DNA मराठी

आरोग्य

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर…

Coffee Side Effects : जर तुम्ही देखील जेवण करण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर चहा किंवा कॉफी घेत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेल्या चहा आणि कॉफीच्या सेवनात संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अलीकडेच, ICMR ने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) च्या सहकार्याने भारतभर निरोगी खाण्याच्या सवयींना चालना देण्याच्या उद्देशाने 17 नवीन आहार मार्गदर्शक तत्त्वे सादर केली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे वैविध्यपूर्ण आहार आणि सक्रिय जीवनशैलीच्या महत्त्वावर विशेष भर देतात. चहा आणि कॉफीचे सांस्कृतिक महत्त्व मान्य करताना वैद्यकीय तज्ज्ञांनी अतिसेवनाच्या संभाव्य आरोग्य धोक्यांचा इशारा दिला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधकांनी नोंदवले की चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असते, जे मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करते आणि शारीरिक अवलंबनास कारणीभूत ठरते. म्हणून, ICMR ने त्यांच्या वापरामध्ये संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वे लोकप्रिय पेयांमध्ये कॅफीन सामग्री देखील हायलाइट करतात. 150 मिली ब्रूड कॉफीमध्ये 80-120 मिलीग्राम, इन्स्टंट कॉफीमध्ये 50-65 मिलीग्राम आणि चहामध्ये 30-65 मिलीग्राम कॅफिन असते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आरोग्यावर संभाव्य नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी दररोज कॅफिनचे सेवन 300 mg पर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करते. वैद्यकीय संस्था जेवणाच्या किमान एक तास आधी आणि नंतर चहा किंवा कॉफी टाळण्याची शिफारस करते, कारण त्यात टॅनिन असतात, ज्यामुळे शरीरातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते. टॅनिन पोटात लोहाशी बांधतात आणि ते शोषून घेणे कठीण करतात, ज्यामुळे लोहाची कमतरता आणि ॲनिमिया सारख्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकृती देखील होऊ शकतात.

Coffee Side Effects : जेवण करण्यापूर्वी किंवा नंतर चहा-कॉफी घेत असाल तर सावधान, नाहीतर… Read More »

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला

Ahmednagar News:  कोविड संकट ही संधी मानून देशातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली झाले. प्रत्‍येक सामान्‍य माणसाला घराजवळच आरोग्‍य सुविधांचा लाभ मिळण्‍यासाठी त्‍यांनी घेतलेला प्रत्‍येक निर्णय आज कृतीत उतरल्‍याचे चित्र पाहायला मिळत असल्‍याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.  इंडियन मेडीकल असोशिएशन, निमा यांच्‍यावतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सर्व डॉक्‍टर्स, फार्मासिस्‍ट, पॅथोलॉजिस्‍ट यांच्‍याशी संवाद साधला. खा.डॉ.सुजय विखे पाटील, आ.संग्राम जगताप, भाजपाचे अध्‍यक्ष अभय अगरकर, विनायक देशमुख, इंडियन मेडीकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ.मिलींद पोळ, सेक्रेटरी सचिन पंडुळे, डॉ.रविंद्र साताळकर, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ.प्रकाश कांकरीया, केमीस्‍ट असोसिएशनचे अध्‍यक्ष दत्‍ता काडळकर, लॅब असोसिएशनचे अध्‍यक्ष निनाद आकोलकर आदि याप्रसंगी उपस्थित होते.  केंद्र आणि राज्‍य सरकारने आरोग्‍य विषयक निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली आहे. आयुष्‍यमान भारत योजनेचा मोठा दिलासा मिळाला असून, राज्‍य सरकारनेही महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना आता नव्‍या बदलाच्‍या स्‍वरुपात सुरु केली आहे. यामध्‍ये येणा-या त्रृटी दुर केल्‍या जातील. कोव्‍हीड नंतर आरोग्‍य सुविधा अधिक परिपुर्ण कशा होतील यासाठीच मोठी गुंतवणूक आता करण्‍यात येत असून, देशाच्‍या स्‍वातंत्र्यानंतर पहिल्‍यांदाच आरोग्‍य सेवेला विकासाच्‍या प्रक्रीयेशीजोडण्‍याचे महत्‍वपूर्ण काम मागील दहा वर्षात झाले असल्‍याचे ना.विखे पाटील यांनी सांगितले.  जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेमध्‍ये सुध्‍दा आरोग्‍य सुविधेला प्राधान्‍यक्रम आहेच, या बरोबरीनेच जिल्‍ह्यामध्‍ये रोजगार निर्मितीही औद्योगिक आणि पर्यटन विकासातून होवू शकते यासाठी आता जिल्‍ह्याचा विकास आराखडाही तयार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  जिल्‍ह्याला साहित्‍य, कला, संस्‍कृतीचा मोठा वारसा आहे, त्‍या दृष्‍टीन नॅशनल स्‍कुल ऑफ ड्रामाच्‍या धर्तीवर एखादी शाखा सुरु करतानाच शहरातील वाडीया पार्कला अंतरराष्‍ट्रीय चेहरा मिळवून देण्‍यासाठी निश्चित प्रयत्‍न होईल अशी ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

