DNA मराठी

Maharashtra election

IMG 20241112 WA0003

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा

Prajakta Tanpure : माझ्या विरोधी उमेदवारच्या गावात बुर्‍हाणनगर येथे आज आलो. देवीच्या मंदिरात नम्रपणे माथे टेकवून नतमस्तक झालो. परंतु राहुरी येथे माझ्या गावात शनी मंदिरासमोर ज्युनियर कर्डिले यांनी काय अविर्भाव केले. हे सगळ्यांनी पाहिले. मी देवासमोर नतमस्तक होतो, ते दंड-मांड्या ठोकतात. हाच आमच्यातील फरक आहे. असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. नगर तालुक्यात आमदार तनपुरे यांनी दरेवाडी, सैनिक नगर, बाराबाभळी, आलमगीर, वारूळवाडी, कापूरवाडी, गजराज नगर, बुऱ्हाणनगर, वडारवाडी नागरदेवळे येथे झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी बुऱ्हाणनगर येथे तनपुरे बोलत होते. अभिषेक भगत, अमोल जाधव, गोविंद मोकाटे, रामेश्वर निमसे, झोडगे, राहुल ढोरे, उद्धव दुसिंगे, विलास काळे, रामदास ससे, अजय गुंड, कुणाल भगत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले की, “बुऱ्हाणनगर येथे ग्रामस्थ श्वास कोंडल्यासारखे राहतात. कुणालाही मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याला अपवाद अभिषेक भगत, अमोल जाधव आहेत. मतदार संघाचा आमदार असताना येथील ग्रामस्थ माझ्याकडे यायला घाबरतात. येत्या दहा दिवसात सर्व ग्रामस्थांवरील दबाव संपवण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. बुर्‍हाणनगर गावाला पिण्याचे पाणी देण्याचे ज्यांचे काम आहे. तेच आपल्या शेतातील विहिरीत पाणी योजनेची जलवाहिनी फोडून शुद्ध पाणी वापरत होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गावाच्या वाट्याचे पाणी स्वतःसाठी वापरणारे असे कसे नेतृत्व आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुळा धरणातून बुऱ्हाणनगर पाणी योजनेत आपण काही बदल केले आहेत. योजनेतील घाटाखालील राहुरी व नगर तालुक्यातील खडांबे, धामोरी, देहरे, विळद गावांसाठी वेगळी योजना केली आहे. घाटावरील ग्रामीण भागातील गावांसाठी स्वतंत्र जलवाहिनी व बुर्‍हाणनगर, नागरदेवळे साठी स्वतंत्र जलवाहिनी केली आहे. भविष्यात बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजनेतील सर्व गावांना योग्य प्रमाणात पाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमदार म्हणून पाच वर्षे काम करताना मतदार संघातील सर्व गावांना मूलभूत सोई-सुविधा कशा मिळतील. यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. या भागातही अनेक ठिकाणी रोहित्र दिले. पाच वर्षात फक्त विकास कामांवर फोकस केला. कोणत्याही विरोधकाला कोणत्याही प्रकारे त्रास देण्याचा कधीही विचार केला नाही. परंतु काही चांडाळ चौकडींना इशारा देतो. निवडणूक लोकशाही मार्गाने होऊ द्या. निवडणुकीचे दहा दिवस निघून जातील. निवडणूक भयमुक्त होऊ द्या. अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू. भविष्यात तुमचे नेते आमच्या पक्षात येतील, त्यावेळी तुम्हाला पश्चाताप करावा लागेल.” महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्डिले वारंवार राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शरद पवार, अजित पवार यांना भेटून मला तुमच्या पक्षात घ्या. अशी विनंती करायचे. त्यांनी एकदा शरद पवार यांना असे सांगितले की, मला विधान परिषदेचे तिकीट द्या. प्राजक्त तनपुरे यांना विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. त्यावर, त्यांनी तुम्हाला पाडले, तुम्ही काय जबाबदारी घेणार? असे शरद पवार म्हणाले.” असागौप्यस्फोट आमदार तनपुरे यांनी केला. राहुरी व पाथर्डी तालुक्यासह नगर तालुक्यातही तुतारी चिन्ह जोमात आहे. कर्डिलेंना पराभव दिसू लागला आहे. कितीही आवाज दाबला तरी तुतारी वाजणारच आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यातही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.” असेही तनपुरे यांनी सांगितले.

