DNA मराठी

Maharashtra election

1000012592

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बंडात साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर यापूर्वी मनसेकडून देखील 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं आहे. मुख्यमंत्री शिंदे आज या आमदारांना एबी फॉर्म वाटप करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे अद्याप देखील महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही. आज किंवा उद्या महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ज्या जागांवर वाद नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना महायुतीकडून एबी फॉर्म देण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आतापर्यंत 17 पेक्षा जास्त उमेदवारांना एबी फॉर्म दिला आहे तर भाजपने आतापर्यंत 99 जागांवर आपले उमेदवारांची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे उमेदवार कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदेसाक्री (अज) – मंजूळाताई गावितचोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटीलएरंडोल – अमोल चिमणराव पाटीलपाचोरा – किशोर पाटीलमुक्ताईनगर – चंद्रकांत पाटीलबुलढाणा – संजय गायकवाडमेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकरदर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळरामटेक – आशिष जैस्वालभंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकरदिग्रस – संजय राठोडनांदेड उत्तर – बालाजी कल्याणकरकळमनुरू – संतोष बांगरजालना – अर्जून खोतकरसिल्लोड – अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाटपैठण – विलास भूमरेवैजापूर – रमेश बोरनारेनांदगाव – सुहास कांदेमालेगाव बाह्य – दादाजी भुसेओवळा माजीवडा – प्रताप सरनाईकमागाठाणे – प्रकाश सुर्वेजोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकरचांदिवली – दिलीप लांडेकुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकरमाहिम – सदा सरवणकरभायखळा – यामिनी जाधवकर्जत – महेंद्र थोरवेअलिबाग- महेंद्र हरी दळवीमहाड- भरतशेठ मारुती गोगावलेउमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुलेपरांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव- महेश शिंदेपाटण- शंभूराज देसाईदापोली- योगेश कदमरत्नागिरी- उदय सामंतराजापुर- किरण सामंतसावंतवाडी- दीपक केसरकरराधानगरी- प्रकाश आबिटकरकरवीर- चंद्रदिप नरकेखानापुर- सुहास बाबर

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदेंची पहिली यादी जाहीर, बंडात साथ देणाऱ्या आमदारांना पुन्हा संधी Read More »

1000005247

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण

Maharashtra Election: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे अहमदनगर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्याच नगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संदीप कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली. त्यामुळे संदीप कोतकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा नगरच्या राजकारणात होत आहे. संदीप कोतकर यांच्या जिल्हा बंदीवरील स्थगितीचा आदेश येताच त्यांच्या समर्थकांनी नगर शहरासह केडगाव उपनगरात मोठा जल्लोष करण्यात आला. माजी महापौर संदीप कोतकर यांना एका प्रकरणात शिक्षा झाली होती. उच्च न्यायालयाच्या या निकालाच्या विरोधात कोतकर यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यानुसार या निकालाला स्थगिती देण्यात आली. याच दरम्यान, कोतकर यांना जामिन देण्यात आला होता. मात्र, त्यांच्यावर नगर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. विधानसभा निवडणूक लढविण्याचा इरादा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जाहीर करताना त्यांच्यासमोर जिल्हा बंदीचे मोठे संकट होते. जिल्हा बंदीची अट उठवावी यासाठी त्यांनी न्यायालयीन लढाई केली. त्यास अखेर यश आले. त्यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आली आहे. कोतकर यांची जिल्हा बंदीची अट शिथील करण्यात आल्याचे वृत्त येताच या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. न्यायालयीन आदेशाची प्रत हाती पडताच ती प्रशासनाकडे सोपविण्याचे सोपस्कर करण्यात येणार असून त्यानंतर संदीप कोतकर हे नगर जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याचे त्यांच्याकडील सुत्रांनी सांगितले. त्यामुळे संदीप कोतकर महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? हे पाहावे लागेल.

Maharashtra Election: माजी महापौर संदीप कोतकरांची जिल्हा बंदी उठली अन् नगरच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण Read More »

Congress

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Election: विधानसभेची घोषणा होताच प्रत्येक पक्षाने उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या काही दिवसात उमेदवारांची घोषणा देखील होणार आहे.  यातच समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीने बुधवारी 62 जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.  प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्क्रिनिंग कमिटीने पाठवलेल्या नावांमधून काँग्रेसचे सीईसी उमेदवाराच्या नावाला मंजुरी देतात. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीने रवींद्र चव्हाण यांचे पुत्र दिवंगत संतराव चव्हाण यांचे एकच नाव मंजूर केल्याचेही ते म्हणाले. वसंतराव चव्हाण यांचे यावर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले, त्यामुळे नांदेड लोकसभा जागेवर पोटनिवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री हिमाचल भवन येथे झालेल्या स्क्रीनिंग समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर पटोले म्हणाले, “62 जागांसाठी मंजुरी देण्यात आली आहे. 20 ऑक्टोबरला सीईसीची बैठक होणार आहे.” दुसरीकडे काँग्रेसने झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी बीके हरिप्रसाद, गौरव गोगोई आणि मोहन मरकम यांची वरिष्ठ समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.  महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

