DNA मराठी

BMC Election

aaditya thackeray

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले

Aaditya Thackeray: मुंबईच्या रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी आता थेट मुंबईकरांच्या खिशालाच ‘ब्रेक’ लावण्याचे नियोजन सुरू आहे का? असा सवाल आमदार आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महापालिकेकडे ‘कंजेश्चन टॅक्स’ (गर्दी शुल्क) आकारण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या या ‘टॅक्स बॉम्ब’वर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. ​आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या प्रस्तावाचा समाचार घेताना विचारले की, मुंबईकडून देशाच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा जातो, मग बदल्यात मुंबईकरांना नवीन करांचा बोजा का? “एकीकडे मुंबईतील उद्योग आणि रोजगार राज्याबाहेर घालवायचे आणि दुसरीकडे इथल्या सामान्य जनतेला नवीन करांच्या जाळ्यात ओढायचे, हा भाजपचा दुहेरी डाव आहे,” असे ठाकरे म्हणाले. याआधीही रस्ते आणि सुशोभीकरणाच्या कामात घोटाळे करून मुंबईची तिजोरी रिकामी करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ​मकरंद नार्वेकर यांनी मांडलेला हा प्रस्ताव म्हणजे भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा खडा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. “रस्त्यांची दुरवस्था करणाऱ्या कंत्राटदारांना पाठीशी घालणारी भाजप जनतेला ‘टॅक्स रिफंड’ देणार का? खराब हवामानामुळे आरोग्याचे नुकसान होणाऱ्या मुंबईकरांना भरपाई मिळणार का?” असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी भाजपला कोंडीत पकडले. ‘बेस्ट’ बसची संख्या कमी करून खाजगी कंपन्यांचे खिसे भरले जात असताना आता सामान्य वाहनधारकांना लक्ष्य केले जात असल्याने मुंबईत आगामी काळात मोठा राजकीय रणसंग्राम होण्याची शक्यता आहे.

Aaditya Thackeray: टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरे भडकले Read More »

eknath shinde

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र

BMC Election: मुंबई महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नवनिर्वाचित नगरसेवकांना सामील करून आपली ताकद वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तीन आणि शरद पवार गटातील एक नगरसेवक शिंदे गटात अधिकृतपणे सामील होण्याची तयारी करत आहेत. हे चार नगरसेवक आता बीएमसीमध्ये संयुक्त विधिमंडळ गट म्हणून स्थापन केले जात आहेत. या नवीन राजकीय समीकरणांतर्गत, महायुती आघाडी बीएमसीमध्ये दोन स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करेल. भाजप स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन करेल, तर शिंदे यांची शिवसेना संयुक्त गट म्हणून नोंदणी करेल, ज्यामुळे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शरद पवार गटातील नगरसेवक एकत्र येतील. या फेरबदलानंतर, बीएमसीमध्ये शिंदे सेनेची संख्या 29 वरून 33 पर्यंत वाढेल. शिवसेनेच्या गटातील नगरसेवकांची संख्या वाढल्याने बीएमसीमधील नेतृत्व आणि महत्त्वाच्या निर्णयांवर त्यांचा प्रभाव आणखी मजबूत होईल. दरम्यान, महायुती आघाडीची एकूण संख्या आता 122 नगरसेवकांपर्यंत पोहोचली आहे. भाजपचा वाढता दबाव बीएमसीमध्ये वाढत्या शिवसेना (शिंदे गट) गटामुळे त्यांच्या मित्रपक्ष भाजपची चिंता वाढली आहे. नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने, बीएमसी धोरणात्मक निर्णयांवर आणि नेतृत्वावर शिंदे गटाचा प्रभाव आणखी मजबूत होईल. बीएमसी महापौरपद आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्वावरून दोन्ही पक्षांमध्ये आधीच संघर्ष सुरू आहे. वाढत्या ताकदीमुळे, शिंदे सेना आपला दावा अधिक आक्रमकपणे मांडू शकते, ज्यामुळे भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मुंबई बीएमसी निवडणुकीत या वर्षीचा जनादेश भाजप युतीसाठी ऐतिहासिक ठरला आहे. महायुतीने प्रचंड विजय मिळवला आणि ठाकरे कुटुंबाची जवळजवळ तीन दशकांची पकड मोडून काढली. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागा जिंकल्या, त्यापैकी एकट्या भाजपने 90 जागा जिंकल्या आणि सर्वात मोठा पक्ष बनला. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी (यूबीटी) ही निवडणूक निराशाजनक ठरली. पक्षाला मागील निवडणुकीत 84 जागांवरून 65 जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) उद्धव सेनेसोबत युती करून 53 जागा लढवूनही केवळ सहा जागा मिळाल्या.

