DNA मराठी

ऑटोमोबाईल

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला

Trump Tariffs Rules : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आजपासून नवीन टॅरिफ नियम लागू केले आहे. त्यामुळे आता याचा जगाच्या अर्थव्यस्थेवर काय परिणाम होणार याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. नवीन नियमांनुसार भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 26% कर लावण्यात आला आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाचे वर्णन अमेरिकेच्या “आर्थिक स्वातंत्र्या”कडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून केले आहे.या नवीन धोरणांतर्गत, चीन आणि पाकिस्तानसह अनेक देशांवर कठोर आयात कर लादण्यात आले आहेत. चीनवर 34%, बांगलादेशवर 37% आणि पाकिस्तानवर 29% कर लादण्यात आला आहे. तर युरोपियन युनियन, जपान, तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांवर वेगवेगळ्या दराने शुल्क लादण्यात आले आहे. भारतावर 26% कर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिकेला बऱ्याच काळापासून व्यापार पातळीवर तोटा सहन करावा लागत आहे. त्यांनी आरोप केला की भारत अमेरिकन वस्तूंवर 52% कर लादतो, म्हणून अमेरिकेने भारतावर 26% कर लादून प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्या देशांवर किती शुल्क आकारले गेले? ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या चार्टनुसार, हे नवीन शुल्क वेगवेगळ्या देशांवर लादण्यात आले आहे. चीन: 34% युरोपियन युनियन: 20% दक्षिण कोरिया: 25% भारत: 26% व्हिएतनाम: 46% तैवान: 32% जपान: 24% थायलंड: 26% स्वित्झर्लंड: 31% इंडोनेशिया: 32% मलेशिया: 24% कंबोडिया: 49% युनायटेड किंग्डम: 10% दक्षिण आफ्रिका: 30% ब्राझील: 10% बांगलादेश: 37% सिंगापूर: 10% इस्रायल: 17% फिलीपिन्स: 17% चिली: 10% ऑस्ट्रेलिया: 10% पाकिस्तान: 29% तुर्की: 10% श्रीलंका: 44% कोलंबिया: 10% कॅनडा आणि मेक्सिकोसाठी विशेष सूट या नवीन टॅरिफ धोरणात कॅनडा आणि मेक्सिकोला विशेष सूट देण्यात आली आहे. व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की हे दोन्ही देश आधीच USMCA करारांतर्गत येतात, ज्यामुळे त्यांना या नवीन शुल्कातून सूट देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले, “आपण अनेक देशांना सबसिडी देतो, पण आता आपल्याला आपल्याच देशाचा विचार करावा लागेल.”

ट्रम्पने दिला जगाला धक्का, भारतावर 26% टॅक्स, जाणून घ्या कोणत्या देशावर किती टॅक्स लावला Read More »

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decision : राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांकडून (Aggregators) इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे. या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या अँग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरिता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच या बैठकीत वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ९४३ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आणि राज्याच्या हिश्श्याचे ९४३ कोटी २५ लाख रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा निधी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५० टक्के आर्थिक सहभाग देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. सध्या या प्रकल्पाचा एकूण खर्च १ हजार ८८६ कोटी ५ लाख रुपये इतका असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. आतापर्यंत राज्य सरकारने २८८ कोटी ८५ लाख रुपये वितरित केले असून उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास गडचिरोली जिल्हा रेल्वे मार्गाने जोडला जाईल, ज्यामुळे येथील विकास प्रक्रियेला गती मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल.

बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय Read More »

