DNA मराठी

#महाराष्ट्र

sawedi land scam game of fake documents complaint to the superintendent of police

“संपत्ती हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ” पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

अहिल्यानगर :Sawedi land scam – जमिनीच्या वादातून बनावट दस्तऐवज तयार करून संपत्तीवर बेकायदेशीर मालकी हक्क सांगण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुणे जिल्ह्यातील खराडी येथील रहिवासी कासम अब्दुल अजीज यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या भावाच्या नावाने दिनांक 07 जून 1991 रोजी बनावट अर्ज व दस्तऐवज तयार करून नोंदणी कार्यालयात दाखल करण्यात आला. संबंधित नोंद 2154/32 या क्रमांकाखाली दाखल असून, त्यावर मृत व्यक्तीच्या नावाची सही करण्यात आल्याचे आढळते. मात्र, त्या तारखेला संबंधित व्यक्तीचे निधन झालेले असल्याने अशी सही करणे शक्यच नसल्याचे अर्जदारांनी स्पष्ट केले आहे. अर्जदारांच्या मते, मृत व्यक्तीच्या नावाने दस्तऐवज तयार होणे हे केवळ गंभीर गैरप्रकार नसून, शासकीय यंत्रणेतील काहींच्या संमतीशिवाय अशा प्रकाराला मूळच मिळणे अशक्य आहे. त्यामुळे बनावट दस्तऐवज तयार करणारे, त्यांना पाठबळ देणारे तसेच या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर फौजदारी गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, जमीन हडपण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दस्तऐवजांच्या सत्यतेची तपासणी करून दोषींना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असेही तक्रारदारांनी नमूद केले आहे.

“संपत्ती हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा खेळ” पोलिस अधीक्षकांकडे तक्रार Read More »

ahmednagar fake land documents case district collector complaint

महसूल फेरफारावर संशय: अर्जदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अहिल्यानगर  :अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील तालुक्यातील सर्व्हे नं. २१५/८ब या जमिनीबाबत खोटे व बनावट दस्त तयार करून मालकी हक्क मिळविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारस अब्दुल अजीज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दाखल केली आहे,  य अप्र्कारांची चौकशी करून  दोषींवर कठोर कारवाईची मागणी कारस अब्दुल अजीज केली आहे. प्रकरणाची पार्श्वभूमी अर्जदाराच्या वडिलांच्या व भावाच्या नावे असलेली मिळकत कायमस्वरूपी कुटुंबाच्या ताब्यात होती. मात्र ३१ ऑक्टोबर १९९१ रोजी बनावट खरेदीखताचा दस्त तयार करण्यात आल्याचा संशय त्यांनी वेक्त करत. त्यानंतर २१ ऑगस्ट १९९२ रोजी “चूक दुरुस्ती लेख” दस्त बनवत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे,या दस्तात अर्जदाराची बनावट सही दाखवण्यात आली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, “मी कधीही असा दस्त केला नाही किंवा त्यावर सही दिलेली नाही. हा प्रकार पूर्णपणे खोटा व बनावट आहे.” महसूल दप्तरी गंभीर विसंगती अर्जदाराने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत फेरफार क्र. १४६७६ मंजूर दि. ०३/०८/१९९२ यावर विशेष लक्ष वेधले आहे. हा फेरफार तहसिलदार नगर यांच्या आदेश एसआर१६/९२, दि. १३/०७/१९९२ नुसार झाला. तक्रारीनुसार, या वाटपाप्रमाणे ७/१२ वेगळे नोंदवले गेले. मात्र वाटपाप्रमाणे खरेदीखतात संबंधितांची नावे दाखल नाहीत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की खरेदी दस्तातील संबंधितांना अगोदरच माहिती कशी मिळाली?या विसंगतीवरून महसूल दप्तरातील फेरफार हे संशयास्पद असल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. शासनाची दिशाभूल करून जमिनी बळकावण्याचा कट अर्जदाराचा आरोप आहे की खोट्या कागदपत्रांच्या आधारे महसूल खात्याची दिशाभूल करण्यात आली असून, नोंदीत फेरफार करून कोट्यावधीची मालमत्ता बळकावण्याचा कट रचण्यात आला आहे. हा प्रकार केवळ बनावट दस्तापुरता मर्यादित नसून, संपूर्ण संगनमताचा भाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढे काय होऊ शकते? या तक्रारीची चौकशी जिल्हाधिकारी स्तरावर सुरू होण्याची शक्यता आहे. महसूल विभागाच्या नोंदी, फेरफार मंजुरी आदेश, ७/१२ उतारे आणि खरेदीखत यांची सविस्तर चौकशी करून कागदपत्रे खरी की बनावट हे स्पष्ट होणार आहे.दोषींविरुद्ध पुरावे ठोस आढळल्यास जिल्हाधिकारी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेल्यास दोषींना कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. वारसांचा संताप गेल्या काही वर्षांत अहिल्यानगर जिल्ह्यात खोटे कागदपत्रे व महसूल फेरफार करून जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले असल्याची चर्चा आहे. अशा घटनांमुळे प्रामाणिक प्लॉट आणी जमीनमालकांत असंतोष पसरला आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांत त्वरित व कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महसूल फेरफारावर संशय: अर्जदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव Read More »

sawedi land scam kind officer apologizes for mistak

चुका करूनही अधिकारी दयावान? | जमिनीचे वाटप व चुका-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह | अहिल्यानगर बातमी

