DNA मराठी

Uddhav Thackeray

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार

Loksabha Election :  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे. तर ऑक्टोंबर – नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी आता महायुतीने तयारी केली आहे.   मुंबईत महायुतीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महाआघाडीत सामील तिन्ही पक्ष-भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी निवडणुकीच्या योजना सांगितल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.  राज्यातील लोकसभेच्या 45 हून अधिक जागांवर विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी महायुतीने मेगाप्लॅन केला असून, त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. 14 जानेवारीपासून सर्व जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे होणार आहेत. भाजपचे नेते बावनकुळे म्हणाले, आम्ही 45 हून अधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला यश मिळेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.  जिल्हा, तालुका आणि बूथ स्तरावर रॅली, सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये तिन्ही पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जाहीर सभा घेणार आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला राज्यात मोठे यश मिळेल. राज्यातील 48 पैकी 45 हून अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार आहोत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते मिळणार आहेत, महायुती आणखी मजबूत करू, असे आमच्या तिन्ही पक्षांनी ठरवले आहे. अनेकांना आमच्या आघाडीत सहभागी व्हायचे आहे. 47 हजार 412 लोकांनी आमच्याशी संवाद साधला असून त्यांना मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायचे असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. विधानसभेतही विजय निश्चित – बावनकुळे पक्षात येण्यासाठी लोकांची गर्दी झाल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. आगामी काळात महाविकास आघाडीत फक्त नेतेच असतील, कार्यकर्ते उरणार नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार उभे राहतील. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत महायुती मोठा विजय मिळवेल आणि आम्हाला 225 पेक्षा जास्त जागा मिळतील. अजित पवार गटाचा प्लॅन तयार राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेली 10 वर्षे देशाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. आज राज्यात महायुतीचे सरकार आहे. जानेवारीपासून महायुतीच्या बैठकांना सुरुवात होणार आहे. यासाठी एक हजार प्रमुख कार्यकर्ते असतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही (अजित पवार गट) जाहीर सभा घेणार आहोत. शिवसेना नेते व मंत्री दादा भुसे म्हणाले, देशपातळीवर अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. महायुतीचे सर्व मोर्चे आम्ही विभाग स्तरावर, गावपातळीवर आयोजित करत आहोत. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड पुकारले आणि भगवा पक्ष दोन गटात विभागला गेल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे (एमव्हीए) सरकार पडले होते. यानंतर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी, गेल्या वर्षी जुलैमध्ये शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हेही राष्ट्रवादीच्या आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. यानंतर अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला. सध्या दोन्ही गट निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत वर्चस्वासाठी लढत आहेत.

Loksabha Election : महायुतीने वाजवले निवडणुकीचे बिगुल! लोकसभेच्या 45 जागांसाठी मास्टर प्लॅन तयार Read More »

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी

Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामवर केलेल्या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.  त्यांनी केलेल्या विधानाविरुद्ध आज अहमदनगर शहरात हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जितेंद्र आव्हाडावर कठोर कारवाई करण्याचे मागणी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असे देखील म्हटले आहे.  याच बरोबर जितेंद्र आव्हाड यांची नार्कोटिक्स डिपार्टमेंट करून तपासणी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.  माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी होते असं म्हंटले होते. मात्र हा प्रकरण वाढल्यानंतर त्यांनी माफी मागितली.

Maharashtra Politics : जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही- कुणाल भंडारी Read More »

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का! एमव्हीएमध्ये येणार नाही राजू शेट्टी; ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक

Maharashtra Politics : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या तयारीला लागला आहे.  यातच  माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होऊ शकते.   माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, आगामी 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष लोकसभेच्या सहा जागा स्वबळावर लढवणार आहे. शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक शेट्टी म्हणाले की, त्यांनी महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती या दोघांपासून समान अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे.  दोन्ही आघाडीकडून आम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संकेत मिळाले आहेत, मात्र आम्ही स्वबळावर पुढे जाऊ, असे ते म्हणाले. त्यांचा पक्ष राज्यातील 6 लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. हातकंगले, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, परभणी आणि माढा अशा या 6 लोकसभा जागा आहेत. शेट्टी यांच्या उद्धव यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकरी नेते शेट्टी एमव्हीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. तथापि, शेट्टी यांनी ही शक्यता फेटाळून लावली आणि म्हणाले की, मी उद्धव यांना स्पष्ट केले आहे की शेतकरी संघटना आणि त्यांच्या राजकीय शाखेने निवडणुकीत एकट्याने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जानेवारीला उद्धव यांची भेट घेतली 2 जानेवारी रोजी मातोश्री बंगल्यावर राजू शेट्टी यांनी शिवसेना यूबीटी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागितला होता. भेटीनंतर राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले होते.  ते म्हणाले होते की, राज्यातील विविध समस्यांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. निवडणुका अजून दूर आहेत, पण महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. निवडणुका आल्या की या विषयावर ते सविस्तर बोलतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने अप्रत्यक्षपणे आमच्याशी संपर्क साधला असला तरी आम्ही कोणाशीही हातमिळवणी करणार नाही, असे शेट्टी म्हणाले.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला धक्का! एमव्हीएमध्ये येणार नाही राजू शेट्टी; ‘इतक्या’ जागांवर लढवणार लोकसभा निवडणूक Read More »

Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद!

Maharashtra Politics:  येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाआघाडी आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे.  दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपली भूमिका कठोर केली असून राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे एमव्हीएमध्ये तणाव वाढला आहे. खरे तर, काँग्रेसने शिवसेनेला (यूबीटी) 23 जागांवर उमेदवार उभे करण्याची परवानगी दिली, तर त्यांच्या आणि राष्ट्रवादीसाठी (शरद पवार गट) केवळ 25 जागा उरतील. शिवसेनेचे (यूबीटी) मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही 23 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी 18 जागा जिंकल्या.  संभाजीनगरमध्ये आमचा उमेदवार अवघ्या काही मतांनी पराभूत झाला. महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांवर चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. पण ज्या जागा काँग्रेस मजबूत आहे त्या जागाही त्यांना मिळतील. दिल्लीतील हायकमांडशी आमची चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्या नुकत्याच झालेल्या वक्तव्यावर राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. राज्यसभा खासदार राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात कोणीही विधान केले तर ते फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.  पत्रकारांनी संजय निरुपम यांच्याबद्दल विचारले असता, संजय राऊत म्हणाले, “संजय निरुपम. ते कोण आहेत? त्यांना काही अधिकार आहेत का? काँग्रेस हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे आम्ही दिल्लीत चर्चा करू. आता संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. निरुपम म्हणाले, “शिवसेना (ठाकरे गट) लोकसभेची एकही जागा स्वबळावर जिंकू शकत नाही. हे माझे त्यांना आव्हान आहे. ठाकरे गटाला निवडणुकीत काँग्रेसची गरज आहे. तसेच काँग्रेसलाही त्यांची गरज आहे.  गेल्या निवडणुकीत त्यांनी 18 जागा जिंकल्या होत्या. पण, त्यापैकी डझनभर खासदारांनी त्यांना सोडले आहे. आता त्यांचे चार-पाच खासदार उरले आहेत. ते राहणार की नाही याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही.  काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, संजय राऊत यांची स्मरणशक्ती थोडी कमकुवत झाली आहे. संजय निरुपम कोण हे शिवसेनेलाच माहीत आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात MVA ची स्थापना झाली. MVA आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे.

Maharashtra Politics: उद्धव सेना एकही जागा जिंकू शकत नाही, MVA मध्ये पुन्हा मतभेद! Read More »

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका

Navneet Rana : राज्याचे राजकारणात पुन्हा एकदा   अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा चर्चेत आले आहे.  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण केल्याप्रकरणी अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे आरोपी आहेत. त्याच्यावर खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका न्यायालयाने फेटाळली. राणा दाम्पत्याने दावा केला होता की एफआयआर नोंदवण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती, जी बेकायदेशीर होती. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला. या खटल्याची सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकाल राखून ठेवला होता, जो आज सुनावण्यात आला. तसेच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पुढील सुनावणीत हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यानंतर आता न्यायालयातून खटल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याप्रकरणी आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया पुढील वर्षी 5 जानेवारीला होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना तसे न करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, पोलिसांची नोटीस न जुमानता राणा दाम्पत्याने ठाकरे यांच्या विरोधात आंदोलनाचा गजर केला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी खार पोलिसांनी त्याला अटक केली. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम 153अ, 34,37 आणि मुंबई पोलिस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.  नंतर आयपीसीच्या कलम 124A अंतर्गत देशद्रोहाच्या गुन्ह्यातही वाढ करण्यात आली. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अनेक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना सशर्त जामीन मिळाला.

Navneet Rana : नवनीत राणा पुन्हा चर्चेत! ‘त्या’ प्रकरणात कोर्टाने फेटाळली याचिका Read More »