DNA मराठी

Maharashtra Politics News

balasaheb thorat

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल

Balasaheb Thorat : दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपण निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. कालव्यांच्या वरच्या बाजूला पाणी मिळावे हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या मदतीने भोजापुर चारी तयार केली. पाणी देण्यासाठी आपण सातत्यपूर्ण काम केले. यावर्षी मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने निसर्गाची कृपा झाली. तयार असलेली चारी आणि चांगला झालेला पाऊस यामुळे पाणी आले असल्याचा आनंद आहे. मात्र तुमचे या चारीमध्ये योगदान काय असा सवाल माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे पाटील यांना विचारला आहे. बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, निमोण, नान्नज दुमाला या दुष्काळी परिसराला पाणी मिळावे याकरता 1977 मध्ये संगमनेर व प्रवरा कारखाना यांनी संयुक्त खर्चातून चारी करावी असे ठरले. मात्र प्रवरा कारखान्याने यामधून अंग काढून घेतले. 1994 मध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कारखान्याने त्यावेळेस खर्च करून ही पूर चारी निर्माण केली .1996 मध्ये वटमाई डोंगराजवळ पाणी आले. हे पाणी पुढे तिगाव माथापर्यंत नेता येईल याचा विचार करून तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली. 2006 मध्ये कारखान्याची यंत्रणा व सर्व कामगार यांनी श्रमदान करून तिगाव माथापर्यंत चारी पूर्ण केली. 2 ऑक्टोंबर 2006 मध्ये येथे पाणी पूजन केले. आपण जलसंधारण मंत्री असताना 2008 मध्ये या चारीच्या दुरुस्ती, सेतु पुल, काँक्रीट कामे, व लांबी करता 5 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. त्या माध्यमातून सातत्याने कामे केली. भोजापूरचे पाणी दरवर्षी निमोन पिंपळे नान्नज दुमाला ,पारेगाव बुद्रुक, तळेगाव, तीगाव, वरझडी या गावांकरता मिळावे याकरता पाठपुरावा केला. याचबरोबर ही चारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित केली. 2021 मध्ये पुन्हा चारीच्या दुरुस्ती करता 2 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. अनेक वेळा पिंपळे धरण भरल्यामुळे पारेगाव बुद्रुक चिंचोली गुरव देव कवठ्यापर्यंत पाणी गेले. सुरुवातीला चारीच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली.कारखाना यंत्रणा व आपण सातत्यपूर्ण काम केले. हे जनतेला माहित आहे. आपण आपणही अनेक वर्ष मंत्री आहात यापूर्वी या चारीच्या कामासाठी कोणते योगदान दिले. या कामांमध्ये आपण एक तरी खडा कधी उचलला का ? असा सवाल विचारताना नवीन लोकप्रतिनिधीला तर ही चारी सुद्धा माहित नव्हती. काम कोणी केले कोणाचे योगदान आहे हे जनतेला माहित आहे. खोट्या भूल थापा आणि सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून ही भ्रम निर्माण केला जात आहे. यावर्षी निसर्गाची मोठी कृपा झाली. मे आणि जून मध्ये चांगला पाऊस झाल्याने लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाले आणि कारखान्याच्या माध्यमातून तयार असलेली भोजापुर आणि निसर्गाची कृपा यामुळे लवकर पाणी आले. याचा सर्वाधिक आपल्याला आनंद आहे. ही चारी मागील आठ महिन्यात झाली का ? असा सवाल करताना या चारीच्या कामात आपले योगदान काय ? असा परखड सवाल बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे व नवीन लोकप्रतिनिधी खताळ यांना विचारला आहे. कितीही भूलथापा द्या लवकर उत्तर देणार आपण दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी निळवंडे धरण कालवे पूर्ण केले भोजापुरच्या चारीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणी सर्वांना मिळाले पाहिजे यासाठी सातत्यपूर्ण काम आणि प्रयत्न केले. उपेक्षित सर्वांना पाणी मिळाले पाहिजे हा आपला आग्रह आहे. तुम्ही कितीही भूलथापा द्या सर्वांना लवकरच उत्तर देऊ असा इशाराही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

Balasaheb Thorat : तुमचे योगदान काय, तुम्ही आठ महिन्यात चारी केली का ? बाळासाहेब थोरात यांचा परखड सवाल Read More »

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले!

