DNA मराठी

eknath Shinde news

eknath shinde

Eknath Shinde On Uddhav Thackeray: ठाकरेंची तीन वर्षे शिव्या-शाप देण्यात गेली; एकनाथ शिंदेंचा थेट वार

Eknath Shinde On Uddhav Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून माझ्या नावाने शिव्या आणि शाप दिले जात आहेत. मी काही छेडत नाही, पण एकदा छेडलं तर मग मीही सोडत नाही, अशा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिला. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच टोला लगावत म्हटले की, पावसात जसं बेडूक उगवतात तसा रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला आहे. तिन्ही वर्षांपासून माझ्यावर शिव्या-शाप आणि आरोपच सुरु आहेत. ‘चल मेरे भाई, हात जोडता हूँ’ हे गाणं आठवतंय,” असा टोलाही त्यांनी लगावला. विश्वासघात केल्याची टीका शिंदेंनी आठवण करून दिली की, 2014 मध्ये मुंबईचं महापौरपद फडणवीसांनी अर्ध्या तासात शिवसेनेला दिलं होतं. पण नंतर जेव्हा वेळ आली तेव्हा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांचे फोनही उचलले नाहीत, असा आरोप करत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर विश्वासघात केल्याची टीका केली. मी कुणाचं ताट घेत नाही. आम्ही एक भाकर चार जण वाटून खाणारे लोक आहोत. मी ‘सोन्याचा चमचा’ कुणाला उद्देशून म्हटलं नाही. कोव्हिड काळात कोणी रुग्णांचे घास घेतले हे लोकांनी पाहिलंय. उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत शिंदे म्हणाले, या सगळ्यांना केमिकल लोचा झालाय का काय? एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना शिव्या, दुसरीकडे फडणवीस यांना बुके. इतका द्वेष का? आपल्या भूमिकेवर ठाम राहात शिंदे म्हणाले, मी छेडत नाही पण कोणी छेडलं तर सोडतही नाही. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही, आणि करणारही नाही.

Eknath Shinde On Uddhav Thackeray: ठाकरेंची तीन वर्षे शिव्या-शाप देण्यात गेली; एकनाथ शिंदेंचा थेट वार Read More »

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा

Eknath Shinde: आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य तपासणी गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. नोडल अधिकारी नेमणार यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

वारकऱ्यांना मिळणार विम्याचा लाभ अन् टोल फ्री वाहन; शिंदेंची मोठी घोषणा Read More »

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले

Eknath Shinde : मिरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC), जी मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) एक महत्त्वाची नागरी स्थानिक संस्था (ULB) आहे, आपल्या नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या, सुरक्षेसाठी व कल्याणासाठी प्रबळ वचनबद्ध आहे.  १२ लाख लोकसंख्येसाठी ३६६ शाळांचे व्यवस्थापन करणारी एमबीएमसी सुमारे १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सतर्क राहिली आहे. महाराष्ट्र शासनाने २४ ऑगस्ट २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाच्या (GR) अनुषंगाने, एमबीएमसीने विद्यार्थ्यांच्या केवळ सुरक्षेसाठीच नव्हे तर सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एमबीएमसीने ३६ शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून, सुमारे १०,००० विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले जात आहे. सततच्या देखरेखीमुळे कोणत्याही घटनेवर त्वरित कारवाई करता येते. तसेच, एमबीएमसी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व व कौशल्य चाचण्या देखील घेत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या  सुविधेचे उद्घाटन भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृहात  करण्यात आले. एमबीएमसी आयुक्त संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे आणि आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन हे देखील उपस्थित होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचा संदेश दिला की, केवळ सुरक्षा सुनिश्चित करणेच नव्हे, तर ती खरी वाटली पाहिजे. त्यांनी असे स्पष्ट केले की संपूर्ण सरकारची जबाबदारी आहे की स्थानिक संस्थांचा समावेश करून, सुरक्षेची भावना निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे.  मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट केवळ संरक्षण नव्हे तर प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना एक सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळावे, अशी भावना निर्माण करणे आहे. महापालिका आयुक्त श्री संजय श्रीपतराव काटकर यांनी विद्यार्थी कल्याणासाठी ही समग्र दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. घटनांच्या प्रतीक्षेत न राहता, एमबीएमसीच्या शाळा सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक दृष्टिकोन अवलंबला आहे. पालिका शाळांमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, १०,००० विद्यार्थ्यांचे रिअल-टाइम मॉनिटरिंग, आणि नियमित तपासणी करणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत. याशिवाय, एमबीएमसीने शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि कौशल्य चाचण्या सादर करून, १,३७,००० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार केला आहे. एमबीएमसीच्या या सुरक्षितता उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील रिअल-टाइम मॉनिटरिंगवर दिलेला भर आहे, ज्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटर (CSCC) मुळे १००० कॅमेऱ्यांचे एकाचवेळी निरीक्षण करता येते. ही सुविधा दररोज सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यरत असते, ज्यामुळे अखंड देखरेख केली जाते. एमबीएमसीने हे मॉडेल इतर शहरांमध्ये आणि खासगी शाळांमध्ये देखील वाढवण्याचे नियोजन केले आहे. भारतरत्न गानसम्राद्नी लता मंगेशकर नाट्यगृह, मिरा रोड (पूर्व) येथे आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, तसेच खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, आमदार जनेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी ऑनलाइन माध्यमातून हजेरी लावली. एमबीएमसीचा हा उपक्रम केवळ सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठीच नव्हे तर ती विद्यार्थ्यांना आणि पालकांना खरोखर जाणवावी यासाठी केलेला प्रयत्न आहे, आणि भविष्यात जबाबदार व सशक्त नागरिक घडवण्यासाठी त्याची वचनबद्धता दर्शवतो.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमबीएमसीच्या सेंट्रल स्कूल कमांड सेंटरची शहरांमध्ये पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले Read More »

