ‘ही’ औषधे होणार स्वस्त; वाचा सविस्तर Read More »

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Tips: कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठून कोमट पिण्याचा सल्ला तर आपण अनेकांकडून ऐकला असेलच.  कोमट पाण्यात सर्व शारीरिक कार्य व्यवस्थित पद्धतीने पार पाडण्याची क्षमता असते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायद्याचे आहे. झोपताना अनेक लोक पाणी पिणे टाळतात परंतू कोमट पाणी पिण्याने आरोग्यही चांगलं राहतं आणि शांत झोप देखील लागते. योग्य रित्या होईल पचन कोमट पाणी पचन तंत्रात अवांछित अन्नाला योग्य पचन दिशेत घेऊन जाण्यात मदत करतं. रात्री आपले पचन तंत्र सर्वात कमजोर अवस्थेत असतं अशात कोमट पाणी पिण्याने अन्न लवकर पचण्यात मदत मिळते. वजन कमी होण्यास मदत मिळेल आमचे पचन तंत्र रात्री मजबूत अवस्थेत नसतं. अशात कोमट पाण्यामुळे आहार लवकर पचवण्यात मदत मिळतं. ज्याने वजन कमी होण्यात मदत मिळते. काळजी आणि उदासीनता दूर होईल शरीरात पाण्याची कमी ताण निर्माण होतं. यामुळे झोप देखील प्रभावित होते. दिवसाच्या शेवटी कोमट पाण्याचे सेवन केल्याने शरीरात जल स्तराचे प्रमाण योग्य राहील आणि आपली मन देखील प्रसन्न राहील. विषारी पदार्थांपासून मुक्ती कोमट पाणी शरीराचे आंतरिक तापमान वाढवतं आणि घाम निर्माण करतं ज्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत राहतं आणि शरीराला विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळते. सौंदर्यात वाढ झोपण्यापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचेचं सौंदर्य वाढतं.

Health Tips: झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्या, मिळणार ‘हे’ जबरदस्त फायदे Read More »

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा

Health Tips : टायफाइडमध्ये लोकांना तापाबरोबरच डोकं दुखी, छातीत जळजळ सारख्या समस्यांना सामोरी जावं लागतं. यामुळे या लेखात जाणून घ्या कश्या प्रकारे सुटका मिळवता येईल. टायफाइडच्या तापाला मियादी ताप म्हणजे अधून -मधून येणारा ताप देखील म्हणतात. टायफाइडचा ताप पचन तंत्राच्या आणि रक्तप्रवाहातील असलेल्या साल्मोनेला टायफी नावाच्या एका बॅक्टेरिया मुळे होतो हा घाणपाणी आणि संक्रमित खाण्यामुळे आपल्या शरीरात शिरकाव करतो.  या आजारात संक्रमित झालेल्या माणसाचं शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाईट पर्यंत पोहोचतो. टायफाइड पासून मुक्त होण्याचे काही घरघुती उपचार. टायफाइडची लक्षणे  ताप येतो भूक लागत नाही डोकं दुखणं थंडी जाणवते जास्त अशक्तपणा जाणवणं अतिसाराची समस्यां छातीत जळजळ होणं बद्धकोष्ठता होणं टायफाइड पासून मुक्त होण्यासाठी काही घरघुती उपचार  तुळस  तुळस आणि सूर्यमुखीच्या रसला काढून प्यायलानं आपणास फायदा होणार. या व्यतिरिक्त एका भांड्यात पाणी आणि थोडी तुळशीचे पान टाकून उकळवून घ्या. दिवसातून 3 ते 4 वेळा असेच पिऊन घ्या. सफरचंदाचा रस सफरचंदाचा रस टायफाइडच्या समस्येपासून मुक्त करू शकतो. या साठी आपण सफरचंदाच्या रसात आल्याचं रस मिसळून प्या. असे केल्यानं आपल्याला टायफाइडच्या तापापासून आराम मिळेल. लसूण लसूण अँटिबायोटिक, अँटिऑक्सिडंट असण्यासह उष्ण प्रकृतीचा आहे. यासाठी साजूक तुपात 6 -7 पाकळ्या लसणाच्या तळून घ्या. यामध्ये सेंधव मीठ घालून खावं. लवंग लवंग देखील या आजारापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहे. या साठी आठ कप पाण्यात 6 ते 7 लवंगा टाकून उकळवून घ्या. पाणी अर्ध झाल्यावर याचे सेवन दिवसभर करावं. असे केल्यानं टायफाइड मुळे आलेला अशक्तपणा देखील कमी होणार. मध मधात अँटिव्हायरल, अँटीबॅक्टीया, अँटीऑक्सीडेंट सारखे गुणधर्म आढळतात. कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावं. या मुळे आपणास आराम मिळेल.