Maharashtra Politics: महाराष्ट्राची ओळख कष्टकरी, बुद्धिजीवी आणि परिवर्तनवादी राज्य म्हणून होती. पण गेल्या काही दशकांत ही ओळख झाकोळली आहे. राज्य आर्थिक संकटात आहे, शेतकरी अडचणीत, तरुण बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था कोलमडलेली त्यामुळे जनता अडचणीत आहे. मात्र याच काळात नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये उमेदवार दाखल करत असलेल्या मालमत्ता विवरणपत्रांवर नजर टाकली, तर अनेक नेत्यांची संपत्ती काही वर्षांत दुप्पट-तिप्पट झाल्याचे स्पष्ट होते. कुठून येतो हा पैसा? सत्तेचा वापर फक्त समाजसेवेकरता नाही, तर वैयक्तिक फायदा मिळवण्यासाठी होतो, अशीच जनता भावना बळावते. शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करत असतो, विद्यार्थी फी भरू शकत नाहीत, रुग्णांना उपचार मिळत नाहीत. पण मंत्रीमहोदयांच्या कोट्यवधींच्या गाड्या, फौजफाटा, बंगल्यांची झळाळी मात्र झकास असते. ही दुहेरी परिस्थिती लोकशाहीला सुरुंग लावत आहे. महाराष्ट्रातील सत्ता म्हणजे केवळ सत्ता नव्हे, ती संपत्तीची शिडी बनली आहे. विरोधात असताना “भ्रष्टाचारविरोधी” घोषणा करणारे सत्तेत गेल्यावर मात्र त्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होतात आणि जनतेला आश्वासनांची विषारी गोळी देत राहतात. आज महाराष्ट्राला गरज आहे ती जबाबदार नेतृत्वाची, पारदर्शक कारभाराची आणि जागरूक जनतेची. अन्यथा “महाराष्ट्र गरीब, नेते श्रीमंत” ही ओळख आपणच कायमस्वरूपी स्वीकारावी लागेल.

Maharashtra Politics: “महाराष्ट्र गरीब झाला, पण नेते श्रीमंत झाले! Read More »

Maharashtra Politics: MVA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! काँग्रेस 14 तर ‘इतक्या’ जागांवर लढणार उद्धव गट

Maharashtra Politics: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 48 पैकी 40 जागांवर अंतिम निर्णय झाला आहे तर 8 जागांवर हा मुद्दा अजूनही अडकला आहे. या 8 जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावा करत असल्याने चर्चा सुरु आहे.  वृत्तानुसार, लोकसभेच्या 40 जागांपैकी ज्यांचे वाटप निश्चित झाले आहे, त्यापैकी शिवसेना (उद्धव ठाकरे) 15, काँग्रेस 14 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 9 लोकसभा जागांवर निवडणूक लढवू शकते. तर वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी यांना प्रत्येकी एक जागा मिळू शकते. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी यांचाही महाविकास आघाडीत समावेश आहे. या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या दोन्ही जागा उद्धव ठाकरे गटाकडून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रात MVA ची स्थापना झाली. MVA आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे. तर तिन्ही पक्षही ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. राज्यातील काही छोटे पक्षही विरोधी आघाडीचा भाग आहेत. महाराष्ट्रातील ज्या आठ लोकसभेच्या जागांवर वाद सुरू आहे त्यात रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा जागांचा समावेश आहे. वास्तविक काँग्रेस मुंबई दक्षिण-मध्य आणि मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या जागांची मागणी करत आहे. मात्र 2019 मध्ये शिवसेनेने दोन्ही जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेना (यूबीटी) या दोन जागा सोडण्यास तयार नाही. महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांच्या वाटपाबाबत एमव्हीएची पुढील बैठक 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जागावाटपाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. अकोला लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी सोडली जाऊ शकते. अशा स्थितीत पक्ष या एका जागेवर समाधानी होणार की आणखी जागांची मागणी करणार हे पाहावे लागेल.

