DNA मराठी

मनोरंजन

vishal

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक

Vishal Brahma Drug Case : स्टुडंट ऑफ द इयर 2 या बॉलिवूड चित्रपटात काम करणारा अभिनेता विशाल ब्रह्मा याला चेन्नई विमानतळावर ड्रग्जसह अटक करण्यात आली आहे. वृत्तानुसार, सिंगापूरहून AI-347 या फ्लाइटमधून उतरल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंदाजे 40 कोटी (अंदाजे US$1.2 अब्ज) किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. नायजेरियन टोळीने अडकवले तपासात असे दिसून आले की 32 वर्षीय विशालला नायजेरियन ड्रग्ज टोळीने आमिष दाखवले होते. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विशालला कंबोडियाला सुट्टीचे आमिष दाखवण्यात आले होते, परंतु तो परत आल्यावर त्याला ड्रग्जने भरलेली ट्रॉली बॅग देण्यात आली, जी तो घेऊन भारतात परतला. या टोळीचा हेतू असा होता की सुरक्षा एजन्सी त्याच्या अभिनेत्याच्या रूपामुळे त्याच्यावर संशय घेऊ नयेत. विशालला टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका असलेल्या स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून प्रसिद्धी मिळाली. तो “बिहू अटॅक” चित्रपटातही दिसला. मात्र त्याच्या अलीकडील अटकेमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसला आहे. तपास सुरूच, टोळीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न संचालनालय (डीआरआय) आणि इतर तपास संस्था आता संपूर्ण नेटवर्क उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. नायजेरियन टोळ्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी कट आणि भारतातील त्याची मुळे तपासण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

Vishal Brahma Drug Case : 40 कोटी किमतीच्या ड्रग्जसह ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला अटक Read More »

shahrukh khan

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव

Shahrukh Khan : समीर वानखेडे यांची नेटफ्लिक्सच्या बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीज विरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. नेटफ्लिक्स आणि शाहरुख खान यांच्या रेड चिलीस इंटरटेनमेंटच्या विरोधात समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसिरीजमध्ये समीर वानखेडे यांच्याशी सबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबरच त्या पात्राच्या तोंडून सत्यमेव जयते या डायलॉगनंतर आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आल्याच म्हणत सत्यमेव जयतेची विटंबना केल्याचाही याचिकेत आरोप समीर वानखेडे यांनी केले आहे. जवळपास 2 कोटींची ही मानहानीची याचिका असून ती वसूल झाल्यास कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणार असल्याचे याचिकेत म्हणण्यात आलेल आहे.

Shahrukh Khan : शाहरुख खान विरोधात मानहानीचा खटला; समीर वानखेडे यांची हायकोर्टात धाव Read More »

shah rukh khan

FIR On Shah Rukh Khan :  मोठी बातमी, राजस्थानमध्ये शाहरुख खानसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

