DNA मराठी

IMD Alert Today

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी

Ahmednagar Rain Alert: देशात मान्सून परतीच्या पावसाची सुरुवात झाली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील काही भागात 23 ते 25 सप्टेंबर जोरदार पावसाचा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत वीजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस, तसेच 26 सप्टेंबर रोजी  वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्‍यात आलेला आहे.   पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे  जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.   मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्‍ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्‍यासाठी दक्षतेची बाब म्‍हणून जाहिरात फलकांच्‍या (होर्डिंग्‍ज्) आजूबाजूला थांबू नये व योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. स्‍थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना तातडीने सुरक्षितस्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्‍याकाठच्‍या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्‍यास नागरिकांनी नदीपात्रातुन तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्‍यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्‍यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्‍यासाठी गर्दी करू नये. अतिवृष्‍टीमुळे भूस्‍खलन होण्‍याची व दरडी कोसळण्‍याची शक्‍यता असते. त्‍यादृष्‍टीने डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्‍यावी. वेळीच सुरक्षित स्‍थळी स्‍थलांतर करावे. घाट रस्‍त्‍याने प्रवास करणे शक्‍यतो टाळावे.  धरण व नदीक्षेत्रामध्‍ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्‍यावी. नदीच्‍या पाण्‍याच्‍या प्रवाहामध्‍ये चढू अथवा उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्‍फी  काढू नये.                   वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन किंवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्‍वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844  अथवा 2356940  या क्रमांकावर  संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Ahmednagar Rain Alert: सावधान, जिल्ह्यात पुढील 2 दिवस कोसळणार धो धो पाऊस, अलर्ट जारी Read More »

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

Weather Update: देशातील काही भागात मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे तर काही भागात मुसळधार पावसामुळे लोकांचे जीवन धोक्यात आले आहे.   वायनाड भूस्खलन असो किंवा उत्तर भारतातील हिमाचलमध्ये ढग फुटण्याची घटना असो दोन्ही ठिकाणी लोकांचे मृत्यू झाले आहे. वायनाडमध्ये सर्वाधिक जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. सध्याही पावसाचा जोर कायम आहे.  उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही डोंगराळ भागात अजूनही पाऊस पडत आहे, जेथे थंड वारे वाहत आहेत. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते बंद झाले, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.   या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामानाने देशातील सर्व भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि बिहारसह सर्व राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच राजधानी दिल्लीत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिल्लीत शनिवार ते सोमवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत 6 ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. चंदीगड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. येत्या दोन दिवसांत उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. डोंगराळ भागात रस्त्यावर जाण्याचा सल्ला दिला जात नाही, कारण भूस्खलनासारख्या घटना घडू शकतात. याशिवाय बिहारमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, बांका, गया, जमुई, नवाडा येथे पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा IMD नुसार, दक्षिण भारतातील सर्व राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोस्टल कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुद्दुचेरी, कराईकल, कोस्टल आंध्र प्रदेश, यानाम, तेलंगणा आणि रायलसीमा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 2 ऑगस्टपर्यंत आणि किनारपट्टीच्या कर्नाटकात 4 ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडू शकतो.

Weather Update: विजांच्या कडकडाट अन् मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी Read More »

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क

Rain Bath : देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. या पावसात  मान्सूनच्या पावसात भिजल्यासारखं प्रत्येकाला वाटतं. पाऊस बालपणीच्या दिवसांची आठवण करून देतो. पावसात आंघोळ करायला खूप मजा येते. बरेच लोक पावसात भिजण्यास नकार देतात, तथापि, पावसात आंघोळ करण्याचे बरेच फायदे आहेत. पावसात भिजताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पावसात भिजण्याचे फायदे पुरळ बरे होतात उष्णतेमुळे आणि घामामुळे पुरळ उठते. ते दूर करण्यासाठी पावसाचे पाणी देखील फायदेशीर आहे. पावसात आंघोळ केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पुरळही बरे होतात.  हार्मोन्स बाहेर पडतात पावसात भिजण्याची मजा येते आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. अशा स्थितीत मन आणि शरीराला खूप आराम वाटतो. पावसात आंघोळ केल्याने तुमचा मूड सुधारू शकतो. व्हिटॅमिन बी 12 वाढवते पावसात 10 ते 15 मिनिटे अंघोळ करणे आरोग्यासाठी चांगले असते. यातून तुम्हाला व्हिटॅमिन बी12 मिळते. पण लक्षात ठेवा पावसात आंघोळ केल्यानंतर साबणाने आंघोळ करा. केसांसाठी फायदे पावसाच्या पाण्यात अल्कधर्मी पीएफ असतो. हे पाणी केसांसाठी फायदेशीर आहे. पावसात आंघोळ केल्याने केसांचा निस्तेजपणा दूर होतो. ते त्वचेसाठीही चांगले असते. लक्षात ठेवा पावसात भिजल्यानंतर शॅम्पू करणे आवश्यक आहे. पावसात भिजत असाल तर घ्या ही खबरदारी पावसात जास्त वेळ अंघोळ करू नये कारण आजारी पडण्याचा धोका असतो. 15-20 मिनिटे पावसात भिजायला हरकत नाही. यापेक्षा जास्त आंघोळ करू नका.  पावसात 15-20 मिनिटे आंघोळ केल्यानंतर लगेच आंघोळ करावी. कोमट पाण्याने आंघोळ करावी.  शरीर आतून गरम करण्यासाठी पावसात भिजल्यावर गरम सूप किंवा चहा प्या. याशिवाय पहिल्या पावसात भिजणे टाळावे. या पाण्यात बॅक्टेरिया असतात.

