Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय
Maharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पाडली मात्र या बैठकीमध्ये देखील महायुतीमध्ये एक मत न झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सरकार स्थापन करण्याबाबत पुढील चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव मुंबईतच ठरवले जाईल, याबाबत बैठक होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही अडथळा नाही- शिंदेदिल्लीतील बैठक आटोपून मुंबईत परतलेले एकनाथ शिंदे म्हणाले की, अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट सकारात्मक होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबतची ही पहिलीच बैठक असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत आणखी एक बैठक होणार असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या नावावर निर्णय होणार आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापनेत अडथळा बनणार नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करू, असे सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजपचा उमेदवार निवडण्याचा मार्ग मोकळा झाला. शिंदे म्हणाले, हा ‘लाडका भाऊ’ दिल्लीत आला आहे आणि ‘लाडका भाऊ’ या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक आहे. फडणवीसांचा मार्ग मोकळा, पण भाजप जातीय समीकरणे सांभाळेलएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, भाजपचे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील सामाजिक समीकरणांचा विचार करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे भाजपमधील इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि मराठा समाजाच्या नेत्यांसाठी मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या निवडीमध्ये जातीय समीकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, कारण सर्व पक्षांच्या 288 आमदारांपैकी बहुतांश मराठा समाजाचे आहेत. फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे असून ते 2014 मध्ये प्रथम मुख्यमंत्री झाले आणि नंतर 2019 मध्ये काही काळासाठी मुख्यमंत्री झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाचे पालन केल्यास फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता बळावली असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
Maharashtra CM : मुख्यमंत्री कोण? दिल्लीत तिढा सुटला नाही, आता मुंबईत होणार निर्णय Read More »