BMC Election : एकनाथ शिंदेंचा भाजपला धाक; मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी येणार एकत्र Read More »

bmc election

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय?

BMC Election: मुंबई महापौरपदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरची औपचारिक बाब राहिलेली नाही. आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे. गुरुवारी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून, या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्तासमीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचे चित्र आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. याचे कारण स्पष्ट आहे. मुंबई महापौरपदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात गेले, तर सत्ताधारी भाजप–शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौरपदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही. याच वेळी, सत्तेबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एसटी आरक्षण आणि महायुतीची कोंडी महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता, भाजप–शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेला नगरसेवक नाही. याउलट, एसटीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक ५३ आणि १२१ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे विजयी झाले आहेत. त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता बळावते. हीच शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सत्तेचे अंकगणित हाताशी असतानाही महापौरपद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना धार देत आहे. चक्राकार पद्धत: नियम की राजकीय कवच? सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार, सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि त्यानंतर पुढील आरक्षणे ठरतील. त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. मात्र, राजकीय जाणकार वेगळे चित्र मांडतात. त्यांच्या मते, “नियम जरी स्पष्ट असले, तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात.” एससी–ओबीसी आरक्षणात फारसा संघर्ष नाही अनुसूचित जाती (एससी) किंवा इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण पडल्यास मात्र सत्तासंघर्षाची तीव्रता कमी राहील. भाजप–शिवसेना महायुती, ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गांतील नगरसेवक उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन प्रवर्गांमध्ये महापौरपदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होणार नाही. तथापि, एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक आहे, ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी ठरत आहे. संयमित भाषा, पण स्पष्ट संकेत अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणांत दिसणारी संयमित पण सूचक भाषा अनेक अर्थांनी घेतली जात आहे. “देवाच्या मनात असेल तर…” अशा वाक्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकपणे जाणवते आहे. सत्तेपासून दूर असतानाही महापौरपदाची संधी चालून येणे, हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनरुज्जीवनाचे संकेत मानले जात आहेत. एक सोडत, अनेक शक्यता गुरुवारची सोडत म्हणजे केवळ नावांची चिठ्ठी नाही, तर मुंबईच्या सत्तेचा कौल आहे. महायुतीला चक्राकार पद्धतीचा आधार आहे, तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे. शेवटी प्रश्न तोच राहतो कि महापौरपदाचा निर्णय लोकशाही बहुमत ठरवणार की आरक्षणाची चिठ्ठी? उत्तर काही तासांत समोर येईल; पण या उत्तराचे पडसाद मुंबईच्या राजकारणात दीर्घकाळ घुमत राहणार, हे नक्की.

BMC Election: आरक्षणाची चिठ्ठी ठरवणार मुंबईचा महापौर; नेमकं घडणार काय? Read More »

sanjay raut

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut on BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यामुळे आता मुंबई महापालिकेत भाजपचा पहिल्यांदा महापौर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्व गटांनी ठरवले असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे कोणत्या पदासाठी आग्रही हा त्यांचा प्रश्न त्यांचा पक्ष भाजपचा अंगवस्त्र आहेत, अमित शहा त्यांचे प्रमुख, ते त्यांच्याकडे जाऊन मागणी करतील, मात्र फडणवीस ऐकणार नाही अशी माझी माहिती आहे. त्यांनी आपले नगरसेवक बंद ठेवलेत, त्यांनी आमदार फोडले, त्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात, ते आमदार सुरतला घेऊन गेले होते. एकनाथ शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री तरी त्यांना वाटत आपले नगरसेवक पळवले जातील अशी भीती ही किती मोठी हस्यजत्रा आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे सर्वांनी ठरवलं आहे बघू काय होईल. जे नगरसेवक आहेत त्यात बरेच नवे चेहरे, ते शिवसैनिक आहेत, त्यांना वाटत भाजपचा महापौर होऊ नये त्यांना कितीही कोंडला तरी खूप साधन आहे. दळणवळणाची साधन आहे, संदेश काही जाऊ शकते. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महत्व महापौर बसू शकतो. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहे, आम्ही तथास्थ होउन पाहतोय, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा फोन झाला आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, राज्य त्यांचे तरी नगरसेवकांना कोंडून ठेवले, स्वतःला भाई म्हणून घेणारे एकनाथ शिंदेंनी नगरसेवक कोंडून ठेवले. महापौर शिवसेनेचा असतो, डूब्लिकेट शिवसेनेचा नाही, ती अमित शाह यांची सेना आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला महापौर शिवसेनेला पाहिजे, असायला हवा ते आम्ही पाहू, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली. 29 नगरसेवक कोंडले तो मराठी अस्मितेचा कोंडमारा, एकनाथ शिंदे सोडले तर हे कोणालाच फरक पडणार नाही.

