DNA मराठी

Imtiyaz Jaleel

img 20250711 wa0002

नगरच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका? MIM जिल्हाध्यक्ष परवेज अशरफींनी दिले संकेत

AIMIM Ahmednagar: अहमदनगरमध्ये पूर्ण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा एमआयएमच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक एमआयएम किंग मेकर ठरणार की कोणाला धक्का देणार याबाबत जिल्ह्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात एमआयएम पक्षाला बळकट करण्यासाठी राज्याची कोर कमेटीने राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशाने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. पश्चिम महाराष्ट्राची सुरवात अहमदनगर येथून करण्यात आली. नगर येथे ही जिल्ह्याचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर, अतिक अहमद, प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी, सह सचिव शाफीउल्ला काझी, सह सचिव सैफ पठाण यांच्यासह पक्षाचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी नगरची माहिती देत असतांना सांगितले की अहमदनगरमध्ये जेव्हा आम्ही एमआयएमचे काम सुरु केले तेव्हा लोक कोणताही प्रतिसाद देत नव्हते. परंतु आज चांगल्या चांगल्या नेते आणि आजी माजी लोक प्रतिनिधी एमआयएम सोबत येण्यास तयार आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी देणार असल्याचेही पक्ष श्रेष्ठींना सांगितले. येणाऱ्या महानगर पालिका निवडणूक असो की जिल्ह्यातील कोणतीही निवडणूक असो एमआयएम आपल्या हिस्स्याचे लोक प्रतिनिधी निवडून आणतील. प्रदेश महासचिव समीर साजिद बिल्डर यांनी सांगितले की आम्ही नगर पासून जवळ आहे. आम्हाला माहित आहे की स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुस्लीम अल्पसंख्यांक समाजाबद्दल काही अपशब्द वापरले आहे.त्यांना मुस्लीम समाजाचे दर्गा मस्जिद आणि जमीन यांच्यावर कब्जा करायचा आहे. काळजी करू नका विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची क्षमता फक्त एमआयएममध्ये असून लवकरच त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्यात येईल. महानगर पालिकेत एमआयएमचे उमेदवार निवडून द्या. विकास काय असतो आणि कसा करायचा असतो हे जनतेला दाखून देऊ. असं देखील ते म्हणाले. प्रदेश महासचिव अतिक अहमद म्हणाले की पक्ष बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व समाजाला ज्यांच्यावर अत्यचार करण्यात आले आहे त्यांना एकत्र घेऊन सत्तेत भागीदारी घ्यावी लागेल. येणारा काळ एमआयएम साठी सुवर्णकाळ असणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रदेश उपाध्यक्ष युसुफ पुंजानी यांनी ते एम आय एम सोबत कसे जुडले आणि कसे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला यावर भाष्य केले. तर सैफ पठाण यांनी सांगितले की मी एम आय एम सोबत एक कार्यकर्ता या नात्याने जुडलो आणि समाजाचे काम करत गेलो. माझ्या कामाची विरोधकांनी इतकी धास्ती घेतली की मला खोट्या गुन्ह्यात अडकून तुरुंगात टाकले.परंतु आज खासदार ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन प्रदेश सहसचिव पदाची जबाबदारी दिली. आणि मला पूर्ण महाराष्ट्रात पक्ष बळकट करण्यासाठी सांगितल्याने मी आज तुमच्या सोबत असल्याचे नमूद केले. सहसचिव शफीउल्ला काझी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की जो पक्षासाठी निष्ठावंत आहे पक्ष त्याच्या सोबत खंबीरपणे उभा राहणार. कोणीही पक्ष विरोधी कारवाई केली तर त्याला पक्षात कोणतेही स्थान नसणार. यावेळी एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष तौसीफ शेख, युवा अध्यक्ष अमीर खान, शेवगाव अध्यक्ष युसुफ शेख, कर्जत अध्यक्ष डॉ अन्सार, श्रीरामपूर शहर अध्यक्ष शहाबाज शेख, सरफराज सय्यद, इम्रान देशमुख, इस्माईल शेख, शम्स शेख, नासीर शेख, आवेज शेख, नदीम तांबोळी, शोएब पठाण, सज्जाद शेख आदी उपस्थिती होते. येणाऱ्या काळात एम आय एम ची सत्ता स्थापनेसाठी महत्वाची भूमिका असणार असल्याची चर्चा सर्वत्र होत असल्याने एम आय एम मुळे किधर खुशी किधर गम असण्याची शक्याता आहे.

