DNA मराठी

IND vs Aus

josh hazlewood

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर

Josh Hazlewood : पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताविरोधात शानदार गोलंदाजी करणारा ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड टी 20 मालिकेतून बाहेर झाला आहे. तो या मालिकेतील पुढील तिन्ही सामने खेळणार नसल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बॉर्डकडून देण्यात आली आहे. जोश हेझलवूड मालिकेतून बाहेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी अ‍ॅशेस कसोटी मालिकेला लक्षात घेऊन जोश हेझलवूडला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या प्रतिष्ठित कसोटी मालिकेसाठी हेझलवूडला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवणे संघ व्यवस्थापनासाठी प्राधान्य आहे. लांब आणि आव्हानात्मक पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेत त्याचा अनुभव आणि तंदुरुस्ती आवश्यक असेल, म्हणून त्याला भारताविरुद्धच्या उर्वरित टी-20 सामन्यांमधून विश्रांती देण्यात आली आहे. मेलबर्नमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात, हेझलवूडने चार षटकांत फक्त 13 धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याच्या घातक स्पेलमुळे टीम इंडिया सुरुवातीलाच अडचणीत आली. हेझलवूडच्या अनुपस्थितीत, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी विभागाची नक्कीच परीक्षा होईल. संघ आता त्याच्या जागी झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस किंवा शॉन अ‍ॅबॉट सारख्या गोलंदाजांना निवडू शकतो. दुसरीकडे, भारतीय संघासाठी ही एक दिलासादायक बाब आहे की त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये हेझलवूडच्या धोकादायक स्विंग आणि अचूक गोलंदाजीचा सामना करावा लागणार नाही.

Josh Hazlewood : टीम इंडियासाठी गुड न्यूज; ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार गोलंदाज टी20 मालिकेतून बाहेर Read More »

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात

Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये शानदार कामगिरी करत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2013, 2017 नंतर सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाच्या विजयात मोहम्मद शमी आणि विराट कोहली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शमीने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला 264 धावांवर रोखले तर कोहलीने धावांचा पाठलाग करताना संघाची जबाबदारी घेतली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, परंतु भारताच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले. शमीने 3 विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनीही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पाठलाग करताना विराट कोहलीने श्रेयस अय्यरसह 91 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोघांनीही भारताच्या विजयाचा पाया रचला. कोहलीने 73 धावा करत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर श्रेयसने 45 धावा केल्या. त्यानंतर कोहलीसोबत अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. राहुल (42*) आणि हार्दिक पंड्या (28) यांनी संघाला विजय मिळवून दिला. 14 वर्षांनी ऑस्ट्रेलियाला हरवलेभारताने 14 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात भारताने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले होते.

भारताची फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलियाला 14 वर्षांनंतर दिली मात Read More »

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय?

Rohit Sharma: भारतीय कर्णधार रोहित शर्माची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये बॅट आतापर्यंत खूप फ्लॉप ठरली आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात केवळ 22 धावा केल्या आहेत. रोहितच्या या खराब फॉर्ममध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे. सातत्याने धावा न केल्याने निराश झालेल्या रोहितने आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित निवृत्तीची घोषणा करू शकतोमीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. अशा स्थितीत सिडनीतील शेवटचा सामना हिटमॅनच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी ठरू शकतो. रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य निवडकर्ता आणि माजी खेळाडू अजित आगरकर मेलबर्नमध्ये असून तो रोहित शर्माशी त्याच्या भविष्याबद्दल बोलू शकतो. रिपोर्टनुसार, जर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला नाही, तर रोहित शर्मा टेस्ट फॉरमॅट सोडू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सध्या 1-1अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत रोहितचे कसोटी भवितव्य त्याच्या फॉर्मवर आणि भारताच्या विजयावर अवलंबून आहे. रोहितला कारकीर्द वाचवायची असेल तर त्याला मेलबर्न आणि सिडनीमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. त्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा सामना असणार आहे. रोहित टी-20आधीच निवृत्त झाला आहेरोहित शर्माने पहिल्यांदाच T20I ला अलविदा केला आहे. भारताने यावर्षी ऐतिहासिक T20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर चाहते खूपच निराश झाले होते. आता हा रिपोर्ट जाणून हिटमॅनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आता रोहितने आगामी डावात फलंदाजीने खळबळ माजवावी आणि भारतासाठी महत्त्वाची खेळी खेळून संघाला विजयाकडे नेले पाहिजे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. हिटमॅन रोहित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना खेळला नव्हता. यानंतर त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि मधल्या फळीत फलंदाजी केली. मात्र, रोहितच्या खराब फॉर्मने त्याची साथ सोडली नाही आणि तो आतापर्यंत बॅटने मोठी खेळी खेळू शकला नाही.

Rohit Sharma होणार निवृत्त, मुख्य निवडकर्ता आगरकर घेणार मोठा निर्णय? Read More »

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम

IND VS AUS 4th Test : आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉक्सिंग डे कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 19 वर्षीय सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टन्सने कसोटीत डेब्यू केला आहे. तर दुसरीकडे या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टन्समध्ये वाद पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्याच्या 11व्या षटकात विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे पंच आणि सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी प्रकरण शांत केले. 19 वर्षीय सलामीवीराच्या खांद्याला धक्का दिल्याने आयसीसी विराट कोहलीवर कारवाई करू शकते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावातील 11 वे षटक टाकत होता. ज्यावर नवोदित सॅम कॉन्स्टासने चौकार आणि षटकार ठोकले. त्यानंतर 11व्या षटकाच्या मध्यावर विराट कोहली ऑस्ट्रेलियन सलामीवीराच्या दिशेने जाताना दिसतो. याच व्हिडिओमध्ये विराट बॉल घेणार असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याची सॅम कॉन्स्टासशी टक्कर झाली. आयसीसीचे नियम काय सांगतात ते जाणून घ्याजर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्ड (ICC) चे नियम पाहिले तर कलम 2.1 नुसार क्रिकेटपटू, पंच, सामनाधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला धक्का दिल्यास आयसीसी कारवाई करू शकते. या घटनेपूर्वीही क्रिकेटच्या इतिहासात अशी प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आधीच्या घटना पाहिल्या तर कळेल की अशा प्रकरणांमध्ये सामन्यावर बंदी किंवा निलंबनासारखी शिक्षा दिली जात नाही. केवळ सामनाधिकारीच शिक्षा म्हणून सामना फी किंवा डिमेरिट पॉइंट देऊ शकतात.

IND VS AUS 4th Test : सॅम कॉन्स्टन्सला भिडणे विराट कोहलीला महागात पडणार? जाणून घ्या काय सांगतो ICC नियम Read More »