Rain Bath : बिन्धास्त करा ‘रेन बाथ’, पावसात भिजण्याचे फायदे जाणून व्हाल तुम्ही थक्क Read More »

Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप

Ahmednagar Rain: राज्यातील बहुतेक भागासह अहमदनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.  यातच जामखेड मोहरी परीसरात रात्री आठच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने नागरिकांची तारांबळ केली. जामखेड शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर तसेच जामखेड नगर रस्त्यावर आणि नाल्यात पूरसदृश पाण्यामुळे वाहतूक चार तास खोळंबली होती त्यामुळे परिसराचा संपर्क तुटला. तसेच परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते तर मोहरी परिसरात जोरदार पावसामुळे नदी ओढ्याकाठची शेती वाहुन गेली. तर अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. आता या नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.  तर दुसरीकडे मोहरी तलाव एकाच पावसाने ओव्हर फ्लो झाला आहे.

Ahmednagar Rain: जामखेडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्याला आले नदीचे स्वरूप Read More »

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी

Monsoon Update: जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा आगमन झाला आहे. यामुळे आता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. पुढील 2 दिवसांत राज्यातील आणखी काही भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत वेळेपूर्वी दाखल झाला असून, येत्या दोन दिवसांत दक्षिण कोकणात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे.  कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी मुसळधार पाऊस पडू शकतो. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 11 जूनपर्यंत कोकणात अतिवृष्टी (64.5-115.5 मिमी) ते अति अतिवृष्टी (115.5-204.4 मिमी) होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. तर सोमवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Monsoon Update: पुढील 2 दिवस धो धो पाऊस! सोलापूर, नांदेड, लातूरसह ‘या’ भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी Read More »

IMD Alert Today: होणार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

IMD Alert Today : हळूहळू आता संपूर्ण देशात मान्सूनचा आगमन होताना दिसत आहे. यामुळे काही ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने  देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पूर्व भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत कर्नाटक, केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय लक्षद्वीप, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि अंदमान निकोबार बेटांवर मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच विदर्भ, सिक्कीम, ईशान्य भारत, दक्षिण गुजरात, जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे वीज पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, ओडिशा आणि दक्षिण गुजरातच्या सर्व भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व राजस्थान आणि बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. पश्चिम राजस्थान आणि पूर्व राजस्थानच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक ठिकाणी धुळीच्या वादळासह पाऊस पडू शकतो. दिल्ली आणि परिसरात धुळीचे वादळ आणि हलका पाऊस झाला. ईशान्य मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

IMD Alert Today: होणार मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी Read More »

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे.  या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.  अकोला जिल्ह्य़ात व बाळापूर, तेल्हारा, अकोट, पातुर तालुक्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. काही शेतकऱ्यांना अवकाळी दिलासा मिळाला तरी काही शेतकऱ्यांची निराक्षा झाली आहे. अकोल्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.  टरबूज, संत्रा, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यात सायंकाळी वादळी  पावसासह काही भागात गारपीट झाली आहे. राज्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे.  तरी यांकडे अकोला जिल्हाअधिकारी अजित कुंभार यांनी लक्ष देऊन नुकसान झालेल्या गहू, हरभरा, ज्वारी,कादा संञा, या पिकांचे सर्वे करण्याचे आदेश तलाठी यांना द्यावे व नुकसान झालेल्या अकोल्या जिल्ह्य़ातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बाळापूर तालुक्यांमध्ये हरभरा, कादा काढण्याचे काम चालू आहे. त्यामुळे लोहारा ,कवठा,बहादूरा, निंबा, हाता,जानोरी,वझेगाव, अंदुरा या परिसरात काल झालेल्या अवकाळी पाऊसामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत.