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Sujay Vikhe News: महाराष्ट्र मजबूत  झाला तरच देश मजबूत होईल, मोदींच्या विकासाचे यान चंद्रावर पोहचले आहे. मात्र राहूल गांधीचे यान अद्यापही लॉंच होऊ शकले नाही. महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच होईल, कारण आता जनतेचा विश्वास फक्त मोदी गॅरेंटीवर असल्याचे प्रदिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या सभेत ते बोलत होते.    नगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. प्रा.राम शिदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आ. संग्राम जगताप, माजी अरूणकाका जगताप, आ. मोनिका राजळे, शिवसेनेचे जिल्‍हा प्रमुख बाबुशेवठ टायरवाले,भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष दिलीप भालसिंग , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, शहर अध्‍यक्ष अभय आगरकर, रिपाईचे भैलुमे यांच्‍यासह राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, रिपब्लिक पार्टी आठवले गट तथा मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.  ततपुर्वी महायुतीच्या वतीने नगर शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले. प्रभातफेरीपुर्वी डॉ.सुजय विखे पाटील यांनी शहरातील सर्व महापुरूषांना विनम्र अभिवादन केले.या रॅलीमध्ये महिला युवक, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिल्लीगेट चौकात या रॅलीचा समारोप झाला.  त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यंत्री एकनाथ शिदे म्हणाले की , ड्रामा करून कुणी निवडून येत नाही. विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा आहे. स्व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठे योगदान असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलरावांच्या   आठवणींना उजाळा दिला. त्यांचा  वारसा स्व. बाळासाहेब विखे यांची पुढे नेला,तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला.आणि सुजय विखे हा वारसा अविरत चालवत आहेत. यामुळे सुजय विखे हे सर्वांच्या सुखादुखात धावून जातात. त्यांना तरूणांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यांनी जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मोठ्या प्रभावीपणे लोकसभेत मांडले आहेत. यामुळे ज्याच्या नावातच जय आहे त्याचा पराभव अशक्य आहे. डॉ. विखे खासदार झाल्यावर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीप मध्ये सामिल होणार आहेत. यामुळे नगर जिल्ह्याचा विकास जलद गतीने होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात  इंडी आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकार ही विकासाची गाडी असून त्याला वेगवान पंतप्रधान मोदी यांचे इंजिन आहे. तर दुसरीकडे इंडी आघाडीत सर्वच स्वताला इंजिन समजतात. राहूल गांधी, उध्दव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी, असे सर्वच नेते आपल्याला इंजिन समजत असल्याने इंजिनमध्ये केवळ ड्रायवरला बसायला जागा असते. सर्वसामान्यांना इंजिनमध्ये बसता येत नाही.  राहूल सोनिया गाधीच्या इंजिन मध्ये राहूल गांधी बसतील होतील, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील होतील तर उध्दव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे असतील अशी मार्मिक टिका करून दुसरीकडे मोदींच्या विकासाच्या इंजिनला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आणि इतर मित्र पक्षांचे डबे आहेत. तिथे सर्वांना बसण्यासाठी जागा आहे. मोदींच्या गॅरंटीमध्ये सबका साथ सबका विकास हे धोरण आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ.सुजय विखे यांचा डबा मोदींच्या गाडीला जोडण्यासाठी १३ मेला मोठ्या मताधिक्याने सुजय विखे यांना मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले.तर खा. डॉ, सुजय विखे पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Sujay Vikhe News: महाविकास आघाडीचे कुणी आले तरी विजय सुजय विखेंचाच: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More »

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी

Maharashtra Politics: आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मागच्या दीड वर्षापासून चर्चेत असणारा शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर निर्णय घेणार आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागला आहे.  या निर्णयावर एकनाथ शिंदे यांची सरकार राज्यात राहणार की जाणार याचा देखील निर्णय आज होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.  20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40  आमदारासह बंड केले होते ज्यामुळे राज्यात असणारी ठाकरे सरकार कोसळली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेत राज्यात सरकार स्थापित केली होती.   मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला होता.  यासाठी त्यांनी 31 डिसेंबर 2023 ची डेटलाईन दिली होती मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली होती जी आज संपत आहे. तर दुसरीकडे सरकारला कोणताही धोका नसल्याचं भाजपकडून सांगितलं जातय. उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय काहीही आला तरी आमचं सरकार स्थिर राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांची सुनावणी घेतली आहे. कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा झालेली आहे. अपात्रतेशी संबंधित याचिकेवर आज संध्याकाळी 4 पर्यंत येऊ शकतो. कायदेतज्ज्ञांनुसार शिंदे गटाविरोधात निकाल गेल्यास मुख्यमंत्री शिंदे, त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदारांना तातडीनं राजीनामा द्यावा लागेल.   भाजप युतीकडे बहुमत असेल. काही महिन्यांपूर्वीच अजित पवारांचा गट भाजपसोबत आला आणि सत्तेत सहभागी झाला. आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागा आहे. बहुमतासाठी 145 आमदारांचा पाठिंबा गरजेचा असतो.

