DNA मराठी

Maratha

gangadhar kalkute

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल

Gangadhar Kalkute : बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कुणबी दाखल्यांच्या मुद्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. कुणबी दाखले रद्द करण्याची आणि कथित चुकीचे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी लक्ष्मण हाके यांनी केली होती. यावर आता मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करत, त्यांना “मराठा द्वेषाची कावीळ झाली असून मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे,” असा घणाघात केला. तसेच बीडमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्लाही त्यांनी हाके यांना दिला. मराठा समाजाविरोधात सातत्याने भूमिका घेत असल्याचा आरोप करत काळकुटे यांनी हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यासोबतच, कुणबी दाखल्यांच्या प्रश्नावर मराठा समाज संविधानिक आणि रस्त्यावरची दोन्ही प्रकारची लढाई लढण्यास तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावरून राज्यातील मराठा-ओबीसी वाद पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Gangadhar Kalkute : “लक्ष्मण हाकेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; बुद्धी भ्रष्ट झाली” ; गंगाधर काळकुटे यांचा हल्लाबोल Read More »

manoj jarang attack on cm devendra fadnavis

Manoj Jarang On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाला, मी मुंबईला येतोय

Manoj Jarang On Devendra Fadnavis: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून मुंबईसाठी निघाले आहे. जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आरक्षणासाठी आंदोलन करणार आहे. मुंबईसाठी निघण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत मी मुंबईत येत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाला असं म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकार हिंदू विरोधी काम का करत आहे. आम्ही मुंबईला जाणार. आम्ही हिंदू आहे. आमच्या अंदोलनाच्या वेळी देव पुढे घालतात. आम्ही न्यायालचा आदर करतो. आम्ही शांततेत येणार आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. तर यावेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावर देखील प्रतिक्रिया दिली. याचिका कालच दाखल केली आणि निकाल पण कालच लावला. सरकारने नवीन आणला आहे. आम्ही लेखी अर्ज केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा डाव सादला. आत्ता ही लोकशाही राहिली नाही. कायदा पण एकाच दिवसात स्तफान केला. आम्हाला परवानगी द्याची का नाही हे सरकार ठरवणार. नवीन दिपर्मेट कोणालाच माहिती नाही मराठ्यांचा पोरांनो कोणीही आत्महत्या करू नका. देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाल मी मुंबईला येत आहे. गोरगरीबाच्या पोरांच्या हक्कासाठी लढतोय. फक्त मला सात द्या. जो कोणी लोकप्रतिनिधी समाजाचं काम करणार नाही त्याला त्याची जागा दाखवा. सर्व समाज बदवाणी आंदोलन ना वर लक्ष राहूद्या. कोणी ही आत्ता बेसवाद पणे वागू नका. आत्ता आंदोलन हे निर्णयक वळणावर आलं आहे. असं देखील जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarang On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस साहेब मला गोळ्या घाला, मी मुंबईला येतोय Read More »