Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा
Team India: भारताने दमदार कामगिरी करत आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने 147 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे तिलक वर्मा, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने साध्य केले. बीसीसीआयकडून 21 कोटी रुपयांचे बक्षीस आशिया कप विजयानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी 21 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आशिया कपमध्ये भारताचे वर्चस्व भारताने आतापर्यंत 9 वेळा आशिया कप जिंकला आहे, ज्यामध्ये 7 एकदिवसीय आणि 2 टी-20 जेतेपदांचा समावेश आहे. या कामगिरीमुळे भारत या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ बनला आहे. श्रीलंकेने 6 वेळा आणि पाकिस्तानने 2 वेळा विजेतेपद जिंकले आहे. कुलदीप यादवची शानदार कामगिरी फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 146 धावा केल्या. साहिबजादा फरहान आणि फखर झमान यांनी 84 धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर त्यांची फलंदाजी कोसळली. कुलदीप यादवने चार बळी घेत पाकिस्तानला 146 धावांवर बाद केले. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तिलक आणि दुबे यांची स्फोटक फलंदाजी भारताकडून तिलक वर्माने शानदार खेळी केली, 53 चेंडूत 69 धावा (तीन चौकार आणि चार षटकार) केल्या. शिवम दुबेने 22 चेंडूत 33 धावा (दोन चौकार आणि दोन षटकार) केल्या, ज्यामुळे भारताला लक्ष्य सहज गाठता आले.
Team India : Asia Cup नंतर भारतीय संघ मालामाल, बीसीसीआयकडून मोठी घोषणा Read More »


