DNA मराठी

Maharashtra Election update

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा

Harshwardhan Sapkal: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना पत्र पाठवले असून या पत्रात सपकाळ म्हणाले की, मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, अशा प्रकारे एका महत्वाच्या व संवैधानिक पदावरील व्यक्तीने लोकशाहीचे धिंडवडे काढून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. सपकाळ पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे कर्तव्यच आहे परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर हरप्रकारे दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, आणि निवडणूक आयोगाच्या पाठीचा कणा मजबूत आहे हे आपण दाखवून द्यावे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Harshwardhan Sapkal: राहुल नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा Read More »

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडला आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याआधी निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार होते मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर निकाल आता 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यात बोलताना सपकाळ म्हणाले की, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणावर धांदल झाली. प्रशासकीय धांदल आणि मतांची धांदल देखील या निवडणुकीत दिसली. निवडणूक आयोग हा नशापाणी करून काम करत आहे की आयोग सरकारच्या हातचा बाहुला आहे असा प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोग ही कटपुतली आहे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहे असं सपकाळ म्हणाले. तर040 तास आधी मतदान पुढ ढकलणे, मतमोजणी पुढे ढकलल्याने निवडणूक आयोगाचे वाभाळे निघाले आहेत. निवडणूक आयोग कमी पडल आहे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुका केल्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली पैसे खाऊन भारतीय जनता पार्टी ही गब्बर झाली आहे सगळ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पैसा फेक तमाशा देख असं भाजप करत आहे. राज्यभरात 25 हजार तक्रारी आल्या असाव्यात. आज सगळी पायमल्ली झाली आहे.आजच्या निवडणुकीने लोकशाहीला मोठा फटका बसला आहे असं देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Harshwardhan Sapkal on Maharashtra Election: निवडणूक आयोग कटपुतली, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर काम करतो; हर्षवर्धन सपकाळांचे टीकास्त्र Read More »

election

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल

Maharashtra Election: शिर्डी नगरपरिषद निवडणूकीत एका मतदान केंद्रावर एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने मतदान केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर, निवडणूक प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित मूळ महिलेस नियमानुसार मतदानाचा हक्क मिळवून दिला आहे. ‘प्रदत्त मत’ (Tender Vote) या तरतुदीचा वापर करून संबंधित महिलेचे मतदान करून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डी येथील एका मतदान केंद्रावर शोभा शिंदे या मतदानासाठी आल्या असता, यादीतील त्यांच्या नावासमोर आधीच खूण असल्याचे व त्यांचे मतदान झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराबाबत त्यांनी आणि उपस्थित प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली. याविषयी अधिकृत खुलासा करताना निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले की, “सदर प्रकरणात मूळ मतदाराऐवजी दुसऱ्याच मतदाराने मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर तरतुदीनुसार, मूळ मतदार (श्रीमती शिंदे) यांना ‘प्रदत्त मतपत्रिका’ (Tender Ballot Paper) देण्यात आली. या प्रक्रियेद्वारे त्यांचे ‘प्रदत्त मतदान’ कायदेशीररित्या करून घेण्यात आले आहे.” निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही वैध मतदाराचा हक्क बाधित होऊ नये, यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Maharashtra Election: शिर्डी मतदारसंघात मूळ मतदारास Tender Vote प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बहाल Read More »

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येताच पोलीस विभागातील मोठी बातमी समोर आली आहे. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काल रात्री उशिरा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी रश्मी शुक्ला आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने त्यांना पदमुक्त केले होते. आता पुन्हा एकदा त्यांना सेवेत दाखल करून घेण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने सातत्याने रश्मी शुक्ला यांच्यावर टीका केली होती. त्यांच्यावर फोन टॅपिंगचे आरोप आहेत.काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडून त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यांच्या जागेवर संजयकुमार वर्मा यांची निवडणुक कालावधी पुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात अली होती. 30 जून 2024 रोजी शुक्ला या सेवा निवृत्त झाल्या होत्या परंतु महायुती सरकारने त्यांना पोलीस महासंचालक पदी बसवून दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: मोठी बातमी! पुन्हा एकदा रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी Read More »