FIR On Shah Rukh Khan  : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानविरुद्ध राजस्थानमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एका कार कंपनीची जाहिरात केल्याबद्दल शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणसह 7 जन्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहितीनुसार राजस्थानातील भरतपूर येथील रहिवासी कीर्ती सिंह नावाच्या 50 वर्षीय व्यक्तीच्या तक्रारीवरून शाहरुख आणि दीपिकासह सुमारे 7 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीचा आरोप आहे की त्याला जाणूनबुजून दोषपूर्ण हुंडई अल्काझर कार विकण्यात आली, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचे जीवन धोक्यात आले. या प्रकरणात, कीर्तीने कारची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात कीर्ती सिंहने न्यायालयात तक्रार केली होती. त्यानंतर, एसीजेएम कोर्ट क्रमांक 2 च्या आदेशानुसार, मथुरा गेट पोलिस स्टेशनमध्ये अर्जाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कीर्ती म्हणते की तिने 2022 मध्ये हुंडई अल्काझर खरेदी केली होती. तिने ही कार कर्जावर घेतली होती, परंतु काही दिवसांतच कारमध्ये मॅन्युफॅक्चरिंग दोष दिसू लागले. तक्रारदाराचे म्हणणे आहे की जेव्हा गाडीचा वेग वाढवण्यासाठी एक्सीलरेटर दाबला जातो तेव्हा गाडीचा आरपीएम वाढतो आणि गाडी थरथरायला लागते, परंतु गाडीचा वेग वाढत नाही. यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होतो. एफआयआर कोणाविरुद्ध आहे? शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त, कीर्ती सिंग यांनी कंपनीशी संबंधित लोकांविरुद्धही खटला दाखल केला आहे. यामध्ये किम अँसो (सीईओ, ह्युंदाई मोटर इंडिया), तरुण गर्ग (होल टाइम डायरेक्टर आणि सीईओ), नितीन शर्मा (एमडी, मालवा ऑटो सेल्स कुंडली), प्रियंका शर्मा (संचालक, मालवा ऑटो सेल्स कुंडली) आणि इतर एकाचा समावेश आहे. कीर्तीने सांगितले आहे की तिने ही कार बुक करण्यासाठी प्रथम 51000 रुपये दिले. नंतर तिने 10 लाख 3 हजार 699 रुपयांचे कर्ज घेतले आणि उर्वरित रक्कम रोखीने दिली. तिने ही कार 23 लाख 97 हजार 353 रुपयांना खरेदी केली. कीर्तीचा दावा आहे की डीलरने सांगितले होते की गाडीत कोणतीही समस्या येणार नाही आणि जर काही समस्या आली तर आम्ही जबाबदार आहोत. शाहरुख-दीपिका का अडकले आहेत? कीर्ती सिंगचा आरोप आहे की शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण हे या कार कंपनीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत आणि त्यांनी कंपनीच्या खराब गाड्यांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले आहे, त्यामुळे दोघेही या प्रकरणात आरोपी आहेत. ती म्हणते की दोन्ही कलाकार या गुन्हेगारी कृत्यात समान भागीदार आहेत. या प्रकरणात, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420 आणि 120-ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की शाहरुख 1998 पासून ह्युंदाईचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे, तर दीपिका 2023 मध्ये कंपनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

FIR On Shah Rukh Khan :  मोठी बातमी, राजस्थानमध्ये शाहरुख खानसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं कारण काय? Read More »

'coolie' vs. 'war 2' — a colorful box office battle

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत

दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या दोन वेगवेगळ्या सिनेमाई प्रवाहांचा थरार अनुभवायला मिळत आहे. एका बाजूला हृतिक रोशन आणि ज्युनियर NTR यांच्या “War 2” मधील अ‍ॅक्शन-थ्रिलरचा झंझावात, तर दुसरीकडे रजनीकांतच्या “Coolie” मधील साऊथ इंडियन मास एंटरटेनमेंटचा जादुई प्रभाव पडला आहे. या दोन्ही चित्रपटांच्या टक्करने बॉक्स ऑफिसवर एक नवा अध्याय लिहायला सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक विरुद्ध व्यावसायिक ब्रँडिंग War 2 हा यशराज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. जागतिक दर्जाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सेस, स्टार कास्टची जबरदस्त केमिस्ट्री आणि हॉलीवूडसदृश सादरीकरण या सगळ्यामुळे त्याची प्रतिमा ‘इंटरनॅशनल थ्रिलर’सारखी झाली आहे. मात्र, Coolieचा प्रभाव वेगळा आहे — रजनीकांतच्या करिष्म्याने तयार झालेला एक सांस्कृतिक सोहळा, ज्यामध्ये कथा, गाणी, संवाद आणि फॅन्सचा भावनिक ओघ या सर्वांचा संगम आहे. आकड्यांचा खेळ पहिल्या दिवशी War 2 ने ₹20–21 कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली, विशेषतः हिंदी पट्टा आणि तेलुगू प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादामुळे. पण Coolieने एडवांस बुकिंगमध्येच ₹51 कोटींचा टप्पा गाठून आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. परदेशातील प्रीमियर शोजमध्ये Coolieने War 2पेक्षा अनेक पटींनी अधिक कमाई करून एक स्पष्ट संदेश दिला — फॅनबेसची ताकद कोणापेक्षा कमी नाही. मराठी प्रेक्षकांचे स्थान महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी या दोन्ही सिनेमांचा आनंद घेत आहेत. एकीकडे War 2मधील आधुनिक अ‍ॅक्शनचा थरार त्यांना भुरळ घालत आहे, तर दुसरीकडे Coolieमधील रजनीकांतच्या अप्रतिम स्क्रीन प्रेझेन्सची मोहिनीही कमी झालेली नाही. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतरच्या आठवड्याच्या शेवटी कोण आघाडीवर राहील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निष्कर्ष ही स्पर्धा केवळ आकड्यांची नाही, तर भारतीय प्रेक्षकांच्या विविध अभिरुचींची, भाषांच्या पलीकडच्या प्रेमाची आणि स्टारडमच्या अद्वितीय शक्तीची आहे. Coolie आणि War 2 हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या सिनेमाई शाळांचे प्रतिनिधित्व करतात — एक साऊथ इंडियन मास अ‍ॅक्शन, तर दुसरा बॉलिवूडचा जागतिक स्तरावरील थ्रिलर. शेवटी जिंकणारा ठरणार तोच, जो प्रेक्षकांच्या मनात अधिक काळ घर करून राहील.

