DNA मराठी

National News

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल

National News: एक मोठी बातमी समोर आली आहे. तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 60 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची माहिती देताना कुल्लाकुरिचीच्या डीएमने मृत्यूला दुजोरा दिला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी दारू विक्रेत्याला अटक विषारी दारूप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी अवैध दारू विक्रेते के. कन्नूकुट्टी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 200 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. तपासणी केली असता त्यात मिथेनॉल आढळून आले. पोलीस पुढील कारवाईत व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच अवैध दारूविक्री रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. स्टॅलिन यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला आणि दुःख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

National News: मोठी बातमी! विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 60 हून अधिक रूग्णालयात दाखल Read More »

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Travel Tips : बऱ्याच वेळा असं होत की आपण प्रवास करतो परंतु आपले आरोग्य पूर्णपणे चांगले नसते.एखाद्या ग्रुपसह प्रवास करतांना देखील ही समस्या उद्भवू शकते की प्रवासाची संपूर्ण योजना आखल्यावर देखील थोडं आजारी पडल्यावर प्रवासाच्या योजनेत बदल करण्या ऐवजी सर्वांची सोय बघून प्रवासात निघून जातो. बऱ्याच वेळा आपले आरोग्य हवा आणि पाणी बदल झाल्यामुळे चांगले होते.बऱ्याच वेळा स्थिती अशी होते की आपल्यामुळे प्रवाशांना देखील त्रास होतो. म्हणून स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचे आहे.या साठी आपण आजारी असल्यावर प्रवासात काळजी काय घ्यावी जाणून घ्या. अतिरिक्त औषधे जवळ बाळगा  आपण अस्वस्थ असाल तर सर्वप्रथम, प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणं महत्त्वाचे आहे. डॉक्टर जे काही औषधें देतील त्या औषधांची यादी आपल्या सह घ्यावीच या व्यतिरिक्त औषधे आपल्या जवळ ठेवा.  जर एखादं औषध  दोन वेळा घ्यावयाचे आहे तर दोनच्या ऐवजी चार घेऊन जा. असं केल्यानं आपण जिथे जाता तिथे जाऊन औषधाची शोधाशोध होणार नाही. आपली स्थिती स्पष्ट करा आपल्या आरोग्याबद्दल लोकांना आधीपासूनच कळवा,असं केल्याने त्यांना आपल्या आरोग्या विषयी माहिती होऊन त्यांचा व्यवहार तसा राहील. जसं एखाद्या लांब पल्ल्यातून जायचे असेल तर त्यानुसार व्यवस्था करतील.जर आपण स्वस्थ असाल तर व्यवस्था करण्याचा प्रश्न नाही आपण हसत खेळतच एका ठिकाण्यावरून दुसऱ्या ठिकाणी गेला असता. पण अस्वस्थ असाल तर आता ते आपली चांगली काळजी घेतील. अन्ना बद्दल विशेष काळजी घ्या जर आपण अस्वस्थ असाल तर डॉक्टरांनी ज्या गोष्टींना घेण्यास नकार दिला आहे त्याचे सेवन करू नये. अन्यथा आपल्याला समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. आपल्या आवडीचे पदार्थ बघून जर आपण आहार ठरवाल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.म्हणून चमचमीत आणि चटपटीत खाण्या ऐवजी आरोग्याला सांभाळून आरोग्याची काळजी घेऊन आहार घ्यावा. ऑनलाईन माहिती घ्या आपण जिथे जात आहात त्या जागेची ऑनलाईन माहिती घ्या. आपल्याला काहीही आरोग्य विषयक त्रास झाल्यास त्याच्याशी निगडित डॉक्टर कोण आहे ? त्यांचे रुग्णालय कुठे आहेत? असं केल्यानं जास्त त्रास झाल्यास आपल्याला काहीच त्रास होणार नाही आणि गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घेऊ शकाल.

Travel Tips: प्रवासाच्या दरम्यान अस्वस्थ असाल, तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा Read More »

Indian’s Spending :  काय सांगता, अन्नावर नाहीतर ‘या’ ठिकाणी जास्त खर्च करतात भारतीय, जाणून व्हाल थक्क

Indian’s Spending : नुकतंच सोशल मीडियावर एक सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या सर्वेक्षणात भारतीय लोकांच्या खर्चाबाबत धक्कादायक माहिती शेअर करण्यात आली आहे.  सर्वेक्षणानुसार, गेल्या 10 वर्षांत भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे मात्र लोकांचा अन्नावरील खर्च कमी झाला आहे. या सर्वेक्षणानुसार आता भारतीय लोक खाण्यापिण्याऐवजी इतर गोष्टींवर जास्त खर्च करताना दिसत आहे.  कपडे आणि मनोरंजनावर खर्च   या सर्वेक्षणानुसार गेल्या 10 वर्षात भारतीय लोकांच्या घरगुती खर्च दुप्पट झाला आहे. लोक आता कपडे, टेलिव्हिजन सेट आणि मनोरंजनाशी संबंधित वस्तूंवर जास्त खर्च करत आहे. यामुळे बाजारात खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.   या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा कमी झाला होता. ग्रामीण भागातील मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा 2011-12 मध्ये 53 टक्के होता, तो आता 46.4 टक्के आहे. तर शहरी भागात मासिक खर्चात खाण्यापिण्याचा वाटा या कालावधीत 42.6 टक्क्यांवरून 39.2 टक्क्यांवर आला आहे. या कालावधीत शहरी भागात अखाद्य पदार्थांचा वाटा  57.4 टक्क्यांवरून वाढून चक्क 60.8 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर 47 टक्क्यांवरून चक्क 53.06 टक्क्यांवर ग्रामीण भागात आहे.   दरडोई ग्राहक खर्चात वाढ हे जाणून घ्या कि, ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 दरम्यान हे सरकारी सर्वेक्षण करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, 2011-12 मध्ये सुमारे 2,630 रुपये सरासरी मासिक दरडोई ग्राहक खर्च होता तो आता अंदाजे 6,459 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर  ग्रामीण भागात हा आकडा 1,430 रुपयांवरून अंदाजे 3,773 रुपयांपर्यंत गेला आहे.  सर्वेक्षणाच्या या आकडेवारीनुसार भारतीय लोक आज अन्नावर कमी तर प्रवास आणि इतर गोष्टींवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि, हा डेटा सरकार किरकोळ महागाई आणि GDP मोजण्यासाठी वापरते.

Indian’s Spending :  काय सांगता, अन्नावर नाहीतर ‘या’ ठिकाणी जास्त खर्च करतात भारतीय, जाणून व्हाल थक्क Read More »