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. राज्यात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महायुतीची सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माहितीनुसार निवडणूक आयोग राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. प्रत्यक्षात त्यांच्या पक्षाचा एकही आमदार विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला नाही. त्याच वेळी, पक्षाची मतांची टक्केवारीही खूप कमी होती, त्यामुळे निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करण्याचा विचार करत आहे. विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाला किमान एक विधानसभेची जागा किंवा 8 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 125 जागांसाठी उमेदवार उभे केले होते, पण एकही जागा जिंकता आली नाही. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही निवडणुकीत पराभव झाला. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता रद्द केल्यास तो राज ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाईल. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.55% मते मिळाली आहेत. पक्षाला एकूण 1,002,557 मते मिळाली. या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या घरी पक्षश्रेष्ठींची आत्मपरीक्षण बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणुकीतील खराब कामगिरी आणि पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते. भाजपने 132 जागा जिंकल्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा 100 हून अधिक जागा जिंकण्यात यश मिळवले. 149 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपने 132 जागा जिंकल्या. त्याचवेळी शिवसेनेने 57 तर राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या. त्या तुलनेत महाविकास आघाडी केवळ 49 जागांवर मर्यादित राहिली. या निवडणुकीत भाजपची मते 26.77 टक्के होती. तर काँग्रेसला 12.4 टक्के मते मिळाली.

Raj Thackeray: राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची मान्यता होणार रद्द, ‘हे’ आहे कारण Read More »

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : राज्यातील विधानसभेसाठी प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला. आज संध्याकाळी 6 ला प्रचाराच्या तोफा थंड देखील होणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबई आयोजित एका जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी नीती आयोगाची ब्ल्यू प्रिंट म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) महत्त्व कमी करून मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव असल्याचा दावा केला. यावेळी उद्धव म्हणाले की, सत्तेत आल्यास महाविकास आघाडी (MVA) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) आणि MMRDA यांच्यात झालेला सामंजस्य करार रद्द करेल, कारण BMC चे महत्त्व कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावरील सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) बीएमसीच्या अधिकारक्षेत्रात अतिक्रमण करत असेल तर ते एमएमआरडीए विसर्जित करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. ते म्हणाले, “मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र केवळ चर्चा नाही तर एक गंभीर संकट आहे. हे षडयंत्र खरे आहे, परंतु आम्ही हे कधीही होऊ देणार नाही. ते म्हणाले की एमएमआरडीए आणि डब्ल्यूईएफ यांनी सप्टेंबरमध्ये एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी करार केला होता. एमएमआर विकासावरील NITI आयोगाच्या अहवालानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील जमीन अदानी समुहाच्या ताब्यात देणाऱ्या महायुती सरकारची धोरणे संपुष्टात आणण्याचा एमव्हीएच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिला निर्णय असेल, असे ठाकरे म्हणाले. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, ते ‘विकासविरोधी नसून विनाशविरोधी’ आहेत. त्यांनी दावा केला की त्यांच्या नेतृत्वाखालील एमव्हीए सरकार पाडले गेले (जून 2022 मध्ये) आणि शिवसेनेत फूट पडली कारण त्यांनी महाराष्ट्राची लूट होऊ दिली नाही. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray: … तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल Read More »

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही

PM Modi Live: महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेत पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला मात्र या सभेत देखील त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करत मोदींनी पुण्यात सुरू असणाऱ्या विकासकमाबद्दल माहिती दिली. तसेच पुण्यात गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर याची गरज आहे. ती आम्ही वाढवू. महायुतीची नवीन सरकार पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाठी आणखी जोराने काम करणार अशी ग्वाही त्यांनी दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे अडीच वर्ष फक्त महायुतीचे प्रोजेक्ट रद्द करण्यात संपले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीची हीच संस्कृती आहे. अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीतर काँग्रेसच्या काळात अनेक वर्ष देशात दोन संविधान होते मात्र आम्ही कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान लागू केला आणि लाल चौकमध्ये तिरंगा फडकावला. मात्र पुन्हा एकदा काँग्रेस आणि त्यांचे लोक जम्मू काश्मीरमध्ये   370 कलम लागू करण्याचे प्रयत्न करत आहे. असेही मोदी म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर एकही शब्द बोलला नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी जोरदार टीका केली होती मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींकडून शरद पवार यांचा उल्लेख टाळण्यात येत आहे.