‘Coolie’ विरुद्ध ‘War 2’ — बॉक्स ऑफिसची रंगतदार लढत Read More »

munmun dutta

Munmun Dutta : TMKOC ची बबिता जी सोशल मीडियावरून गायब; मुनमुन दत्तावर कोसळला संकटांचा डोंगर

Munmun Dutta: लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. कधी शो मुळे तर कधी आपल्या खाजगी आयुषामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत राहते. तिने बबिता जीच्या भूमिकेने मुनमुनने घराघरात आपली ओळख निर्माण केली. बबिता आणि जेठालालची जोडी सर्वांशी स्पर्धा करते. मुनमुन चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते मात्र गेल्या काही दिवसांपासून मुनमुन सोशल मीडियावर अँक्टिव नसल्याने तिच्याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून बबिताने इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही स्टोरी पोस्ट केली नाही. आता अलीकडेच मुनमुन दत्ताने स्वतः तिच्या याबाबतचे कारण सांगितले आहे. मुनमुन दत्ताने पोस्ट शेअर करत लिहिले की ‘हो, मी बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता आहे. माझी आई बरी नाही. गेल्या 10 दिवसांपासून मी रुग्णालयात ये- जा करत आहे. आईची आता प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच बरी होईल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील संतुलन बिघडवत आहे. पण मला खूप साथ देणाऱ्या माझ्या अद्भुत मित्रांचे मी आभार मानते. देव महान आहे.’ हे जाणून चाहत्यांना मुनमुनबद्दल खूप वाईट वाटले. चाहते मुनमुन दत्ताच्या आई लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना करत आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो लोक चाहते आहेत. मुनमुनने तिच्या बंगाली सौंदर्याने लोकांची मने घायाळ केली. तर दुसरीकडे शोचे निर्माते असित मोदी यांनी दिशा वाकानीसोबत रक्षाबंधन साजरे केले. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वाकानी वर्षानुवर्षे पाहून चाहते थक्क झाले.