Maharashtra Politics: MVA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! काँग्रेस 14 तर ‘इतक्या’ जागांवर लढणार उद्धव गट Read More »

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा

प्रतिनिधी : सय्यद शाकीर  Maharashtra Politics : भारतीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर करणार आहे. यामुळे आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे. सर्व पक्ष आता जागा वाटपावरून एकमेकांशी बोलताना दिसत आहे.  तर दुसरीकडे राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असणारे भारतीय जनता पक्षाने मुंबईसाठी एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई सर्वाधिक लोकसभा जागा लढू शकते. यामुळे शिंदे गटाला मुंबईत लोकसभेचे किती जागा मिळणार आता हे पाहावे लागणार आहे.   राज्याची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशी थेट लढत होणार आहे. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील साही जागांवर भाजप शिवसेनेने विजय मिळवला होता मात्र आता मुंबईत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजप अशी लढत होणार आहे. यामुळे भाजपने एक खास प्लॅन रेडी केला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष चार जागांवर निवडणूक लढवू शकते. भाजप उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह भाजप दक्षिण मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर उमेदवार देऊ शकते. जर असं झालं तर शिंदे गटाला फक्त 2 लोकसभा जागा मुंबईमध्ये मिळणार. शिंदे गटाला भाजप उत्तर पश्चिम आणि मुंबई साऊथची जागा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics: मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लान तयार! शिंदे गटाला मिळणार फक्त ‘इतक्या’ जागा Read More »

Maharashtra Politics : राज्यात ‘I.N.D.I.A’ मध्ये मतभेद? शिवसेनेचा लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर दावा

Maharashtra Politics: येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहे त्यामुळे आत्तापासूनच सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राज्यात आता काँग्रेस आणि शिवसेनामध्ये तेढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी दोन्ही पक्षांचे नेते आपापले फॉर्म्युला देत आहेत. मात्र, शिवसेनेने (यूबीटी) राज्यातील लोकसभेच्या 23 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांशी नाही तर थेट काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली जाणार आहे. शिवसेना (उद्धव गट) नेते संजय राऊत यांनी राज्यातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागांवर त्यांचा पक्ष उमेदवार उभा करणार असल्याचे राज्यसभा खासदार राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चाही केली आहे. खरे तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी राज्यातील लोकसभेच्या 25 जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाले, काँग्रेसने 25 नव्हे तर सर्व 48 जागांवर निवडणूक लढवावी. मात्र आम्ही आमच्या 23 जागांवर निवडणूक लढवण्यास कटिबद्ध आहोत. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात निर्णय घेऊ शकेल असा एकही काँग्रेस नेता नाही, जे नेते आहेत त्यांना जागावाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांना पुन्हा पुन्हा दिल्लीला विचारावे लागते. त्याऐवजी आम्ही दिल्लीत काँग्रेस नेत्यांशी चर्चा करू, आम्ही 23 लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेश काँग्रेसचे नेते बाजूला? संजय राऊत म्हणाले, शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जेव्हा दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा केली होती. मी आणि आदित्य ठाकरेही उद्धव ठाकरेंसोबत होतो. आम्ही सर्वांनी एकत्र बसून महाराष्ट्राचे राजकारण आणि जागावाटपावर चर्चा केली. त्या चर्चेत काय झाले हे फक्त आपल्यालाच माहीत आहे. महाराष्ट्रातील क्वचितच कोणत्याही काँग्रेस नेत्याला या बैठकीची माहिती असेल. आमच्या जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत होणार आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर प्रदेश काँग्रेसचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  महाराष्ट्रातील मित्रपक्ष MVA (महा विकास आघाडी) आणि I.N.D.I.A सोबत जागावाटपाचा निर्णय दिल्लीतूनच घेतला जाईल, असे काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना आधीच स्पष्टपणे सांगितले आहे.  MVA आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव गट) यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील I.N.D.I.A आघाडीचा एक भाग आहे.

Maharashtra Politics : राज्यात ‘I.N.D.I.A’ मध्ये मतभेद? शिवसेनेचा लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर दावा Read More »