Ahmednagar News: आरोग्‍य व्‍यवस्‍थेला विकास प्रक्रीयेशी जोडण्याचे महत्‍वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला Read More »

Health Tips: सावधान, दुधासोबत ‘हे’ 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी ठरणार हानिकारक

Health Tips : दूध पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले गेले आहे कारण दुधात पोषक तत्त्व जसे कॅल्शियम, प्रोटीन इतर आढळतात ज्याने शारीरिक विकास होण्यास मदत होते. परंतू दुधाचे सेवन करताना यासोबत कोणते असे पदार्थ आहे जे आहारात सामील करू नये जाणून घेणे तेवढंच महत्त्वाचं आहे कारण अशात आरोग्यावर विपरित परिणाम देखील होऊ शकतो. नमकीन मीठ आणि दूध याचे सोबत सेवन करणे चुकीचे आहे कारण अशात लिव्हरसंबंधी त्रास उद्भवण्याची शक्यता असते. दुधात प्रोटीन आणि मिठात आयोडीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचा विपरित प्रभाव लिव्हरवर पडतो. केळी अनेक लोक वजन वाढवण्यासाठी दुधासोबत केळी खातात परंतू दूध आणि केळ शेक या रूपात घेतल्यास फायदा होतो परंतू ज्यांना फक संबंधी तक्रार असेल त्यांनी याचे सेवन करणे टाळावे. कच्चा कांदा दूध पिण्यानंतर किंवा आधी लगेच कच्चा कांदा खाल्ल्याने त्वचा संबंधी समस्या उद्भवू शकते. स्किन इन्फेक्शन, खाज इतर समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. मासे मासे खात असल्यास त्यासोबत दूध किंवा दुधाने तयार कोणतेही पदार्थ खाणे टाळावे. नाहीतर त्वचेवर पांढरे डाग पडू शकतात. मसालेदार पदार्थ मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यावर लगेच दूध पिण्याने पचन तंत्रावर विपरित परिणाम होतो. जेवण पचण्यास त्रास होत असून पोट दुखी, जळजळ, गॅस सारख्या समस्यांना सामोरा जावं लागतं. उडद डाळ अनेक लोक रात्री उडीद डाळीचे सेवन केल्यावर दूध पितात. परंतू असे केल्याने अन्न पचायला त्रास होतो. सोबतच पोटाशी निगडित समस्यांना सामोरा जावं लागतं. आंबट पदार्थ दूध पिण्यानंतर लगेच दही, लिंबू किंवा इतर आंबट फळं खाल्ल्याने अपचन होतं. पोटात दूध फाटल्यामुळे अॅसिडिटी, उलटी किंवा मळमळणे अश्या समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.