Munmun Dutta : TMKOC ची बबिता जी सोशल मीडियावरून गायब; मुनमुन दत्तावर कोसळला संकटांचा डोंगर Read More »

controversy over the film khalid ka shivaji

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक

मुंबई | प्रतिनिधी – Khalid Ka Shivaji – ‘खालिद का शिवाजी’ या नव्याने प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे कथित अपमानास्पद चित्रण केल्याचा आरोप केला आहे,  हिंदू महासंघाने राज्यभर निदर्शने सुरू केली आहेत. यामुळे काही शहरांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही याचे पडसाद उमटले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर शहरांत महासंघाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते,  “छत्रपतींचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा घोषणा देत, चित्रपटावर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. काही ठिकाणी आंदोलनं चिघळू नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, प्रशासनाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले कि  “शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान होऊ दिला जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे, ही निवडणूकपूर्व औपचारिक प्रतिक्रिया आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. दरम्यान, ‘खालिद का शिवाजी’ या  वादग्रस्त ठरलेल्या या चित्रपटाचे निर्माते पुढे येत, “चित्रपटाचा उद्देश कोणत्याही समाजगटाला दुखावण्याचा नाही. अशी भूमिका घेतली आहे, कृपया संपूर्ण चित्रपट पाहिल्यावरच निष्कर्ष काढावा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. थोडक्यात:

Khalid Ka Shivaji Movie | ‘खालिद का शिवाजी’ मराठी सिनेमा प्रदर्शनाआधी वादात, हिंदू महासंघ आक्रमक Read More »

maharashtra governments strict step for the environment no to pop idols new rules to be implemented till 2026

POP मूर्तींना ‘नाही’ पर्यावरणासाठी महाराष्ट्र सरकारचे कठोर पाऊल – २०२६ पर्यंत नवे नियम लागू