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही…

April Rules Change: आजपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. देशात त्यामुळे या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मोठे बदल दिसून येणार आहे आणि या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसणार आहे. या महिन्यापासून लागू झालेल्या 10 प्रमुख बदलांबद्दल जाणून घ्या व्यावसायिक सिलिंडर 44.50 रुपयांनी स्वस्तनवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलपासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 44.50 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 44.50 रुपयांनी स्वस्त झाल्याने दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1762 झाली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्तनवीन कर प्रणालीनुसार आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजपासून देशात 12 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बंदमहिलांसाठी चालवली जाणारी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ (MSSC) योजना आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यात 7.5% व्याजदर होता आणि कोणीही किमान 1000 ते 2 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकत होता. कारच्या किमती वाढल्याआजपासून मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, किआ इंडिया, ह्युंदाई इंडिया आणि होंडा या कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती 4% पर्यंत वाढवल्या आहेत. यामुळे वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना महागाईचा सामना करावा लागेल. UPI वापरला जाणार नाहीजर तुमचा मोबाईल नंबर बराच काळ डि ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकणार नाही. असे क्रमांक UPI सिस्टममधून काढून टाकले जातील. ज्येष्ठ नागरिकांना व्याज उत्पन्नावर दुप्पट सूट ज्येष्ठ नागरिकांना आता बँका आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 50,000 रुपयांऐवजी 1 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळेल. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी UPS पेन्शन योजना सुरूआता केंद्र सरकारी कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) चा भाग बनू शकतात, ज्यामध्ये 25 वर्षांच्या सेवेनंतर, कर्मचाऱ्यांना गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50% इतके पेन्शन मिळेल. या योजनेत सरकार 18.5% योगदान देईल. युलिपवरील भांडवली नफा करजर तुमचा युलिप प्रीमियम दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तो भांडवली मालमत्ता मानला जाईल. आता यावर मिळणाऱ्या नफ्यावर भांडवली लाभ कर आकारला जाईल. बँकेतील किमान शिल्लक नियमात बदलएसबीआय, पीएनबी, कॅनरा बँकेसह अनेक बँकांनी किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियम बदलले आहेत. आता, तुमच्या खात्यातील किमान शिल्लक तुमच्या क्षेत्रानुसार ठरवली जाईल आणि ती राखण्यात अयशस्वी झाल्यास दंड होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त झालाएव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती कमी झाल्या आहेत, ज्यामुळे विमान प्रवास खर्चात दिलासा मिळू शकतो. चेन्नईमध्ये एटीएफची किंमत 06,064.10ने स्वस्त झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

1 एप्रिलपासून लागू होणारे 10 मोठे बदल… थेट खिशावर होणार परिणाम, जाणून घ्या सर्वकाही… Read More »

IPS Sudhakar Pathare Death: मोठी बातमी! आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

IPS Sudhakar Pathare Death: आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते त्या गाडीची बसला धडक झाली आणि हा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सुधाकर पठारे यांच्या अपघातामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात सुधाकर पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे. कोण होते सुधाकर पठारे?सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील होते. आयपीएस होण्याअगोदर ते शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून राहिले आहेत. डॉ. सुधाकर पठारे यांचे शिक्षण एम.एस्सी. अ‍ॅग्री, एलएलबी झाले आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी सेवा बजावलीअप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका केला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.सुधाकर पठारे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोलिस खात्यावर शोककळा पसरली आहे.

IPS Sudhakar Pathare Death: मोठी बातमी! आयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन Read More »

वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू, गर्भवती महिलांसाठी ‘हे’ आहे विशेष नियम

Surya Grahan 2025 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी होत आहे. वर्षातील पहिला सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष महत्वाचा असतो. हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. जे भारतात दिसणार नाही, त्यामुळे आपल्या देशात सुतक काळ वैध राहणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेचा काही भाग, उत्तर आशिया, वायव्य आफ्रिका, युरोप, उत्तर ध्रुव, आर्क्टिक महासागर आणि अटलांटिक महासागरात दिसेल. सूर्यग्रहणाशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया. भारतात सूर्यग्रहणाची वेळभारतीय वेळेनुसार, हे ग्रहण दुपारी 2.21 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6.14 वाजता संपेल. एकूण, त्याचा कालावधी सुमारे 3 तास ​​53 मिनिटे असेल. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने येथे कोणतेही धार्मिक नियम लागू होणार नाहीत. सूर्यग्रहणाचे वैज्ञानिक आणि ज्योतिषीय महत्त्वजेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्यप्रकाश अंशतः रोखतो तेव्हा सूर्यग्रहण होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे, तर ज्योतिषशास्त्रानुसार, ती अनेक राशींसाठी प्रभावशाली मानली जाते. भारतात सुतक काळ वैध असेल का?धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाच्या 9 ते 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो, त्या दरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तथापि, जेव्हा ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहता येते तेव्हाच सुतक काळ प्रभावी असतो. कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक काळ वैध राहणार नाही. सूर्यग्रहण कुठे दिसेल?हे आंशिक सूर्यग्रहण न्यू यॉर्क, बोस्टन, मॉन्ट्रियल आणि क्यूबेकसह अनेक ठिकाणी दिसेल. याशिवाय, ते आफ्रिका, सायबेरिया, कॅरिबियन आणि युरोपच्या काही भागात देखील दिसेल.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुरू, गर्भवती महिलांसाठी ‘हे’ आहे विशेष नियम Read More »