Health Tips: सावधान, दुधासोबत ‘हे’ 7 पदार्थ चुकून खाऊ नये, आरोग्यासाठी ठरणार हानिकारक Read More »

Detox Tea : ‘या’ चहाच्या मदतीने किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करा

Detox Tea : निरोगी राहण्यासाठी शरीर आतून स्वच्छ आणि बळकट असणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाने शरीर स्वच्छ राखण्यास मदत होते. मूत्रपिंडाची कार्यक्षमता उत्तम ठेवण्यासाठी वेळोवेळी डिटॉक्स करणं आपली जबाबदारी आहे. या लेखात आम्ही आपल्याला सांगणार आहोत हर्बल चहाबद्दल ज्याचा नियमित सेवनाने आपण आपल्या यकृत आणि मूत्रपिंडाला डिटॉक्स करू शकता. मूत्रपिंड आणि यकृताला डिटॉक्स करण्यासाठी चहा  जास्वंदाचा चहा जास्वंदाचा चहा आपल्या यकृताला निरोगी आणि सुरक्षित ठेवून अनावश्यक घटक बाहेर काढण्यास मदत करतं. याचे नियमाने सेवन केल्याने यकृताच्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. दालचिनीचा चहा दालचिनीचा चहा मूत्रपिंड आणि यकृताला स्वच्छ म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. याने आपण आपल्या सकाळची सुरुवात करू शकतात. बीटाचा चहा बीटाचा चहा एक चांगला मूत्रपिंड क्लींजर आहे आणि हे आपल्या यकृताच्या आरोग्याला सुधारतो. बीटाचा रस अँटीऑक्सीडेंटने समृद्ध असतं. जे मुक्त रॅडिकल्स काढून टाकतो. हा मूतखडा सारख्या आजारावर फायदेशीर आहे. औषधी गुणधर्माने समृद्ध असलेल्या हळदीचे सेवन केवळ मूत्रपिंडांना डिटॉक्स करण्यातच मदत करीत नाही तर या मुळे सूज येणं देखील कमी होते. हळद रक्तदाब कमी करते, जे मूत्रपिंडाच्या आजाराचे मुख्य कारण आहे. इतकेच नव्हे तर हे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. परंतु उन्हाळ्यात हळदीचा चहा शरीरात जास्त उष्णता वाढवू शकतो, म्हणून उन्हाळ्यात याचे सेवन न करणेच योग्य मानले जाते.

Detox Tea : ‘या’ चहाच्या मदतीने किडनी आणि लिव्हरला डिटॉक्स करा Read More »

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर ….