Maharashtra Election: काँग्रेसकडून 62 उमेदवार फायनल, ‘या’ दिवशी होणार घोषणा Read More »

Ahmednagar Collector Office

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण

Maharashtra Election :  निवडणूक आयोगाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये  निवडणूकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय आणि सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी  कोणत्याही प्रकारची मिरवणूक मोर्चा काढणे, आंदोलन, निदर्शने आणि उपोषण करण्यास बंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जिल्ह्यात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भयपणे व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून हे आदेश देण्यात आले आहेत.  वरील नमूद ठिकाणी कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे  आणि निवडणुकीचा प्रचार करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. हे आदेश 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत जिल्ह्यात लागू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदाप्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Election: मोठी बातमी! नगर जिल्ह्यात मोर्चा, निदर्शनांना बंदी, ‘हे’ आहे कारण Read More »

AjitPawar

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये

Maharashtra Election : निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या अनेक इच्छुक उमेदवार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का देत मुंबई काँग्रेसचे मोठे नेते जावेद श्रॉफ यांना पक्ष प्रवेश दिला आहे.  जावेद श्रॉफ मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि त्यांची मुंबईत चांगली पकड असल्याचे मानले जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  नुकतच जाहीर झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याने याचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसू शकतो अशी चर्चा सुरू आहे. यातच अनेक नेते आता पक्ष सोडत असल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.  विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा समावेश आहे. तर महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. कधी होणार मतदान 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.  22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि नामांकनाची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असेल. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. महाराष्ट्रात 9.63 कोटी पात्र मतदार आहेत. महाराष्ट्रातील एकूण 100186 मतदान केंद्रांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

Maharashtra Election: निवडणुकीची घोषणा अन् अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, जावेद श्रॉफ राष्ट्रवादीमध्ये Read More »

IMG 20241016 WA0000

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त

Maharashtra News: श्रीगोंदा पोलीसांनी मोठी कारवाई करत कारवाई विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त् केला आहे.  पोलीस अधिक्षक  राकेश ओला ,अपर पोलीस अधिक्षक  प्रशांत खैरे , व मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, विवेकानंद वाखारे  विभाग व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना गुप्त् बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर एक सुझुकी कंपनीची कॅरी गाडीत एक अनोळखी इसम हा देशी-विदेशी दारुच्या बॉक्सची विनापरवाना बेकायदा चोरुन विक्री करत आहे अशी खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती.  पो.नि किरण शिंदे , यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे, पोना/गोकुळ इंगावले, पोकों/संदिप राऊत, पोकों/संदिप शिरसाठ व पोकों/आनंद मैड यांना सदरची बातमी सांगून कायदेशीर कारवाई करणेबाबत सांगितल्याने लागलीच पोना/गोकुळ इंगावले यांनी दोन खाजगी पंचाना पोलीस स्टेशन येथे बोलावून सदरची माहिती सांगून कारवाई करणेकामी सोबत येण्यास कळविल्याने खांडगांव शिवारात श्रीगोंदा ते मांडवगण जाणारे रोडवर हॉटेल यशोदा समोरील रोडवर सापळा रचुन विनापरवाना बेकायदा देशी-विदेशी दारुची विक्री करणारा इसम  शैलेंद्र सुखदेव बोरगे (वय-52 वर्षे रा. सोनेवाडी ता.जि. अहिल्यानगर) यास सुझुकी कंपनीची कारसह ताब्यात घेतले. आरोपीकडून 5,00,000 रुपये किमंतीची सुझुकी कंपनीची कार व 2,75,460 रुपये किमंतीची देशी-विदेशी दारु असा एकुण 7,75,460 रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.  पोकों संदिप शिरसाठ यांनी सरकार तर्फे फिर्यादी होवून श्रीगोंदा  दारुबंदी का.क.65 (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोना गोकुळ इंगावले हे करीत आहे.

Maharashtra News: विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्या आरोपीकडुन 7,75,460 रुपयांचा मुददेमाल जप्त Read More »

Maharashtra Election

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा

Maharashtra Election: केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे.  महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे. नुकतेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. आता निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही राज्यात सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापनेसाठी बहुमत मिळविले, मात्र अंतर्गत संघर्षामुळे शिवसेनेने युती सोडली. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीची नवी युती केली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले होते. परंतु 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या 40 आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि ते राज्याचे नवे मुख्यमंत्री बनले. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटही सरकारमध्ये सामील झाला. झारखंड निवडणूक पाचव्या झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये झाल्या होत्या. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या युतीने हेमंत सोरेन मुख्यमंत्री बनून राज्य सरकार स्थापन केले. यावेळीही ही युती एकत्र असून सर्व 81 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील ECI शिष्टमंडळाने 24 सप्टेंबर रोजी रांची येथे झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेतला, केंद्र आणि राज्य संस्थांना निधीचा वापर थांबविण्याचे निर्देश दिले. 2019 च्या निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यात मतदान झाले, तर महाराष्ट्रात फक्त एकाच टप्प्यात मतदान झाले.