मुंबई – महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. Plaster of Paris (POP) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, पर्यावरण पूरक सण साजरा करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी मार्च २०२६ पर्यंत सक्तीने लागू राहणार आहे. ८ सदस्यीय समिती स्थापन या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एक ८ सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून या समितीने राज्यभरात झालेल्या विसर्जन प्रक्रियेतील समस्यांचा अभ्यास करून, पर्यावरणीय दृष्टीने सुरक्षित आणि कार्यक्षम उपाय सुचवले आहेत. समितीने केलेल्या निरीक्षणांतून स्पष्ट झालं आहे की POP मूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण, पाण्याची अजीर्ण अवस्था, मासळी व जलचर जीवांचे नुकसान तसेच नदी, तलाव यांचं प्रदूषण वाढत आहे. सण साजरा करताना जबाबदारीची गरज शासनाच्या नव्या धोरणानुसार, उत्सव साजरा करताना श्रद्धेचा मान राखत पर्यावरणाशी सुसंगत पद्धतीने गणपती विसर्जन केलं पाहिजे. मूर्ती विक्रेत्यांना POP ऐवजी शाडू मातीपासून, नैसर्गिक रंगांचा वापर करून मूर्ती तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने सांगितलं की, “ही बंदी केवळ दंडात्मक नसून लोकजागृती, सहभाग, आणि पर्यावरण संवर्धन यावर आधारित आहे.” काय म्हणतात पर्यावरण तज्ज्ञ? पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्ते या निर्णयाचं स्वागत करत आहेत.“POP मूर्तींचा विघटन कालावधी फार मोठा असतो. यामुळे केवळ जलप्रदूषणच नाही, तर जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होतो. राज्य सरकारने उचललेलं हे पाऊल उशिरा का होईना, अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे,” असं मत पर्यावरण अभ्यासक डॉ. मृणाल देशपांडे यांनी व्यक्त केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींना कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती, जनजागृती मोहिमा व मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साथीचे आजार, प्लास्टिक व रंगांचे दुष्परिणाम लक्षात घेता गणपती विसर्जनाच्या संदर्भात आरोग्य आणि पर्यावरण दोघांचा समतोल साधण्याची गरज असल्याचेही शासनाने नमूद केले आहे. जनतेची प्रतिक्रिया काही मंडळांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, “श्रद्धा आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणं हे गणेशभक्ताचं कर्तव्य आहे,” असं मत व्यक्त केलं.तर काही मंडळांना कृत्रिम तलावांच्या उपलब्धतेबाबत शंका असून, शासनाकडून सुव्यवस्था व साधनसामग्री लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. काय आहेत नवे नियम? राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील प्रमुख बाबी या नव्या नियमांतर्गत स्पष्ट करण्यात आल्या आहेत: गणेशोत्सव हा श्रद्धेचा, परंपरेचा आणि सामूहिक एकतेचा सण आहे. आता त्यात पर्यावरणसंवेदनशीलतेची जाणीव जोडण्याची वेळ आली आहे. POP मूर्तींवरील बंदी ही शासनाची जबाबदारी आणि नागरिकांची जागृकती  यांचा समन्वय साधणारी पायरी ठरू शकते. POP मूर्तींना ‘नाही’! पर्यावरणसंवेदनशीलतेसाठी राज्य सरकारचा निर्णायक पाऊल — २०२६ पर्यंत नवे नियम