Biscuits Side Effects : डायजेस्टिव बिस्टिकटच्या जाहिराती आपल्याला जेवणामधील जास्त कळाचं अंतर व भूक सहन करण्याच्या सवयीवरून घाबरवतात.  यापासून बचाव करण्यासाठी डायजेस्टिव बिस्किट चांगला पर्याय असल्याचं सांगितलं जातं. शुगर, फॅट व सोडियम फ्री असल्याचा दावा करणा-या बिस्किटामध्ये खरं तर खूप प्रमाणात साखर, फॅट, सोडियम व रिफाइंड पीठ असतं. शिवाय चविष्ट लागावं म्हणून यामध्ये केमिकलयुक्त टेस्ट इनहेंसर देखील वापरलं जातं. यामध्ये वापरली जाणारी सामग्री आपल्या आरोग्यावर काय परिणाम करते आणि खरंच ही बिस्किटं आरोग्यासाठी लाभदायक असतात का? डायजेस्टिव बिस्किट खरं तर डॉक्टर्सच्या सल्ल्यावरून जुलाब  व खराब डायजेशनमधून जाणा-या रुग्णांसाठी बनवली गेली आहेत.  बाजारात मिळणा-या इतर बिस्किटांच्या तुलनेत डायजेस्टिव बिस्किटात फायबरयुक्त, प्रोटीन, व्हिटॅमिन व मिनरल असण्यासोबतच कोलेस्ट्रॉल व फॅट फ्री असल्याचं सांगितलं जातं व नाश्ता किंवा चहासोबत खाण्याचा सल्ला दिला जातो.  ही बिस्किटं मधुमेहांच्या  रुग्णांसाठी किंवा यापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त असल्याचं समजलं जातं. ग्लुटेनची मात्रा करू शकते घात बेकरी आयटम्स मैद्यापासून बनलेले असतात. डायजेस्टिव बिस्किटात मैद्याऐवजी गव्हाच्या पीठाचा वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. या गव्हाच्या पीठात ग्लुटेन असतं. वेगवेगळ्या ब्रॅंडच्या डायजेस्टिव बिस्किटांमध्ये ग्लुटेनची मात्रा देखील वेगवेगळ्या प्रमाणात वापरली जाते.  जर तुम्हाला ग्लुटेनची अ‍ॅलर्जी असेल तर हे बिस्किट तुमच्यासाठी लाभदायक नाही. ग्लुटेनच्या अतिप्रमाणात केलेल्या सेवनाने पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडीटी, डायरिया व जुलाब यांसारख्या समस्या होऊ शकतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे नुकसान डायजेस्टिव बिस्किटांच्या पाकिटावर फॅट फ्री असं लिहिलेलं असतं. पण यामध्ये सॅच्युरेटेड फॅट व फॅटच्या दुस-या पर्यायांचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅटचं सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल व गैस्ट्रोइंटेस्टाइनलशी निगडीत आजारांचं शिकार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जरी ही बिस्किटं तुम्ही खात असाल तरी मर्यादीत प्रमाणात सेवन करणे कधीही उत्तम. प्रिजरव्हेटिव्हसचा भडिमार बाजारात डायजेस्टिव बिस्किटाला खूप मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी इतर बिस्किटांप्रमाणेच यामध्ये प्रिजरव्हेटिव्हस मिसळले जातात. जेणे करून बिस्किटं बराच काळ खराब न होता टिकून राहतील. सोबतच सुगंधासाठी यामध्ये इसेंस टाकणंही मजबूरी असते.  आता ही बिस्किटं तुमच्यासाठी लाभदायक आहेत की नुकसानकारक, हे त्यामध्ये मिसळलेल्या प्रिजरव्हेटिव्हसच्या प्रमाण व क्वालिटीवरच अवलंबून असते. हे प्रिजरव्हेटिव्हस व इसेंस शेवटी केमिकलच आहेत. शुगरलेस नाही डायजेस्टिव बिस्किट हे दुस-या बिस्किटांच्या तुलनेत कमी गोड असतात. पण यामध्ये नैसर्गिक स्वीटनर्ससोबतच साखरेचाही वापर केला जातो. याचाच अर्थ ही बिस्किटं शुगरलेस नाहीत. ही बिस्किटं खालल्याने तुम्ही नकळतच एक्स्ट्रा साखरेचं सेवन करता. त्यामुळे जर यातील साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर लठ्ठपणा, ह्रदयाशी निगडीत आजार व डायबिटीज सारख्या आजारांचा धोका कमी होताना दिसतच नाही. सोडियममुळे होऊ शकतात समस्या बिस्किटाचा स्वाद वाढवण्यासाठी व हलकंसं नमकिन बनवण्यासाठी यामध्ये सोडियम मिक्स केलं जातं. सोडियमचं जास्त प्रमाण हाय ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन व स्ट्रोक सारख्या जीवघेण्या आजारांचं कारण बनतं. प्रत्येक आजार व रुग्ण वेगवेगळा असतो. त्यामुळे कोणताही पदार्थ डोळे झाकून सेवन करण्याआधी ते बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या सामग्रीची माहिती लक्ष देऊन वाचा. डायजेस्टिव बिस्किटाऐवजी ड्रायफ्रुट्स, स्प्राऊट्स आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करावा.  यासोबतच भात, साबुदाणा किंवा कोकोनट बिस्किटं किंवा असे पदार्थच खा जे कोणत्याही प्रकारचं नुकसान, अ‍ॅलर्जीपासून बचाव करून आरोग्यास फायदे मिळवून देईल.