Maharashtra Politics : शिंदे की ठाकरे? सत्ता संघर्षात  कोण मारणार बाजी Read More »

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती

Eknath Shinde: हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांमध्ये मिरा भाईंदर महानगरपालिकेने मुंबईतील अशाच प्रकारच्या मोहिमांच्या यशाने प्रेरित होऊन सखोल स्वच्छता अभियान (Deep Clean Drive) हा उपक्रम सुरू केला आहे.  28 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आलेली ही मोहीम पुढील तीन महिन्यांत संपूर्ण दुहेरी शहरांमध्ये उलगडण्यासाठी नियोजित केलेल्या सर्वसमावेशक स्वच्छता मालिकेची सुरुवात दर्शवते. दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी नवघर हनुमान मंदिरा जवळील परिसराच्या स्वच्छतेच्या उद्घाटन मोहिमेत सक्रियपणे सहभागी झालेल्या मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. आमदार प्रताप सरनाईक आणि मा. आमदार गीता जैन यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवत शहराप्रती सामूहिक बांधिलकीवर जोर दिला.  सखोल स्वच्छता अभियान या मोहिमेचे उद्दिष्ट रस्ते आणि पदपथावरील धूळ दूर करण्याचा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि प्रेरणाचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले. मा. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. हे अनेक शुक्रवारच्या मोहिमांपैकी पहिले चिन्हांकित आहे, ज्या दरम्यान नियुक्त वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉप वरील, भिंतींवरील बिले आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील रेड स्पॉट्स संबोधित केल्याने एकूणच स्वच्छतेच्या प्रयत्नांना हातभार लागला.  मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करत मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांनी हनुमान मंदिर, इंद्रलोक नाका आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मा. मुख्यमंत्री यांनी सर्व स्तरावर कौतुक केले. मिरा भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे प्रदर्शन केले, शहर स्वच्छतेच्या तांत्रिक प्रगतीसाठी वचनबद्धतेचे प्रदर्शन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री यांनी नागरिकांशी संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका मान्य करून स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले.  मिरा भाईंदर महानगरपालिका ही गती कायम ठेवण्यास उत्सुक आहे, आगामी मोहिमेद्वारे तेथील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मिरा भाईंदर महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहणार असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन मा. आयुक्त संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या वतीने करण्यात येत आहे.  तसेच कार्यक्रमास प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सामाजिक संस्था व नागरिकांनी उपस्थिती दर्शविल्याबद्दल मा. आयुक्त यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.

Eknath Shinde:  मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात “डीप क्लिन ड्राईव्ह” मोहिमेत मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री यांची उपस्थिती Read More »

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद

Maharashtra News: अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत समशेरपुर, ता. अकोले येथील ए.टी.एम. मशिन चोरी करणारी टोळी 7,52,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 48 तासांचे आत जेरबंद केली आहे.  23 डिसेंबर 2023 रोजी रात्री 12 ते सकाळी 06.00  चे दरम्यान समशेरपुर फाटा, ता. अकोले  येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सचे गाळ्यामधील इंडिया 1 पेमेंट लि. कंपनीचे ए.टी.एम. मशिनला दोरखंड बांधुन ए.टी.एम. मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.  फिर्यादी नितीन सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अकोले पोलीस ठाण्यात भादवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 90,000 रुपये किमतीचे मशिन व त्यामधील रोख रक्कम चोरी गेलेली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समशेरपुर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासत असतांना गुन्ह्यातील आरोपी हे केळी रुम्हणवाडी मार्गे गेल्याचे दिसुन आले. पोनि दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील ए.टी.एम. मशिन हे आरोपी भरत लक्ष्मण गोडे व त्याचे इतर साथीदारांनी चोरुन नेले आणि तो त्याचे राहते घरी त्याचे इतर साथीदारांसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली.  या माहितीवरून सदर ठिकाणी जावुन गुन्हे शाखेच्या पथकाने भरत लक्ष्मण गोडे , सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे ,  सुयोग अशोक दवंगे आणि अजिंक्य लहानु सोनवणे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून  1,42,000 रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, गुन्ह्याचे वेळी वापरलेले मोबाईल व तुटलेले ए.टी.एम. मशिनसह एकुण 7,52,000  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासकामी अकोले पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशन करीत आहे.

Maharashtra News: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ATM मशिन चोरी करणारी टोळी 48 तासांचे आत जेरबंद Read More »