Maharashtra Election: बिगुल वाजणार, आज विधानसभेसाठी जाहीर होणार निवडणुकीच्या तारखा Read More »

Money

LIC चा धमाका, मिळणार 28 लाख रुपये, करा फक्त ‘हे’ काम

LIC Scheme :  मुलीचे शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी तुम्ही देखील गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एलआयसीने कन्यादान पॉलिसी नावाने एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. तुम्हाला या योजनेत ठराविक कालावधीनंतर चांगला परतावा मिळतो.   LIC कन्यादान पॉलिसी योजना काय आहे? एलआयसी कन्यादान पॉलिसी ही एक योजना आहे जी विशेषतः आयुर्विमा एलआयसीने मुलींचे भविष्य लक्षात घेऊन तयार केली आहे. या अंतर्गत, जर कोणत्याही पालकाने आपल्या मुलीच्या नावावर निश्चित रक्कम जमा केली तर त्यांना पॉलिसीच्या परिपक्वतेवर मोठी रक्कम मिळते. ज्याचा उपयोग त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा इतर गरजा भागवण्यासाठी केला जाऊ शकतो. LIC कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत किती पैसे गुंतवावे लागतील? या योजनेंतर्गत तुम्ही दररोज 121 रुपये जमा केल्यास, 25 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला 27 ते 28 लाख रुपये मिळतील. एलआयसी कन्यादान पॉलिसी योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्याची पात्रता वडिलांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 50 वर्षे असावे. मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. पॉलिसी मॅच्युरिटीचे कमाल वय 65 वर्षे असावे. ही पॉलिसी फक्त पालकच त्यांच्या मुलीच्या नावाने खरेदी करू शकतात. एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना कशी खरेदी करावी ही पॉलिसी एलआयसीच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या शाखेत जाऊन खरेदी केली जाऊ शकते. तेथे तुम्हाला पॉलिसीशी संबंधित अर्ज मिळेल. जे तुम्हाला काळजीपूर्वक भरावे लागेल. त्याशिवाय, तुम्हाला अनेक आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. यानंतर, तुम्हाला दररोज किती प्रीमियम भरावा लागेल? तुम्हाला त्याचा तपशील देखील प्रविष्ट करावा लागेल. तरच 25 वर्षांनंतर तुम्हाला 27 ते 28 लाख रुपये मिळू शकतील.

LIC चा धमाका, मिळणार 28 लाख रुपये, करा फक्त ‘हे’ काम Read More »

Shinde And Fadnavis

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही?

Maharashtra Election: राज्यात आता विधानसभेचे वारे वाहत आहे. येत्या काही दिवसात निवडणुकांची घोषणा देखील होणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आता आपापल्या तयारीला लागला आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना पुणे शहरातील एकही विधानसभा जागेवर उमेदवार देणार नाही.  माहितीनुसार जागा वाटपामध्ये पुण्यातील विधानसभा लढवण्याचा शिवसेनेने दावा सोडला आहे. पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात सेनेचा एकही इच्छुक उमेदवार नसल्याने शिवसेनेने दावा सोडला असल्याची माहिती समोर येत आहे.  तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील 2 जागांवर शिवसेना निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. माहितीनुसार पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता आहे.  तर दुसऱ्या बाजूला मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महादेव बाबर मधून पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा आहे.

Maharashtra Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, ‘या’ शहरात एकही उमेदवार देणार नाही? Read More »

Sanjay Raut

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं

Sanjay Raut:  कालच नायब सैनी सांगत होते निवडणूक जिंकून घेण्यासाठी मी पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. वेबसाईटवर काँग्रेस मागे आहे असं दिसतं पण पूर्ण निकाल होऊ द्या. इथे जसा मराठी माणूस लढवायला आहे तसा तिथे हरियाणातील मतदार देखील लढला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच हरियाणामध्ये काँग्रेसची सरकार येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.  तर महाराष्ट्रात राहुल गांधी, किंवा प्रियंका गांधीला मुख्यमंत्री व्हायचं नाही येथे स्थानिक नेतृत्व आहेत. शरद पवार ,उद्धव ठाकरे आम्हाला माहित आहे जागावाटप कसा व्हायला पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये आमचं जागा वाटपाचा टास्क पूर्ण होईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.  दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल. काँग्रेसचा मुख्यमंत्री हा दिल्लीत निश्चित होतो येथे बोलून काही होणार नाही. आमच्या पार्टीचा हाय कमांड महाराष्ट्र मुंबईत आहे त्यामुळे या संदर्भातील निर्णय आम्ही महाराष्ट्रात घेतो असेही ते म्हणाले.

Sanjay Raut: ‘या’ दिवशी महाविकास आघाडीची पहिली यादी येणार, संजय राऊत यांनी जाहीरचं करून टाकलं Read More »