Prajakta Tanpure : निवडणूक भयमुक्त होऊ द्या, अन्यथा मस्ती जिरवण्याचे काम करू…, तनपुरेंचा इशारा Read More »

Election Commission

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Supriya Sule

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »

Police

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभेसाठी निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. संपूर्ण राज्यात पोलिस देखील आचारसंहिताचे पालन करत मोठी कारवाई करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. काळबादेवी येथे पोलिसांनी 12 जणांकडून 2.3 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री काही लोकांना अडवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या लोकांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2.3 कोटी रुपयांची रोकड सापडली. पैसे घेऊन जाणारे हे लोक रोख रकमेशी संबंधित कोणतेही दस्तऐवज सादर करू शकले नाहीत किंवा एवढी मोठी रक्कम घेऊन जाण्याचे कारणही सांगू शकले नाहीत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली पथक रोख रक्कम, दारू आणि इतर संभाव्य प्रलोभनांबाबत सतर्क आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळपर्यंत कागदपत्रे आणि चौकशीनंतर ही रक्कम जप्त करण्यात आली असून रोख घेऊन जाणाऱ्या 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर ही रोकड तपासासाठी आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 2.3 कोटी रुपये जप्त Read More »

Money

RBI Bank: बाबो… बाजारात ‘इतक्या’ कोटींचे 2000 च्या नोटा आजही बाजारात

RBI Bank: देशाची सर्वांत मोठी बँक भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट दिली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांच्या नोटांपैकी 98.04 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्या आहेत आणि अशा नोटांपैकी केवळ 6,970 कोटी रुपयांच्या नोटा लोकांकडे आहेत. RBI ने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. RBI ने सांगितले की, 19 मे 2023 रोजी व्यवसायाच्या समाप्तीच्या वेळी 3.56 लाख कोटी रुपयांच्या एकूण 2000 रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 31 ऑक्टोबर 2024 रोजी व्यवहाराच्या शेवटी चलनात असलेल्या नोटांचे मूल्य 6,970 कोटी रुपये होते. निवेदनात म्हटले आहे की अशा प्रकारे 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 98.04 टक्के नोटा परत आल्या आहेत. या नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा सर्व बँक शाखांमध्ये 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत उपलब्ध होती. ही सुविधा अजूनही RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.

RBI Bank: बाबो… बाजारात ‘इतक्या’ कोटींचे 2000 च्या नोटा आजही बाजारात Read More »

Election

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Election: जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या २५९ उमेदवारांपैकी १०८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, अकोले विधानसभा मतदारसंघात ९, संगमनेर १३, शिर्डी ८, कोपरगाव १२, श्रीरामपूर १६, नेवासा १२, शेवगाव १५, राहुरी १३, पारनेर १२, अहमदनगर शहर १४, श्रीगोंदा १६, तर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ३७ लाख ८३ हजार ९८७ मतदारांपैकी १९ लाख ४६ हजार ९४४ पुरुष, १८ लाख ३६ हजार ८४१ महिला मतदार आहेत. २०२ तृतीयपंथी मतदार असून सैनिक मतदारांची संख्या ९ हजार ५७५ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे ५४ हजार नवमतदारांची भर पडली असल्याची माहितीही सालीमठ यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात १ हजार ९९४ ठिकाणी ३ हजार ७६३ मतदान केंद्र आणि दोन सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. १ हजार ५०० पेक्षा अधिक मतदार असल्याने शिर्डी मतदारसंघातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गजराजनगर (बुऱ्हाणनगर) जिल्हा परिषद शाळेच्या पूर्व इमारतीत प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र उभारण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यात १९ हजार ९६० दिव्यांग व ८५ वर्षावरील ५५ हजार ८०१ एवढे मतदार आहेत. यापैकी गृह मतदान सुविधेसाठी २ हजार ६८८ मतदारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम तसेच मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. जिल्ह्यात मतदान व्यवस्थेचा भाग म्हणून ३४३ क्षेत्रात जिल्ह्याची विभागणी केली असून प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूणच निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ३ हजार ५८० प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच अवैधरित्या वाहतुक करण्यात येणारे मद्य, रोकड आदी मिळून २८ कोटी २६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीशी निगडीत ९ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असुन निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती ओला यांनी यावेळी दिली.