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Government: राज्य सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वाहन मालकांना मुदत देण्यात आली होती. मात्र आता सरकारने मोठा निर्णय घेत आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्याचे काम कमी झाले असल्याने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता 3 संस्थाची /उत्पादकांची परिवहन विभागामार्फत निवड केली आहे. तरी संबंधित वाहन मालकांनी याची नोंद घेऊन 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यात यावी, असे आवाहन परिवहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

अनेकांना दिलासा, वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ Read More »

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय

Donald Trump : अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेण्याचे तयारीत आहे. ट्रम्प प्रशासन डझनभर देशांच्या नागरिकांवर व्यापक प्रवास बंदी घालण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकूण 41 देशांना तीन वेगवेगळ्या गटांमध्ये विभागता येईल. 10 देशांच्या पहिल्या गटात अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश आहेत, ज्यांचे व्हिसा पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. दुसऱ्या गटात, इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदानसह पाच देशांना अंशतः निलंबनाचा सामना करावा लागेल, ज्यामुळे पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसा तसेच काही अपवादांसह इतर स्थलांतरित व्हिसा प्रभावित होतील. जर पाकिस्तान, भूतान आणि म्यानमारसह एकूण 26 देशांच्या सरकारने “60 दिवसांच्या आत कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत” तर तिसरा गट त्यांना अमेरिकन व्हिसा देण्यावर अंशतः बंदी घालण्याचा विचार करेल. यादीत बदल होऊ शकतातएका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यादी बदलू शकते आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह प्रशासनाने अद्याप तिला मान्यता दिलेली नाही. हे पाऊल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सात मुस्लिम बहुल देशांमधून प्रवाशांना प्रवेश बंदी घालण्याच्या धोरणाची आठवण करून देते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला मान्यता देण्यापूर्वी अनेक वेळा या धोरणाचे रिव्ह्यू केले. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे की नाही हे शोधण्यासाठी अमेरिकेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या कोणत्याही परदेशी व्यक्तीची सखोल सुरक्षा तपासणी करणे आवश्यक आहे. त्या आदेशात अनेक मंत्रिमंडळ सदस्यांना 21 मार्चपर्यंत अशा देशांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते ज्यांमधून प्रवास अंशतः किंवा पूर्णपणे निलंबित करावा कारण त्यांची “चाचणी आणि तपासणीची माहिती अत्यंत अपुरी आहे.” ट्रम्प यांनी ऑक्टोबर 2023 च्या भाषणात त्यांच्या योजनेचा आढावा घेतला, गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, येमेन आणि “आपल्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही ठिकाणाहून” लोकांना बंदी घालण्याची प्रतिज्ञा केली.