Biscuits Side Effects : हेल्दी समजून अतिप्रमाणात करू नका ‘या’ बिस्किटांचे सेवन, नाहीतर …. Read More »

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा

Kitchen Tips : आपल्याला चकचकीत स्वयंपाकघर आवडतं पण याला चकचकीत करण्यासाठी लागणारी मेहनत आणि एनर्जीचा वैताग येतो.  त्यासाठी आम्ही आपल्याला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याला अवलंब करून आपण आपल्या स्वयंपाकघराला स्वच्छ आणि चकचकीत ठेवू शकता.  स्वयंपाकघराची स्वच्छता करणं म्हणजे अक्षरशः थकवा येतो. आपण तासंतास आपला वेळ स्वयंपाकघरात घालवतात. दररोज स्वच्छ करून देखील बघा तेव्हा किचन घाण आणि पसरलेलंच असत. हे बघून फार चिडचिड होते.  या लेखमध्ये आम्ही आपल्याला काही अश्या सोप्या टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपल्याला किचन स्वच्छ करणं सहज आणि सोपं वाटेल.  किचनच्या टाइल्स  उष्णता आणि स्वयंपाक केल्यामुळे टाइल्स चिकट आणि घाण होतात. हे स्वच्छ करणं म्हणजे मोठा प्रश्न असतो. टाइल्स लहान असो किंवा मोठे ते घाण होतातच. आता ह्यांना स्वच्छ करणं सोपं आहे. काय करावं  एका स्प्रेच्या बाटलीत 1 कप व्हिनेगर सह 1 ¼ कप बेकिंग सोडा मिसळा. आता टाइल्सवर या लिक्विडचा स्प्रे करून टूथब्रशने घासून घ्या.  घाण निघत नसल्यास या घोळात ½ कप लिक्विड साबण मिसळा  आपल्या किचनच्या वेंटला नवे बनवा आपल्या किचनच्या वेंट मध्ये सर्वात जास्त तेल जमा होतं. हे गॅस च्या वर असल्यामुळे उष्णतेमुळे तेल लवकर एकत्र करते. काय करावं   एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात पाणी तापत ठेवा आणि वेंट बाहेर काढा.  हळू हळू या मध्ये ¼ कप बेकिंग सोडा मिसळा थोड्याच प्रमाणात मिसळा. या मिश्रणाला 60 सेकंद पर्यंत उकळू द्या. आपल्याकडे लहान भांड असल्यास त्याला पालटी करा आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक बाजू 60 सेकंदासाठीच घोळात असावी.  चॉपिंग बोर्डाची स्वच्छता  लाकडाचे बोर्ड कापण्यासाठी आणि चॉप करण्यासाठी चांगले असतात. पण त्यांचा पृष्ठभाग सच्छिद्र असल्यामुळे त्याचा वर त्वरितच डाग पडतात आणि त्यामधून वास येऊ लागतो. काय करावं बोर्ड वर मीठ भुरभुरा. एक लिंबू घ्या त्याला अर्ध चिरून घ्या.  आता या लिंबाने बोर्डाला मागून पुढून पुसून घ्या डाग आणि वास नाहीसे होतील. जळालेले भांडे स्वच्छ करणं आपण गॅसवर दूध ठेवून विसरून गेला आहात किंवा आपण साखरेला केरॅमल बनविण्याचा प्रयत्न केला असाल आणि साखर भांड्याला चिटकली असल्यास, परिणाम भांडंं जळतंं. तर काही उपाय करून आपण जळालेल्या भांड्यांना स्वच्छ करू शकता. काय करावं   जळालेल्या भांड्यात 1 कप पाणी आणि 1 कप व्हिनेगर घाला. या घोळाला उकळू द्या. उकळल्यावर भांड सिंक मध्ये ठेवा आणि या मध्ये 2 चमचे बेकिंग सोडा घाला.  आता मिश्रण जमणे बंद झाल्यास कंटेनर रिकामे करा आणि कडक स्पॉंजने स्वच्छ करा. जळालेले भांडे स्वच्छ झाले नसल्यास अतिरिक्त बेकिंग सोडा घाला.  स्वयंपाकघरातील स्पॉंज स्वच्छ करावं स्वयंपाकघर स्वच्छ करताना आपण स्पॉंज स्वच्छ करायला विसरतो, ज्यामुळे बॅक्टेरिया एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी जातात. म्हणून दिवसातून एकदा तरी ह्याची स्वच्छता करावी. काय करावं   स्पॉंज मऊ करण्यासाठी आणि त्यामधून घाण आणि तेल काढण्यासाठी स्पॉंज एक ग्लास पाण्यासह काही मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.  जळालेले गॅस बर्नर स्वच्छ करणे  बऱ्याचदा जळालेले स्टोव्ह किंवा बर्नर गरम असल्यामुळे आपण स्वच्छ करतं नाही पण यासाठी सर्वात उत्तम उपाय अमोनिया आहे जे उत्तम ग्रीस रिमूव्हर आहे. म्हणून आपल्या गॅस बर्नरच्या सभोवताली ग्रीसचे डाग काढण्यासाठी याचा वापर करावा. काय करावं  एका झिपलॉक बॅगेत ¼ कप अमोनिया घाला. या पेक्षा जास्त टाकू नका. या मध्ये आपल्या गॅस बर्नरला टाकून ठेवा आणि बॅग लॉक करा. बर्नरला किमान 8 ते 9 तास असेच पडू द्या. स्पॉन्जच्या मदतीने पुसून घ्या.