Sanjay Raut on BMC Election : भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, खासदार राऊत असं का म्हणाले? Read More »

maharashtra election comission

BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

BMC Election: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक २०० ते २०६ साठी टपाली मतदानाची जबाबदारी निवडणूक आयोगावर होती. आयोगाने टपाली मतदानासाठी परेल भोईवाडा मराठी उ. प्रा. शाळा संकुल, परेल, मुंबई या ठिकाणी केंद्र ठरवले, तरी व्यवस्थापन अपूर्ण असल्याचे दिसून आले. मतदानाचा काळ १०, ११ व १२ जानेवारी ठरला होता, तरीही आयोगाने मतदारांसाठी स्पष्ट सूचना देण्यास दुर्लक्ष केले. टपाली मतपत्रिका संबंधित प्रभागाच्या मतदान पेटीत टाकणे अपेक्षित होते, पण आयोगाच्या देखरेखीअभावी काही लिफाफे चुकून अन्य प्रभागात पडले. या घाईगडबडीमुळे मतमोजणीच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली, ज्यासाठी आयोगाने तपासणी करावी लागली. टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून बाहेर काढून प्रभागनिहाय तपासणी करणे ही आयोगाच्या पूर्व नियोजनातील त्रुटी दर्शवते. आयोगाच्या अपूर्ण नियोजनामुळे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना तातडीने उपस्थित राहण्याचे आवाहन करावे लागले, जे अनावश्यक गोंधळाचे कारण ठरले. मतमोजणी प्रक्रियेची पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आयोगाने अतिरिक्त उपाययोजना करावी लागली. आयोगाने घाईगडबडी व नियोजनाच्या कमतरतेमुळे तयार झालेल्या परिस्थितीचा योग्य तो आढावा घेणे आवश्यक होते. या त्रुटींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले असून, आयोगाच्या नियोजन व देखरेखीवर टीका होत आहे.

BMC Election: टपाली मतदान प्रक्रियेत गोंधळ; निवडणूक आयोगाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह Read More »

mns

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक

BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. “हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे. नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

BMC Election : राज्यभाषा मराठी असताना गुजराती प्रचार का? मनसे आक्रमक Read More »

thackeray

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध

Raj Uddhav Thackeray Interview : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत नुकतीच चित्रित झाली आहे. ही ‘दणदणीत आणि खणखणीत’ मुलाखत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी घेतली. या मुलाखतीचा टीझर ‘सामना’च्या अधिकृत X हँडल (@SaamanaOnline) वर शेअर करण्यात आला आहे. टीझरमध्ये राज ठाकरे म्हणतात, “राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये!” तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराच्या गोष्टी करू नयेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीला विशेष महत्त्व आहे. मुलाखतीचा पहिला भाग गुरुवार, 8 जानेवारी 2026 रोजी ‘सामना’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित होणार आहे. ही संयुक्त मुलाखत ठाकरे बंधूंच्या राजकीय एकत्र येण्याचे प्रतीक मानली जात आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने तसेच भाजप – शिवसेना शिंदे गट युतीसह आणि काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Raj Uddhav Thackeray Interview : राज्यकर्त्याचे प्रेम हे…, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध Read More »

bjp

BMC Election BJP First List :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा संपूर्ण लिस्ट