Maharashtra Election: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात 151 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात Read More »

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे. काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आज मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत विधानसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, फक्त मराठा समाजावर निवडून येणे शक्य नाही त्यामुळे रात्री 3 पर्यंत चर्चा करून निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमच्या विरोधकातील लोक पाडायचे असा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी बंडखोरी केल्याने ते देखील अर्ज माघारी घेणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांची मोठी घोषणा, सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश Read More »

Ajit Pawar

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन

Ajit Pawar: लोकसभेप्रमाणे यंदा देखील सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागला आहे. या मतदारसंघात पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्याने यावेळी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळाली होती तर आता अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केला आहे. लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा. असं अजित पवार एका सभेत बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत, यावेळी सावळमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की लोकसभेला लोकांमध्ये एक अंडर करंट होता. त्यामुळे लोकसभेला तुम्ही लोकांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करून साहेबांना खुश केलं आणि आता विधानसभेची ही खालची निवडणूक आहे. त्यामुळे मला मतदान करून मला देखील खुश करा असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 19 जागा जिंकता आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar: लोकसभेत साहेबांना खुश केलं, आता मला खुश करा, अजित पवारांचा बारामतीकरांना आवाहन Read More »

Eknath Shinde

Eknath Shinde: CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, जर मुलगी बहिण गुन्हा असेल तर…

Eknath Shinde: राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडून महायुती सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रचार सभेत बोलताना लाडकी बहिण योजनेवरील विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. जर लाडकी बहिण योजना राबवणे गुन्हा असेल तर ते मला मारू शकतात आणि असे हजारो गुन्हा मी करण्यास तयार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते कुर्ल्यातील एका जाहीर सभेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणतात की ते लाडकी बहिण योजना बंद करू. तुम्ही त्यांना काय उत्तर द्याल?…ते मुंबई हायकोर्टात गेले पण फेटाळले गेले, MVA लोक नागपूर कोर्टात योजना बंद करण्यासाठी गेले. ही योजना आणि इतर योजना बंद करू असे त्यांचे म्हणणे आहे… ते म्हणतात मुली बहिणीला पैसे देणे गुन्हा आहे, मी एकदा नाही तर दहा वेळा असा गुन्हा करायला तयार आहे. तसेच सर्व महिलांच्या सुरक्षित आणि सशक्त भविष्यासाठी त्यांच्या दृष्टीकोनाचा भाग म्हणून ही योजना कायम राहील असे आश्वासन नागरिकांना दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलारविवारी त्यांनी महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर (कुर्ला) आणि मुरजी पटेल (अंधेरी पूर्व) यांच्या समर्थनार्थ दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित केले. केंद्र आणि राज्य प्रशासन यांच्यातील सहयोगी प्रयत्नांवर प्रकाश टाकत शिंदे यांनी लाडकी बहिण सारख्या कल्याणकारी उपक्रमांचे प्रदर्शन केले ज्याने विरोधकांच्या टीकेला उत्तर देत नोव्हेंबरचा हप्ता दिला. निवडणुकांनंतर डिसेंबरचा निधीही असाच ॲडव्हान्स दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आणि महाराष्ट्रातील महिलांना अधिक पाठिंबा देण्यासाठी सध्याच्या 1,500 रुपयांच्या वाटपात वाढ करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी ‘लाडकी बहिण योजने’साठी नोव्हेंबरचा हप्ता यशस्वीरित्या वितरित केल्याची घोषणा केली आणि निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला. असं ते म्हणाले. या योजनेद्वारे राज्य सरकारने राज्यातील मुलींना आधार देण्याची आणि लोकांचे जीवनमान सुधारण्याची आपली वचनबद्धता सातत्याने पूर्ण केली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार कार्यक्रमादरम्यान शिंदे यांनी लोककल्याणासाठी आपल्या समर्पणाला दुजोरा दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये अपूर्ण आश्वासनांवर विरोधकांवर टीका केली आणि हिमाचल प्रदेश, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये काँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी याची तुलना त्यांच्या प्रशासनाच्या वास्तविक वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करण्याशी केली.

Eknath Shinde: CM शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले, जर मुलगी बहिण गुन्हा असेल तर… Read More »