Health Tips: टायफाइड असल्यास, ‘हे’ उपाय करा! होणार फायदा Read More »

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या

Hair Dryer : केस कोरडे करावयाचे आहे मग उन्हात कोरडे कारणे हे चांगले पर्याय आहे. पण जर हवामान ढगाळी पावसाळी किंवा थंडीचे असेल केसांना कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करावा लागतो.  जर आपण नियिमतपणे ड्रायरचा वापर करता तर मग या पासून होणारे तोटे आणि खबरदारी बद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. केसांना नवीन स्टाइल देण्यासाठी हेयर ड्रायर वापरतात पण ह्याच्या पासून होणारे तोटे देखील त्वरितच दिसून येतात.  हेयर ड्रायरचा अत्यधिक वापर केसांच्या नैसर्गिक सौंदर्याला काढून टाकतो. तर ह्याच्या दररोज वापर केल्याने केसांमध्ये कोंडा होणं, क्लिडेंट, निस्तेज आणि कोरडे होणं सारख्या समस्या वाढतात. या मुळे केस रुक्ष आणि निर्जीव होऊन तुटू लागतात.  या पासून तोटे होण्याचे एक कारण म्हणजे या मधून निघणारी उष्णता आहे जी केसांच्या मुळाला नुकसान देते आणि केसांना दोनतोंडी करते.  खबरदारी काय घ्यावयाची  हेयर ड्रायरचा वापर करताना हे लक्षात ठेवा की केसांपासून याची दुरी 6 ते 9 इंच असावी. असे केले नाही तर केसांमध्ये कोरडेपणा वाढेल आणि ते लवकर तुटू लागतील. ड्रायरचा वापर करण्याच्या पूर्वी केसांमध्ये नरिशमेंट सीरम लावावे, जेणे करून ड्रायरच्या उष्णतेमुळे केसांना काहीही नुकसान होऊ नये आणि केस मऊ व्हावे. आपल्या केसांच्या प्रकारानुसार हेयर ड्रायरचा वापर करणे योग्य राहील. जसे की केस कुरळे आहे, रुक्ष आहे, मऊ आहेत किंवा रेशमी आहेत, त्यानुसार आपल्याला तापमान किंवा वेळेची आवश्यकता असेल. ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडीशनींग करणे विसरू नका. बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे न वापरल्यामुळे केस कोरडे होण्यासह गुंततात, या मुळे ते तुटतात. रुक्ष आणि कोरड्या केसांमध्ये शक्य असल्यास कमी ड्रायर वापरा किंवा कोल्ड ड्रायर वापरा कारण या मध्ये आयन असतात जे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या हवेत उष्णता कमी असते. जर आपल्यासाठी हेयर ड्रायरचा वापर करणे आवश्यक आहे तर केसांना नियमितपणे तेल लावा, जेणे करून केसांना पुरेशे पोषण मिळेल. ड्रायरचा जास्त वापर केल्याने हे केसांमधील पोषण काढतो. केस बळकट आणि पोषित ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या आहारात आवळा, हिरव्या पालेभाज्या, ज्यूस, दही इत्यादी समाविष्ट करावे जेणे करून केसांना पोषण मिळेल.

Hair Dryer: हेयर ड्रायर वापरत असाल तर ‘या’ 7 गोष्टींची काळजी घ्या Read More »