DNA मराठी

hardik Pandya

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट?

IPL 2024 : नेहमी सोशल मीडियावर चर्चित राहणारा भारतीय संघाच्या स्टार खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. तो यावेळी IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता मात्र यावेळी आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबईचा संघ पहिला संघ ठरला होता. तर आता हार्दिक वैयक्तिक आयुष्याबाबत काही धक्कादायक बातम्या समोर येत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि नताशा स्टॅनकोविक एकमेकांपासून घटस्फोट घेणार आहेत, ज्याचे संकेत नताशानेच दिले आहेत.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यातील संबंध चांगले चालले नाहीत आणि हे दोघेही एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. Reddit वर मंगळवारी कोणीतरी एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये असे लिहिले होते की, हार्दिक आणि नताशा एकमेकांपासून वेगळे होत आहेत असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, हार्दिक आणि नताशाच्या वेगळ्या होण्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नताशाने असे संकेत दिले सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवरून हार्दिक पांड्याचे आडनाव हटवले आहे. नताशा आधी पांड्या हे आडनाव वापरायची, पण तिने आता ते काढून टाकले आहे. याशिवाय तिने हार्दिकसोबतचे अनेक फोटोही डिलीट केले असून अनेक दिवसांपासून तिने एकमेकांसोबतचे फोटोही पोस्ट केलेले नाहीत. एवढेच नाही तर हार्दिकने नताशाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस आहे चार वर्षांपूर्वी लग्न झाले होते हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांनी 31 मे 2020 रोजी एकमेकांशी लग्न केले. दोघांनी कोर्ट मॅरेज केले असले तरी. वास्तविक, लग्नाच्या काही महिन्यांनंतर 31 जुलै रोजी नताशा आणि हार्दिक आई-वडील झाले. नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती. हार्दिक आणि नताशाच्या मुलाचे नाव अगस्त्य आहे.

IPL 2024 : हार्दिक पांड्याचे लग्न मोडणार, नतासा स्टॅनकोविक देणार घटस्फोट? Read More »

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण

IPL 2024 : आयपीएल 2024 साठी तयारी सूरु झाली आहे. काही दिवसापूर्वी आयपीएल 2024 साठी दुबईमध्ये मिनी लिलाव देखील झाला होता.  या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क सर्वात महाग विकला गेला. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार 22 मार्चपासून आयपीएल 2024 सूरू होणार आहे.  आयपीएल लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रेड करून आपल्या संघात समाविष्ट केले  आणि त्याला कर्णधार बनवून सर्वांना आश्चर्यचकित केले.  आता अशी चर्चा आहे की, हार्दिक पांड्याचा आयपीएलच्या पुढील मोसमातील सहभाग धोक्यात आहे. जर असा झाला तर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा एक जोरदार धक्का असेल. गुजरात टायटन्सकडून ट्रेड झालेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची फारशी शक्यता नाही. तो अजूनही दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे आयपीएलच्या मोसमातही त्याला तंदुरुस्त होणे कठीण जाईल, असे मानले जात आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असेल.  मुंबईने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली आहे. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती, परंतु मुंबई फ्रँचायझीच्या काही लोकांनी हा सर्वांच्या संमतीने घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक पंड्या खेळणार की नाही याबाबत अधिकृतरित्या अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये हा मोठा दावा केला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्सचा दोन हंगाम कर्णधार आहे. पांड्याने कर्णधार म्हणून पहिल्या सत्रात गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले. दुसरीत उपविजेती ठरली. दोन्ही वेळा पांड्याने घेतलेले निर्णय आणि त्याची फलंदाजी चमकदार होती.

IPL 2024 : मुंबईकरांना धक्का,हार्दिक पांड्या आयपीएलमधून होणार आऊट? अनेक चर्चांना उधाण Read More »

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद

T20 World Cup:  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या टी – 20 मध्ये धमाकेदार विजय मिळूवुन भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका 1-1 ने बरोबरीत राखली.  या मालिकेनंतर आता सूर्यकुमार यादव 2024 मध्ये होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून उदयास आला आहे. सध्या कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची सातत्याने चांगली कामगिरी लक्ष वेधून घेत आहे. जून 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. स्पर्धेची तयारी सुरू असताना संघाचे नेतृत्व कोण करणार या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या, ज्यांना यापूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, ते अनिश्चिततेचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीमुळे T20 संघातील नेतृत्व शून्य झाले आहे. एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याच्या दुखापतीमुळे तो खेळापासून दूर राहिला आणि त्याच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न कायम आहेत. रोहित शर्मा देखील नियमितपणे T20 सेटअपचा भाग नसल्यामुळे, निवडकर्त्यांसमोर T20 विश्वचषकासाठी कर्णधार निवडण्यात पेचप्रसंग आहे. या परिस्थितीत, सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून वचन दिले आहे, ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध T20 मालिकेत 4-1 असा विजय मिळवला. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राखली.  सूर्यकुमारचे कर्णधारपद यशस्वी ठरले आहे आणि त्याने बॅटनेही आपला फॉर्म कायम ठेवला आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अतिरिक्त दडपणाच्या परिणामाची चिंता दूर केली आहे. भारत अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मायदेशात टी-20 मालिकेसाठी तयारी करत असताना, कर्णधारपदाचा प्रश्न चर्चेत आहे.  सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकात संघाचे कर्णधारपद भूषवणार की नाही आणि केवळ तीन टी-20 मालिकेनंतर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणे हा योग्य निर्णय आहे की नाही, या निवडकर्त्यांसाठी महत्त्वाच्या बाबी आहेत.  अफगाणिस्तानविरुद्धची आगामी मालिकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

T20 World Cup: रोहित-हार्दिकला बीसीसीआय देणार धक्का; ‘या’ खेळाडूला मिळणार टीम इंडियाचा कर्णधार पद Read More »