Maharashtra IMD Alert:- आभाळ फाटलं, काळीज तुटलं, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नंनावर पाणी Read More »

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी

Weather Update: देशात दररोज बदलणाऱ्या वातावरणामुळे काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात थंडीने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणीत वाढ केली आहे.  आज सकाळी देशातील बहूतेक भागात रिमझिम पाऊसही पाहायला मिळाला.   तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीच्या आसपासच्या हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. याच बरोबर ईशान्येकडील राज्यांमध्ये पुन्हा हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी तापमान वाढत आहे तर काही ठिकाणी घसरत आहे. दक्षिण भारतातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा इशारा दिला आहे. येथे हवामान कसे असेल? IMD नुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्याने राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पावसासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.   सोमवारी जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवारी ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानच्या विविध भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामानातील हा बदल फक्त वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे नोंदवला जाऊ शकतो. इथे मुसळधार पाऊस पडेल IMD नुसार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 19-21 फेब्रुवारी दरम्यान वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय 19 आणि 20 फेब्रुवारी दरम्यान राजस्थानमध्ये आणि 20-22 फेब्रुवारी दरम्यान पूर्व उत्तर प्रदेशात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह तुरळक वादळे अपेक्षित आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट आणि हिमाचल प्रदेशच्या सर्व भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस अन् विजांचा कडकडाट; अलर्ट जारी Read More »

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यातच आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये तापमानात घट झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही कडाक्याची थंडी अपेक्षित आहे. मुंबईतील सांताक्रूझ हवामान केंद्रात मंगळवार आणि बुधवारी तापमान 15 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले. तर आज तापमान 17.8 अंशांवर घसरले. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरातील अनेकांनी स्वेटर आणि बोनफायरचा सहारा घेतला. पुण्यातही थंडीची तीव्रता वाढली आहे. पुण्यातील शिरूरमध्ये आज पारा 7.4 अंशांवर घसरला. नागपूरचे तापमान 8.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. अवकाळी पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तविक, राज्यात अवकाळी पावसाचा धोका आहे. कोकणात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मुंबई आणि कोकणात तापमानात मोठी घसरण झाली आहे. मुंबईत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. अलिबागमध्ये पारा 3.3 अंशांनी घसरला असून आजचे किमान तापमान 14.1 अंशांवर पोहोचले आहे. रत्नागिरीत किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर माथेरानमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही परिस्थिती कायम आहे. थंडीचा कहर कायम राहणार आहे पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर भारतात थंडी आणि धुके आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. राज्यात अनेक दिवसांपासून थंड वारे वाहत आहेत. थंडी आणि धुक्यामुळे हवाई आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. नाशिकमध्ये 4.4 अंश तापमान नाशिकच्या निफाड तालुक्यात पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. या हिवाळ्यात हे सर्वात कमी तापमान आहे. धुळे शहरात थंडीचा कहर सुरूच आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यांतील तापमानात सातत्याने घसरण होत आहे.

Maharashtra Weather Update: कडाक्याच्या थंडीत ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर Read More »

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता

IMD Weather News:  दक्षिण भारतात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रामध्ये देखील झपाट्याने वातावरण बदलताना दिसत आहे.  बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील बहुतेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अहमदनगर, मुंबई, पुणेसह राज्यातील इतर भागात पारा घसरल्याने थंडी जाणवू लागली आहे.   आठवड्याच्या शेवटी दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात थंड वाऱ्यांनी प्रवेश केल्याने पारा सामान्यापेक्षा खाली घसरला. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर 20 डिसेंबरनंतर किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यातही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून तापमानात आणखी 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. वास्तविक उत्तर भारतातून थंड वारे महाराष्ट्रात पोहोचत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात आता किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. मात्र नवीन हवामान प्रणालीमुळे पारा चढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने काय म्हटले? IMD (पुणे) च्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या म्हणण्यानुसार, 18 डिसेंबरपासून काही दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. या आठवडय़ात किमान तापमानात चढ-उतार दिसून येतील, परंतु 18-20 डिसेंबरच्या सुमारास राज्यातील रात्रीचे तापमान सामान्यापेक्षा किंचित कमी राहील. यानंतर रात्रीच्या तापमानात पुन्हा किंचित वाढ होऊ शकते. थंडी कमी होईल! IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सामान्यपेक्षा किंचित जास्त राहील. मात्र, या काळात राज्यातील उर्वरित भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहू शकते. 20 ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यात उत्तरेकडील वारे वाहू लागतील, त्यामुळे किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. वास्तविक हे थंड वारे पश्चिम हिमालय आणि उत्तर-पश्चिम भारताच्या थंड प्रदेशातून येत आहेत. पाऊस का पडू शकतो? दुसरीकडे, हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पुढील काही आठवडे अंतर्गत महाराष्ट्रातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त आणि विदर्भ आणि मराठवाड्यात सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  वाऱ्याची दिशा बदलल्याने राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होणार आहे. ओलसर आग्नेय-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात आजपासून 20 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील आणि किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्येही गुलाबी थंडी कमी होणार आहे. या आर्द्रतेमुळे पुण्यासह दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातही तुरळक सरी पडू शकतात. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी कमी असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Weather Update: नागरिकांनो, अलर्ट जारी! मुंबईसह ‘या’ भागात बदलणार हवामान; पावसाची शक्यता Read More »