PM Modi Live: पंतप्रधान मोदींचा पुण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल पण शरद पवारांवर शब्द ही नाही Read More »

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी, मुद्रीत माध्यमांमधून प्रकाशित होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचे पारनेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी कळविले आहे. यासाठी जाहिरात प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान दोन दिवस अगोदर जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात अर्ज सादर करावा. मतदानाच्या दिवशी किंवा त्याच्या आधी कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे निवडणूक प्रक्रिया बाधित होवू नये यासाठी पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने या निर्देशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Election: मुद्रीत माध्यमात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक – निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर Read More »

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा

Supriya Sule On Ajit Pawar: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दमदार भाषण करत अजित पवारांना इशारा दिला आहे. या वेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा वेगळ्या व्यक्तीसाठी आम्ही तिकीट मागितली होती असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. मागच्या वेळेस ज्या व्यक्तीला तिकीट दिलं त्याच्या एबी फॉर्मवर शरद पवार यांची सही आहे. म्हणजे त्या व्यक्तीला तिकीट शरद पवार यांनी दिल. त्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. पोर्षे कार दुर्घटनात ज्या आई-वडिलांचे एक मुलगा आणि एक मुलगी गेली त्यांचे अश्रू आजही थांबलेले नाहीत.इथल्या स्थानिक नेत्यानी पोर्श कार ज्याची होती त्या आरोपीला बिर्याणी आणि पिझ्झा खायला घातला हे वास्तव आहे. ज्यांनी पोर्षे कार दुर्घटनेमधील आरोपींना मदत केली त्याच नेत्यानी शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे की तुम्ही या दुर्घटनेच्या केसमध्ये माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेल. मी त्या नेत्याला आव्हान देते मी एकदा नाही तर शंभर वेळा ज्यांनी त्या दोन युवकांची हत्या केली त्यांची मदत करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात बोलणार तुमच्यात हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांना देखील नोटीस पाठवाच. रक्ताचे सॅम्पल बदलायचं पाप हे तुमच्या सरकारने केला आहे. अरे शरद पवार दिल्लीच्या तक्ताच्या ईडीच्या नोटीसला घाबरत नाही या तुझ्या नोटीसला काय घाबरणार? माझी त्या व्यक्तीसोबत वैयक्तिक दुश्मनी नाही. पोर्स दुर्घटनेमध्ये सहभाग नसता तर मी त्याच्यावर एक शब्द देखील बोलले नसते. काही वेळापूर्वी इथे येऊन एका नेत्यांनी भाषण केलं की अनेक लोकांना मी संधी दिली, पक्षाने नाही मी… आता मी जे बोलते ती भाषणाची स्टाईल माझी नाही माझं हे भाषण ऐकून माझी आई मला खूप ओरडणार आहे. इथे येऊन ते म्हणाले कुणाची अंडी पिल्ली माहित आहेत जशी तुम्हाला इथली माहित आहे तशी आम्हाला…. त्यामुळे जुनं काही बोलू नका आणि जर काढलंच तर ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’. बापू मला तुमच्याकडून आज एक शब्द हवाय तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघात एकही एक्सीडेंट झाला तर तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार नाही तुम्ही सरळ हॉस्पिटलमध्ये जाल.

Supriya Sule On Ajit Pawar: ‘यहा से भी करारा जबाब मिलेगा’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना थेट इशारा Read More »

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेसाठी रणधुमाळी सुरु असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळ्यात महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेत आहे. या सभेत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असे वक्तव्य केले आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पुढे होता मात्र मालेगाव आणि धुळेमधील व्होट जिहादमुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे ही निवडणूक जागे व्हायची निवडणुक आहे. ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यात पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळत आहे.

Devendra Fadnavis: ही निवडणूक व्होट जिहाद विरुद्ध, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल Read More »