BMC Election BJP First List : मुंबई महानगरपालिका साठी सध्या जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना शिंदे गटासोबत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील मनसेसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित सोबत आघाडीची घोषणा केली आहे. तर आता भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रभाग क्रमांक 31 मधून मनिषा यादव तर प्रभाग क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर आणि प्रभाग क्रमांक 16 मधून श्वेता कोरगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजप उमेदवारांची पहिली यादी 1. वॉर्ड क्रमांक – २ – तेजस्वी घोसाळकर 2. वॉर्ड क्रमांक ७ – गणेश खणकर 3. वॉर्ड क्रमांक १० – जितेंद्र पटेल 4. वॉर्ड क्रमांक १३ – राणी त्रिवेदी 5. वॉर्ड क्रमांक १४ – सीमा शिंदे 6. वॉर्ड क्रमांक १५ – जिग्ना शाह 7. वॉर्ड क्रमांक १६ – श्वेता कोरगावकर 8. वॉर्ड क्रमांक १७ – शिल्पा सांगोरे 9. वॉर्ड क्रमांक १९ – दक्षता कवठणकर 10. वॉर्ड क्रमांक २० – बाळा तावडे 11. वॉर्ड क्रमांक २३ – शिवकुमार झा 12. वॉर्ड क्रमांक २४ – स्वाती जैस्वाल 13. वॉर्ड क्रमांक ३१ – मनिषा यादव 14. वॉर्ड क्रमांक ३६ – सिद्धार्थ शर्मा 15. वॉर्ड क्रमांक ३७ – प्रतिभा शिंदे 16. वॉर्ड क्रमांक ४३ – विनोद मिश्रा 17. वॉर्ड क्रमांक ४६ – योगिता कोळी 18. वॉर्ड क्रमांक ४७ – तेजिंदर सिंह तिवाना 19. वॉर्ड क्रमांक ५२ – प्रीती साटम 20. वॉर्ड क्रमांक ५७ – श्रीकला पिल्ले 21. वॉर्ड क्रमांक ५८ – संदीप पटेल 22. वॉर्ड क्रमांक ५९ – योगिता दाभाडकर 23. वॉर्ड क्रमांक ६० – सयाली कुलकर्णी 24. वॉर्ड क्रमांक ६३ – रुपेश सावरकर 25. वॉर्ड क्रमांक ६८ – रोहन राठोड 26. वॉर्ड क्रमांक ६९ – सुधा सिंह 27. वॉर्ड क्रमांक ७० – अनिश मकवानी 28. वॉर्ड क्रमांक ७२ – ममता यादव 29. वॉर्ड क्रमांक ७४ – उज्ज्वला मोडक 30. वॉर्ड क्रमांक ७६ – प्रकाश मुसळे 31. वॉर्ड क्रमांक ८४ – अंजली सामंत 32. वॉर्ड क्रमांक ८५ – मिलिंद शिंदे 33. वॉर्ड क्रमांक ८७ – महेश पारकर 34. वॉर्ड क्रमांक ९७ – हेतल गाला 35. वॉर्ड क्रमांक ९९ – जितेंद्र राऊत 36. वॉर्ड क्रमांक १०० – स्वप्ना म्हात्रे 37. वॉर्ड क्रमांक १०३ – हेतल गाला मार्वेकर 38. वॉर्ड क्रमांक १०४ – प्रकाश गंगाधरे 39. वॉर्ड क्रमांक १०५ – अनिता वैती 40. वॉर्ड क्रमांक १०६ – प्रभाकर शिंदे 41. वॉर्ड क्रमांक १०७ – नील सोमय्या 42. वॉर्ड क्रमांक १०८ – दिपिका घाग 43. वॉर्ड क्रमांक १११ – सारिका पवार 44. वॉर्ड क्रमांक ११६ – जागृती पाटील 45. वॉर्ड क्रमांक १२२ – चंदन शर्मा 46. वॉर्ड क्रमांक १२६ – अर्चना भालेराव 47. वॉर्ड क्रमांक १२७ – अलका भगत 48. वॉर्ड क्रमांक १२९ – अश्विनी मते 49. वॉर्ड क्रमांक १३५ – नवनाथ बन 50. वॉर्ड क्रमांक १४४ – बबलू पांचाळ 51. वॉर्ड क्रमांक १५२ – आशा मराठे 52. वॉर्ड क्रमांक १५४ – महादेव शिगवण 53. वॉर्ड क्रमांक – १७२ – राजश्री शिरोडकर 54. वॉर्ड क्रमांक – १७४ – साक्षी कनोजिया 55. वॉर्ड क्रमांक १८५ – रवी राजा 56. वॉर्ड क्रमांक १९० – शितल गंभीर देसाई 57. वॉर्ड क्रमांक १९५ – राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 58. वॉर्ड क्रमांक १९६ – सोनाली सावंत 59. वॉर्ड क्रमांक २०७ – रोहिदास लोखंडे 60. वॉर्ड क्रमांक २१४ – अजय पाटील 61. वॉर्ड क्रमांक २१५ – संतोष ढोले 62. वॉर्ड क्रमांक २१८ – स्नेहल तेंडुलकर 63. वॉर्ड क्रमांक २१९ – सन्नी सानप 64. वॉर्ड क्रमांक २२१ – आकाश पुरोहित 65. वॉर्ड क्रमांक २२६ – मकरंद नार्वेकर 66. वॉर्ड क्रमांक २२७ – हर्षिता नार्वेकर