जमिनीचे वाटप, चुका-दुरुस्ती आणि शंका निर्माण करणारी प्रक्रिया Sawedi land scam – अहिल्यानगर जिल्ह्यात जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित वादविवाद, चुक दुरुस्ती आणि अभिलेखातील फेरफार या मुद्द्यांवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नोंदींमधील तफावत आणि विसंगतीमुळे प्रशासनावरील विश्वासार्हता डळमळीत होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चुकांवर चुकांची भरया प्रकरणात सुरवातीला चूक दुर्स्ठी लेख समोर आला नाही मात्र या प्रकरणाला वाचता झाल्यानंतर अप्पर अधिकारी यांच्याडे तो सदर झाला, १३ जुलै १९९२ रोजी झालेल्या जमिनीच्या वाटपाची नोंद आहे. मात्र, २७ ऑगस्ट १९९२ रोजी झालेल्या चुक दुरुस्तीत हीच माहिती हि मुळ खरेदी खाताशी सुसंगत नाही त्यामुळे  यावरही शंका निर्माण होते, उदाहरणार्थ, सर्व्हे नं. २४५/वर ०.६३ हे.आर. क्षेत्रफळ वडील अब्दुल अजीज डायाभाई यांच्या नावावर दिसते. पण वाटपात मात्र सर्व्हे नं. २४९/बर चे क्षेत्र मुलगा डायाआई अब्दुल अजीज यांच्या नावावर दाखवले आहे. ही विसंगती गंभीर शंका निर्माण करत आहे. सूचीची दोन रूपे!सूची क्र. २ मध्ये हस्तलिखित स्वरूप आणि प्रिंटेड स्वरूप यामध्ये स्पष्ट फरक आढळतो. सरकारी कामकाजासाठी मागणी केली असता प्रिंटेड प्रत सादर केली जाते; मात्र अभिलेखात हस्तलिखित सूची नोद  घेताना दिसते. एकाच दस्तऐवजाची दोन भिन्न स्वरूपे कशी,  हा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय. फेरफारांच्या कहाण्या नित्याच्याजमिनीच्या नोंदींमध्ये मूळ अभिलेख, त्यानंतरची चुक दुरुस्ती आणि नंतर सादर होणारी कागदपत्रे यामध्ये विसंगती आढळणे ही अपवादात्मक बाब नाही. अनेकदा हेतुपुरस्सर फेरफार होतो का, असा संशय मुळजमीन मालकांच्या वारसांना आहे, धोक्याची घंटानोंदींमध्ये एका बाजूला वडिलांचे नाव, तर दुसऱ्या बाजूला मुलाचे नाव दिसणे; हस्तलिखित आणि प्रिंटेड सूचीतील फरक — या चुका केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर प्रशासनालाही अडचणीत टाकतात. यामुळे न्यायालयीन लढाया, वाद आणि सामाजिक तणाव वाढत आहे, शेतकऱ्यांचा विश्वास धोक्यातआजच्या घडीला रेकॉर्ड ऑफ राईट्स व ७/१२ उतारे शेतकऱ्यांचे गीता, कुरण आणि बायबल मानले जाते. पण जर ह्याच कागदपत्रांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह लागले, तर शेतकऱ्यांचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होणार हे निश्चित. मूलभूत प्रश्नजमिनीच्या प्रकरणात चुका दुरुस्त करायच्या की लपवायच्या?हा प्रश्न अधिकाधिक टोकदार होत आहे. जमिनीचे प्रकरण आर्थिक व भावनिक दृष्ट्या संवेदनशील असल्याने, प्रशासकीय ढिसाळपणा केवळ वादग्रस्तच नाही तर धोकादायकही ठरू शकतो. मी किती दयावान असे असतानाही अधिकाऱ्यांची भूमिका मात्र वेगळीच दिसते. “मी किती दयावान आहे हे दाखवायचे प्रयत्न आम्ही करत आहोत; खरेदी कोणी केली याने काय फरक पडतो? शेवटी नोंद करायची ती आमचीच आहे”, अशा थाटात अधिकाऱ्यांची वक्तव्ये ऐकू येतात. यावरून स्पष्ट होते की या प्रकरणात गोंधळ कमी करण्याऐवजी तो अधिक वाढवण्याकडेच प्रशासनाचा कल आहे.