kitchen Tips :  चकचकीत स्वयंपाकघर हवे असल्यास ‘या’ 6 टिप्स अवलंबवा Read More »

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे

Clove Tea : दिवसाची सुरुवात असो किंवा कोणतंही शारीरिक, मानसिक काम केल्यानंतर आलेला थकवा असो एक कप कडकडीत चहा प्यायला की सगळी मरळ दूर होते आणि  मस्त तरतरी येते. त्यामुळे चहा हे अनेकांच्या आवडतं पेय आहे.  पूर्वी चहा हा अत्यंत साध्या पद्धतीने केला जात होता. मात्र, आता या चहामध्ये सुद्धा नवनवीन फ्लेवर मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे गृहिणी साधाच चहा हटके पद्धतीने तयार करत त्याला एक नवीन चव देतात. त्यामुळेच साध्या चहापेक्षा मसाला चहा, आल्याचा चहा, गवतीचहा, ब्लॅक टी, लेमन टी असे अनेक चहा लोकप्रिय होत आहे.  परंतु यासोबतच लवंगांचा चहा सुद्धा सध्या लोकप्रिय होत असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी आहे. त्यामुळे लवंगांचा चहा कसा करायाच आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात. 1. श्रमाची काम केल्यामुळे किंवा आजारपणामुळे अंग दुखत असल्यास लवंगांच्या चहामुळे थकवा दूर होतो व आराम मिळतो. 2. अॅसिडीटीचा त्रास होत असल्यास दूर होतो व अन्नपचन व्यवस्थित होते. 3. दातदुखी दूर होते. 4. किरकोळ ताप येत असेल तर लवंगांचा चहा प्यावा. 5. सर्दी-खोकला दूर होतो. 6.डोकेदुखीपासून आराम मिळतो.  लवंगांचा चहा कसा कराल? 4-5 लवंगा घेऊन त्यांची बारीक पूड करा. त्यानंतर चहासाठी पाणी ठेवल्यावर त्यात 1 लहान चमचा तयार लवंगांची पूड टाका. लवंगांची पूड टाकलेलं पाणी 10 मिनीटं उकळवा व पाण्याला एक उकळी आल्यावर त्यात चहा पावडर टाका. त्यानंतर हा चहा गाळून घ्या. अशा प्रकारे लवंगांचा चहा तयार. ( आवड असल्यास साखर घालावी.)