41 देशांच्या प्रवासावर बंदी येणार, डोनाल्ड ट्रम्प घेणार मोठा निर्णय Read More »

Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार

Tata CNG Car : भारतीय बाजारात टाटा ऑटो कंपनी लोकप्रिय हॅचबॅक कार टियागोचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे. नवीन कारमध्ये एकापेक्षा एक फीचर्स स्टाइलिंग अपडेट्स आणि नवीन ट्रान्समिशन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहे. 2025 टाटा टियागो एनआरजीची किंमत आता 7.2 लाख ते 8.75 लाख एक्स-शोरूम आहे. हे मॉडेल फक्त टियागोच्या टॉप-स्पेक XZ ट्रिममध्ये उपलब्ध आहे. 2025 च्या टियागो प्रमाणेच, नवीन टियागो एनआरजीमध्ये मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे, तर मोठा बदल म्हणजे सीएनजी-एएमटी पर्याय. 2025 टाटा टियागो एनआरजीमध्ये काही किरकोळ स्टायलिश अपडेट्स आहेत. यामध्ये नवीन मॅट ब्लॅक क्लॅडिंगसह नवीन डिझाइन केलेला बंपर आणि पुढील आणि मागील बाजूस जाड सिल्व्हर स्किड प्लेट्सचा समावेश आहे. 15-इंच स्टीलच्या चाकांना वेगवेगळे कव्हर मिळतात. कारमध्ये सीएनजीचा पर्याय टाटा टियागो एनआरजीमध्ये 1.2-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 84.8 बीएचपी पॉवर निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटसह जोडलेले आहे. सीएनजी व्हर्जन 71 बीएचपी पॉवर निर्माण करण्यासाठी तयार केलेली आहे आणि 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी युनिटशी जोडलेली आहे. या मॉडेलसाठी CNG-AMT हा एक पूर्णपणे नवीन पर्याय आहे आणि गेल्या वर्षी Tiago CNG मध्ये सादर करण्यात आला होता. अपडेटेड टाटा टियागो एनआरजी मारुती सुझुकी स्विफ्ट, ह्युंदाई ग्रँड आय10 निओस या कारशी स्पर्धा करणार आहे.

Tata CNG Car: स्वस्तात मस्त, टाटाने CNG सह लॉन्च केली सफारीसारखी कार Read More »

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले

Tamil Nadu ₹ Symbol : गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये हिंदी भाषेचा विरोध मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. तर आता तमिळनाडू सरकारने मोठा निर्णय घेत राज्याच्या अर्थसंकल्पातून ₹ हे चिन्ह काढून टाकले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सरकारने ₹ च्या जागी ‘ரூ’ (ru) चिन्ह स्वीकारले आहे, जे तमिळ लिपीतील एक अक्षर आहे. देशभरात ₹ चिन्ह बदलण्याची ही पहिलीच घटना आहे आणि तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या भाषा वादाशी याचा संबंध जोडला जात आहे. रुपया (₹) चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाइन केलेल्या भारतीय तिरंग्यापासून प्रेरित होते. धर्मलिंगम हे तामिळनाडूचे आहेत आणि त्यांची रचना पाच निवडलेल्या चिन्हांमधून निवडण्यात आली. हे चिन्ह 2010 मध्ये स्वीकारण्यात आले आणि ते भारतीय चलनाचे अधिकृत चिन्ह बनले. विशेष म्हणजे, धर्मलिंगम हा तामिळनाडूतील एका माजी आमदाराचा मुलगा आहे. ₹ च्या जागी नवीन चिन्हआता, तामिळनाडू सरकारने ₹ चिन्हाऐवजी ‘ரூ’ चिन्ह लावण्याचा निर्णय राज्यात सुरू असलेल्या हिंदी विरोधी चळवळीशी जोडला जात आहे. तामिळनाडूमध्ये हिंदीविरुद्ध बऱ्याच काळापासून राजकीय संघर्ष सुरू आहे आणि अलीकडेच मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही या मुद्द्यावर विधान केले आहे. हिंदी लादण्याच्या प्रयत्नामुळे भारतातील प्राचीन भाषा धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. हिंदीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक स्थानिक भाषा नाहीशा होत आहेत, असे स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनी बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणच्या भाषांचे उदाहरण दिले, जिथे हिंदीच्या दबावाखाली स्थानिक भाषा मरत आहेत. त्यांच्या मते, हिंदीने अनेक भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्यामुळे त्या भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयानंतर राज्यात पुन्हा भाषेबाबत वाद सुरू झाला आहे. तामिळनाडू सरकारच्या या पावलामुळे राज्याची, विशेषतः हिंदीबद्दलची भूमिका स्पष्ट होते आणि सांस्कृतिक ओळखीचे संरक्षण म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.