चुका करूनही अधिकारी दयावान? | जमिनीचे वाटप व चुका-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह | अहिल्यानगर बातमी Read More »

malegaon bomb blast accused dna marathi

१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त;  काय होते प्रकरण

मुंबई | प्रतिनिधी – २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव (जि. नाशिक) येथील भिक्कू चौकात रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या स्फोटात सहा नागरिक ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. न्यायालयाने निकालात म्हटलं आहे की, आरोपींच्या सहभागाबाबत कोणतेही “विश्वसनीय, प्रत्यक्षदर्शी आणि स्पष्ट पुरावे” सादर करण्यात आले नाहीत. घटनेचा आढावा २९ सप्टेंबर २००८ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मालेगाव शहरातील भिक्कू चौकाजवळील मशिदीच्या परिसरात एक मोटारसायकल स्फोटात उद्ध्वस्त झाली. घटनास्थळी झालेल्या स्फोटामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले. स्फोटासाठी वापरलेली LML फ्रीडम मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले. तपासात या गाडीचा संबंध साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी असल्याचे सांगण्यात आले. तपासाची पार्श्वभूमी प्रारंभी तपास महाराष्ट्र ATS ने केला. त्यावेळी स्व. हेमंत करकरे हे ATSचे प्रमुख होते. या तपासात प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी व सुधाकर द्विवेदी यांना अटक करण्यात आली. २०११ साली तपासाची सूत्रं NIA (National Investigation Agency) कडे सोपवण्यात आली. या प्रकरणात UAPA, आयपीसी, शस्त्र कायदा आणि MCOCA अंतर्गत गुन्हे दाखल होते. मात्र २०१६ मध्ये न्यायालयाने MCOCA अंतर्गतचे आरोप बाद केले. न्यायालयीन प्रक्रिया व निकाल तब्बल ३२३ साक्षीदारांची साक्ष घेतल्यानंतर आणि अनेक वर्षांतील सुनावणीनंतर ३१ जुलै २०२५ रोजी निकाल देण्यात आला. विशेष NIA न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी स्पष्ट केलं की – “स्फोट घडवण्यात या आरोपींचा थेट सहभाग असल्याचे सुस्पष्ट व निर्विवाद पुरावे सादर करण्यात आले नाहीत. कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरून दोषी ठरवता येत नाही.” न्यायालयाने नमूद केले की: स्फोटात वापरलेली मोटरसायकल प्रज्ञा ठाकूर यांची असल्याचा ठोस पुरावा नव्हता. चेसिस व इंजिन क्रमांक पुसण्यात आलेले होते, त्यामुळे मालकीचे निश्चितीकरण शक्य नव्हते. RDX वापरण्यात आल्याचे सिद्ध झाले असले, तरी ते कोठून आणले गेले, याचे मूळ उघडकीस आले नाही. काही साक्षीदारांच्या साक्षी प्रशिक्षित तपास संस्थांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाचे निर्देश स्फोटात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ₹२ लाख व जखमींना ₹५०,००० भरपाई देण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत. प्रतिक्रिया व राजकीय प्रतिक्रिया प्रज्ञा सिंह ठाकूर (सध्या भाजपच्या खासदार) यांनी म्हटलं – “भगवा आतंकवाद” ही संकल्पनाच खोटी होती. मला खोट्या प्रकरणात गोवलं गेलं. आज देवाने सत्य समोर आणलं. AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना प्रश्न उपस्थित केला “जर आरोपी निर्दोष असतील, तर मग त्या सहा लोकांना मारलं कोणी? तपासाच्या सुस्पष्ट दिशेच्या अभावामुळे मुस्लिम समाजावर अन्याय झाला.” प्रकरणाचा सामाजिक आणि कायदेशीर संदर्भ मालेगाव स्फोट प्रकरणानंतर देशात ‘भगवा आतंकवाद’ ही संज्ञा चर्चेत आली. काही संघटनांच्या कार्यकर्त्यांवर दहशतवादाचा आरोप होणं ही त्या काळात अभूतपूर्व घटना होती. मात्र या प्रकरणात दोष सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली, हे या निकालावरून स्पष्ट होतं. त्यामुळे न्यायप्रणालीवरील जनतेचा विश्वास वाढवण्याबरोबरच तपास संस्थांच्या कामकाजावर पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. निष्कर्ष १७ वर्षांचा प्रदीर्घ न्यायालयीन प्रवास, शेकडो साक्षीदार, तांत्रिक व पुराव्यांच्या तपासातून अखेर सर्व आरोपींना दोषमुक्त ठरवण्यात आलं आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबियांच्या न्यायप्राप्तीच्या अपेक्षांना धक्का बसला आहे, तर दुसरीकडे आरोपींच्या बाजूने हा निकाल न्याय मिळाल्याचं प्रतीक ठरतो. मात्र, ही घटना आणि त्यानंतरची तपास यंत्रणांची कार्यपद्धती याकडे सरकार व न्यायप्रणालीला नव्याने पाहण्याची गरज आहे.

१७ वर्षांनंतर मालेगाव स्फोटातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त;  काय होते प्रकरण Read More »