लागू मुंबई – महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. Plaster of Paris (POP) पासून बनवलेल्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर बंदी घालण्यात आली असून, पर्यावरण पूरक सण साजरा करण्यासाठी मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी मार्च २०२६ पर्यंत सक्तीने लागू राहणार आहे. ८ सदस्यीय समिती स्थापन या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शासनाने एक ८ सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून या समितीने राज्यभरात झालेल्या विसर्जन प्रक्रियेतील समस्यांचा अभ्यास करून, पर्यावरणीय दृष्टीने सुरक्षित आणि कार्यक्षम उपाय सुचवले आहेत. समितीने केलेल्या निरीक्षणांतून स्पष्ट झालं आहे की POP मूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण, पाण्याची अजीर्ण अवस्था, मासळी व जलचर जीवांचे नुकसान तसेच नदी, तलाव यांचं प्रदूषण वाढत आहे. सण साजरा करताना जबाबदारीची गरज शासनाच्या नव्या धोरणानुसार, उत्सव साजरा करताना श्रद्धेचा मान राखत पर्यावरणाशी सुसंगत पद्धतीने गणपती विसर्जन केलं पाहिजे. मूर्ती विक्रेत्यांना POP ऐवजी शाडू मातीपासून, नैसर्गिक रंगांचा वापर करून मूर्ती तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने सांगितलं की, “ही बंदी केवळ दंडात्मक नसून लोकजागृती, सहभाग, आणि पर्यावरण संवर्धन यावर आधारित आहे.” काय म्हणतात पर्यावरण तज्ज्ञ? पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्ते या निर्णयाचं स्वागत करत आहेत.“POP मूर्तींचा विघटन कालावधी फार मोठा असतो. यामुळे केवळ जलप्रदूषणच नाही, तर जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होतो. राज्य सरकारने उचललेलं हे पाऊल उशिरा का होईना, अत्यंत आवश्यक आणि योग्य आहे,” असं मत पर्यावरण अभ्यासक डॉ. मृणाल देशपांडे यांनी व्यक्त केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींना कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती, जनजागृती मोहिमा व मार्गदर्शन केंद्रे उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साथीचे आजार, प्लास्टिक व रंगांचे दुष्परिणाम लक्षात घेता गणपती विसर्जनाच्या संदर्भात आरोग्य आणि पर्यावरण दोघांचा समतोल साधण्याची गरज असल्याचेही शासनाने नमूद केले आहे. जनतेची प्रतिक्रिया काही मंडळांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, “श्रद्धा आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणं हे गणेशभक्ताचं कर्तव्य आहे,” असं मत व्यक्त केलं.तर काही मंडळांना कृत्रिम तलावांच्या उपलब्धतेबाबत शंका असून, शासनाकडून सुव्यवस्था व साधनसामग्री लवकरच उपलब्ध करून दिली जाईल, असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं. काय आहेत नवे नियम? राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील प्रमुख बाबी या नव्या नियमांतर्गत स्पष्ट करण्यात आल्या आहेत: निष्कर्ष: गणेशोत्सव हा श्रद्धेचा, परंपरेचा आणि सामूहिक एकतेचा सण आहे. आता त्यात पर्यावरणसंवेदनशीलतेची जाणीव जोडण्याची वेळ आली आहे. POP मूर्तींवरील बंदी ही शासनाची जबाबदारी आणि नागरिकांची जागृकती  यांचा समन्वय साधणारी पायरी ठरू शकते.