नगरच्या राजकारणात लवकरच मोठा धमाका? MIM जिल्हाध्यक्ष परवेज अशरफींनी दिले संकेत Read More »

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका

imtiyaz Jaleel : मागील काही दिवसांपासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावरून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अशातच आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मोठी मागणी केली आहे. “ज्यांचा मृत्यू झाला ते तर आता परत येणार नाहीत. पण जर आपल्याला त्यांना न्याय द्यायचा असेल तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत असून जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले की, “सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त गुन्हेगारी बीडमध्ये होत आहे. कशाप्रकारे तिथे गँग ऑपरेट होते. त्याशिवाय वाळू माफी असेल किंवा दुसरे काही असेल. अशावेळी प्रश्न हा उपस्थित होतो की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हा प्रश्न का पडत नाही? त्यामुळे जी गुन्हेगारी सुरू आहे, त्याला कुठेतरी राज्य सरकारचं संरक्षण आहे असे दिसत आहे,” असा गंभीर आरोप देखील इम्तियाज जलील (imtiyaz Jaleel) यांनी केला आहे. इम्तियाज जलील यांची मुख्य मागणी: राजकीय प्रतिक्रिया: ह्या प्रकरणामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप युती सरकारवर दबाव वाढला आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणामुळेच अशी गुन्हेगारी घडत आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. पुढील संभाव्यता: या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडणार आहे, विशेषत: गुन्हे, प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवर चर्चा होत आहे.

imtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीकाimtiyaz Jaleelimtiyaz Jaleel : धनंजय मुंडेंचे नाव न घेता इम्तियाज जलील यांची सरकारवर टीका Read More »

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार

Delhi Assembly Election: पुढील वर्षी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएम देखील उमेदवार देणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी पक्षाकडून मुस्तफाबादमधून ताहीर हुसेन यांच्या नावाची घोषणा देखील पक्षाकडून करण्यात आली आहे. माहितीनुसार एआयएमआयएम दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये 10 जागांवर निवडणुक लढवणार आहे. एआयएमआयएमच्या या घोषणेनंतर सत्ताधारी आम आदमी पक्षाला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएमने केवळ ताहिर हुसैन यांना तिकीट दिले नाही तर 18 डिसेंबर रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या मतदारसंघात रॅलीही काढली. मुस्लीमबहुल मुस्तफाबाद येथे रॅली काढताना ओवेसी म्हणाले की, राजकारणात मुस्लिमांना कोणीही नेतृत्व देऊ इच्छित नाही. त्यांचे नेतृत्व कोणालाही सहन होत नाही. ते म्हणाले की भारतातील प्रत्येक समुदायाला राजकीय नेतृत्व आहे परंतु मुस्लिमांसाठी राजकीय नेतृत्व तयार करण्यात लोकांना अडचणी येतात. एआयएमआयएम दिल्लीतील दहा विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. मुस्तफाबाद या एका जागेसाठी ताहिर हुसेन यांची नावे आधीच जाहीर करण्यात आली आहेत. पक्ष लवकरच 9 जागांची घोषणा करेल. ओवेसी यांचा पक्ष सीलमपूर, बाबरपूर, बल्लीमारन, चांदनी चौक, ओखला, जंगपुरा, सदर बाजार, मतिया महल आणि करावल नगर या जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. आम आदमी पक्षाने 10 पैकी 9 जागा जिंकल्यादिल्लीचे राज्य प्रभारी इम्तियाज जलील म्हणाले की, पक्ष सर्वेक्षण करत आहे जेणेकरून योग्य उमेदवार उभे करता येतील. वृत्तांवर विश्वास ठेवला तर AIMIM ने ज्या 10 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यापैकी 9 जागांवर मुस्लिम बहुल आहेत. या जागा आम आदमी पक्षाकडे आहेत.

Delhi Assembly Election: आप-काँग्रेसला धक्का, दिल्ली विधानसभा निवडणुकीत ओवेसींची एन्ट्री, ‘इतक्या’ जागांवर उमेदवार देणार Read More »