Tamil Nadu ₹ Symbol : तामिळनाडूत हिंदी विरोध, सरकारने अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह काढले Read More »

जिओ देणार ग्राहकांना दिलासा, एलोन मस्कसोबत घेणार मोठा निर्णय

Jio partners with Elon Musk’s SpaceX:  देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने मोठा निर्णय घेत भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी  स्पेसएक्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे आता जिओ ग्राहाकांना  स्टारलिंकची उपग्रह-आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा देणार आहे. मात्र ही सेवा सुरु होणार की नाही. याबाबत निर्णय भारत सरकार घेणार आहे. जर सरकारने परवानगी दिली तर ही सेवा देशात सुरु होणार आहे. या सेवेमुळे भारतातील दुर्गम भागात हाय-स्पीड, कमी-लेटन्सी इंटरनेट प्रदान करण्यास मदत होणार आहे.  प्रत्येक गावात इंटरनेट जिओ आणि स्पेसएक्समधील या भागीदारीअंतर्गत, जिओ त्यांच्या रिटेल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे स्टारलिंक सेवा प्रदान करेल. यामुळे, भारतातील अधिकाधिक लोकांना सॅटेलाइट ब्रॉडबँड उपलब्ध होईल. या युतीचा उद्देश ज्या भागात आतापर्यंत ब्रॉडबँड सुविधा मर्यादित होत्या, जसे की गावे, शाळा, आरोग्य केंद्रे आणि दुर्गम व्यवसाय केंद्रे, अशा ठिकाणी इंटरनेट सेवा प्रदान करणे आहे. जिओफायबरला अधिक मजबूत बनवेलजिओ केवळ स्टारलिंक हार्डवेअर विकणार नाही तर ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी इन्स्टॉलेशन आणि अॅक्टिव्हेशन सपोर्ट देखील देईल. या भागीदारीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्टारलिंकची सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी जिओच्या विद्यमान ब्रॉडबँड सेवा जसे की जिओएअरफायबर आणि जिओफायबरला आणखी मजबूत करेल. यामुळे ज्या भागात पारंपारिक फायबर नेटवर्क टाकणे कठीण आहे तेथे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करणे शक्य होईल. जिओचे ग्रुप सीईओ मॅथ्यू उमान यांनी या भागीदारीला भारतातील डिजिटल क्रांतीतील एक महत्त्वाचे पाऊल म्हटले. ते म्हणाले, ‘आमचे उद्दिष्ट प्रत्येक भारतीयाला, तो देशात कुठेही राहत असला तरी, हाय-स्पीड आणि परवडणारे इंटरनेट प्रदान करणे आहे.’ स्पेसएक्ससोबतची आमची भागीदारी जिओच्या या मोहिमेला आणखी बळकटी देईल. जिओच्या ब्रॉडबँड इकोसिस्टममध्ये स्टारलिंक जोडून, आम्ही देशभरात कनेक्टिव्हिटीची व्याप्ती वाढवत आहोत. स्पेसएक्सचे अध्यक्ष आणि सीओओ ग्विन शॉटवेल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘भारतात डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या जिओच्या प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो.’ अधिकाधिक लोक, व्यवसाय आणि संस्था स्टारलिंकच्या हाय-स्पीड इंटरनेटशी जोडता याव्यात यासाठी आम्हाला जिओसोबत काम करण्याची आणि भारत सरकारकडून आवश्यक त्या मंजुरी मिळविण्याची उत्सुकता आहे. जरी हा करार जिओ आणि स्पेसएक्समध्ये झाला असला तरी, भारतात स्टारलिंकचे अधिकृत प्रक्षेपण अजूनही भारत सरकारच्या मान्यतेवर अवलंबून असेल. यासाठी, भारताच्या दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय राष्ट्रीय अंतराळ संवर्धन आणि अधिकृतता केंद्र (IN-SPACE) कडून परवानगी घ्यावी लागेल.

जिओ देणार ग्राहकांना दिलासा, एलोन मस्कसोबत घेणार मोठा निर्णय Read More »