BMC Election BJP First List :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा संपूर्ण लिस्ट Read More »

devendra fadnavis

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड घडली असून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून देखील ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. तर दुसरीकडे या युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले, “शिया आणि युक्रेन एकत्र आल्यासारखे प्रचार केला जात आहे, झेलेन्स्की आणि पुतिन बोलत आहेत, त्यांचे अस्तित्व शोधणारे पक्ष, त्यांचे अस्तित्व गमावलेले पक्ष, ज्यांनी वारंवार भूमिका बदलून स्वतःबद्दल अविश्वास निर्माण केला आहे असे दोन पक्ष एकत्र आले तर काय फरक पडेल? हे दोन्ही पक्ष त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या लोकांनी महायुती सरकारचा विकास पाहिला आहे. मुंबई आमच्यासोबत आहे, मुंबई आमच्यासोबत राहील आणि महायुती बीएमसी निवडणुकीत जिंकेल.” फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे हे खूप निराश व्यक्ती आहेत, म्हणून मला वाटते की त्यांच्या शब्दांना महत्त्व देऊ नये. तसेच मी हिंदुत्ववादी आहे संपूर्ण जगाला माहिती आहे असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज यांनी युतीची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्ष एकत्र राहण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला (यूबीटी) फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, तर मनसेला यश मिळाले नव्हते.

Devendra Fadnavis on Shivsena MNS Alliance : मी हिंदुत्ववादी, ठाकरे बंधू एकत्र पण फरक पडणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

election

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा

BMC Election: राज्यात महानगरपालिकेच्या निवडणूका जाहीर होण्यापूर्वीच मुंबई महानगरपालिका देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या मतदारयादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता. मतदार याद्यांतील घोळ आणि प्रभागाच्या तोडफोडीवरून मनसे नेते बाळा नांदगावकर चांगलेच आक्रमक झालेत. मतदार यादीतील सगळ्या त्रुटी जोपर्यंत दूर होत नाही तोवर निवडणूक घेऊ नका. अशी मागणी देखील त्यांनी केली. एका मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार आहेत. ज्या मतदारांची नावं तीन ते चार ठिकाणी नोंदवली गेलीत. आता निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत. मतदारयादीत त्रुटी असल्याचं मान्य केलंय. मतदारयाद्यांत 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. मतदारयादीत जी नाव दुबार आहेत अशी नाव हटवण्यासाठी महानगरपालिकेने निवडणूक आयोगाने वेळ मागितला असल्याची देखील माहिती आहे. त्याचप्रमाणे मतदारयादीत एकाच व्यक्तीच नाव हे एक-दोन नव्हे तर तर 103 वेळेस असल्याचं देखील महानगरपालिकेने सांगितलंय. गेल्या अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला दावा खरा ठरलाय. याबाबत त्यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्र देखील देण्यात आलं होतं. 4 लाख 33 मतदाराची नाव दुबार नोंदवली गेल्यानं हि संख्या 11 लाखांवर गेली. नोंदवल्या गेलेल्या बनावट मतदाराची इत्यंभूत माहिती नसल्यानं प्रशासन यासाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. 5 डिसेंबरपर्यंत हि मोहीम चारणारे असून निवडणूक वार्डांच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही मोहीम राबवणार आहेत.

BMC Election: मुंबई महानगरपालिकेत तब्बल 11 लाख दुबार मतदार!; निवडणूक आयोगाचा खुलासा Read More »