Clove Tea : लवंगांचा चहा कधी प्यायला नाही? मग जाणून घ्या ‘हे’ फायदे Read More »

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क

Health Tips: आहाराद्वारे शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. अंडे की पनीर? यापैकी कोणत्या पदार्थाद्वारे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात, जाणून घेऊया याबाबतची माहिती. पनीर आणि अंडे, दोन्हींमध्येही शरीरास आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अंडे व पनीर, दोन्ही पदार्थ प्रोटीनचा उत्तम स्त्रोत मानले जातात. शाकाहार करणाऱ्यांना पनीरपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं भरपूर आवडते. तर मांसाहार व डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्ती आपल्या आहारामध्ये अंड्याचा आवर्जून समावेश करतात. पनीरमध्ये पोषक तत्त्वांचा खजिना आहे. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी चे घटक आहेत. दरम्यान प्रोटीनमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते शिवाय स्नायू मजबूत राहण्यासाठीही शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीनचा पुरवठा होणे गरजेचं आहे.  अंडे आणि पनीर, दोन्हींमध्येही भरपूर प्रमाणात आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे? दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो? दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास 100 ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा 14 ग्रॅम इतकी असते. तर 100 ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण 14 ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे. पनीर आणि अंड्याची तुलना अंडे आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते. हाडे बळकट होतात पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते. या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात.  याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते. त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

Health Tips: अंडे की पनीर,कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या व्हाल थक्क Read More »

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या

Health Tips: आज अनेकजण स्वतःला फिट ठेवण्यासाठी या बिझी लाईफस्टाईल मध्ये रोज सकाळी किंवा रात्री अंडी खातात मात्र आपल्याला हे माहित आहे का ? फ्रीज मध्ये ठेवलेले अंडी हे आपले आरोग्य बिघडवू शकतात.    संसर्ग होण्याचा धोका बऱ्याच वेळा अंडींच्या सालांवर बाहेरची घाण लागलेली असते. ज्यामुळे फ्रीज मध्ये ठेवल्याने इतर पदार्थांमध्ये देखील संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हेच कारण आहे की अंडी फ्रीज मध्ये ठेवणे टाळावे. फ्रीज बाहेर ठेवलेली अंडी जास्त आरोग्यवर्धक आहे   फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी बाहेरच्या अंडींपेक्षा जरी जास्त दिवस चांगले राहत असेल तरी फ्रीज मध्ये ठेवलेली अंडी जास्त थंड झाल्यामुळे आपले पोषक घटक गमावतात.  अशा परिस्थितीत जर आपण आरोग्याबद्दल सज्ज आहात तर हे जाणून घ्या की खोलीच्या तापमानात ठेवलेली अंडी, फ्रीज मध्ये ठेवलेल्या अंडींच्या तुलनेत जास्त आरोग्यदायी आहे.  बॅक्टेरियांचा धोका अंडींना फ्रीज मध्ये ठेवल्यावर त्यांना सामान्य तापमानात ठेवल्याने कंडेनसेशन म्हणजे गॅस मधून द्रव होण्याची प्रक्रिया ची शक्यता वाढते. कंडेनसेशनमुळे अंडींच्या सालींवरील असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतच नाही तर अंडींच्या आत देखील प्रवेश करू शकतात. अश्या अंडींचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तापमान  जर आपण अंडींचा वापर बेकिंग उत्पादन साठी करू इच्छिता तर हे फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना फेणायला त्रास होतो. एवढेच नव्हे तर फ्रीज मधील ठेवलेल्या अंडींना वापरल्याने त्यांच्या चवीमध्ये आणि रंगात बदल होऊ शकतो. तुटण्याची भीती  बाजारातून आणलेले अंडी त्वरितच उकडण्यासाठी ठेवल्याने त्यांची फुटायची भीती कमी असते. तर फ्रीज मधील अंडींना उकडल्याने ती अंडी फुटायची भीती असते.

Health Tips: फ्रीजमध्ये अंडी ठेवता? मग ‘या’ 5 गोष्टी जाणून घ्या Read More »

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Travel Tips : बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या ग्रुपसह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो. बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या. अतिरिक्त औषधे जवळ बाळगा  आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा.  जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही. आपली स्थिती स्पष्ट करा आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील. अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा. ऑनलाईन माहिती घ्या आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा Read More »