POP मूर्तींना ‘नाही’ पर्यावरणासाठी महाराष्ट्र सरकारचे कठोर पाऊल – २०२६ पर्यंत नवे नियम लागू Read More »

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 ’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

Maharashtra Politics: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2024 ते 31 डिसेंबर, 2024 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  31 जानेवारी, 2025 असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. 19 जुलै, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 ’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ Read More »

sawedi land scam, the role of two 'heroes' of revenue

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका

Sawedi land Scam हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली.३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलचे दोन ‘महानायकांची’ भूमिका अहिल्यानगर – Sawedi land Scam सावेडी परिसरातील बहुचर्चित भूखंड घोटाळा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, तब्बल ३५ वर्षांनंतर या प्रकरणाला नवा धागा मिळाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्याकडे एक या संदर्भात तक्रार आली आहे, यावर प्रांताधिकारी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल मंडळ अधिकारी यांच्याकडे मागवला आहे. या प्रक्रियेला चालना देणारे मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोन महसूल यंत्रणेतले ‘महानायक’ असल्याची सध्या चर्चेत आहेत. हे प्रकरण  १५ एप्रिल १९९१ रोजी १.९० लाख रुपयांना झालेल्या खरेदीखताच्या नोंदणीवरून उफाळून आला आहे. आश्चर्य म्हणजे, हे खरेदीखत ३५ वर्षांनंतर २९ एप्रिल २०२५ रोजी नोंदवले गेले आणि १७ मे २०२५ रोजी या नोंदीस कायदेशीर मान्यता दिली गेली. यामध्ये वादाला कारणीभूत ठरले तत्कालीन तलाठी प्रमोद गायकवाड यांनी संबंधित जमिनीची नोंद भरली. आणि सावेडी मंडल अधिकारी दिलीप जायभाय यांनी नोंदीस मान्यता देण्यात आली, परंतु, महत्त्वाचा मुद्दा असा की, जर या दस्तऐवजावर ३५ वर्षांनंतर नोंद घेतली गेली, तर त्या कालावधीत प्रत्यक्ष खरेदीदारांना किंवा मूळ मालकांना नोटीस का पाठवली गेली नाही? कायदेशीर प्रक्रियेचा भंग करत, मागच्या तारखेचा पंचनामा कसा केला गेला, आणि तो करताना गंभीर त्रुटी का राहिल्या, हे अनेक प्रश्न उपस्थित करतो. या सगळ्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, खरेदीखत बनावट असल्याचा संशय आहे तर मग . DNA मराठीला मिळालेल्या माहिती नुसार, हि जमीन विक्रीसाठी ७० लाखांचे फ्रँकिंग उपनिबंधक कार्यालयात झाले आहे. यावरून हे लक्षात येते की, खरेदीखताच्या नोंदी मागे एक मोठा आर्थिक व्यवहार दडलेला आहे. या जमिनीत लागलेलं रक्कम वसूल करून यातूनच हा व्यवहार दुसऱ्याला हस्तांतरित करून, मोठ्या प्रमाणात रक्कम मिळवण्याचा डाव आखण्यात आला का, हा संशय अधिक गडद होतो. शहा पारसमल मश्रीलाल यांनी २५ एप्रिल २०२५ रोजी नोंदणीसाठी अर्ज दिला होता, मात्र नोंदीसाठी नोटीसा कशा बजावल्या गेल्या नाहीत , याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. इतकंच नव्हे, तर त्या नोटीसा खरंच पाठवल्या होत्या का, की त्या नुसत्याच दाखल्यात वापरल्या गेल्या, याचंही उत्तर अजून गुलदस्त्यात आहे. डायाभाई यांना किवा यांच्या वारसांना का कळविले, या सगळ्या प्रक्रियेत जेव्हा चौकशी सुरू आहे, तेव्हा या जमिनीची विक्री करण्यात घाई का करण्यात येत आहे. ही विक्री झाल्यास त्याचे गंभीर परिणाम कोणाला भोगावे लागतील? मूळ मालक, खरेदीदार की तिसरा पक्ष? यासारखे अनेक अनुत्तरित प्रश्न आजही उभे आहेत. यापूर्वी अशा अनेक प्रकरणांमध्ये बनावट खरेदीखत तयार करून जमिनीची विक्री केल्याचे समोर आले असून, त्यातून संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली आहे. शासनाचे नियम डावलून झालेली ही नोंदणी आणि त्यामागे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा सहभाग, ही गोष्ट गंभीरपणे तपासण्याची गरज आहे. कारण, सामान्य माणसासाठी त्याची जमीन ही आयुष्याची पुंजी असते. आणि जर शासन यंत्रणा त्याच्याविरोधात उभी राहिली, तर न्याय मिळण्याची आशाही मावळते. या सर्व प्रक्रियेमध्ये मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी घेतलेल्या निर्णयांचे योग्य आहे का, हे पाहणे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तपास सुरू असतानाही गुपचूप व्यवहार झाले असल्यास, यामागे भूमाफिया आणि शासकीय यंत्रणेमधील साटेलोटे स्पष्ट होतात. त्यामुळे ‘सावेडी घोटाळा’ ही केवळ एक जमीन घोटाळ्याची कथा नसून, ती प्रशासनातील पारदर्शकतेवर उठलेला मोठा प्रश्न आहे.

Sawedi land Scam सावेडी भूखंड घोटाळा: ३५ वर्षांनंतर जिवंत झालेलं प्रकरण, महसूलच्या दोन ‘महानायकांची’ भूमिका Read More »

ashish chanchlani and elli avram's instagram post created a stir on social media dna marathi

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट?

मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. मुंबई : – प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani) आणि अभिनेत्री एली अवराम (Elli AvRam) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आशीषने जुलै १२ रोजी इंस्टाग्रामवर एलीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करत केवळ “Finally!” असे लिहिले आहे. हा फोटो आणि त्यावरील शब्द सध्या चर्चेचा विषय ठरले असून त्यावर नेटकऱ्यांमध्ये जोरदार चारच्या सुरु झाली आहे आहे . या पोस्टनंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याविषयी अफवा पुन्हा एकदा गडद झाल्या आहेत. काही चाहत्यांनी याला “प्रेमसंबंधाची अधिकृत कबुली” मानले आहे, तर काहींनी हा नवीन म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड प्रमोशन असण्याची शक्यता वर्तवली आहे. दोघांनी याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List Awards इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासून त्यांच्यातील मैत्री आणि जवळीक यावर नेटकरी चर्चा करत होते. मात्र, त्यानंतर आशीष चंचलानी (Ashish Chanchlani)  आणि एली अवराम (Elli AvRam)  यांनी त्यांच्या नात्याबाबत कोणताही खुलासा केला नाही. या पोस्टनंतर काही तासांतच Instagram वर लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहते “Congratulations”, “Finally together” अशा प्रतिक्रिया देत असून काही बॉलिवूड कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एली अवराम ही “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” (“kis kisako pyaar karoon”) या चित्रपटांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री असून ती बिग बॉस  (big boss ) च्या एका सिझनमध्येही झळकली होती. आशीष चंचलानी हा युट्यूबवरील एक लोकप्रिय विनोदी कंटेंट क्रिएटर असून त्याचे व्हिडीओ जगभरात पाहिले जातात. सध्या तरी दोघांकडून कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. ही पोस्ट केवळ वैयक्तिक प्रेम व्यक्त करणारी आहे की कोणत्यातरी प्रोजेक्टचा भाग, याविषयी स्पष्टता नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. https://www.instagram.com/p/DL__mwju1Up/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MTBoeGV0cmprajlycA== थोडक्यात  अफवा नव्हे, स्पष्ट संकेत? गेल्या काही महिन्यांपासून आशीष आणि एली अवरामच्या मैत्रीविषयी अनेक चर्चा रंगत होत्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या Elle List या ग्लॅमरस इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या अफवा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. मात्र, त्यानंतर आशीष – एली यांनी कोणताही खुलासा केला नाही. आता जुलै १२ रोजी आशीषने इंस्टाग्रामवर एक रोमँटिक फोटो शेअर केला असून, त्यात दोघेही एकमेकांच्या मिठीत आहेत. पोस्टखाली लिहिलं आहे – “Finally”. या एकाच शब्दाने नेटकऱ्यांना संभ्रमात टाकलं आहे – ही रिलेशनशिपची अधिकृत घोषणा आहे की फक्त एखाद्या नव्या कोलॅबोरेशनची झलक? चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पोस्टवर काही तासांतच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक चाहत्यांनी हार्ट इमोजी, शुभेच्छा, आणि ‘कॉन्ग्रॅच्युलेशन्स’चा वर्षाव केला आहे. काही प्रसिद्ध कलाकारांनीही या पोस्टखाली “So happy for you both!”, “Finally Indeed!” अशा कमेंट्स केल्या आहेत. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या पोस्टला ‘इंटरनेटवरचं नवीन IT कपल’ असं बिरूद दिलं आहे. ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर चाहत्यांनी #AshEl आणि #Finally ट्रेंड सुरू केला आहे. काही चाहत्यांनी लग्नाचीही शक्यता बोलून दाखवली आहे. रिलेशनशिप की प्रोफेशनल स्टंट? तथापि, अनेक जाणकार आणि डिजिटल माध्यम तज्ज्ञांचे मत आहे की ही पोस्ट एखाद्या नव्या डिजिटल प्रोजेक्टचा भाग असू शकते — कदाचित म्युझिक व्हिडीओ, वेब सिरीज किंवा ब्रँड कोलॅबरेशन! कारण आशीष चंचलानी ही सोशल मीडियावर सर्जनशील आणि युनिक प्रमोशनल स्टंटसाठी ओळखला जातो. या आधीही अनेक कलाकारांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या अफवांद्वारे आपल्या आगामी प्रोजेक्ट्सचा प्रचार केला आहे, त्यामुळे काही युझर्स याकडे साशंकतेने पाहत आहेत. कोण आहेत हे दोघे? आशीष चंचलानी हे नाव सोशल मीडियावर नवीन नाही. त्यांच्या विनोदी व्हिडीओज, स्केचेस आणि वेब सिरीज यांमुळे ते घराघरात पोहोचले आहेत. ३० दशलक्षांहून अधिक युट्यूब सब्स्क्राइबर्स असलेला आशीष हा देशातील अग्रगण्य डिजिटल क्रिएटर्सपैकी एक आहे. एली अवराम ही एक स्वीडिश-भारतीय अभिनेत्री असून, “मिकी व्हायरस”, “किस किसको प्यार करूं” यांसारख्या चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. बिग बॉस मध्ये भाग घेतल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. पुढे काय? सध्या तरी या दोघांपैकी कुणीही अधिकृतरित्या रिलेशनशिप जाहीर केलेली नाही. पोस्टवरून हा खरोखर प्रेमाचा स्वीकार आहे की फक्त एखाद्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग — याबाबत स्पष्टता नाही. मात्र सोशल मीडियावरील उत्साह पाहता, या विषयावर अधिक माहिती लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. एका साध्या “Finally” कॅप्शनने आंतरजालावर एवढी मोठी चर्चा निर्माण होईल, याचा प्रत्यय या पोस्टने दिला आहे. आशीष आणि एली यांच्यात खरंच प्रेम आहे की हा फक्त प्रमोशनल गिमिक आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. मात्र, चाहत्यांच्या मनात मात्र ही जोडी घर करून बसली आहे. पुढील अपडेट्सकडे सगळ्यांचे डोळे लागून आहेत!

“Finally!” पोस्टमुळे आशीष-एली चर्चेत; प्रेमसंबंध जाहीर की नव्या प्रोजेक्ट हिंट? Read More »